मीडियागिरीचा हंगामा
लहान मुलांच्या लपाछपीत किंवा चोरशिपाई खेळात भिडू `सापडला' की त्याच्या पाठीत धपाटा घालतात, त्याची हुर्यो करतात; आणि मग त्याच्यावर `राज्य' येते. हे सगळे आळीपाळीने चालते. प्रत्येक भिडू, किंवा गट, किंवा संघ वेगळे काही करत नाही. एखाद्यावर कधीच राज्य येत नाही असे होत नाही. कौशल्य - कसब - चपळाई थोडी कमीजास्त असेल; पण राज्य कधीतरी येतेच; परंतु एखाद्यावर राज्य आले, किंवा धपाटा मारून त्याच्यावर उलटवले की त्याला रडकुंडीला आणण्याइतके चिडवायचे; - जसे काही आपण कधीच चुकणार नाही!
श्री नरेंद्र मोदी प्रकरणात आडवाणींसह इतर सर्वच पक्षांनी जे अकांडतांडव चालविले आहे ते पाहिल्यावर त्या बालिश खेळातल्या धपाटेगिरीची आठवण होते. श्री.नरेंद्र मोदी हे त्यांच्या पक्षाचे निवडणूक प्रमुख झाले, यावर त्यांना `संपविण्या'साठी इतर गिधाडांनी किती दगड उगाळावेत! आडवानी तर त्यांच्या पक्षात सर्वज्येष्ठ नेता आहेत. त्यांनीही केलेला बालिशपणा, म्हातारपण आणि लहानपण सारखेच असते असे मानून सोडता येईल. परंतु शेजारघरच्या मुलाने परजातीच्या वधूशी लग्न ठरविले, म्हणून हा शेजार सोडून दूर राहायला जाण्यासारखे वर्तन नीतीशकुमार व कोण ते जदयू वाले करू लागले. श्री.मोदी हे त्यांच्या पक्षात निवडणूक प्रमुख झाले याबद्दल इतरांनी काय करू नये याचा वस्तुपाठ सध्या सर्व पक्ष देत आहेत.
श्री.नरेंद्र मोदी हे पापी - अपराधी - खुनी वगैरे असल्याचा गहजब करणाऱ्यांनी भारतीय जनतेला काही कळतच नाही असे गृहीत धरले आहे. मोदींचा अपराध ठरविण्यास भारतीय न्यायालये सक्षम नाहीत काय? कदाचित न्यायालयीन मर्यादा असल्यामुळेही मोदींवरचे आरोप सिद्ध होत नसतील; परंतु म्हणून तो अधिकार तिस्ता सेटलवाड, नीतीशकुमार, सोनियाजी, मायावती, लालूजी अशांना कोणी दिला? मोदी इतके अपराधी असूनही गुजरात त्यांना तीनदा निवडून देते इतकी कृतघ्न-क्रूर आहे काय? इथे नरेंद्र मोदी दोषी की निर्दोषी, किंवा पदाला योग्य-अयोग्य हे ठरविण्याचा मुद्दाच नाही. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे मूल्यांकन, विकासाचे चित्र, निधडे व्यक्तिमत्त्व वगैरे खरे-खोटे हे त्यांचा पक्ष ठरवेल. उद्या निवडणुकीत मतदार ठरवतील. जर जनता ही सार्वभौम आहे, तर निवडून येणाऱ्या नेत्याविषयी कोणत्या थराला जायचे याचे भान हवे.
आडवानींचे राजीनामा प्रकरण हे तर नाटक किंवा उतावीळपणा ठरला, परंतु तोही खेळ आजपर्यंत कितीतरी जणांनी केला. अगदी एकाही पक्षाचा अपवाद नाही. म.न.से. या आधीच फुटीर गटातूनसुद्धा कालपरवा काहीजण फुटले. काँगेस तर सुभाषबाबू-आंबेडकर यांच्यापासून फुटतच आहे. शरद पवार तर त्यात माहीर मानावेत, पण त्यांच्याही इवल्याशा राष्ट्नीय पक्षातून सदाशिवराव मंडलीक गेले. हिंदू भडक अतिरेकी हे जर भाजप प्रणित जातीयवादी असतील तर नक्षलवाद्यांचे पाप कोणत्या डाव्या हाताचे? नीतीशकुमारांचा पक्षच जनता दल (यू) म्हणजे `त्या' जनता पक्षाची जी शकले झाली त्यापैकी एक. अशा साऱ्या स्थितीत या सर्वांनी मोदी-आडवाणींना त्यांच्या राजीनाम्यावरून फुटीच्या भेगेवरच उभे करावे हे खरोखरीच अजब! पक्ष तर आडवानींनी सोडला नाही. ज्यांनी तो यापूर्वी सोडला, त्यांची (दुर्)दशा सांगण्यास शंकरसिंग वाघेला, कल्याणसिंग, उमा भारती वगैरे आहेत. चिदंबरम्, सुशीलकुमार यांनीही तळयात-मळयात करून झाले. तात्पर्य असे की आपली चिखलवस्त्रे न झाकता दुसऱ्यावरच्या शिंतोड्यास हसावे असे चालले आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की न व्हावेत याचा निर्णय या वाचाळ नरवीरांनी करण्याचा नाही. ते झालेच तर आणि तरीही; त्यांना गुन्हेगार म्हणून मीडिया डोक्यावर घेणाऱ्यांनी, आजच्या लोकसभेत २७४ खासदारांवर गुन्हे दाखल आहेत याची तरी नोंद घ्यावी. हे सगळे धर्मनिरपेक्ष असल्यामुळे गुन्हेगार चालू शकतात असे आमची पवित्र घटना सांगत असेल? त्यांच्याबाबतीत सगळे धर्मनिरपेक्ष नेते स्वत: मनमोहनसिंग असल्याप्रमाणे शून्यमनस्क असतात. किंवा तुरुंगातील पक्क्या सिद्धहस्त गुन्हेगारांना राखी बांधायला जातात.
श्री.नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री बनणे अद्यापि फार दूर आहे. मुळात त्यांचा पक्ष, आघाडीसह सत्तेवर येण्याची शाश्वती नाही. पण राहुल गांधी अथवा सध्याच्या `स्वप्नाळू' नेत्यांपैकी कोण आला तर त्यास मोदींचा पर्याय म्हणून कसा स्वीकारावा असा पेच जनतेपुढे आहे. या सगळयाचा साकल्याने, गांभीर्याने, जबाबदारीने विचार करून या मंडळींनी मीडियागिरी करायला हवी. त्याऐवजी असल्या उथळ भिरमिट वावटळीने जनता हतबल होईल; मग कसली महासत्ता अन् कशाचा तरुण देश!
लहान मुलांच्या लपाछपीत किंवा चोरशिपाई खेळात भिडू `सापडला' की त्याच्या पाठीत धपाटा घालतात, त्याची हुर्यो करतात; आणि मग त्याच्यावर `राज्य' येते. हे सगळे आळीपाळीने चालते. प्रत्येक भिडू, किंवा गट, किंवा संघ वेगळे काही करत नाही. एखाद्यावर कधीच राज्य येत नाही असे होत नाही. कौशल्य - कसब - चपळाई थोडी कमीजास्त असेल; पण राज्य कधीतरी येतेच; परंतु एखाद्यावर राज्य आले, किंवा धपाटा मारून त्याच्यावर उलटवले की त्याला रडकुंडीला आणण्याइतके चिडवायचे; - जसे काही आपण कधीच चुकणार नाही!
श्री नरेंद्र मोदी प्रकरणात आडवाणींसह इतर सर्वच पक्षांनी जे अकांडतांडव चालविले आहे ते पाहिल्यावर त्या बालिश खेळातल्या धपाटेगिरीची आठवण होते. श्री.नरेंद्र मोदी हे त्यांच्या पक्षाचे निवडणूक प्रमुख झाले, यावर त्यांना `संपविण्या'साठी इतर गिधाडांनी किती दगड उगाळावेत! आडवानी तर त्यांच्या पक्षात सर्वज्येष्ठ नेता आहेत. त्यांनीही केलेला बालिशपणा, म्हातारपण आणि लहानपण सारखेच असते असे मानून सोडता येईल. परंतु शेजारघरच्या मुलाने परजातीच्या वधूशी लग्न ठरविले, म्हणून हा शेजार सोडून दूर राहायला जाण्यासारखे वर्तन नीतीशकुमार व कोण ते जदयू वाले करू लागले. श्री.मोदी हे त्यांच्या पक्षात निवडणूक प्रमुख झाले याबद्दल इतरांनी काय करू नये याचा वस्तुपाठ सध्या सर्व पक्ष देत आहेत.
श्री.नरेंद्र मोदी हे पापी - अपराधी - खुनी वगैरे असल्याचा गहजब करणाऱ्यांनी भारतीय जनतेला काही कळतच नाही असे गृहीत धरले आहे. मोदींचा अपराध ठरविण्यास भारतीय न्यायालये सक्षम नाहीत काय? कदाचित न्यायालयीन मर्यादा असल्यामुळेही मोदींवरचे आरोप सिद्ध होत नसतील; परंतु म्हणून तो अधिकार तिस्ता सेटलवाड, नीतीशकुमार, सोनियाजी, मायावती, लालूजी अशांना कोणी दिला? मोदी इतके अपराधी असूनही गुजरात त्यांना तीनदा निवडून देते इतकी कृतघ्न-क्रूर आहे काय? इथे नरेंद्र मोदी दोषी की निर्दोषी, किंवा पदाला योग्य-अयोग्य हे ठरविण्याचा मुद्दाच नाही. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे मूल्यांकन, विकासाचे चित्र, निधडे व्यक्तिमत्त्व वगैरे खरे-खोटे हे त्यांचा पक्ष ठरवेल. उद्या निवडणुकीत मतदार ठरवतील. जर जनता ही सार्वभौम आहे, तर निवडून येणाऱ्या नेत्याविषयी कोणत्या थराला जायचे याचे भान हवे.
आडवानींचे राजीनामा प्रकरण हे तर नाटक किंवा उतावीळपणा ठरला, परंतु तोही खेळ आजपर्यंत कितीतरी जणांनी केला. अगदी एकाही पक्षाचा अपवाद नाही. म.न.से. या आधीच फुटीर गटातूनसुद्धा कालपरवा काहीजण फुटले. काँगेस तर सुभाषबाबू-आंबेडकर यांच्यापासून फुटतच आहे. शरद पवार तर त्यात माहीर मानावेत, पण त्यांच्याही इवल्याशा राष्ट्नीय पक्षातून सदाशिवराव मंडलीक गेले. हिंदू भडक अतिरेकी हे जर भाजप प्रणित जातीयवादी असतील तर नक्षलवाद्यांचे पाप कोणत्या डाव्या हाताचे? नीतीशकुमारांचा पक्षच जनता दल (यू) म्हणजे `त्या' जनता पक्षाची जी शकले झाली त्यापैकी एक. अशा साऱ्या स्थितीत या सर्वांनी मोदी-आडवाणींना त्यांच्या राजीनाम्यावरून फुटीच्या भेगेवरच उभे करावे हे खरोखरीच अजब! पक्ष तर आडवानींनी सोडला नाही. ज्यांनी तो यापूर्वी सोडला, त्यांची (दुर्)दशा सांगण्यास शंकरसिंग वाघेला, कल्याणसिंग, उमा भारती वगैरे आहेत. चिदंबरम्, सुशीलकुमार यांनीही तळयात-मळयात करून झाले. तात्पर्य असे की आपली चिखलवस्त्रे न झाकता दुसऱ्यावरच्या शिंतोड्यास हसावे असे चालले आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की न व्हावेत याचा निर्णय या वाचाळ नरवीरांनी करण्याचा नाही. ते झालेच तर आणि तरीही; त्यांना गुन्हेगार म्हणून मीडिया डोक्यावर घेणाऱ्यांनी, आजच्या लोकसभेत २७४ खासदारांवर गुन्हे दाखल आहेत याची तरी नोंद घ्यावी. हे सगळे धर्मनिरपेक्ष असल्यामुळे गुन्हेगार चालू शकतात असे आमची पवित्र घटना सांगत असेल? त्यांच्याबाबतीत सगळे धर्मनिरपेक्ष नेते स्वत: मनमोहनसिंग असल्याप्रमाणे शून्यमनस्क असतात. किंवा तुरुंगातील पक्क्या सिद्धहस्त गुन्हेगारांना राखी बांधायला जातात.
श्री.नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री बनणे अद्यापि फार दूर आहे. मुळात त्यांचा पक्ष, आघाडीसह सत्तेवर येण्याची शाश्वती नाही. पण राहुल गांधी अथवा सध्याच्या `स्वप्नाळू' नेत्यांपैकी कोण आला तर त्यास मोदींचा पर्याय म्हणून कसा स्वीकारावा असा पेच जनतेपुढे आहे. या सगळयाचा साकल्याने, गांभीर्याने, जबाबदारीने विचार करून या मंडळींनी मीडियागिरी करायला हवी. त्याऐवजी असल्या उथळ भिरमिट वावटळीने जनता हतबल होईल; मग कसली महासत्ता अन् कशाचा तरुण देश!
Comments
Post a Comment