Skip to main content

Posts

Showing posts from December, 2018

17-24 Dec 2018

माझा विदेशी नाताळ  यंदाचा नाताळ क्रॅनडात साजरा करायला मिळणार म्हणून मी खूश होतो. आता इतके मित्र-मैत्रिणी झालेत म्हणजे चार-पाच ठिकाणी तरी जेवणाची आमंत्रणं मिळणार म्हणून मी आधीपासूनच दात घासून बसलो होतो. पण कसचं काय! िख्रास्मसमध्ये (म्हणे) इथं लांबच्या माणसांना फारसं जवळ करत नाहीत. म्हणजे `तसं' जवळ करतात. भरपूर गळामिठ्या आणि पाप्यांसह मला शुभेच्छा मिळाल्या. पण गळयात दोन हात टाकले तरी घरापासून मात्र आपल्याला चार हात लांब टाकतात. एकतर माझे बरेच मित्र-मैत्रिणी सडेफटिंग राहात होते, त्यामुळे तेच कुठे ना कुठे - बहुतांशी आईवडिलांच्या किंवा बायकोच्या गावाला जाणार होते. आणि तसाही नाताळ हा प्रामुख्यानं कुटुंबीय आणि गट्टीतल्या फॅमिली फ्रेंडस्बरोबर साजरा केला जातो. त्याउलट पुढच्या आठवड्यात येणारी वर्षाखेर हा सार्वजनिक उत्सव असतो. रोषणाई, आतषबाजी, एकमेकांकडे येणं-जाणं वगैरे. तेव्हा नाताळमध्ये फक्त आईवडील, बहीणभाऊ - मुलं - नातवंडं एवढंच! एरवी चार दिशांना तोंडं असल्यामुळं त्यांना ह्या कौटुंबिक संमेलनाचंही अप्रुप असतं. आपल्याकडच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मला इथला नाताळ अगदीच `सुना सुना' व

10 Dec 2018

वाङ्मय विकास  ही सर्वांची जबाबदारी! कै.नारायण हरी आपटे हे १ व २ डिसेंबर १९३३ला बडोदा येथे भरलेल्या मराठी वाङ्मय परिषद, तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांनी  ८५ वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजही समयोचित बोधप्रद आहेत, येत्या मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भाने त्या भाषणाचा गोषवारा- मराठी वाङ्मयाची सध्याची प्रकृती व परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. या अनावस्थेची कारणे अनेक आहेत. त्यांपैकी प्रमुख कारण म्हणजे वाङ्मय-प्रसारासंबंधी आमचे प्रयत्न जितके साक्षेपाने व्हावयास पाहिजेत, तितके ते होत नाहीत. कोणत्याही वाङ्मयाचा उत्कर्ष दोन गोष्टींवर अवलंबून असतो. उत्कृष्ट वाङ्मय निर्माण होणे, आणि वाङ्मयाचा सत्वर व सर्वत्र प्रसार होणे. या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहेत. आम्ही पाररतंत्र्यात असल्याने ही दुर्दैवी परिस्थिती ओढवली आहे. गेल्या शतका-दीडशतकात इंग्रजी लोकांचे साम्राज्य अवघ्या भूमंडलावर पसरल्यामुळे त्यांच्या भाषेला परम भाग्याचे दिवस लाभले आहेत. जगातील सारस्वतांमध्ये इंग्रजी वाङ्मय सर्वोच्च स्थानी विराजमान असून मानवजातीच्या ज्ञानात त्याने विलक्षण व महत्वाची भर घातली आहे. अशा सर्वांगस

3 Dec 2018

मी लोकांचा सांगाती! -संपतराव पवार माझ्या आयुष्याला बालपणापासूनच स्वातंत्र्य चळवळीतील ध्येयवाद आणि राष्ट्न्उभारणीच्या प्रखर प्रेरणेची किनार मिळत गेली. शालेय जीवनात पुरोगामी विद्यार्थी संघटना आणि शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जनचळवळीत सक्रिय राहिलो. १९७२ साली विधानसभेची निवडणूक लढवण्याची जबाबदारी अंगावर आली. काही प्रश्न निर्णायकरित्या लढवले. काही प्रश्नांबाबत शासनाला धोरण बदलावे लागले. पन्नास वर्षांहून अधिक काळ सातत्याने झुंजत राहिलो. चळवळ हे माझे एकट्याचे काम नाही. जे काही घडत गेले त्यामध्ये कार्यकर्त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता. चळवळीतील खरीखुरी शक्ती तीच होती. या चळवळीचा वृत्तांत लोकांपुढे सादर करावा, काय चुकलं ते शोधावं, या उद्देशाने लिहिलेला प्रवास `मी लोकांचा सांगाती' या नावाने प्रकाशित झाला आहे. या प्रवासात एखाद्या पक्षाशी, विचाराशी एकनिष्ठ राहून उभे आयुष्य पणाला लावणाऱ्या, अखेरच्या श्वासापर्यंत विचार जोपासणाऱ्या,  तत्वनिष्ठ त्यागी माणसांचा सहवास लाभला. तीच माझी प्रेरणा होती. बळीराजा धरण पूर्ण झाल्यावर धरणाची सिंचनव्यवस्था उभी राहिली. नंतर पाणीवाटपाचा एक कार्