बदल हवाच असतो `बदल करायला हवा' असे आपल्यातल्या प्रत्येकाला सतत वाटत असते. स्वस्थचित्त असलेल्या माणसालाही थोड्या वेळाने मांडी फिरवून बसावे वाटते. घरातला पलंग किंवा स्वैपाकाचे फडताळ आिकडून तिकडे हलवून ठेवले की आपल्याला सुधारणा झाल्याचे समाधान मिळते. पण जे कोणी त्या बदलात सामील नसतात, अनभिज्ञ असतात, त्यांना मात्र असा बदल केलेला रुचत नाही. घरच्या मोठ्या माणसांच्या माघारी तरुण पोरांनी किंवा सुनेने केलेला बदल, नंतर त्यांच्या पाहण्यात आला की, त्या मोठ्या -किंवा खरे सांगायचे तर कालबाह्य झालेल्या, -लोकांस तो अजिबात रुचत नाही. ही अशी हलवाहलवी करून घराचा सारा गोंधळ अुडवून दिलेला आहे, ही त्यांची हमखास प्रतिक्रिया असते. अेक वस्तू सापडत नाही, नव्या जागी ठेचकळायला होते, असे बदल करताना निदान विचारायचे तरी.... असा त्यांचा आक्रोश बराच काळ चालतो. काही वेळेला तो आितक ा असह्य होतो की, कुठून हा बदल आपण करायला गेलो, असे त्या अुत्साही नव्या पिढीला वाटू लागते. वास्तविक पहिली व्यवस्था तर साऱ्यांना गैरसोयीची होतीच होती, ती बदलायला हवीच होती. पण तो मोठा बदल प्र्रत्यक्षात केला, हे मात्र पुष्कळांना सहजी रुचत