धर्म कालानुरूप हवा - प्रसाद भावे मी हिंदू आहे. मला त्याचा अभिमान आहे. कोणतीची गोष्ट चांगली-वाईट ठरवताना माझ्या मनाला विचार करण्याची सवय लागली आहे. माझ्याप्रमाणेच खूप लोकांस खूप गोष्टी खटकतात. पण त्यात बदल करावा अशी धारणा होत नाही. कसे बदल करता येतील, याबाबत पंडीत व विचारवंतांनी जरूर विचार करावा. मार्गदर्शन करावे, स्वत: आदर्श घालून द्यावेत. म्हणजे इतरेजनांस त्या बदलांचे अनुकरण करण्यात संकोच वाटणार नाही. हिंदू हा धर्म नसून ती संस्कृती आहे असे म्हटले जाते. पण सरकार दरबारी किंवा व्यवहारातही तो धर्म म्हणूनच आचरण्यात येतो. याबद्दल असणारा संभ्रम दूर कसा होणार? कारण मुळातच आपण कोणा एका धर्मगुरूचे मानत नाही. धार्मिक नेता म्हणून हिंदू धर्मात कोणास संबोधता येईल? त्याचा निर्णय अंतीम मानला जाईल? भारतात आद्य शंकराचार्यांना धर्मगुरू म्हणून बरेच लोक मानतात. त्यांची सर्वत्र पीठे आहेत. पण प्रत्येक पीठाचे प्रमुख फक्त स्वत:लाच श्रेष्ठ मानतात. प्रत्येकाची तोंडे वेगवेगळया दिशेला. कोणाचा शब्द अंतीम मानायचा? साहजिकच प्रत्येकाला सोयीस्कर असेल ते त्यांचा आदेश मानतात. मग धर्माची एकसंधता नाहीशी होते. यासाठी