स्वामीनिष्ठ सेवेची ती कथा कोकणभूमी निसर्ग संपत्तीने समृद्ध असली तरी गेल्या तीनचारशे वर्षांत तिथे दारिद्र्य आणि खडतर जीवन यांस तोंड द्यावे लागत होते. त्यास कंटाळून आपले नशीब काढण्यासाठी महत्वाकांक्षी लोक स्थलांतर करीत. १८व्या शतकात अनेक ब्राह्मण कुटुंबे देशावर आली, आणि पुणे मुंबआी, सातारा वाआी, सांगली कोल्हापूर अशा ठिकाणी स्थायिक झाली. रत्नागिरीजवळच्या सोमेश्वर येथील रघुनाथ केळकर हे अशांपैकी अेक. ते वाआीला आले. त्यांचा मुलगा बाळकृष्ण हुशार होता. अैन अुगवत्या वयात त्याच्या हुशारीची ख्याती, सातारचे (शेवटचे) छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या कानी पडली. त्यांनी बाळकोबास बोलावून घेतले. त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांत लवकरच तो सामील झाला. हिंदुस्थानात ब्रिटिश अंमल स्थिरावला होता. संस्थाने खालसा करून त्यांची खाजगी मालमत्ता, थोडाबहुत तनखा, आणि अगदी मोजके सैन्य पदरी ठेवण्याची मुभा होती. १८५७ सालचा स्वातंत्र्यसंग्राम आितिहासात गाजला; परंतु त्याआधीही ब्रिटिश राजवटीविरुद्ध अुठाव करण्याची कारस्थाने चालू झालेलीच होती. सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी बाळकोबा केळकरामार्फत अुत्तरेच्या होळकर-गायकवाड-श