नव्या मतांचा आग्रह हवा, हट्ट नको... हट्टाग्रह चुकीचाच - सुविनय दामले आमच्या सिंधुदुर्ग भागात नुकताच एक कार्यक्रम झाला. विधवा बायकांसाठी हळदीकुंकवाचा तो कार्यक्रम होता. रूढी परंपरांच्या चौकटी मोडून केलेला हा अुपक्रम थोडा धाडसाचाच म्हणावा लागेल. आपल्याकडे धर्माने किंवा शास्त्राने स्त्रियांना दुय्यम स्थान दिले आहे असे काही मंडळींचे म्हणणे आहे. त्यावर वाद घालायला हवा असे नाही. प्रत्येकाची विचार करण्याची पध्दत वेगळी असेल. काळाला धरून आपल्या धार्मिक रूढी व सामाजिक आचरण बदलायला हवेच! त्या सुधारणा कोणी कराव्यात? का कराव्यात? कशा पध्दतीने कराव्यात? बदलाचे अधिकार कोणाकडे आहेत? असे काही प्रश्न माझ्या मनात रुंजी घालू लागले. अलीकडच्या काळात लोेकांंच्या भावना डिवचणारे किंवा चेतविणारेे प्रकार मुद्दाम केले जातात, पण त्यांतून पळवाट आधीच शोधून ठेवलेली असते. बाजीरावांचा आितिहास काय असेल तो असो, पण तो विषय काही लोकांच्या अभिमानाचा आहे हे तर खरे! त्यांच्यावर सिनेमा काढताना निर्मात्याने वा दिग्दर्शकाने खोडसाळपणा करायचा, पण सिनेमाच्या सुरुवातीलाच `यातील काही प्रसंग काल्पनिक असून... कुणाच्या भावना दु