संपादकीय मंत्र्यांना कामी लावावे केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार आणि खातेपालट झाला आणि राज्यातही तो विधी अेकदाचा पार पडला. पंतप्रधान मोदींनी लगेचच नव्या मंत्र्यांना जबाबदारीचे भान दिले, आणि संसदेचे सत्र तोंंडावर असल्याने त्याची परिपूर्ण तयारी करावी असेही सांगितले, शिवाय १५ऑगस्टपर्यंत आपापल्या गावाकडे जाण्याची तत्परता दाखवू नका, हेही सुनावले. राज्य स्तरावरही त्याच सूचनांचा अंमल व्हायला हवा, पण प्रत्यक्ष तसे कोणकोण वागले हे आपण जाणतोच आहोेत. मंत्रीपद घेअून गावच्या गल्लीत मिरवायचे असते, अेवढेच ज्यांना माहीत आहेे, त्यांचीच आपणा जनतेलाही सवय झाली आहे. फार तर त्या मंत्र्यापुढे आापल्या शेपट्या हलवत अुभारावे, आणि त्याचा कृपाकटाक्ष घडला तर धन्य व्हावे, अशी आजवरची रीत बनली आहे. आपल्या पोराला नोकरी किंवा काहीतरी तत्सम लाभाचे काम असेल तर मधल्या चमच्याला, त्या मंत्र्यांचा जावआी-पुतण्या अशा कोणाला तरी गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा रराज्यकारभाराचा कितीही अुबग आला तरी तो सहन करण्यातच आधीच्या पिढीची हयात सरली. सत्ताबदलाचे परिणाम असोत, तरुण जनता क्रियाशील झाल्यामुळे असो, किंवा माहिती तंत्रज्ञान