Skip to main content

Posts

Showing posts from July, 2011

sampadkiya of 18july2011

हट्टाग्रहात सत्य हवे महाराष्ट्नत `अंधश्रद्धा' निर्मूलनासाठी भोंदूगिरी-विरुद्ध कायदा करावा यासाठी एकीकडे आंदोलन होत आहे, त्यास पाठिंबा असल्याचे सरकार भासवते. आपल्या पुरोगामित्त्वाचा टेंभा मिरवत राज्याचा मुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा बांधून `वेळेवर पाऊस पाड, जनतेला सुखी ठेव' असे साकडे घालतो हीच तर भोंदूगिरी झाली. वास्तविक पाऊस पडत नाही त्या संकटाशी सामना करणारे सरकार गरजेचे आहे. पण `कर्म करोनी म्हणती साधू' असे लोकच सर्वत्र बोकाळले आहेत. त्यामुळे भोंदू अंधश्रद्धेविरुद्ध कायदा कसा होणार, आणि त्याचा कसचा उपयोग होणार, याबाबत सच्च्या पुरोगामींनी तरी विचार करायला हवा. सत्य श्री साईबाबांचे निधन झाल्यावर त्यांच्या संपत्तीविषयी चमत्कार कथा प्रसृत होत आहेत. हातातून उदी, गुलाल निघणे किंवा बंद मुठीतून घड्याळ-अंगठी येणे असले मंतरखेळ छोट्या बालकांना अचंबित करतात. ज्यांची बालबुद्धीच आहे असे पब्लिक असल्या चमत्कृत अध्यात्मास भुलले. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यापासून सगळया बड्या लोकांसही भुरळ पडल्याचे दिसले त्यात सत्यत्त्व किती आणि साईत्त्व किती असा प्रश्न आहे. नास्तिकांनी साई भक्तांच्या झालेल्य

panchgavya

पंचगव्य  वेद काळापासून गाय ही शेती व्यवसायाशी अत्यंत निगडीत आहे. गाईला सर्व धर्मांत व शास्त्रात पवित्र मानले गेले आहे. `गावो विश्वस्य मातरम्' असे म्हटले आहे. गाईच्या स्वामित्वासाठी युद्धे होत व गोधन ज्याच्याकडे जास्त तो सामर्थ्यवान, वैभवसंपन्न व शूरवीर समजला जात असे. गोमय, गोमूत्र व दुध, गाईचे तूप, गाईचे दही या पंचामृताची आहुती यज्ञांमध्ये देत असत. याला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. गाईच्या या पाच पदार्थांच्या मिश्रणास पंचगव्य म्हणतात.  शेणाने सारवलेल्या जमिनीत कीड व बुरशीनाशक गुणधर्म कसे येतात हे पाहण्यासाठी एक प्रयोग केला गेला. गोमय व गोमूत्र एकत्र करून ते १० हजार आरपीएम ने घुसळले. तापमान वाढू नये म्हणून तेथे थंड करण्यासाठी शीतपद्धती वापरली. त्या मिश्रणातील रस बाहेर काढला. तो रस पेट्नीडिशमध्ये अगार हे माध्यम वापरून त्यावर घेतला. सर्व प्रकारच्या बुरशी त्यावर सोडल्या. कोणत्याही बुरशीची वाढ झाली नाही. अगदी इकोलाय व साल्मुनेला बुरशीपण रोखल्या गेल्या. हा कीड व बुरशीनाशक गुणधर्म आहे.  वशिंड व आकाशाकडे टोके असणारी शिंगे धारण करणारी भारतीय गाय कोणत्याही तापमानात राहू शकते. तिच्या ग

sandriya sheti

सेंद्रीय शेती शेतातील विविध पिकांवर तरतरी आणि त्यांचे सकस उत्पादन असे दृश्य पिचतच दिसते. शिवाय त्या ठिकाणी गायींचे खिल्लार, फळबागांवर धूर पसरविणारे अग्निहोत्र, दूध-दुभत्यांचे असंख्य प्रकार आणि वनस्पतींचा औषधी वापर हे सर्व पाहिल्यानंतर कुठल्यातरी ऋषी काळातील कृषीची कल्पना करता येते. श्री. जयंत वामन बर्वे यांच्या विटे (जि.सांगली) यांच्या शेतावर तसे प्रयोग प्रत्यक्ष पाहता येतात. हा सर्व शेती व्यवहार आता प्रयोग अवस्थेतून कायमच्या यशस्वी व्यवसायामध्ये स्थिर झाला आहे. पाण्याची कमतरता असूनही एकरी एेंशी टन ऊस नदीकाठच्या बागायतीलाही दुर्मिळ झाला आहे. लगडलेले आंबे किंवा फुलारलेली डाळींबाची झुडपे कोणत्याही किडीची माशी अंगावर बसू देत नाहीत. या सर्वांच्या मुळाशी निसर्गाने दिलेली विविधता आपल्या सामर्थ्याचा ओलावा टिकवून ठेवते आहे. श्री.बर्वे यांचे हे सेंद्रिय शेतीचे तंत्र आता सर्वदूर शेतकऱ्यांच्या सहजपणी आटोक्यात येत आहे. अर्थातच विदेशी रासायनिक खते आणि नाकारलेली कीडनाशके यांच्या वेढ्यात सरकारी यंत्रणा गुंतलेली असल्यामुळे त्यांचाच प्रचार अधिक होत असतो. मात्र खरा शेतकरी तशा फसव्या हरितक्रांतीपासून आता