आठवांचे साठव..... तिघांचे जाणे मला आठवते तेव्हापासून ज्यांना पाहात आलो, अशा तीन व्यक्ती गेल्या आठदहा दिवसात काळाआड गेल्या. त्यांनी आपापल्या परीनं सुखी संसार केला, आणि त्यासाठी मन:पूर्वक प्रामाणिक खस्ता खाल्ल्या. त्यामुळं गावात ती भली माणसं म्हणून ओळखली गेली, त्यांच्या जाण्याची हळहळ ठेवून गेली. ८५-९० च्या वयातील त्यांंचं जाणं तसं धक्कादायक किंवा अकाली नव्हे, पण स्थिरचित्तानं आपली खेळी करून चांगला `स्कोअर' उभारणारा खेळाडू आऊट झाल्यावर एक रुखरुख वाटायची ती वाटतेच. सदाशिव कृष्ण कुलकर्णी हे जवळच्या पलूस गावचे जमीनदार घरातले होते. त्या काळच्या अजस्त्र कुटुंबाची निर्वाह चिंता आणि परिस्थिती यांच्या विचारातून पांगापांग झाली. किर्लोस्करवाडीच्या कारखान्यात नोकरी पत्करून ते वाडीजवळ राहायला आले, त्यांच्या तिशीपासून ते `एस.के.तात्या' म्हणूनच ओळखले जाऊ लागले. आमच्या मळयात त्यांचे बिऱ्हाड राहिले, प्रपंच-पाणी-नोकरी एवढ्या व्यापात अडकलेले ते दिसत. नाटक हा त्यावेळी पुष्कळांचा छंद होता. तात्यांनी ऐतिहासिक नाटकात कामे केली. सरदार बाजी घोरपडे यांच्या तरवारधारी वेशातला त्यांचा फोटो आमच्या घरी