Skip to main content

lekh of Sandip Vasalekar


विकासाच्या दिशेचा शोध
- संदीप वासलेकर 
`सध्याचा काळ हा केवळ बाजारपेठेच्याच भाषेत बोलतो हे जरी खरे असले तरी मग आपण जी किंमत मोजतो तशीच वस्तू मिळेल हे निर्विवाद आहे. आपला देश - आपला समाज आपल्याला सुंदर हवा, संपन्न हवा असेल तर त्यासाठी आपण कोणती किंमत देतो याचा विचार करायला नको का? लोकशाही प्रणाली आणि राजकीय हितसंबंध किंवा साध्या शब्दात म्हणजे आजचे राजकारण थोडे बाजूला ठेवले तरी सध्या जे कोणी नेते आहेत, त्यांच्या मागे लागून जेवढ्या मागण्या केल्या जातात, त्यापैकी १० टक्के मान्य होतात असे म्हटले तर आपण आपल्या मागण्या घेऊन या नेत्यांकडे किती वेळा जातो, हा प्रश्न स्वत:शी विचारून बघावा.' असे आवाहन करून श्री.संदीप वासलेकर यांनी श्रोत्यांना अंतर्मुख केले.
आपले मनोगत मांडताना ते म्हणाले की, भारतात गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाचा विस्तार झाला आहे ही गोष्ट खरी, परंतु तरीही आपण सगळे समाधानी - सुखी - स्वस्थ असे नाही. साधारणत: २००१ पासून आपली आर्थिक स्थिती ठीक सुधारत आहे असे जगात म्हटले जाते. सकल राष्ट्नीय उत्पन्न ५, ६, ७ कधी ९ टक्क्यांनी वाढले. साधारणत: ८ टक्के वाढ धरली तरी ते प्रमाण वास्तविक चांगलेच आहे, तरीही त्याचा परिणाम देशातल्या खऱ्या विकासावर दिसत नाही. २० कोटि लोक २००१ मध्ये  श्रीमंत किंवा सुखवस्तू असतील परंतु २००१ मध्ये आपली संख्या १०० कोटि होती त्यातली ८० टक्के  सामान्य आर्थिक स्थितीत होते. २०१२ साली संख्या १२० कोटि झाली, त्यात स्थिती सुधारून २० चे ४० कोटी श्रीमंत झाले, २०२५ साली पैसा ७-८ टक्क्यांनी वाढून बऱ्याच लोकांना म्हणजे ६० कोटींना श्रीमंत वा सुखवस्तू म्हणता येईल. परंतु या एकूण पंचवीस वर्षात सामान्य वा गरीब लोकांची संख्या ८० कोटि ही बदलणार नाही. याचा अर्थ देशात कुठल्याही निमित्ताने व कारणाने नुसता बक्कळ पैसा वाढत राहिला तर त्यास प्रगती म्हणता येत नाही. प्रगती व विकास या संकल्पना केवळ आर्थिक नव्हेत. इथे आज लोकांत उदासीनता, उद्वेग, नैराश्य आहे. सहज कायदेभंग, भ्रष्टाचार आहे. समूहजीवनापेक्षा एकारलेपणातून भावी काळाबद्दल ओढ वाटेनाशी आहे. `प्रगती' त्यावेळी म्हणतात, जेव्हा सगळया समाजात भावनिक संबंध वाढतात, सामान्यांना आशा व उत्साह वाटतो. म्हणूनच केवळ तंत्रज्ञानावर भर न देता त्यास तत्त्वज्ञानाची जोड देण्याची भारतात गरज आहे.
``शालीय जीवनापासून या गोष्टी शिकवायला हव्यात; पण मुळात त्यासाठी शिक्षणाच्या किमान सुविधा तरी हव्यात. देशात ७ लाख खेडी आहेत त्यातल्या ५ लाख खेड्यांत आज सातवीच्या पुढे शाळाच नाहीत. महाराष्ट्न् प्रगत म्हणावे तर इथे ४४ हजारापैकी ३३ हजार खेड्यांत माध्यमिक शाळा नाहीत. ज्या प्राथमिक शाळा आहेत तिथे हे आशादायी शैक्षणिक वातावरण कसे पोचेल हा प्रश्नही बिकट झाला आहे.
``अर्थात् त्याचे उत्तर शोधावेच लागेल. त्यासाठी प्रचलित पद्धती व समजुती बदलाव्या लागतील. तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल. यापुढे इंटरनेट, कम्युनिटी रेडिओ अशी साधने वापरली तर `शाळा' नावाची गोष्ट मागे पडेल. एक माध्यमिक शाळा चालू करण्यासाठी जागा, इमारत, संसाधने, शिक्षक वगैरे तरतूद करण्याला एकदीड कोटि रुपये खर्ची पडतात आणि त्या ठिकाणी सात-आठशे विद्यार्थ्यांची सोय होते. तेवढेच पैसे खर्चून जर २५ किमी. पल्ला (रेंज) धरून कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू केले तर तेवढ्या त्रिज्येतील सुमारे ७ लाख जनतेला शिक्षण देता येईल. इंटरनेटमुळे त्याहून शंभरपट लोकांना `शिकविता' येईल. केवळ साक्षरता देणारी आजची शाळा परिवर्तित करावी लागेल.
``शाळेतून बाहेर पडल्यावरच खरे शिक्षण सुरू होते असे म्हणतात. कारण शाळेबाहेरच्या जगात `शिक्षण म्हणजे शहाणपण' असते. शिक्षणातून काही शाश्वत मूल्ये समजली पाहिजेत. मूल्ये हा शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. शिक्षणातून मानवी मूल्यांपर्यंत पोचण्यासाठी ज्ञान हे साधन आहे. ज्ञानाची देवाणघेवाण होऊ शकते, मूल्यांची साठवण होते, विकसन होते, विस्तार होतो. सुरक्षिततेची हमी देत राहणारा आक्रमणमुक्त, भयमुक्त मानवी समाज निर्माण करणे म्हणजे प्रगती. हे `डिफेन्स प्रमोशन' चांगल्या शिक्षणातून साधेल.
आपण आज एक समस्याग्रस्त समाज बनलो आहोत. पण प्रत्येक समस्येला उत्तर असतेच. आपण समस्या-समस्या म्हणत राहिलो तर समस्या अधिक वेगाने वाढत जातील; त्याऐवजी त्यांवर उत्तरे शोधली तर पुढचे मार्गही सापडतील. आपल्याला बदल हवा असेल तर आज आधुनिकता आणि प्रगतीच्या बाबतीत आपण ज्या धारणा बाळगून आहोत त्या बदलल्या पाहिजेत. जशी व्यवस्था प्रचलित असते, तसे आपण वागतो. पैसे खाणे हीच व्यवस्था असेल तर आपण सहजपणी पैसे देतो, पैसे खाणाऱ्याकडे दुर्लक्ष करतो, प्रसंगी स्वत: खातो! या खादाड व्यवस्थेत कोण बदल करेल? पैसे खाणारेच आहेत ते बदल करतील का? तेच शिक्षा करतील का? यासाठी आपण प्रत्येकजण पुष्कळ काही करू शकतो. वेळ नाही, परिस्थिती तशी नाही, राजकारण आडवे येते.... वगैरे सगळी कारणे म्हणजे निव्वळ सबबी आहेत. `कर्ता करविता तो आहे' म्हणून आपण स्वस्थ राहिलो तर प्रश्न मिटला. नियती नावाचा एक घटक परिणाम करू शकतो हे नाकारता येत नाही. परंतु नियती + निश्चय = निर्मिती हे समीकरण शंभर टक्के सत्य आहे. त्यापैकी निश्चय हा घटक आपल्या मनावरती अवलंबून आहे, जो आपल्याला जे आणि जसे हवे आहे तेच घडवितो.
आमच्या संस्थेचे स्वरूप `स्ट्न्ॅटेजिक फोरसाईट' म्हणजे `युक्तीने किंवा निश्चित धोरणाने प्राप्त केलेली दूरदृष्टी' असे सांगता येईल. `राष्ट्नीय भविष्य' सांगणारी नव्हे. `फोरसाईट' आणि `फोरकास्ट' यात खूप फरक आहे. आम्ही एखाद्या देशाला त्यांच्या उद्दिष्टाप्रमाणे आराखडा करून देतो, तो बरोबर ठरला तरच पुढचे काम मिळेल. ज्योतिषी लोकही खूपदा बरोबर ठरतात. यातला फरक लक्षात येईल अशी एक गंमत सांगता येईल. एक ज्योतिषी गरोदर स्त्रीला मुलगा की मुलगी हे अचूक सांगतो अशी प्रसिद्धी होती. तो जे सांगायचा त्याच्या उलट निर्णय आपल्या नोंदीत लिहून ठेवायचा. `मुलगा' म्हणून सांगितलं तर `मुलगीच' म्हणून नोंदवायचा. त्याच्या म्हणण्याप्रमाणं झालं तर त्याला सांगायला कुणी यायचं नाही, पण उलट झालं की `असं कसं?' विचारत येत. मग हा नोंद दाखवायचा. `असं तुम्हाला म्हटलं होतं' याची खात्रीच! - तसं हे नसतं. राष्ट्नसंबंधी किंवा एखाद्या भव्य योजनेविषयीचा अहवाल कागदावर दिला जातो. त्यात सद्यस्थिती, स्रोत, लोकभावना व रीती यांचा आढावा असतो. उपाय असतात. त्यांचा अंमल केला तर यशाची पुष्कळच खात्री असते.
आज भारताची आर्थिक स्थिती खूप सुधारते आहे, पण पैसा `वाहतो' म्हणजे सुधारणा नव्हे. जगात जी-२० देशांची शिखर बैठक असते त्यावेळी आपल्या प्रधानमंत्र्यास सन्मानाचे निमंत्रण असते. म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपण पहिल्या वीस देशात आहोत, परंतु `विकसित' देशांच्या क्रमवारीत आपण १२० व्या क्रमांकावर आहोत. यातले मर्म समजून घेतले तर नेमके काय करायला हवे हे निदान आपल्यासारख्या सुज्ञ-जनांस वेगळे सांगायला नको! ते प्रत्येकास कळते. प्रत्येकजण स्वत:ला जमेल तेवढे करतोही; पण त्या सर्वांची दिशा एकच असली पाहिजे. एक राष्ट्न् म्हणून या एकाच दिशेचा शोध लवकरात लवकर घेतला पाहिजे.
(शब्दांकन - वसंत आपटे)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन