माणूस महाग झाला
महागाई आणि दरवाढ सगळया बाबतीत लागू झालीच आहे. त्यासाठी जगाच्या पाठीवरची आकलन न होणारी कारणे दिली जात असतात. मनुष्यबळ आणि रोजंदारीचे दर वाढण्यास काही कारणे असतील पण कामाल माणसे मिळत नाहीत हेसुद्धा मजुरीवाढ होण्याचे कारण आहे.
स्वयंपाकाचा गॅस वाढला यारा आंतरराष्ट्नीय कारणे असतील पण गॅस मोटरकारसाठी, वेल्डिंगसाठी वापर करणारे आपण आहोत. हे प्रकार लक्षात येऊनसुद्धा त्याकडे आपणही डोळेझाक करतोच. घरगुती सिलिंडर ४०० रु.तर हॉटेल्ससाठी १५६५ रु.एवढी किंमत असते. काही ग्राहक आपली गॅसटाकी ४०० ला घेऊन ७-८ शे रुपयांत हॉटेलला विकतात. एकूणच अवाढव्य व्यवहारांत हे प्रमाण फार मोठे नसेल पण टंचाई म्हणायला ते पुरेसे ठरते. मुंबईत पाईप गॅस जोडणी ५.४७ लाखपैकी ३.९३ लाख ग्राहकांनी आपले रिकामे सिलिंडर परत केले नाहीत. शिवाय सीएनजी साठी दिलेले सिलिंडर परत आले नाहीत. त्यामुळे पुन्हा भरणीसाठी सिलिंडर उपलब्ध नाहीत. त्यामुळे टंचाई वाढते.
मुंबईत गॅसवितरकांकडे काम करायला माणसे मिळत नाहीत! गॅसवाल्यांकडे संध्याकाळी कर्मचारी कामाला तयार नसतात. ६ नंतर सिलिंडर भरून मालमोटार आली तरी उतरवून घेता येत नाही. घरपोच करण्यासाठी तगडे कर्मचारी हवेत, ते मिळत नाहीत. वितरकाकडून ग्राहकाने सिलिंडर नेला तर ८ रु. कमी केले जातात. प्रत्यक्ष रिक्षा वगैरे वाहनातून सिलिंडर नेण्याआणण्यास ५०-७० रु. खर्च येतो. सायकलवरून हे काम काही परप्रांतीय मुले ३०रु. घेऊन करतात. आपली तरूण मुले घरचा सिलिंडर नेत-आणत नाहीत; बाहेरून येणारी मुले हे काम करून दिवसात तीन-चारशे रुपये मिळवतात.
प्रश्नातून - उत्तर - पुन्हा त्यातून प्रश्न - त्यावर पर्याय - नवा प्रश्न! असा हा व्यवहार. सिलिंडर ४०० रुपये झाला की महाग, त्यावरती हे ३० रुपये जादा जातात ते विशेष नाही!!
Comments
Post a Comment