Skip to main content

matter in 18 june 2012


माणूस महाग झाला
महागाई आणि दरवाढ सगळया बाबतीत लागू झालीच आहे. त्यासाठी जगाच्या पाठीवरची आकलन न होणारी कारणे दिली जात असतात. मनुष्यबळ आणि रोजंदारीचे दर वाढण्यास काही कारणे असतील पण कामाल माणसे मिळत नाहीत हेसुद्धा मजुरीवाढ होण्याचे कारण आहे.
स्वयंपाकाचा गॅस वाढला यारा आंतरराष्ट्नीय कारणे असतील पण गॅस मोटरकारसाठी, वेल्डिंगसाठी वापर करणारे आपण आहोत. हे प्रकार लक्षात येऊनसुद्धा त्याकडे आपणही डोळेझाक करतोच. घरगुती सिलिंडर ४०० रु.तर हॉटेल्ससाठी १५६५ रु.एवढी किंमत असते. काही ग्राहक आपली गॅसटाकी ४०० ला घेऊन ७-८ शे रुपयांत हॉटेलला विकतात. एकूणच अवाढव्य व्यवहारांत हे प्रमाण फार मोठे नसेल पण टंचाई म्हणायला ते पुरेसे ठरते. मुंबईत पाईप गॅस जोडणी ५.४७ लाखपैकी ३.९३ लाख ग्राहकांनी आपले रिकामे सिलिंडर परत केले नाहीत. शिवाय सीएनजी साठी दिलेले सिलिंडर परत आले नाहीत. त्यामुळे पुन्हा भरणीसाठी सिलिंडर उपलब्ध नाहीत. त्यामुळे टंचाई वाढते.
मुंबईत गॅसवितरकांकडे काम करायला माणसे मिळत नाहीत! गॅसवाल्यांकडे संध्याकाळी कर्मचारी कामाला तयार नसतात. ६ नंतर सिलिंडर भरून मालमोटार आली तरी उतरवून घेता येत नाही. घरपोच करण्यासाठी तगडे कर्मचारी हवेत, ते मिळत नाहीत. वितरकाकडून ग्राहकाने सिलिंडर  नेला तर ८ रु. कमी केले जातात. प्रत्यक्ष रिक्षा वगैरे वाहनातून सिलिंडर नेण्याआणण्यास ५०-७० रु. खर्च येतो. सायकलवरून हे काम काही परप्रांतीय मुले ३०रु. घेऊन करतात. आपली तरूण मुले घरचा सिलिंडर नेत-आणत नाहीत; बाहेरून येणारी मुले हे काम करून दिवसात तीन-चारशे रुपये मिळवतात.
प्रश्नातून - उत्तर - पुन्हा त्यातून प्रश्न - त्यावर पर्याय - नवा प्रश्न! असा हा व्यवहार. सिलिंडर ४०० रुपये झाला की महाग, त्यावरती हे ३० रुपये जादा जातात ते विशेष नाही!!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...