Skip to main content

Lok Kaya Boltat


अमेरिकेला जरा दाखवून द्यावे 
आपल्या रुपयाची घसरण सध्या चालू आहे त्यावर अर्थक्षेत्रात चिंता व्यक्त होते. ग्रीस, स्पेन, इटली वगैरे देशातील गुंता मला नीटसा कळलेला नाही परंतु काही महिन्यांपूर्वी हिलरी क्लिंटन भारतात येऊन गेल्या, त्यांची चाल लक्षात येते. इराणकडून भारताला होणारा तेलपुरवठा बंद व्हावा हा त्यांचा उद्देश स्पष्ट झाला, त्यांस अपयश आले. त्या परत गेल्यावर डॉलरच्या तुलनेत रुपाया घसरू लागला. ही घसरण नैसर्गिक नसून `मेड इन यूएसए' आहे असे वाटते. फार काळ ते नाटक चालणार नाही. अमेरिकेला धुडकावून त्याची जागा दाखवून देण्याची ही संधी चालून आली आहे. कारण इराण हा जगात एकमेव देश आहे, तो भारताशी देवाणघेवाण रुपयात करतो. इराणकडून तेल व गॅस आयात कमी करण्याऐवजी दुप्पट करणे आपल्या हिताचे आहे. कारण तेलाच्या किंमतीपोटी त्यांना मिळणाऱ्या भारतीय रुपायातील ८०% भाग इराण भारतीय उत्पादनांच्या खरेदीसाठी वापरतो. आपल्या सर्व व्यवहारांत रुपायावरच भर द्यायला हवा.
१. सध्या आयपीएल क्रिकेट सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. या उल्लूपणाची चलती चालेल तेवढी चालवावी, पण विदेशी खेळाडूंना त्यांचे मानधन (टेबलावरून वा खालून) रुपयातच देण्याचे बंधन सरकारने घालावे.
२. नजरेला खुपावे इतक्या प्रमाणात आपले लोक परदेश वाऱ्या करू लागले आहेत. रुपयाच्या घसरणीला तेही एक कारण आहे. `व्हिसा मिळाला' याचा आनंद-नाच चालतो. परदेशी व्हिसा देण्याबाबतीत आपल्याच सरकारने कडक बंधने घालावीत. राजकारण्यांपासून त्याची सुरुवात करावी. गरजेपेक्षा पैसा जास्त झालेल्या `सुविद्य' समाजात परदेशी जाणे ही फॅशन व प्रतिष्ठा वाटते, पण आपले चलन तिकडे बदलून खर्च करणे हे रुपयाची घसरण करण्याला साहाय्य करते. ते टाळणे देशाच्या मोठ्या हिताचे आहे.
- कर्नल जयंत चितळे ,
(मोबा.९३७१८०७४९१)
८७०/२, भांडारकर रस्ता, पुणे ४

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...