शांत जगावर ताबा हवा असतो दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि जपान या अघोरी देशांचा पाडाव झाला हे खरेच, पण ज्या दोस्तराष्ट्नंचा विजय झाला ते रशिया, इंग्लंड हे देश कमी अघोरी नव्हते. आधीची शेदीडशे वर्षे भारतावर अमानुष गुलामी लादून त्याचे अखंड शोषण व अनेक अत्याचारही करणाऱ्या इंग्लंडने युद्धानंतर साळसूदपणा करत धार्मिक तेढ वाढवून भारताची फाळणी करण्यातही पुढाकार घेतला. रशियन राजवट तर क्रूरतेबद्दल प्रसिद्ध झाली, तिथे सरकार किंवा साम्यवादी पक्षाबद्दल ब्र काढता येत नव्हता म्हणून अनेक विचारवंत लेखक तो देश सोडून गेले. जगात जपान-जर्मनीने थैमान घातले, म्हणून सामर्थ्यसंपन्न अमेरिका त्यावेळच्या युद्धात उतरली असे नव्हे; तर त्यांच्यावरच हल्ले सुरू झाले तेव्हा प्रेसिडेंट रूझवेल्ट हे जमिनीवर आले. तरीही त्यांची सोदेगिरी अशी की, दोस्तसैन्याचे नेतृत्त्व आयसेनहॉवर या अमेरिकन सेनापतीकडेच देण्यात आले. युद्धानंतर `शांतता-शांतता' असा जप करत, संयुक्त राष्ट्न्संघ(यूनो)संस्था स्थापन करण्यात आली तरी त्या संस्थेचे कार्यालय न्यूयॉर्कमध्ये राहिले, आणि गेल्या सत्तर वर्षांत अमेरिकेचा स्पष्ट वरचष्मा त्या संस्थेवर राहिला.