जगाचा रचनाकार : विश्वकर्मा केवळ भारतातच नाही तर साऱ्या विश्वातील समाज अठरा पगड जातींचा बनलेला असतो. त्या जाती म्हणजे, धर्म किंवा जन्मावर आधारित समूह मानण्याचे कारण नाही. व्यवसाय करण्याच्या सोयीने त्या समूहाचेे वास्तव्य, त्यांच्या व्यवसायासाठी लागणारी सामग्री, प्रशिक्षण, कलाकौशल्य आणि अर्थातच परंपरेने येणाऱ्या चालीरीती, रूढी, आहार-वर्तन आित्यादी साऱ्या बाबतींत सारखेपणा येत राहतो. समाजाची बांधणी चार स्तंभांवर होत असते, -ज्ञान, सत्ता, संपत्ती आणि संस्कृती किंवा मनोरंजन. हे चारही स्तंभ समान शक्तीचे, समान अुंचीचे असतील तरच समाज सुस्थिर राहील. हे चार घटक ज्यांनी साऱ्या समाजासाठीच सांभाळायचे व संवर्धित करायचे असतात अशा मानवसमूहास वर्ण म्हटले जाअू लागले. वर्ण म्हणजे जात नव्हे तर व्यवसाय, चरितार्थासाठी चालविलेली वृत्ती. जोशी-कुलकर्णी-खोत यांना वृत्ती म्हणतात. अमूक तमूक यास खोती दिली, किंवा खोताची वृत्ती देण्यात आली अशी विधाने पूर्वजांच्या कागदोपत्री आढळतील. तात्पर्य असे की, वर्णांचे काम हे समाजासाठी निष्ठेने नेकीने व्यवसाय करण्याचे असते; त्याचा जातीभेदाशी काही संबंध नसतो. ब्रह्मा-विष्णू-म