झळा अंगाला भिडणार दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. धान्य व शेतीउत्पन्नावर परिणाम होणार हे तर उघडच आहे पण त्याचे आनुषंगिक परिणाम म्हणून पाणी, वीज यांची टंचाई आणि महागाई-चोरीमारी, बेरोजगारी असेही प्रश्न उभे राहणार आहेत. काही राजकीय नेतेमंडळींच्या वल्गना आणि दुष्काळातसुद्धा हातमारीची कंत्राटे हीसुद्धा पीडित जनतेला मनस्ताप देणारी समस्या ठरणार आहे. दुष्काळाचे संकट केवळ आपल्यावर असल्याचे कुणीच मानू नये. जिथे पावसाचे प्रमाण त्यातल्या त्यात ठीक होते, तिथेही आजची पीकस्थिती गंभीर आहे. पंजाबसारख्या गव्हाच्या राज्यात ३० टक्के पाऊस झाला आहे आणि अमेरिकेतही दुष्काळाने कृषि उत्पन्न घटले असल्याच्या बातम्या आहेत. या सगळया जागतिक स्थितीचे खापर आता निसर्गावर फोडले जाईल. आषाढी एकादशीला शासकीय पूजा करून मुख्यमंत्र्यांनी देवाकडे चांगल्या पावसाची मागणी केल्याचे पेपरवाल्यांस सांगितले. या धर्मनिरपेक्ष राज्यात सश्रद्ध मुख्यमंत्र्यांची ही मागणी म्हणजे त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केलेली दुष्काळी पॅकेजची मागणी नव्हे; त्यामुळे त्यास पांडुरंगाने प्रतिसाद दिला नाही. दिल्लीत एकदा अनुदान-मागणीसाठी जाऊन आले की, विमान