पाऊलवाटेची चाल सेवीं धैर्य, धनान्ध त्यांप्रति वृथा दावूं नको दीनता कूपीं कीं जलधीत कुंभ जल घे जें मापिलें तत्वतां ।। - वामनपंडित छत्तीसावे वर्ष संपले आणि `तीन तपांचा एक टप्पा ओलांडला' त्या मन:स्थितीत काही महिने गेले, तोवर आज सदतीसावेही वर्ष झाले. दरवर्षी भिंतीवरचे क्रॅलेण्डर बदलताना प्रत्येकाला तसा अनुभव येतो. दिवसाचे चोवीसच तास, आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तसेच असतात; पण दरवेळीच असे वाटते की, हे वर्ष आले आले म्हणेतो फारच लवकर संपले! गेल्या वर्षभरात शब्दश: असंख्य वाचकांनी या अंकातील विषयांना, व एकूण विचारदिशेला समरसून दाद दिली हे नमूद केलेच पाहिजे. ३७वर्षांचा टप्पा एखाद्या कार्याच्या वा संख्येच्या बाबतीत मोजण्यासारखा नाही, पण एखादे काम एकहाती करत राहण्याला वाचकांची ती दाद फार महत्त्वाची ठरते आहे. हे `नियत'कालिक असले तरी त्याची काही निरंतर व्यवस्था असली पाहिजे अशी साधारण विचारसरणी असते. एखादे कार्य निरंतर चालू राहिले पाहिजे, राहावे -असे वाटणे स्वाभाविक आहे पण तसे तर कधीच कुठे घडत नाही. संत सज्जनांनीसुद्धा आपापले जीवितकार्य चिरंतन चालत राहण्यासाठी काही व्यवस्था केल्याचे