पाऊलवाटेची चाल
सेवीं धैर्य, धनान्ध त्यांप्रति वृथा दावूं नको दीनता
कूपीं कीं जलधीत कुंभ जल घे जें मापिलें तत्वतां ।। - वामनपंडित
छत्तीसावे वर्ष संपले आणि `तीन तपांचा एक टप्पा ओलांडला' त्या मन:स्थितीत काही महिने गेले, तोवर आज सदतीसावेही वर्ष झाले. दरवर्षी भिंतीवरचे क्रॅलेण्डर बदलताना प्रत्येकाला तसा अनुभव येतो. दिवसाचे चोवीसच तास, आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तसेच असतात; पण दरवेळीच असे वाटते की, हे वर्ष आले आले म्हणेतो फारच लवकर संपले! गेल्या वर्षभरात शब्दश: असंख्य वाचकांनी या अंकातील विषयांना, व एकूण विचारदिशेला समरसून दाद दिली हे नमूद केलेच पाहिजे. ३७वर्षांचा टप्पा एखाद्या कार्याच्या वा संख्येच्या बाबतीत मोजण्यासारखा नाही, पण एखादे काम एकहाती करत राहण्याला वाचकांची ती दाद फार महत्त्वाची ठरते आहे.
हे `नियत'कालिक असले तरी त्याची काही निरंतर व्यवस्था असली पाहिजे अशी साधारण विचारसरणी असते. एखादे कार्य निरंतर चालू राहिले पाहिजे, राहावे -असे वाटणे स्वाभाविक आहे पण तसे तर कधीच कुठे घडत नाही. संत सज्जनांनीसुद्धा आपापले जीवितकार्य चिरंतन चालत राहण्यासाठी काही व्यवस्था केल्याचे दिसत नाही. आद्य शंकराचार्यांचे, बुद्धाचे, तसेच अलीकडच्या काळातील समर्थ रामदासांचे मठ ही त्यांच्या कार्यविस्तारासाठी म्हणून केेलेली व्यवस्था होती. पण त्या भक्कम व्यवस्थेतून त्यांचेच कार्य खूप विस्तारत गेले असे तर आपण ठामपणे म्हणूही शकत नाही. शेदोनशे वर्षांपूर्वी जे न्यास स्थापन झाले, ज्यांनी स्थावर उभी केली त्यांचे मोल आणि मूल्यही आजच्या किंमतीने फार कमी झाले; त्यांचे दैनंदिन खर्चही भागत नाहीत आणि इप्सित कार्याचा तर मागमूसही दिसत नाही.
एक काळ असाच होता की, सारे थोर नेते आपापल्या वैचारिक भूमिकेच्या प्रसार-प्रचारासाठी वृत्तपत्र चालू करीत असत. `त्या' काळातली जी वृत्तपत्रे आजही आर्थिक सामर्थ्यावर चालू आहेत, त्यांच्यामागे कुणी `थोर' राहिलेले नाही; व प्रसार-प्रचाराकरिता काही वैचारिक भूमिकाही त्यांच्याकडे शिल्लक राहिलेली नाही. टिळकांचा `मराठा' ब्रिटिश पार्लमेंटला उचकत असे; तर आचार्य अत्रेंच्या `मराठ्या'ने संयुक्त महाराष्ट्न् गाजवला आणि वरळी समुद्रकाठी प्रचंड स्थावर उभारली. आज `कोणताही' मराठा त्या क्षात्रतेजाचा दिसत नाही. त्या पूर्वसूरींच्या कार्याशी या अंकाची तुलना करण्याचा तर प्रश्नच येत नाही, पण त्या साऱ्या महाजनांनी चाललेल्या महापंथाचा विचार करून, आपल्या पाऊलवाटेची चाल ठरवावी इतक्यापुरतीच त्यांची आठवण केली.
आपल्या शक्तीबुद्धीने हा उपक्रम चालवावा, एवढे संकल्पनही या टप्प्यावर कमी नव्हे. एवढ्या कालावधीनंतर नव्हाळी असणार नाही, तसा यात काही उन्मेषही नाही; पण प्राप्त कामगिरीसाठी मन:पूर्वक प्रयत्न मात्र निश्चितच आहेत. वाचक आणि हितचिंतक त्या प्रयत्नांचे मोल जाणून त्यास योग्य ती शक्ती-बुद्धी देत राहतील. पूर्वीच म्हटल्याप्रमाणे ही तपश्चर्या नव्हे तर मर्यादित उद्दिष्टांची पुराणिकी आहे. काही घरांतून मूठ-पसा मिळत राहिला तरी भागते; आणि निर्वाह करून शिल्लक `टाकण्या'चा प्रश्नही संपतो.
सर्व ऋणाबंधीयांविषयी कृतज्ञता!
(वसंत आपटे )
संपादक
सेवीं धैर्य, धनान्ध त्यांप्रति वृथा दावूं नको दीनता
कूपीं कीं जलधीत कुंभ जल घे जें मापिलें तत्वतां ।। - वामनपंडित
छत्तीसावे वर्ष संपले आणि `तीन तपांचा एक टप्पा ओलांडला' त्या मन:स्थितीत काही महिने गेले, तोवर आज सदतीसावेही वर्ष झाले. दरवर्षी भिंतीवरचे क्रॅलेण्डर बदलताना प्रत्येकाला तसा अनुभव येतो. दिवसाचे चोवीसच तास, आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तसेच असतात; पण दरवेळीच असे वाटते की, हे वर्ष आले आले म्हणेतो फारच लवकर संपले! गेल्या वर्षभरात शब्दश: असंख्य वाचकांनी या अंकातील विषयांना, व एकूण विचारदिशेला समरसून दाद दिली हे नमूद केलेच पाहिजे. ३७वर्षांचा टप्पा एखाद्या कार्याच्या वा संख्येच्या बाबतीत मोजण्यासारखा नाही, पण एखादे काम एकहाती करत राहण्याला वाचकांची ती दाद फार महत्त्वाची ठरते आहे.
हे `नियत'कालिक असले तरी त्याची काही निरंतर व्यवस्था असली पाहिजे अशी साधारण विचारसरणी असते. एखादे कार्य निरंतर चालू राहिले पाहिजे, राहावे -असे वाटणे स्वाभाविक आहे पण तसे तर कधीच कुठे घडत नाही. संत सज्जनांनीसुद्धा आपापले जीवितकार्य चिरंतन चालत राहण्यासाठी काही व्यवस्था केल्याचे दिसत नाही. आद्य शंकराचार्यांचे, बुद्धाचे, तसेच अलीकडच्या काळातील समर्थ रामदासांचे मठ ही त्यांच्या कार्यविस्तारासाठी म्हणून केेलेली व्यवस्था होती. पण त्या भक्कम व्यवस्थेतून त्यांचेच कार्य खूप विस्तारत गेले असे तर आपण ठामपणे म्हणूही शकत नाही. शेदोनशे वर्षांपूर्वी जे न्यास स्थापन झाले, ज्यांनी स्थावर उभी केली त्यांचे मोल आणि मूल्यही आजच्या किंमतीने फार कमी झाले; त्यांचे दैनंदिन खर्चही भागत नाहीत आणि इप्सित कार्याचा तर मागमूसही दिसत नाही.
एक काळ असाच होता की, सारे थोर नेते आपापल्या वैचारिक भूमिकेच्या प्रसार-प्रचारासाठी वृत्तपत्र चालू करीत असत. `त्या' काळातली जी वृत्तपत्रे आजही आर्थिक सामर्थ्यावर चालू आहेत, त्यांच्यामागे कुणी `थोर' राहिलेले नाही; व प्रसार-प्रचाराकरिता काही वैचारिक भूमिकाही त्यांच्याकडे शिल्लक राहिलेली नाही. टिळकांचा `मराठा' ब्रिटिश पार्लमेंटला उचकत असे; तर आचार्य अत्रेंच्या `मराठ्या'ने संयुक्त महाराष्ट्न् गाजवला आणि वरळी समुद्रकाठी प्रचंड स्थावर उभारली. आज `कोणताही' मराठा त्या क्षात्रतेजाचा दिसत नाही. त्या पूर्वसूरींच्या कार्याशी या अंकाची तुलना करण्याचा तर प्रश्नच येत नाही, पण त्या साऱ्या महाजनांनी चाललेल्या महापंथाचा विचार करून, आपल्या पाऊलवाटेची चाल ठरवावी इतक्यापुरतीच त्यांची आठवण केली.
आपल्या शक्तीबुद्धीने हा उपक्रम चालवावा, एवढे संकल्पनही या टप्प्यावर कमी नव्हे. एवढ्या कालावधीनंतर नव्हाळी असणार नाही, तसा यात काही उन्मेषही नाही; पण प्राप्त कामगिरीसाठी मन:पूर्वक प्रयत्न मात्र निश्चितच आहेत. वाचक आणि हितचिंतक त्या प्रयत्नांचे मोल जाणून त्यास योग्य ती शक्ती-बुद्धी देत राहतील. पूर्वीच म्हटल्याप्रमाणे ही तपश्चर्या नव्हे तर मर्यादित उद्दिष्टांची पुराणिकी आहे. काही घरांतून मूठ-पसा मिळत राहिला तरी भागते; आणि निर्वाह करून शिल्लक `टाकण्या'चा प्रश्नही संपतो.
सर्व ऋणाबंधीयांविषयी कृतज्ञता!
(वसंत आपटे )
संपादक
Comments
Post a Comment