इतिहासाचा धडा आपला काही दोष नसताना शाळकरी मुलांना समाजाने दिलेली भयंकर शिक्षा वाचल्यानंतर, आजच्या विखारी आंदोलनांचा वेगळा काही विचार करावासा वाटेल. मोहिब कादरी या तरुणाचे लिखाण वाचले, आणि स्तब्ध झालो. आजवर दलितांची, ग्रामीण तरुणांची आत्मनिवेदनं वाचली होती. ...पण आिथं त्याहून वेगळं. हे मुस्लिम-ग्रामीण आत्मनिवेदन. या अनुभवंाची जात काहीशी वेगळी, अनोळखी..... त्याच्या लहानपणी हिंदू-मुस्लिम हे समाज किती छान अेकमेकांशी निगडीत होते. आीदचे नमाज पटांगणावर पढून झाले की सगळे गावात यायचे. सगळे गावकरी अुभेच असायचे. मिठ्या मारणे, हातात हात घेअून हलविणे... मग पोलीस पाटलाच्या वाड्यावर चहा... विड्याच्या पानांचे मळे, तिथं जाअून पान खायचेे, त्या दिवशी पैसे नाहीत. कुठं गेलं ते?' -ज्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अनिल अवचट यांनी हे लिहिलं आहे, ते `आठवणी जुन्या - शब्द नवे' पुस्तक नुकतंच `साधने'नं प्रकाशित केलं आहे. ग्रामीण भागात लहानपण गेलेल्या कादरी यांनी आपले अनुुभव साध्या सरळ भाषेत, या छोटेखानी पुस्तकात नमूद केले आहेत. तथापि त्या अनुभवांतून हा लेखक बाहेर आला असून कुठलाही राग द्वेष मनात न