बुजुर्गांची जबाबदारी नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का हा विषय आता तसा खेड्यापाड्यांपर्यंत चर्चिला जाऊ लागला आहे. काँग्रेसच्या गेल्या दहा वर्षात, लोकांना साऱ्या अटळ स्थितीचा विलक्षण उबग आला आहे, हे कुणालाही - काँग्रेसनिष्ठांनाही - जाणवत असेल. मोदींची पात्रता किंवा क्षमता हा विषय नाही, पण काँग्रेसने देशाची दयनीय अवस्था केली त्यासाठीचा राग लोकांच्यात आहे हे नाकारण्यात अर्थच नाही. मोदींविषयीच्या आशाअपेक्षांपेक्षा काँग्रेसप्रणित सरकारने केलेली दारूण निराशा अधिक परिणाम करेल असे दिसते. काँग्रेसवरचा हा राग ग्रामीण भागात मनमोहनसिंगांवर निघतो, पण राहुल गांधींविषयी आकर्षण आहेच आहे. त्याउलट शहरी भागात मनमोहनसिंगांचा अनुभव आणि आर्थिक धोरण यांस काहीतरी वजन आहे, पण राहुलबाबाच्या अस्तन्या सावरण्याची खिल्ली उडवली जात आहे. एक गोष्ट वास्तव आहे की, देशाच्या वर्तमानाबद्दल खूप नाराजी आणि भविष्याबद्दल खूप चिंता सार्वत्रिक आहे. राहुल गांधींचा अनुभव, पोक्तपणा, राजकीय समज, मुत्सद्देगिरी अशा सर्वांगांनी ते परिपक्व वाटत नाहीत; तरीही त्यांचे नाव पुढचा पंतप्रधान म्हणून प्रत्यक्ष मनमोहनसिंगच कसे काय ठासून सांगू