शिवाजी महाराजांची पूर्वपीठिका कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे भूतपूर्व प्राचार्य डॉ.बालकृष्ण हे हिंदू संस्कृतीचे अभ्यासक, आर्य समाजाचे विचारवंत होते. `शिवाजी - द ग्रेट' हे त्यांनी लिहिलेले चार खंडात्मक इंग्रजी चरित्र, शिवाजी विद्यापीठाने १९३९ साली प्रथम प्रकाशित केले. शाहू संशोधन केंद्राचे संचालक डॉ.जयसिंगराव पवार यांच्या सौजन्याने, त्या ग्रंथातील काही पृष्ठांचे हे मराठी रूपांतर; शिवजयंतीच्या निमित्ताने... उपलब्ध वंशावळीतील त्रुटी शिवाजीराजांच्या जीवन चरित्रासंबंधी लिहिताना, मराठी इतिहासकार वा बखरकार हे शिवाजीच्या आधीच्या मोजक्या पिढ्यांचा इतिहास आणि आजवर परंपरेने माहीत झालेल्या आख्यायिका एवढ्यांवरच विसंबून, तितक्यावरच खूश असतात. त्या घराण्याचे मूळ कुठवर मागे आहे, याविषयी त्यांना काही माहिती नसते. या महाप्रतापी शिवनृपतीचे वंशज असणारे साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी, त्यांच्या वाडवडिलांसह समस्त वंशवृक्ष नीट मांडणी करण्याचा १८२८ साली कसोशीने प्रयत्न केला. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मुन्शी माधवराव यांनी तशी वंशावळ तयार केली; ती वंशावळ मूळ स्वरूपात साताऱ्याच्या इतिहासप्रस
नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ लोकसभेत दाखल झालं तेव्हापासून उलट-सुलट चर्चा चालू आहे. तो आता कायदा झाला आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली त्याची स्वतंत्र कारणे आहेत. राजकीय पक्ष वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याला र्लीीु ेष ींहश ारींींशी म्हणतात अशा खऱ्या मुद्द्यापर्यंत सर्वसामान्य पोहोचू शकत नाहीत. देशातलं कणखर सरकार, आणि त्याला खणखणीत बहुमत हे त्यास एक कारण आहे. हे विधेयक आत्ताच आणलं गेलं असं नसून तो या सरकारच्या धोरणांचा एक भाग पूर्वीपासूनच आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ हे, नागरिकत्व कायदा १९५५ यामध्ये दुरुस्ती सुचविणारं विधेयक आहे. लोकसभा आणि राज्यसभेत ते बहुमताने पारित झालंय. राष्ट्न्पतींची सही होऊन आता तो कायदा झाला आहे. आज कायदेशीर असलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकासाठी हा कायदा नाही. ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत अफगाणिस्तान, बांग्लादेश, पाकिस्तानमधून भारतात शरणार्थी म्हणून आलेले हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि िख्र्चाश्न यांना नागरिकत्व बहाल करण्यासाठी ती सुधारणा आहे. त्याचा आधीच्या भारतीय नागरिकांशी आणि मुस्लिमांशी अजिबात स