संगीतोपचार (म्युझिक थेरपी) नाहं वसामि वैकुंठे, योगीनां हृदये, रवौ, मद्भक्ता: यत्र गायन्ती, तत्र तिष्ठामि नारद ।। भगवंतांनी नारदांना सांगितले, ``माझे भक्त जिथे संगीत भजन करत असतील तिथे मी असतो. (मी वैकुंठात, योग्यांच्या हृदयात, सूर्यबिंबात असत नाही; तरी माझे भक्त जिथे गायन करत असतात तिथे मात्र मी निश्चित सापडेन.) मानवाच्या गळयाला गाण्याचा लळा मुळापासूनच होता, म्हणून त्याने ऋग्वेदाला सामवेदाचे माधुर्य प्राप्त करून दिले. महाराष्ट्नत जात्याच्या घरघरीसंगे गाणे उमटायचे, तेव्हा कुठे पहाट फुटायची. निरक्षरांच्या अंत:करणातूनही समयस्फूर्त अक्षरांच्या लडी उलगडायच्या. त्यांतून ओवी हा काव्याचा पहिला प्रकार उमटला.छंदोबद्ध काव्यरचना म्हणजे गीत. ओवी हे पहिले गीत, नंतर अभंग. ज्ञानेश्वरांच्या गीतप्रभेने उजळलेल्या कित्येक रचना, हरिपाठाचे अभंग, गौळणी, विराण्या इत्यादी प्रतिभासंपन्न संगीतकारांच्या नजरेस पडल्या. त्यातील आशयाचे मर्म त्यांना उलगडले. त्यावर अतिशय सहृदयतेने अनुरूप असा स्वरांचा साज त्यांना चढवता आला. परिणामी ही गीते कानाकानांतून मनामनांत जाऊन पोचली. संगीत हे दैवी पोषण आहे. त्यायोगे मानसि