भारतीय सौर कालगणना भारतात आजकाल जी दिनदर्शिका(क्रॅलेंडर)साधारणत: वापरली जाते, ती ग्रेगरियन कालदर्शिका म्हणतात. तथापि शालीवाहन शक, विक्रम संवत, शिवशक, युगाब्द, हिजरी, शहेनशाही अशाही प्रकारच्या काही गणना चालू असतात. त्यामुळे अेखादी खगोलशास्त्रीय किंवा अैतिहासिक घटना कोणत्या प्रकाराने नोंदवायची याबाबत गोंधळ होत असतो. आपला वाढदिवसही अेरवी तारखेनुसार करणारे लोक साठीशांत मात्र तिथीप्रमाणे करतात. ग्रेगरियन पध्दतीत `कालविभाग'(टाआीमझोन्स) वेगवेगळे वापरले जातात. भारतात आणि गेल्या शतकात ब्रिटिश राजवटीतील देश अेकाच कालविभाग पध्दतीचा अवलंब करतात. पण टिळक पंचांग आणि दाते पंचांग सौर पध्दतीने बनविलेले असते. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर बऱ्याच बाबींची नवी रचना करण्याचे मोठे काम सुरू झाले, त्यात कालमापन हाही विषय होता.राष्ट्नीय कालगणना करण्यामुळे अस्मिता आणि अेकात्मता वाढेल; तसेच राष्ट्नीय सुट्या ठरविण्याच्या किरकोळ बाबतीतही त्याचा अुपयोग होआील असा हेतू होता. नेहरूंच्या सल्ल्याने भारताच्या वैज्ञानिक व औद्योगिक मंडळाने या विषयाचा अभ्यास करण्यासाठी १९५२मध्ये `क्रॅलेंडर सुधार समिती'