Skip to main content

24 April 2017

 भारतीय सौर कालगणना
भारतात आजकाल जी दिनदर्शिका(क्रॅलेंडर)साधारणत: वापरली जाते, ती  ग्रेगरियन कालदर्शिका म्हणतात. तथापि शालीवाहन शक, विक्रम संवत, शिवशक, युगाब्द, हिजरी, शहेनशाही अशाही प्रकारच्या काही गणना चालू असतात. त्यामुळे  अेखादी खगोलशास्त्रीय किंवा अैतिहासिक घटना कोणत्या प्रकाराने नोंदवायची याबाबत गोंधळ होत असतो. आपला वाढदिवसही अेरवी तारखेनुसार करणारे लोक साठीशांत मात्र तिथीप्रमाणे करतात. ग्रेगरियन पध्दतीत `कालविभाग'(टाआीमझोन्स) वेगवेगळे वापरले जातात.  भारतात आणि गेल्या शतकात  ब्रिटिश राजवटीतील देश अेकाच कालविभाग पध्दतीचा अवलंब करतात. पण टिळक पंचांग आणि दाते पंचांग सौर पध्दतीने बनविलेले असते.
आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर बऱ्याच बाबींची नवी रचना करण्याचे मोठे काम सुरू झाले, त्यात कालमापन हाही विषय होता.राष्ट्नीय कालगणना करण्यामुळे अस्मिता आणि अेकात्मता वाढेल; तसेच राष्ट्नीय सुट्या ठरविण्याच्या किरकोळ बाबतीतही त्याचा  अुपयोग होआील असा हेतू होता. नेहरूंच्या सल्ल्याने भारताच्या वैज्ञानिक व औद्योगिक मंडळाने या विषयाचा अभ्यास करण्यासाठी  १९५२मध्ये `क्रॅलेंडर सुधार समिती'ची स्थापना केली. भौतिकशास्त्रज्ञ मेघनाथ साहा हे त्या समितीचे अध्यक्ष होते. शिवाय अे सी बॅनर्जी, के अेल दप्तरी, ज स करंदीकर, गोरख प्रसाद, आर व्ही वैद्य, अेन सी लाहिरी असे त्या क्षेत्रातील मोठे लोक समितीत होते. देशातील पंचांगकर्ते आणि अभ्यासू जनतेला आवाहन करून सूचना मागविण्यात आल्या. त्यातून ६०पंचांगे मिळाली, त्यांचा अभ्यास करून `भारतीय सौर दिनदर्र्शिके'ची रचना करण्यात आली.
२२मार्च आणि २३ सप्टेंबर या तारखांना १२-१२ तासांची रात्र व दिवस असतात. २२मार्चला विषुववृत्तावर असणारा सूर्य अुत्तरेकडे सरकू लागतो. तो सौरवर्षाचा प्रारंभदिवस आहे. वास्तविक सूर्य दक्षिण वा अुत्तरेला सरकत नाही, तो स्थिर आहे; आणि पृथ्वी फिरते. पण आपल्याला सूर्य फिरतो अ्रसे वाटते, म्हणून त्याला सूर्याचे भासमान भ्रमण म्हणतात.हा शब्दही साहा समितीने सुचविलेला आहे. त्या भासमान भ्रमणाशी निगडीत दर तिमाहीचे प्रारंभदिवस ठरवून त्यांची खगोलीय घटनांशी सांगड घालण्यात आली आहे.भारतात सर्वत्र महिन्यांची नावे `चैत्र, वैशाख....'अशीच असल्यामुळे तीच कायम केली; फक्त्त मार्गशीर्षाला `अग्रहायण' असे म्हटले आहे.
यातील महत्वाचे दिवस म्हणजे, १चैत्र (२२मार्च) -वसन्त सम्पात बिंदू, १आषाढ : दक्षिणायन प्रारंभ बिंदू, १आश्विन :२३ सप्टें.-शरद संपात बिंदू, आणि १पौष : २२डिसें.- अुत्तरायण प्रारंभ बिंदू. तसेच त्यात ऋतुचक्र  व महिने यांचीही सांगड घातलेली आहे. ३६५दिवसांची विभागणी करताना वैशाख ते भाद्रपद हे सलग पाच महिने ३१ दिवसांचे, आणि आश्विन ते फाल्गुन हे ६महिने प्रत्येकी ३०दिवसांचे आहेत. चैत्राला ३०दिवस, आणि लीप वर्षात ३१दिवस असतात. १चैत्र(२२मार्च) या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेशतो, १वैशाख या दिवशी सूर्य वृषभ राशीत प्रवेशतो; या प्रकारे १२ महिने १२राशींशी निगडीत आहेत.
`क्रॅलेंडर रीफॉर्म कमिटी ने तयार केलेली ही नवी दिनदर्शिका १चैत्र १८७९(२२मार्च १९५७)पासून भारताने स्वीकारली. व त्याबाबत सरकारने पुढील निर्णय घोषित केले.-
१. भारताच्या गॅझेटवर आिंग्रजी तारखेसोबत भारतीय दिनांक देण्यात येआील.
२. आकाशवाणी व दूरदर्शनवरून कोणत्याही वार्ता सांगताना भारतीय दिनांक सांगण्यात येआील.
३. सरकारी क्रॅलेंडरवर भारतीय दिनांकही दाखविण्यात येतील.
यांमुळे लोकांना सौर दिनांक दररोज कळून येआील.
आश्चर्याची गोष्ट अशी की आज साठ वर्षे झाली तरी  भारतीय अधिकृत दिनदर्शिकेचा वापर आपण अजूनही सरसकट करू लागलेलो नाही.वास्तविक अशास्त्रीय ग्रेगरियन दिनदर्शिकेला पर्याय म्हणून भारतीय पंचांगांतील नक्षत्रे, महिने,वार अशा शास्त्रीय पायावरची सौर दिनदर्शिका (क्रॅलेंडर) आपण सर्वथैव स्वीकारली पाहिजे, तसा प्रचार केला पाहिजे. संयुक्त राष्ट्न्संघाच्या माध्यमातून ही दिनदर्शिका जगात रूढ करण्याचा मानस डॉ मेघनाथ साहा समितीने व्यक्त केला, भारताच्या संसदेने त्यास मान्यता दिली. त्यामुळे आपण त्याचा अंगीकार करणे ही राष्ट्नीय नैतिक जबाबदारी आहे.
शासकीय राजपत्रांत व नैमित्तिक पत्रव्यवहारांत सौर दिनांकाचा अुल्लेख असतोच. आितर राष्ट्नंशी व्यवहार करताना, त्यासंबंधी कागदपत्रांवरही भारतीय सौर दिनांकाचा अुल्लेख असतो, तरच ती कागदपत्रे वैध ठरतात. रिझर्व बँकेने आपल्या सर्व बँकांना खास आदेश काढून, सौर दिनांक असलेले चेक्स स्वीकारण्याचे आदेश कधीचेच दिलेले आहेत. ते ठाअूक नसल्यामुळे कोण्या बँकेने तसे चेक नाकारल्यावर त्यांच्यावर कारवाआी झालेली आहे. आपल्याला प्रश्न पडतो की, हा सारा खटाटोप कोण कशासाठी करणार? आंतराष्ट्नीय व्यवहारात `आपले' हे सौर क्रॅलेंडर व तारखा कोण  मान्य करणार? त्यास प्रतिप्रश्न असा की, आपल्यातील कितीजण आंतरराष्ट्नीय व्यवहार करतात? -फार तर १टक्का. त्यांनी त्यांच्या सोयीसाठी जगाच्या पाठीवर आज वापरले जाणारे (अशास्त्रीय)क्रॅलेंडर वापरण्यास हरकत नाही. पण भारतात आपण लोकांनी, ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या अधिकृत समितीने तयार केलेले आणि आपल्या संसदेने संमत केलेले शास्त्रशुध्द सौर क्रॅलेंडर का वापरायचे नाही?
शासकीय कामकाजात त्या कालगणनेचा अवलंब करण्याचे आदेश आहेत पण त्याचा वापर होत नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाचे पत्र (२४-७-२०१५आहे.) त्यानुसार भारतीय सौर कालगणनेचा व त्याच रीतीने दिनांक लिहिण्याचा संदेश देणाऱ्या शासकीय परिपत्रकांचा तपशील असा आहे -
अेफ/६८/५६ पीयूबीआय                 दिनांक ०२कार्तिक१८६८   (२४-१०-१९५६)
अेफ/४२/१६/५७ पीयूबीआयआय         २०/२२आग्र.१८६९  (११/१३-१२-१९५७)
०९/१४/६६पीयूबीआयआय               २३चैत्र१८७९   (१३-०४-१९६७)
०८-०२-८८पीयूबी                          ३१आषाढ १९१०   (२२-०७-१९८८)
महाराष्ट्न्, गोवा या राज्यांच्या शिक्षण संचालनालयांनी,  शिक्षण संस्थांतून राष्ट्नीय सौर क्रॅलेंडर वापरले जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. औरंगाबादच्या प्रयत्नशील संस्थेला आयकराची सवलत देणारे पत्र अलीकडेच मिळाले, त्यावर सौर दिनांक  २९अग्रहायण १९३८ असा देण्यात आलेला आहे.
औरंगाबाद शहरात २०१३पासून `राष्ट्नीय दिनदर्शिका प्रसारमंच' ही नोंदणीकृत संस्था त्या बाबतीत प्रयत्न करते आहे. या संस्थेने आपल्या नेहमीच्या(ग्रेगरियन) २२मार्च -म्हणजे सौर दि. ०१ चैत्र पासूनचे क्रॅलेंडर अुत्तम स्वरूपात प्रकाशित केले आहे. त्यातील प्रत्येक दिनांकाच्या चौकटीत चालू आिंग्रजी तारखा संदर्भासाठी आहेत. दरवर्षी असे सौर क्रॅलेंडर व छोट्या डायऱ्या प्रकाशित केल्या जातात. त्यांचा अुपयोग करून आितरांनी या राष्ट्नीय कार्यात सहभागी व्हायला हवे, असे अर्थातच सर्वांना आवाहन आहे.
           संपर्क : राष्ट्नीय दिनदर्शिका प्रचारमंच
`श्रीदुर्गा' ५-६-२० नवा अुस्मानपुरा, औरंगाबाद-४३१००५
फोन नं. (०२४०) २३५८ ४६५  

आजकालचा इतिहास
सध्याचा काळ परिवर्तनाचा  असून आपण  संक्रमणाच्या अवस्थेतून  जात आहोत, हे  विधान तसे  कोणत्याही काळाला  लागू पडतेच. पण भारतात, -विशेषत: महाराष्ट्नत,  कधी नव्हे आितका सामाजिक दुरावा, विस्कटलेपणा, खचलेपणा  आज जाणवत आहे, हे निरीक्षण गंभीरपणानेच घ्यायला हवे. राज्यकर्ता पक्ष काय करतो, आणि विरोधी पक्षीयांची आंदोलने काय पात्रतेची आहेत हे पाहून ते निरीक्षण अधिक वेदनादायी होतेच; पण सामाजिक संदर्भानेही त्या वेदना  डाचत राहतात. मराठी माणसाचे देश पातळीवर किंवा आजच्या काळात जगाच्याही पाठीवर जे योगदान आहे, ते तर तोंडात बोट घालायला लावणारे आहे; पण त्याचबरोबर ते योगदान आितरांसमोर येण्याला आणि आपले कर्तृत्व अधोरेखित करण्याला फार मर्यादा पडत आहेत ही गोष्टही जाणवल्याशिवाय राहात नाही. मराठी जनांची कर्तबगारी आितिहासात नोंद करण्याबाबतीत अुदासीन आहे.

अेके काळी महाराष्ट्नच्या अुद्योग क्षेत्रात ओगले, किर्लोस्कर, आगाशे, आपटे, वेलणकर, घाटगे, साठे आित्यादी नावे आघाडीवर होती. त्यासंबंधाने सहज बोलत असताना, बडोद्याचे दा.वि.नेने तथा दादूमिया यांच्याकडून असे कळले की, गुजरातच्या अुद्योगधंद्याचीही पायाभरणी मराठी लोकांनी केलेली आहे. दिल्लीच्या राजदरबारात राजकारणी आघाडीवर त्यांचा प्रभाव अभावानेच दिसतो.पण तिथंपर्यंत पोचून कच खाणेे हे जसे त्यांचे वैशिष्ट्य आहे, तसेच आपल्याच लोकांना खाली ओढण्यातही त्यांना आनंद वाटत असावा. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा प्रारंभ करून त्यास चळवळीचे स्वरूप देण्याला आतापर्यंत मराठी माणूस कारणीभूत आहे. आजही राजस्थान-पंजाबात-कर्नाटकात,  कित्येक मराठी माणसे आितिहास-काळातील मर्दुमकी गाजवून तिकडे वास्तव्य करून आहेत. आितर अनेक क्षेत्रांत मराठी लोकांनी जे काही कर्तृत्व केले आहे, त्याची आितिहासाच्या दृष्टीने सत्यस्वरूपी नोंद करण्यात आपण अुदासीन  राहात असतो. ती गोष्ट नम्रतेची, प्रसिध्दी पराङ्मुखतेची किंवा विनयशीलतेची  नाही; तर ती अैतिहासिक दृष्टीने अपराधाची आहे.

याचे तोटे दोन प्रकारचे आहेत. अेक म्हणजे ज्यांनी काही कर्तबगारी दाखविली आहे, त्यांचे ते श्रेय हडपण्याचे किंवा ते नाकारण्याचे अुद्योग सध्या बहरले आहेत. आणि दुसरे असे की आधीच्या पिढीतील महामानवांच्या, - विनयशीलतेमुळे किंवा समर्पणभावामुळे लपून राहिलेल्या - कार्याकडे दुर्लक्ष करून,  कुठल्या तरी उपद्रवांचा अन्याय आज आितरांस सहन करावा लागत आहे. कर्तबगार माणसेच अपराधी असल्याप्रमाणे त्यांच्यावर प्रखर दोषारोप होत आहेत. गेल्या पाचपन्नास वर्षांत अेक प्रकारचे सामाजिक अभिसरण घडण्यास वेग आलेला आहे. त्याचे फायदे काय आहेत ते असोत; पण त्यायोगे कृतज्ञभावाची  समाजजागृती होण्याअैवजी अकारण दुष्टावा माजविला  जात आहे. महाराष्ट्नतील कर्तबगारीला कमी लेखण्याची मराठी लोकांचीच रीत त्या समाजावर अन्याय करणारी ठरू लागली आहे.

अेकदम शिवाजी महाराजांचेच अुदाहरण देता येआील. आजच्या साधारण मराठी माणसाला शिवाजी महाराज पूर्णत: ठाअूक असतील काय अशी शंका येते. शिवाजी म्हटले की अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला आणि शाआिस्तेखानाची बोटे तोडली अेवढेच जाणून `जय भवानी जय शिवाजी'चे  राजकारण करणारी मराठी माणसे खूप आहेत. पण या राजाचा कारभार, त्याची लोकाभिमुखता, जमीन महसुलाची सुधारणा, वतनदारीचे निर्मूलन, पगारी सैन्य, प्रधानमंडळाची रचना, रयतेच्या काळजीने दिलेली आज्ञापत्रे, आरमाराची स्थापना, संतसंग..... अशा किती बाबतीत शिवाजीविषयी मराठी माणसांचेही घोर अज्ञान असते. जगाच्या पाठीवर नेपोलियन आणि ज्युलीयस सीझर किंवा अगदी औरंगजेब... यांची नावे सम्राट म्हणून घेतली जातात. शिवाजी हा आमचा साधासुधा राजा होता, रयतेचा राजा होता. पण त्यामुळे  त्याचे सामर्थ्य जगाच्या डोळयाआड होते, हे लक्षात घ्यायला हवे.नेहरूंसारख्यांनी शिवाजीराजाला  `वाट चुकलेला देशभक्त' म्हटले होते,  त्याचे  कारण नेहरू केवळ मराठाद्वेष्टे होते हे नव्हे, तर शिवाजीराजांचा सच्चा आितिहास मूक होता, आजही तो फारसे बोलत नाही, हे कारण अधिक टोचणारे आहे.

गेल्या पन्नास साठ वर्षांत परिस्थिती खूप बदललेली आहे. ज्यांच्या आधीच्या पिढीने काही थोर काम केले आहे, त्यांच्या घराण्यांतील आजची किंवा अुद्याची पिढी तशी सुखवस्तू आहे. त्यांना सामाजिक जाण तर आहेच. पण आपापल्या घरच्या लोकांचा आितिहास नोंदवून ठेवण्याचे त्यांचे कर्तव्यही अधोरेखित करण्याची गरज आहे. कित्येक लोकांनी राष्ट्नीय शाळा काढल्या आहेत, कित्येकांनी त्या पदरला खार लावून चालविल्या आहेत. काहींनी ग्रंथशाळा, काहींनी व्यायामशाळा, काहींनी नाट्यशिक्षण शाळा काढलेल्या आहेत. ग्रंथरचना आणि संशोधन हा तर जीवननिष्ठेने चालविलेला अुद्योग कित्येकांचा होता. औषधी आणि रुग्णसेवा, शेती आणि ग्रामीण जीवन, समाजप्रबोधन, पत्रकारिता, अस्पृश्यता निवारण, सहकार, देशरक्षण..... अशा अनंत क्षेत्रांत आपल्या लोकांनी प्रचंड काम करून ठेवले आहे. ते त्या त्या घरांतल्या वंशजांनाही अज्ञात आहे. त्याचा शोध घेअून ते प्रकाशात आणले पाहिजे. टाटा  घराण्याचेे काम तर कोणीच नाकारणार नाही, पण त्यासंबंधी अनेक समृध्द ग्रंथ प्रकाशित होतात; तसे आणि त्या तोडीचे ग्रंथ किर्लोस्कर-शिरगावकर यांचे होत नाहीत. संस्थानिक म्हटले की आपल्यासमोर ग्वालेर-जामनगर-हैदराबाद येतात; पण लोककल्याणाच्या दृष्टीने दक्षिणी संस्थाने अधिक मोठी होती, हे सांगितल्याशिवाय कोणाला कळणार? -तथापि, `आता कळून तरी काय करायचेय?'-असाच प्रश्न करणे हा आपला स्वभाव आहे. तसा प्रश्न करण्यानेच, समर्थ कर्तबगारीला आजची सामाजिक मानहानीची स्थिती येअू घातली आहे हे नाकारता येणार नाही.

मोठा पराक्रम आणि कोती दृष्टी असा आपला स्थायीभाव बनला आहे. जाट लोक आपल्या आरक्षणासाठी सगळा अुत्तर पट्टा वेठीला धरतात, ते आंदोलन यशस्वी होण्यात काय धोके आहेत हे महाराष्ट्नतले लोक चांगले जाणतात. तर मग अेकत्रित ताकतीने राष्ट्नीय दृष्टीने जाटांच्या  मागणीला विरोध करण्याचे सामर्थ्य मराठी समाजाने दाखवायला हवे. त्याअैवजी अेकेक जात आपल्याला आरक्षण मिळावे म्हणून रान पेटवत सुटली आहे. आितकी वर्षे तसली मागणी करण्यास ब्राह्मण संघटना धजावत नव्हत्या, पण तिथूनही त्या मागणीचा सूर अुमटू लागला आहे. अर्थशास्त्र हा तर मराठी विद्वानांचा  प्रांत आहे. कर्जमाफी अुत्तर प्रदेशाने केली ही अयोग्य असेल तर तसे ठासून म्हणण्याअैवजी,  त्याच भूमिकेतून आपल्याकडेही तो निर्णय व्हावा यासाठी राजकारणी लोक रस्त्यावर अुतरले आहेत. त्यात स्वाभिमानी, माजी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीही आहेत. यांतून आपले अंुचपण आपण खुजे करतो आहोत हे खरे.

प्रचलित घटनांतून अेक आितिहास घडतच असतो. आजचे वर्तमान चुकीच्या दिशेने चालले असेल तरी तेच योग्य असल्याचा संभ्रम निर्माण केला गेला तर पुढच्या पिढ्यांना तो `आितिहास' म्हणून चुकीचा समजेल. तसे होअू नये याची काळजी समाजातल्या जाणत्या वर्गाने घ्यायला हवी. ज्यांना ती क्षमता आली आहे, त्यांच्याकडून त्यासंबंधी ज्यास्त अपेक्षा करायला हव्यात. त्या बाबतीत आजचा काळ फार स्पष्ट बोलता येणारा नाही, निदान अशा सत्यलेखनाची जाणीवपूर्वक सुरुवात झाली तर वातावरण कधीतरी निवळेल त्यावेळी, सत्याचा प्रकाश देण्यासाठी काही समया आजपासून भरून तयार ठेवाव्या लागतीलच.

पत्रकारितेची १ली यत्ता
पत्रकार म्हणून कुठं अभिमानानं सांगताना मला आजही अुगीच लाजल्यासारखं होतं. पण त्या क्षेत्रात लेखणी चालवू लागलो त्यास आता चाळीस वर्षं अुलटली. आज त्या बाबतीत जी नावं आघाडीला आहेत, त्यात विनय सहस्रबुध्दे हे अेक आहे. आज ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्नीय अुपाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार आहेत. तसे बडे नाव आहे. त्यांच्याशी माझी ओळख आहे, हे सांगतानाही जरा दबकलेपण यावं अशी आजची स्थिती. पण त्यानी `काय वसंतराव...' म्हणावं, अेवढ्यावर मी पावशेर मारू शकतो.
आणीबाणीनंतर जनता पक्ष फुटला आणि भारतीय जनता पक्ष स्थापन झाला. त्याची घोषणा करणारी पहिली जाहीर सभा अटलविहारी वाजपयी यानी मुंबआीत घेतली. शिवाजी पार्कवर ती सभा होती. त्या गर्दीच्या तुलनेत आजवरच्या मी पाहिलेल्या आमच्या गावाकडच्या सभा म्हणजे बारशाचे हळदीकुंकू वाटावे. जनसागर म्हणणेही अपुरे पडेल आितकी माणसे. त्या सभेच्या दिवशी मी कर्मसंयोगाने मुंबआीत होतो. सभेच्या स्थानी बराचसा लवकर पेाचलो. अजून तयारी चाललेली होती. मी पत्रकार कक्षात बसण्याची ती पहिलीच वेळ होती. आठ दहा हातांच्या अंतरावरून वाजपेयी अैकता येणार होते, या कल्पनेने मी गावठीपणात बावरलो होतो. संघ पठडीतले काही लोक सभोवती होते. त्यांच्या पध्दतीमुळे असेल किंवा पत्रकारांशी जमवून घेण्याची नव्या पक्षाची रीत म्हणून असेल; माझी चौकशी बरेचजण करीत होते. मला ते जरा सुखकर वाटत होतं. जवळ बसलेल्या अेकाशी मीही कोण कुठले वगैरे बोललो; तेच विनय सहस्रबुध्दे होते. माझी त्यांची ती पहिली ओळख. ती सभा आम्ही शेजारी बसून अैकली. अटलजींच्या भाषावैभवात मध्येच अेकदा मी अनाहूत टाळया वाजवल्या, त्यावेळी मला जरा समजून देत विनयरावांनी `पत्रकारांच्या अलिप्त कामकाजात अशा टाळया वाजवायच्या नसतात' या आशयाची अबोल सूचना केल्याचं मला आठवतं.
नंतरच्या काळात त्यांच्यासोबत `रामभाअू म्हाळगी प्रबोधिनी'त, मुंबआीत, पुण्यात, सांगलीत, अहमदाबादेत, आणि कि.वाडीच्या स्टेशनवरसुध्दा - अशा पुष्कळ भेटी झाल्या. गप्पा झाल्या. `विचार-विनय' घडला. ते लिहितात चांगले आणि खूप, पण पत्रकार म्हणवून घेत नसावेत. मी बापडा तेवढ्या भांडवलावर हळूच का होआीना, पण पत्रकार असल्याचे कुठंतरी सांगतो.
पुढच्या काळात, पत्रकारितेचे मानदंड बरेच भेटले त्यातले एक माधव गडकरी.
सकाळी सकाळी सात वाजता मुंबईच्या विलेपारल्यात `ग्राहक भवन'ला उतरलो. तिथे दहा वाजता बैठक होती. आन्हिके आवरली, तोवर आठ वाजले. आता दोन तास कोणत्या सत्कारणी लावावेत असा विचार करावा लागलाच नाही. कारण पारल्यातले एक दणकेबाज नाव अन् पत्ता माझ्या हाती होता.
फोनबिन कुठं करत बसता, असं म्हणून शोधत निघालो. आणि `कुंदा गडकरी' अशी पाटी असलेल्या ब्लॉकशी जाऊन थडकलो. दार उघडताच, उजव्या हाताला प्रशस्त खुर्चीवर पेपर वाचत बसलेले श्री.माधव गडकरी दिसले. मी वाकून नमस्कार करत, त्यांनी `बस' म्हणायच्या आधीच बसलो. माधव गडकरी हे नाव गोमांतक, मुंबई सकाळ, लोकसत्ता वगैरे वृत्तपत्रांतून सगळया साक्षर महाराष्ट्नला ठाऊक झालेेले. माझी ओळख देण्यापासून सुरुवात होती. चेहऱ्यावर उत्सुकता दाखवत त्यांनी हातातला पेपर बाजूला टाकला. `आपले जग'च्या पंचविशीनिमित्तच्या `स्मरणग्रंथात' पत्रकारितेच्या भविष्यकालासंबंधी त्यांचे भाष्य हवे होते. तो माझा आग्रह त्यांनी मान्य केला.
त्यांची ओळख केवळ `केबिनमध्ये कोंडलेला संपादक' अशी नसून, चौफेर दृष्टिक्षेप टाकत सामाजिक उत्थानासाठी वृत्तपत्र हे साधन म्हणून वापरणारा एक क्रियाशील कार्यकर्ता अशी आहे. त्यामुळेच `ग्राहकसंघा'चा संघटन कार्यातील उपयोग, उर्वरित महाराष्ट्नतील अनुभव, येत्या काळातील ग्राहकाभिमुख अर्थरचना इत्यादी विषय ओझरते आलेच. शिवाय शं.वा. किर्लोस्करांची अभिजात पत्रकारिता, पुढे आलेली सोलापूरची पोटनिवडणूक...यांतही त्यांना स्वारस्य होते. त्यांनी मला त्या निवडणुकीबद्दल माझा अंदाज विचारला. मीही त्यांना `मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या काँग्रेसची सीट येणार' हे एखाद्या अभ्यासू पत्रकाराच्या राजकीय निरीक्षणाच्या आवेशात बिनधास्त सांगितले. ते नंतर सपशेल चूक ठरले!
खोलीत सभोवती काय असणार? चार-दोन साधी आसने, आणि पुस्तकांचे गच्च कपाट. वृद्धत्त्वाच्या शारीर खुणा दिसत असल्या तरी शुद्धबुद्धीची तळप मुळीच कमी नव्हती. ही पिढी एकूणच विलक्षण. त्यांनी पंचाहत्तरी ओलांडली, त्याच्या थोड्या मर्यादा आल्या होत्या. पाय थकले होते. पण त्यांच्याकडून वृत्तपत्रीय सदरे मात्र विविध वृत्तपत्रांतून सादर होत असत. कर्तबगारीच्या वलयात असूनही मनस्वी साधी राहणी. माझ्यासारखा कुणीही थेट जवळ पोहोचू शकतो. तो `भोचकपणा' होईल की काय ही भीती अशा अनुभवातून मी केव्हाच काढून टाकली आहे. `माझीया जाती'चा एक पूर्वसूरी भेटण्याचा आनंद घेऊन मी बाहेर पडलो.
-वसंत आपटे-किर्लोस्करवाडी
फो.न.९५६१३९०८९०

शिमग्याचे दिवस
आपल्याकडे `शिमगा' हा शब्द आणि सण फारसा शुभ मानत नाहीत. त्याचा वापरही टवाळीने करतात. पण मला आठवणारा आमच्या कोकणातील शिमग्याचा सण फार आनंददायी होता.
खेड(रत्नागिरी) तालुक्यात सुसेरी हे आमचे गाव. ते गाव अर्धा आणि लगतचा गाव खारी अर्र्धा हे दोन्ही गाव साठे यांना  पेशव्यांकडून आिनाम मिळालेले होते.सवाआी माधवराव पेशवा यांची सासुरवाडी  या सुसेरीच्या साठ्यांकडे होती. माझ्या लहानपणी बाळासाहेब साठे म्हणून वंशपरंपरा आिनामदार होते. सुसेरीला त्यांचा वाडा होता; शिवाय वाआी (जि.सातारा), आणि पुणे आिथेही वाडा होता. बाळासाहेब त्यांच्या कुटुंबासह  पुण्याला राहात. न.चिं.केळकर यांनी टिळक चरित्राचे लेखन साठे यांच्या वाआीच्या वाड्यात राहून केले. माझे वडील खारी व सुसेरीची त्यांची स्थावर व्यवस्था पाहात असत. ते त्यांच्या नोकरीत होते. आमची शेती फारच थोडी होती. १९३०च्या सुमारास या साठ्यांकडून माझ्या वडिलांना १५रु. पगार होता.
आमच्या या गावचा शिमगा मोठा सण होता.  गावाच्या बाहेर ग्रामदेवतेचे मंदीर देवरहाटीत असे. किर्र झाडीमुळे, सणाव्यतिरिक्त त्या देवळात जायची भीती वाटायची. देवळाजवळच महार लोकांसाठी स्मशान होते. मंदिरात महार लोकांची स्वतंत्र मानाची जागा असे. देवळात नारळ वगैरे मनसायचा  तर थळेसरी  महार असे. त्याला `थळेसरी  सखा' म्हणत. गावात या मंडळींना मान होता. त्या देवळात वाघाची वसती असल्याचे बोलले जाआी. आता तिथली झाडी कमी झाली आहे. जवळ मसणवटा आणि वाघाची भीती यांमुळे तिकडे सणाव्यतिरिक्त वर्दळ नसे.
शिमग्याच्या पौर्णिमेला होम लागला की, ग्रामदेवतेची सहाण भरत असे, त्यावेळी सारा गाव तिथे लोटायचा. प्रत्येक घरटी सहाणेवर ५नारळ द्यावा लागे. मिठाआीची खेळण्यांची  दुकाने लागत. गावचा गुरव किंवा थळेसरी हा नारळ मनसायचा. त्यावेळी तो प्रार्थना म्हणायचा-
`भो% सत्त्याच्या मना, सहदेवाचे मना, बा खेमा (क्षेम क्षेत्रपाळ देवा)
जाखाआी जाखमाता बहिरी देवा,
हा -अमक्या तमक्याचा - नारळ,
सालाबादप्रमाणी दिल्हा आहे, तो मान्य करून घे.
त्याचे मुला-माणसास  घरा-दारास  देशी-परदेशी
सर्वांना सुखी ठेव.
शेरास सव्वाशेर धान्य दे ।'
पालखीत देवाचे चांदीचे मुखवटे असत. ती पालखी मुख्य मानकरी म्हणजे खोत साठे यांच्या चौसोपीला वसतीसाठी येआी. त्या रात्री त्या आिनामदाराकडे राहात असे. तो गाव त्यांनी राखला असे मानले जाआी. गावकऱ्यांचे जेवण पालखीवाल्यांबरोबर त्या वाड्यावरच होआी. रात्री गावातल्या खेळीया  आणि सोंगांचे खेळ चालत, तमाशे होत. दुसऱ्या दिवशी धोतर फेटा यांसह ग्रामदेवतेची पूजा मानकरी करीत. ढोल सनआीच्या तालात पालखी साऱ्या गावातल्या घरोघरी पूजा घेत जात असे. गुढी पाडव्यापर्यंत पालखी चालत असे.नंतर ती गावच्या मंदिरात येआी. शिपणे (रंगखेळ) झाल्यावर सर्व वर्णांतील प्रमुख मंडळींना नारळ विडा  देअून शिमग्याची समाप्ती होत असे.
माझे वडील-आआी सज्जन व परोपकारी होते. १९४६ साली ते अल्पायुषी -पन्नाशीतच-  गेले. गावातील साऱ्या जमीनदारांच्या जमिनी कूळकायद्यात गेल्या; पण आमच्या वडिलोपार्जित जमिनीतील धान्य तिथला शेतकरी अजूनही - आिच्छेला येआील, पिकेल त्याप्रमाणे- आणून देतो.
-वा.मो.बर्वे, दापोली (जि.रत्नागिरी)
फोन -९९७५०९६४१६

थरारक अनुभव
सिव्हील इंजीनियरींग डिप्लोमा झाल्यावर १९५७ मध्ये अहमदनगरच्या मुळा डॅम डीव्हीजनमध्ये मी रुजू झालो. धरणावर सुपरव्हिजन करण्यास मिळणार या रुबाबात नवीन नेमणूक झालेले आम्ही सर्वजण असताना वंजारवाडी येथे दगडी धरण बांधण्याचे काम स्थगित करण्यात आले. स्थळ पक्के व्हावे, लग्नाची तयारी व्हावी आणि अचानक विघ्न यावे तशी स्थिती झाली. वरिष्ठ मुख्य अभियंता यांनी वंजारवाडीऐवजी अन्य साईटचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. वंजारवाडीच्या नशिबात धरण होणे नव्हते. आदेशाचे पालन करीत १९५९पर्यंत आम्ही राहूरीपासून पार वर पुणे नाशिक रस्त्यावरील घारगावपर्यंत मुळा नदीवर अनेक साईटचा सर्व्हे केला. शेवटी राहूरीजवळ बारगाव नांदूर येथे मातीचे धरण मंजूर झाले.
बारगाव नांदूर येथे धरण कामास सुरुवात झाली. नदी पात्रातील काम करण्याचे होते यासाठी नदीतील उन्हाळयातील पाण्याचा किरकोळ प्रवाह डाव्या बाजूच्या खिंडीतून काढलेल्या क्रॅनालमधून वळविण्यासाठी नदीमध्ये मातीचा लहान बंधारा बांधला होता. सर्व काम आठ-पंधरा दिवसात पूर्ण झाले असते. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अहोरात्र काम करीत होतो. १६ मे रोजी हलका पाऊस झाला. थोडी धावपळ झाली, कारण कामात व्यत्यय येऊन उपयोग नव्हता. २० मे १९६१ चा दिवस. नदीच्या वरील भागात कोठेतरी थोडा पाऊस झाला होता, त्यामुळे नदीपात्रातील बंधाऱ्यामागील पाणी वाढू लागले होते. पाणी पातळी गतीने वाढू लागली. आता बंधारा फुटतो की काय या धास्तीने त्यावर वाळूची पोती रचण्यात आली. मी व माझे सहकारी नदीच्या डाव्या तीरावरील क्रॅनालची पाहणी करण्यास गेलो होतो. हातातील बॅटऱ्यांच्या उजेडात रात्री ९ च्या सुमारास नदी पात्रातून उजव्या तीरावर आलो. बंधाऱ्याची स्थिती काय आहे याची चौकशी करत असतानाच बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले व बंधारा फुटला. आम्हाला नदीपात्रातून वर येण्यास थोडा जरी उशीर झाला असता तर आम्ही दोघे वाहून गेलो असतो. जोशींचा विवाह झाला होता. माझा ठरला होता.
आम्ही दोघे त्या  संकटातून वाचलो. आमचे त्यावेळचे कार्यकारी अभियंता कै. के.आर. दाते यांनी त्या दिवशी जागोजागी पडलेल्या पावसाचा अभ्यास करून, बंधारा फुटण्यास कारणीभूत झाला तो पूर ढग फुटीमुळे आला होता असे सिद्ध केले. के.आर.दाते (१९२६-२००८)नंतर राष्ट्नीय तज्ज्ञ म्हणून गणले गेले.
-वि.म. मराठे (निवृत्त कार्यकारी अभियंता), सांगली
फोन नं.९४२०६७८९६५

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन