याला उत्तर काय? जपानचा भूकंप-त्सुनामी पाहतो, वाचतो आहोत. जपानी माणूस शांतताप्रिय, निसर्गप्रेमी, बौध्दभक्त, शिस्तप्रिय, कार्यमग्न, सेवातत्पर, स्वच्छताप्रेमी, प्रामाणिक, देशभक्त, मानवहितैषी इत्यादी सद्गुणांनी परिपूर्ण असूनही निसर्गाची-देवाची त्यावर अवकृपा का? हजारोंना दिलेली मृत्युदंडाची शिक्षा का? लाखोंच्या जीवनाची अशी परवड का? त्यासोबत पशु-पक्षी, वनस्पती या सर्वांचा विनाश का? देव खरंच इतका अन्यायी-निर्दयी आहे का? विज्ञानाकडून या आपत्तीस उत्तर आहे. हे का व कसे घडले हे विज्ञान सांगते, पण या सगळयाला `देवा'ची कारणमीमांसा काय आहे? - रा.खु.भावसार ई-७, अंबड एमआयडीसी, नाशिक संवाद हा प्रश्नस्वरूपी विषय प्राचीन काळापासून अनेकांच्या संदर्भात चर्चिला जात असतो. पुष्कळ स्वयमासक्त लोकांना `मी इतका चांगला वागतो तरी माझ्याच नशीबी हे भोग का?' असा प्रश्न नेहमी पडतो. त्यास निर्विवाद उत्तर देण्याची पात्रता नाही, पण त्या संदर्भात मत मांडता येईल. भूकंप-त्सुनामी हे निसर्गखेळ एकूण ज्ञात विश्वाच्या पसाऱ्यातही `फार मोठे' नव्हेत, अज्ञाताचा वेध घेणाऱ्यांना तर ही क्षुल्लक हालचाल वाटेल. केवळ जपान