Skip to main content

Tristhali

यांचा अपवाद नसावा

 प्रधानमंत्री मनमोहनसिंग गेली २० वर्षे खासदार आहेत. ते आसाममधून राज्यसभेवर निवडून येतात. लोकसभेच्या थेट निवडणुकांचा धबडगा त्यांना सोसणार नाही, पण त्यांच्या बुद्धी-अनुभव-कौशल्य यांचा उपयोग देशाला व्हावा म्हणून ते राज्यसभेवर `आणले' जातात. त्यात वावगे काहीच नाही. परंतु त्यामुळे ते स्वत: आसामच्या पत्त्यावर असतात. म्हणजेच आसामातील मतदारयादीत त्यांचे व त्यांच्या पत्नीचे नाव आहे.
 नुकतेच आसाममधील विधानसभेचे मतदान झाले, त्यात मनमोहनसिंग व त्यांच्या पत्नीनी मतदान केले नाही हे तीव्र आक्षेपार्ह आहे. भारतीय राज्यघटनेने मताचा `अधिकार' दिला आणि मतदान हे लोकशाहीतील मूलभूत कर्तव्य असल्याचे म्हटले जाते. ते मूलभूत कर्तव्य पंतप्रधानच करत नाहीत हे लाजिरवाणे आहे. भारतातील राजकारण अशा थराला गेले आहे की, तरूण साक्षरांना मतदानाचा उबग आहे. मतदान कमी होण्यामुळे खरे प्रतिनिधित्त्व होत नाही, म्हणून मतदान सक्तीचे करावे असाही मतप्रवाह आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री व त्यांच्या पत्नीनी मतदान न करण्याचे समर्थन होणार नाही.
 जे प्रशासकीय कामात असतात अशा पोलिस, निवडणूक कर्मचारी, सीमेवरचे सैनिक, परगावी वा परदेशी गेलेले नागरीक यांना आपले मत नोंद करणे, पोस्टाने मतदान करणे वगैरे सुविधा केलेल्या असतात. त्यामुळे प्रधानमंत्री फार व्यस्त होते, परदेशी होते वगैरे कारण देता येण्याजोगे नाही. त्यांच्या पत्नींचा तर तोही प्रश्न नाही. आमचे सर्वोच्च नेतेच असे करत असतील तर काय बोलणार?

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...