मार्केटिंग पद्धती सकाळी लवकर फिरायला बाहेर पडून बोळकांडीतून मोठ्या रस्त्याला लागलं तर तिठ्ठ्यावर चतकोर भाकरी-लिंबू-मिरची वगैरे कुणी त्रस्त समंधानं ठेवलेलं दिसतं. अमावास्या लक्षात येते. पुढचा मैलभर रस्ता विरळ होत गावातून बाहेर पडतो, तिथवरच्या प्रत्येक दहावीस पावलांवर ही आरास दिसते. झुंजुमुंजू दिसू लागल्यामुळं रस्त्याची माणसं ही बला चुकवीत पाय टाकत असतात. पूर्वी पिचत् कुठंतरी केव्हातरी हा उतारा दिसायचा. हल्ली त्याचंही प्रमाण खूप वाढलं आहे. सध्या सगळयाच गोष्टींना मार्केट चांगलं आहे म्हणतात; त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ जोरात आहे, शनीशिंगणापूरच्या चौथऱ्यावर चढूनच देवदर्शन करणारी हट्टी आंदोलनंही जोरात आहेत, आणि ही उतारे-मंतराची दृष्टही खूप फोफावली आहे.
महामार्गावर गाडी टोलनाक्यावर थांबली, तशी आरडाओरड करत वस्तूविके घोंघावत येतात. त्यात शनिवार-अमावास्या असेल तर मिरची-लिंबू माळा लोंबत पुढे आणणारी पोरं खूप असतात. महामार्ग वाढले, कार-वाहनं वाढली, तसं हे लिंबू-मिरचीवालेही वाढले. एकदा कोल्हापूर-पुणे महामार्गावरच्या टोलनाक्याशी रांगेत थांबलो तर तीन-चारजण तसल्या माळा घेऊन भोवती आले. आमच्या गाडीत एका संस्थेच्या अभ्यासाला आलेल्या हॉलंडमधल्या दोन तरूण पोरी होत्या. त्यांनी त्यातल्या दोन माळा हातात घेतल्या. त्यांना वाटलं, ही भाजी विकायला आली आहे. भाजी टवटवीत राहण्यासाठी अशी टांगून ठेवण्याची कल्पना त्यांनी `ओह, वंड%फूल - फाईन, सो ईझी' असं म्हणत दाद दिली. त्यांना काय आणि कसं सांगायचं हा प्रश्नच होता. मग `नो मून डे', `दे फील फीअर...' असं करत करत त्यांच्या गोंधळात भर टाकली. त्यांना मात्र या भानगडीची लागण होण्याचा संभव कुणालाही वाटला नाही, कारण त्या या देशीच्या नव्हेत, त्यांना यातलं काही ठाऊक नाही, यावर गाडीतल्या बाकी सर्वांचं मराठीत एकमत झालं. ते जे कोणी भूत, मुंजा, समंध, लागीर असेल ते परदेशी गोऱ्या लोकांच्या वाटेला जात नसावे. तेही परधार्जिणं! या माळा सरसकट पाच रुपयाला नव्हत्या. त्यातही जास्त-कमी किंमतीचा माल होता. जादा पाच मिरच्या व टपोरं लिंबू असेल तर भाव जास्त होता. एक मिरची, हळकुंड (असावं) अशी विविधता काहीजणांकडं होती. एकानं इंचभर आकाराच्या छोट्या चपला दोऱ्यात ओवून आणल्या होत्या तर दुसऱ्याकडं उलट्या टांगायच्या काळया बाहुल्या होत्या, त्यातही लहान-मोठे किंवा हलके-भारी वगैरे मार्केट पॉलिसी होतीच.
एका शहराचा सराफा म्हणजे `काय सांगावं महाराजा' असा अनुभव असतो. ही खाऊ गल्ली रात्री नऊच्या पुढं खादीसाठी गजबजते. एका मुक्कामात मुद्दाम त्या वाटेला गेलो. त्या गल्लीच्या आधीपासूनच पायात या मिरच्या-लिंबू उतरून रस्त्यात टाकलेल्या. आजपर्यंतच्या सवयीमुळे ही पीडा चुकविण्यासाठी सुरुवातीला जरा खो खो खेळत पावलं मागं-पुढं टाकून पाहिली. पण तसं किती वेळ करणार? हळूहळू तो मिरचीचा सडा दाट होत गेला. आजूबाजूची लोकं ते सगळं तुडवत बिनधास्त चालली होती हे मी पाहून त्यांच्यासारखा सरळ चाललो. त्यांच्यासारखंच दुर्लक्ष करू लागलो. हे लागीर अंगावर उतायचं असेल तर त्याच्या वाटणीला आपण काही एकटेच येणार नाही. किती टाळलं तरी पायातला मिरची-लिंबू सडा डोळयात इतका खुपत होता की, त्या कोण्या शनी-समंधाला माझीच दृष्ट लागायची!
रस-रंग-गंधासह या सराफ्याचा आस्वाद घेऊन तृप्त मनाने मध्यरात्री मुक्कामी झोपलो. सकाळी लवकर उठून जवळच्याच गल्लीनं परतीच्या प्रवासाला ऑटोरिक्षातून चाललो. त्यावेळी नगरपालिकेचे सफाई कामगार खराटे-फावड्यांनी ते सगळे उतारे ढिगाऱ्यांनी त्यांच्या कचरा-गाडीत भरत होते. तुडवा झाल्यामुळं त्या सगळयाची रया गेलेली होती, त्याचा तजेला जाऊन निव्वळ मातेरे झाले होते. पाट्या-पाट्या भरून ही घरातली इडा-पीडा बाहेर फेकायला नेत होते.
देवाची मूर्ती भक्ताच्या शक्तीनुसार लहान मोठी होते. तसे त्याचे भक्तोपचारही ठरतात. कुणाला बिनवासाचे रानटी फूल पुरते तर काही देवांना गुलाबगेंद व निशिगंधाचे गजरे मिळतात. दुसऱ्या सकाळी सगळयांचे निर्माल्य एकाच गाडीत भरायचे. तसाच प्रकार या भुता-खेतांचाही असतो. `देव-दानवा नरें निर्मिले' हे केशवसुतानी म्हटले. ही निर्मितीच माणसाची असल्यामुळं मागणी, पुरवठा, टंचाई, दरवाढ हे मार्केटचे नियम दोघांनाही लागू होणारच. मिरची लिंबूच्या माळेला पलिटी, साईज प्रमाणं दर असणार. आपण त्यांचे व्यवहारी रिवाज ओलांडून न जाता शक्यतो आपलं पाऊल चुकवावं हे बरं!
महामार्गावर गाडी टोलनाक्यावर थांबली, तशी आरडाओरड करत वस्तूविके घोंघावत येतात. त्यात शनिवार-अमावास्या असेल तर मिरची-लिंबू माळा लोंबत पुढे आणणारी पोरं खूप असतात. महामार्ग वाढले, कार-वाहनं वाढली, तसं हे लिंबू-मिरचीवालेही वाढले. एकदा कोल्हापूर-पुणे महामार्गावरच्या टोलनाक्याशी रांगेत थांबलो तर तीन-चारजण तसल्या माळा घेऊन भोवती आले. आमच्या गाडीत एका संस्थेच्या अभ्यासाला आलेल्या हॉलंडमधल्या दोन तरूण पोरी होत्या. त्यांनी त्यातल्या दोन माळा हातात घेतल्या. त्यांना वाटलं, ही भाजी विकायला आली आहे. भाजी टवटवीत राहण्यासाठी अशी टांगून ठेवण्याची कल्पना त्यांनी `ओह, वंड%फूल - फाईन, सो ईझी' असं म्हणत दाद दिली. त्यांना काय आणि कसं सांगायचं हा प्रश्नच होता. मग `नो मून डे', `दे फील फीअर...' असं करत करत त्यांच्या गोंधळात भर टाकली. त्यांना मात्र या भानगडीची लागण होण्याचा संभव कुणालाही वाटला नाही, कारण त्या या देशीच्या नव्हेत, त्यांना यातलं काही ठाऊक नाही, यावर गाडीतल्या बाकी सर्वांचं मराठीत एकमत झालं. ते जे कोणी भूत, मुंजा, समंध, लागीर असेल ते परदेशी गोऱ्या लोकांच्या वाटेला जात नसावे. तेही परधार्जिणं! या माळा सरसकट पाच रुपयाला नव्हत्या. त्यातही जास्त-कमी किंमतीचा माल होता. जादा पाच मिरच्या व टपोरं लिंबू असेल तर भाव जास्त होता. एक मिरची, हळकुंड (असावं) अशी विविधता काहीजणांकडं होती. एकानं इंचभर आकाराच्या छोट्या चपला दोऱ्यात ओवून आणल्या होत्या तर दुसऱ्याकडं उलट्या टांगायच्या काळया बाहुल्या होत्या, त्यातही लहान-मोठे किंवा हलके-भारी वगैरे मार्केट पॉलिसी होतीच.
एका शहराचा सराफा म्हणजे `काय सांगावं महाराजा' असा अनुभव असतो. ही खाऊ गल्ली रात्री नऊच्या पुढं खादीसाठी गजबजते. एका मुक्कामात मुद्दाम त्या वाटेला गेलो. त्या गल्लीच्या आधीपासूनच पायात या मिरच्या-लिंबू उतरून रस्त्यात टाकलेल्या. आजपर्यंतच्या सवयीमुळे ही पीडा चुकविण्यासाठी सुरुवातीला जरा खो खो खेळत पावलं मागं-पुढं टाकून पाहिली. पण तसं किती वेळ करणार? हळूहळू तो मिरचीचा सडा दाट होत गेला. आजूबाजूची लोकं ते सगळं तुडवत बिनधास्त चालली होती हे मी पाहून त्यांच्यासारखा सरळ चाललो. त्यांच्यासारखंच दुर्लक्ष करू लागलो. हे लागीर अंगावर उतायचं असेल तर त्याच्या वाटणीला आपण काही एकटेच येणार नाही. किती टाळलं तरी पायातला मिरची-लिंबू सडा डोळयात इतका खुपत होता की, त्या कोण्या शनी-समंधाला माझीच दृष्ट लागायची!
रस-रंग-गंधासह या सराफ्याचा आस्वाद घेऊन तृप्त मनाने मध्यरात्री मुक्कामी झोपलो. सकाळी लवकर उठून जवळच्याच गल्लीनं परतीच्या प्रवासाला ऑटोरिक्षातून चाललो. त्यावेळी नगरपालिकेचे सफाई कामगार खराटे-फावड्यांनी ते सगळे उतारे ढिगाऱ्यांनी त्यांच्या कचरा-गाडीत भरत होते. तुडवा झाल्यामुळं त्या सगळयाची रया गेलेली होती, त्याचा तजेला जाऊन निव्वळ मातेरे झाले होते. पाट्या-पाट्या भरून ही घरातली इडा-पीडा बाहेर फेकायला नेत होते.
देवाची मूर्ती भक्ताच्या शक्तीनुसार लहान मोठी होते. तसे त्याचे भक्तोपचारही ठरतात. कुणाला बिनवासाचे रानटी फूल पुरते तर काही देवांना गुलाबगेंद व निशिगंधाचे गजरे मिळतात. दुसऱ्या सकाळी सगळयांचे निर्माल्य एकाच गाडीत भरायचे. तसाच प्रकार या भुता-खेतांचाही असतो. `देव-दानवा नरें निर्मिले' हे केशवसुतानी म्हटले. ही निर्मितीच माणसाची असल्यामुळं मागणी, पुरवठा, टंचाई, दरवाढ हे मार्केटचे नियम दोघांनाही लागू होणारच. मिरची लिंबूच्या माळेला पलिटी, साईज प्रमाणं दर असणार. आपण त्यांचे व्यवहारी रिवाज ओलांडून न जाता शक्यतो आपलं पाऊल चुकवावं हे बरं!
Comments
Post a Comment