Skip to main content

ICE-CREAM & TEA

 एक सरदारजी दुकानात जातो. तिथे त्याला एक नवी वस्तू दिसते. तो विचारतो, `हे काय आहे?' दुकानदार उत्तरतो, `थर्मास - तुम्ही यात थंड पदार्थ भरून ठेवला तर तो तीन-चार तास तसाच थंड राहतो किंवा गरम पदार्थ भरून ठेवला तर तो तीन-चार तास गरम राहतो.'
 सरदारजीला ती वस्तू फारच आवडते नि थर्मास विकत घेऊन तो घरी येतो. मग तो त्यात आईस्क्रीम भरून ठेवतो. ते तीन तास घट्ट राहतं. चहा भरून बघतो. तोही तीन तास गरम राहतो. सरदारजी एकदम खूष होतो. कधी एकदा आपल्या मित्राला ती वस्तू दाखवीन असं त्याला होऊन जातं. तो मित्राकडे जातो नि त्याला तो थर्मास दाखवतो.
 `हे काय आहे?' मित्र विचारतो.
 `थर्मास! अरे काय अफलातून वस्तू आहे ही! हिच्यात आईस्क्रीम ठेवलं तर ते तीन तास तस्संच राहतं अन् चहा ठेवला तर तोही तीन तास तस्साच गरम राहतो.''
 `खरं की काय!' मित्रही आश्चर्यचकीत होतो.
 `मग; तुला खोटं वाटतंय की काय? थांब तुला पुरावाच दाखवतो. मी ह्यात दोन्हीही भरून आणलंय. तुला काय पाहिजे बोल..!'
 - थर्मासात एकाचवेळी आईस्क्रीम आणि चहा भरणाऱ्या सरदारजीला आपण हसतो पण त्याचवेळी विकास आणि पर्यावरण संरक्षण हे दोन्ही एकाच वेळी करू पाहणाऱ्याला मात्र `विचारवंत' म्हणतो. पर्यावरणाच्या हानीविषयी वक्ते चिंता तर व्यक्त करतात, पण योग्य उत्तरं देण्याचं धाडस नसल्यानं लगेच `तरीही विकास झालाच पाहिजे', `पर्यावरणाची जपणूक करून विकास कसा होऊ शकेल हे पाहिलं पाहिजे' असंही म्हणतात. वक्ता हा जर राजकीय नेता असेल, तर तो `आम्ही निश्चितपणे हे दोन्हीही करणार आहोत' असं आश्वासनही देतो. `आम्ही दुधात मीठ घालणार आहोत, पण तरीही ते न नासता चांगलं कसं राहील हेही बघणार आहोत' असं काहीतरी बरळते. असल्याचा भास होतो. पर्यावरणाचं संतुलन टिकणं हे सर्वाधिक महत्त्वाचं, मग त्याकरिता उद्योग, व्यापार, पर्यटन हे बंद पडलं तरी चालेल' अशी ठाम भूमिका मांडण्याची पर्यावरणवाद्यांचीही तयारी नसते. आजच्या संकल्पनेतला `विकास' आणि `पर्यावरण संरक्षण' हे दोन्हीही एकाचवेळी अस्तित्वात असूच शकत नाही! थर्मासात एक तर आईस्क्रीम तरी राहू शकेल, किंवा चहा तरी; दोन्हीही एकाचवेळी त्यात भरलं, तर ते परस्परांना संपवतील. जर पर्यावरणाची सुस्थिती टिकून राहायला हवी असेल तर प्रचलित विकास प्रतिमान नाकारायला हवं; अन् जर `विकास' हवा असेल तर पर्यावरणाचा विनाश स्वीकारायला हवा. जे एकाचवेळी दोन्ही म्हणतात ते एकतर अज्ञ तरी असतात किंवा लबाड तरी.
 `उपभोगांचं उच्चतमीकरण' हे आज जीवनाचं ध्येय आहे, नि मग त्यासाठीच्या सर्व प्रकारच्या उत्पादनांचं उच्चतमीकरण हाच `विकास' बनतो. उत्पादन जितकं अधिक होईल, तितकी ही संसाधनं संपत जाणार. विकासाचा वेग अधिक हवा असेल, तर नवीकरणक्षम संसाधनं पुरी पडणार नाहीत; कारण त्यांची पुनर्निर्मिती फार कमी वेगानं होत असते. म्हणजे मग अ-नवीकरणक्षम संसाधनांवरच डल्ला मारावा लागणार. तीच गोष्ट ऊर्जांची. सौर ऊर्जा खूपच विकेंद्रित स्वरूपात मिळते. ती वापरून वेगानं विकास होणं अशक्य आहे. म्हणजे मग खनिज तेल, दगडी कोळसा, युरेनियम ह्यासारखे जे अ-नवीकरणीम स्रोत आहेत, तेच वापरावे लागणार. एकीकडे ते संपत जाणार, नि दुसरीकडे प्रचंड प्रदूषण होणार. शिवाय ह्या साऱ्या उद्योगांतून प्रचंड कचरा निर्माण होणार - सेंद्रिय, असेंद्रिय, रासायनिक, किरणोत्सर्गी इत्यादी. सारांश, पर्यावरणाची हानी केल्याविना, सध्या ज्याला `विकास' म्हटलं जातं तो होऊच शकणार नाही.
 आपली कितीही इच्छा असो : सध्याचा `विकास' टिकाऊ नाही. धारणाक्षम नाही. कारण संसाधनं मर्यादित आहेत. ही प्रक्रिया आत्मनाशक आहे. जे `पर्यावरण-संरक्षणा'च्या बाजूनं आहेत, त्यांना प्रचलित विकासप्रक्रियेला विरोधच करावा लागेल. एका पूर्णत: वेगळया विकास-प्रतिमानाचीच कास धरावी लागेल.
 आईनस्टाईनचं वाक्य आहे - आजच्या पर्यावरणाच्या समस्या ह्या एका विशिष्ट विकास संकल्पनेचा परिपाक आहेत. ती संकल्पना तशीच ठेवून जर कोणी त्या सोडवू पाहील, तर ते शक्य नाही. पर्यावरण-रक्षण व्हायचं, तर तो `माइंर्ड-सेट'च बदलायला हवा. हे लक्षात घ्यायला हवं की, थर्मासात आईस्क्रीम किंवा चहा ह्यापैकी कोणतीही एक वस्तू भरलेली चालत असली, तरी `विकास' आणि `पर्यावरण-संरक्षण' यात निवडीला वाव नाही!
(दिलीप कुलकर्णी `गतिमान संतुलन')

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...