हे कसले प्रतिनिधी! तिकडे संसदेचे आणि इकडे विधानसभेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. त्या उच्च सभागृहांचे कामकाज पाहिल्यानंतर सुजाण मतदाराला उबग यावा असे चित्र आहे. उद्याच्या स्वातंत्र्यदिनास, व एरवीही वर्षातून चार वेळा ग्रामपातळीवर ग्रामस्थांच्या सभा होतात. एक सोपस्कार म्हणून तो उरकला जातो, त्या गोंधळगाड्यातून नागरिकांना काय मिळते; हा प्रश्न विचारू नये. लोकशाही कार्यपद्धतीत चर्चा व विचारमंथन यांचा सराव होण्यासाठी तो अगदी प्राथमिक पातळीचा प्रयोग, निरुपयोगी असला तरी चालू ठेवणे श्रेयस्कर आहे. तथापि उच्चस्तरीय सभागृहांत आपण निवडून दिलेले प्रतिनिधी जे आणि जसे वागत आहेत, त्यावरून त्यांना ग्रामसभेइतकेही गांभीर्य व परिस्थितीचे भान नाही असे लक्षात येते. चाळीतल्या कजाग बायांचे भांडण तिथे दिसू लागले आहे. सरकार पक्षाचा कारभार व धोरणे सर्वमंगल आहेत असे कुणी म्हणणार नाही. भा.ज.पक्षाचे सरकार केंद्रात आणि बऱ्याच राज्यांत सत्तेवर आहे; त्याचप्रमाणे केरळ-पूर्वांचल-बंगाल-ओरिसा-तामीळनाकेंद्धं-र्त्त्ूद्धॅिींज्ञ््-र्थ्ंगी्-ओर्र्द्धीं%ी-र्डीमुंर्ण्ी वगैरे राज्यांत काँग्रेस किंवा इतर पक्षांचीही सत्ता आहे. काही अप