अजून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद कशाला? - अरुण गोडबोले एके काळी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे महाराष्ट्न् - विशेषत: पश्चिम महाराष्ट्न् आणि मराठवाडा - खूपच विघटित झाला होता. महाराष्ट्नच्या प्रगतीला आणि एकात्मतेला बाधा आणणाऱ्या त्या काळापासून आता आपण खूप पुढे आलो आहोत. वादाचे जुने कंगोरे काळाच्या ऐरणीवर घासून ठोकून खूपसे झिजलेले आहेत. धार्मिकतेचा पाया, आता पुरेसा ठिसूळ झालेला आहे. तरीही राजकीय स्वार्थाकरिता तो वाद पुन्हा धुमसत राहावा असे प्रयत्न राजकीय वा तथाकथित नेते अधूनमधून का होईना, पण जाणीवपूर्वक करताना दिसतात, त्याचा खेद वाटतो. वि.द.घाटे यांचे `दिवस असे होते' हे आत्मचरित्र वाचनात आले. शिक्षण क्षेत्रातील विचारवंत, प्रतिभावंत साहित्यिक म्हणून ते गणमान्य होते. त्यांनी त्यांच्या तरुणपणी मराठा समाज संघटित होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यांनी या वादांवर आपल्या आत्मचरित्रांत दोन स्वतंत्र प्रकरणे लिहिली आहेत. महात्मा फुले यांना मानाचा मुजरा करून घाटे यांनी त्यांच्या कामगिरीचे `अलौकिक' असे वर्णन केले आहे, `फुल्यांची चळवळ ब्राह्मणांच्या विरोधात नव्हती, तर जातीसंस्थेच्या विर