Skip to main content

Posts

Showing posts from December, 2013

16Dec.2013

स्वदेशीच्या चळवळीनं प्रेरित होऊन महाराष्ट्नतील अनेक तरुणांनी कारखानदारी चालू केली. त्यात ओगलेवाडीसारख्या छोट्या गावात `स्टील विंडोज' उद्योग `डी.एन.म्हैसकर आणि कंपनी'नं सर्वप्रथम चालू केला.या कारखान्याचे प्रवर्तक दामोदर नृसिंह म्हैसकर यांचा जन्म जोतिबाचे डोंगरावर २५ डिसेंबर १९०५ रोजी झाला. एक होता उद्योजक दामोदर नृसिंह म्हैसकर त्यांचे वडील नृसिंह रामचंद्र (नरसोपंत) कीर्तनकार होते. नरसोपंतांचे सासरे प्रभाकरपंत ओगले. दामोदरचं आजोळ कोल्हापुरातच असल्यानं मामा लोकांकडे ओढा होता. त्यांना आठ मामा होते. व्यंकटराव व अवधूतराव यांचं नातं मित्रासारखं होतं. थोरले मामा गुरुनाथपंत व धाकटे आत्मारामपंत ओगले यांनी २५/१/१९१६ रोजी आैंध संस्थानातील विरवड्याच्या माळावर (कऱ्हाडजवळ) काच कारखाना चालू केला. दामोदरपंत १९२४ साली ओगलेवाडीत काच कारखान्यात रुजू झाले. इंजिनियरिंग कामाची आवड निर्माण झाली. गुरुनाथपंत जर्मनीस गेले होते. प्रभाकर कंदिल बनवण्याची यंत्रसामग्री तयार होईल तशी ते इकडे पाठवत होते. यंत्र उभारणीचा अनुभव दामोनर म्हैसकरांना श्री.आर.एन.लेले या तज्ज्ञ इंजिनियरच्या हाताखाली मिळाला. हे लेल

9Dec.2013

व्यक्तीऐवजी संघटनात्मक संघर्ष स्त्रियांवरील अत्याचार ही गोष्ट सध्या फारच संवेदनशील मानली जात आहे. स्त्री-पुरुष असमानता जगाच्या प्रारंभापासून आहे. शारीरिक, स्वाभाविक आणि प्राकृतिक दृष्टीने पुरुष निसर्गत: सबल असतो म्हणून त्याने अरेरावी करावी हे आज कोणीच मान्य करणार नाही. त्या अरेरावीमुळे निम्मी मानवसंख्या पीडित होणे निखालस वाईट, पण त्याहीपेक्षा कौटुंबिक व सर्व सामाजिक असंतुलन होणे हे तर महाभीषण! ज्या आधारे कुटुंबसंस्था विकसित झाली आणि कुटुंबांच्या समन्वयातून समाज सुसंस्कृत सुदृढ व्हावा, तो आधार समानतेच्या भावनेवर भक्कम राहायलाच हवा; समानतेच्या आचरणावर नव्हे! बायकांनी पॅन्ट-शर्ट घालण्याने समानता येत नाही, उलट पुरुषांप्रमाणे वागण्याच्या इच्छेतून पुरुषांचे प्राबल्य स्वीकारल्याप्रमाणेच होते. त्यांनी निसर्गत: ज्या मर्यादा सांभाळायच्या असतात, त्यांचे उल्लंघन होण्यातूनही त्यांच्याविषयी अनादर वाढू शकतो आणि समस्याही वाढू शकतात. सुसंस्कृतपणे, हळूवारपणे समाजमनावर हे सर्व बिंबवले पाहिजे, तसे योग्य वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घराघरांनी घ्यावी लागते. त्याऐवजी महिलांच्या बाजूने कायदे आणि कोर्

25Nov.2013

भय नको,बदल हवा नव्या जागतिक धोरणानुसार सर्व जगभर खुलीकरणाचे वारे सध्या वाहात आहेत. कोणत्याही देशामध्ये गुंतवणूक करून उत्पादन आणि व्यापार करण्याला खुलेपण येत आहे. आपल्या देशात मोठमोठे मॉल्स आणि किरकोळ विक्रीसाठी परदेशी कंपन्यांना परवानगी देण्याचा सरकारचा निर्णय पुष्कळदा वादग्रस्त होतो आहे. त्यातले राजकारण सोडून दिले तरी, दळणवळणाची साधने आणि जागतिक आर्थिक नीती विचारात घेतली तर अशा प्रकारच्या मोठ्या व्यापारी संस्था-संघटनांना एकमेकांच्या देशात जाऊन व्यवसाय-धंदा करणे आवश्यकही बनले आहे. यापैकी सरकारी गोंधळ किंवा राजकारण बाजूला ठेवले तरी गावोगावच्या सामान्य व्यापाऱ्यांना खूप धास्ती आणि भय घातले गेले आहे. विदेशी कंपन्यांची मोठी दुकाने किरकोळ व्यापार करण्यासाठी गावोगावी आली तर, आपल्या इथला सामान्य व्यापारी संपून जाईल असे भय व्यापाऱ्यांनाही आतून वाटत असेल तर ते तितकेसे खरे नाही हे समजून घेतले पाहिजे. कुठल्याही व्यवसायाच्या दोन गरजा असतात. एक म्हणजे भांडवल पुरवठा आणि दुसरी गरज सेवाभाव अशी असते. केवळ भांडवल गुंतवून एखाद्या पेठेत दुकान सुरू केले की गिऱ्हाईक मुकाट्याने दारात येते असा आजपर्यंतचा