स्थानिक पातळीवरची लोकशाही महाराष्ट्नतल्या २५जिल्हा परिषदा, २८३पंचायत समित्या, आणि १०महानगरपालिका आितक्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होअू घातल्या आहेत. अेका परीने या निमित्ताने सारे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. आपल्याकडे लोकशाही राज्यपध्दतीचा अर्थ केवळ निवडणुका, आितकाच घेतला जातो. त्या दृष्टीने पाहता ही सारी घालमेल लोकशाहीची मोठी प्रक्रिया ठरते. आपल्या देशाला ६७वर्षांपूर्वी लोकशाही राज्यव्यवस्था मिळाली. ती कोणी `दिलेली' नाही, तर ती `आम्ही भारतीय लोकां'नी स्वीकारली आहे. या सार्वभौम देशाची घटना तयार करून ती `आपण लोकां'नी स्वत:प्रति अर्पण केलेली आहे. त्यामुळे ही सारी प्रक्रिया कोणा राजकीय पक्षासाठी, नेत्यांच्या नेतेगिरीसाठी, किंवा झुंडपुंडगुंडांच्या अरेरावीसाठी नाही; तर ती `आपण लोकां'च्या सुखासमाधानाने राहण्यासाठी असते. प्रत्येक माणसाच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात, त्याच्या हाताला काम मिळावे, आपल्या विकासाच्या कल्पना आपल्याकडूनच राबविल्या जाव्यात यासाठी केलेली ती रचना आहे. ती रचना लोकशाही पद्धतीने चालायची असली तरी, प्रत्यक्षात प्रत्येकाला कारभारात भाग घेणे श