Skip to main content

19 Dec 2016

स्मार्ट जीवनशैलीचा ग्राहक
राष्ट्ीय ग्राहकदिन २४ डिसेंबरला असतो, त्यानिमित्ताने बदलत्या ग्राहकाचे हे चित्रण
आपल्याकडे सध्या स्मार्ट जीवनशैलीची  क्रेझ आहे. शेंबडी पोरंसुध्दा स्मार्ट दिसण्यासाठी धडपडत आहेत. अेकेकाळी केवळ नवऱ्या मुला-मुलीसाठी किंवा सिनेमातल्या हीरोसाठी हा शब्द अुपयोगी पडायचा, पण अलीकडे बाजारात या शब्दाची चलती आहे. कोणत्याही वस्तूला स्मार्ट म्हटल्याशिवाय तिला ग्राहक मिळत नाही. गोरगरीबांसाठी पूर्वी रेशनकार्ड, लायसेन्स अशा कागदी वस्तू असत, आता त्यांनाही स्मार्टकार्डाचे रूप घ्यावे लागले. अेका छपरी दुकानात `येथे स्मार्ट शेवया मिळतील' असा फलक पाहिल्यावर, या स्मार्टपणानं भलत्याच रस्त्याला आपल्याला नेलं की काय अशी शंका वाटू लागली. मी  स्मार्ट शेवया अुत्सुकतेनं पाहायला मागितल्यावर त्यानं मला अेक चकचकीत कागदाचं बंडल आणून दिलं. त्यावर अर्थातच रंगीबेरंगी चित्र छापलेलं; त्यात अेक फाकडू महिला - ती मात्र जरा `ओव्हरस्मार्ट' होती. मला माझ्या आआी-मावशीच्या हातच्या शेवया आठवल्या. त्या बिचाऱ्या आबदार हातांनी कुठल्या तरी पत्र्याच्या डब्यात शेवया भरून ठेवत असत, सणासुदीला त्या रुचकर अन्नब्रह्म होअून ताटात यायच्या. परंतु या स्मार्ट शेवया पॅकिंगमध्ये काय असणार याबद्दल कसं सांगायचं?
शेवयात काय स्मार्ट असणार हे नीट कळावं, म्हणून मी घरी येअूनत्या शब्दाचा शेाध घेतला. ऑक्सफर्ड शब्दकोषात पाहिलं; त्यात स्मार्ट म्हणजे चुणचुणीत, तरतरीत, फाकडा असे अर्थ दिले आहेत. त्याचप्रमाणं स्मार्ट या शब्दाचा आणखी अेक अर्थ दिलाय, तो म्हणजे `ठणका, ठसठस' त्याचं अुदाहरण म्हणून दिलं आहे, `दि स्मोक मेड माय आआीज् स्मार्ट : धुरानं माझे डोळे चुरचुरू लागले.' आजच्या बाजारातील बाजारू राहणीच्या साऱ्या  स्मार्टपणाला हे दोन्ही अर्थ चपखल जुळणारे आहेत. बाजारातील वस्तूंनी स्मार्टपणा धारण केलाच आहे, पण गेल्या काही वर्षांत ग्राहकांनीही स्मार्ट होण्याचं ठरवलं असावं.त्यामुळं जागरूक ग्राहक मात्र डोळे चुरचुरत आहेत
साधारण तीस वर्षंापूर्वी आपल्या ग्राहकांचे प्रश्न साधेसीधे होते. रॉकेल - रेशन - बस सेवा - वीजबिल; किंवा  कापड - भेसळ - दवाखाना  यांभोवती ते फिरत होते. फार तर फार म्हणजे स्कूटर खरेदीला वेळेत नंबर लागत नाही, फोन जोडणी मिळत नाही, मिक्सर नीट चालत नाही  `आितपतच स्मार्ट' तक्रारी होत्या. त्या सोडविण्यासाठी बराच खटाटोप करावा लागत असे. सातबाराचा अुतारा, अेखाद्या मशीनचा स्पेअर पार्ट या बाबतीत अधिक चतुराआी दाखवावी लागत होती. आज या तक्रारी  जवळजवळ नाहीत. रॉकेलची गरज खूप कमी झाली; रेशनच्या रांगा आटल्या. स्कूटर विकत घेण्यासाठी पैसे भरून सात आठ वर्षे नंबर लावावा लागत होता, हे आजच्या स्मार्ट ग्राहकाला सांगून पटणार नाही. कारण आजच्या जमान्यात स्कूटर-कार या वस्तू डोक्यावर घेअून विक्रेते, `गाडी घेता का गाडी %%' असे ओरडत फिरताना दिसतात. फोन तर मिळतच नव्हते, आता पूर्वीचे लँडलाआीन फोन परत देअून टाकण्याचा जमाना आहे. वर्षभराचे बालक पूर्वी आजोबांच्या कडेवर आले तर त्यांच्या खिशातील चष्मा किंवा पेन काढू पाहात असे, ते स्मार्ट बालक आता आजोबांचा मोबाआील फोन काढून घेते! आितका आता देश फोनमय झाला आहे. साबूदाणा-रवा याही वस्तू आता शुध्द निवडलेल्या, चकचकीत पॅकिंगमध्ये हारीने मांडून ठेवलेली दुकाने असतात, तिथे भेसळ खपत नाही. थोडक्यात असे की, गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारपेठेतील ग्राहक भलताच स्मार्ट झाला आहे.
तथापि हे ग्राहकत्व सुजाण झाले आहे असे म्हणता येआील काय? जगात सौंदर्यस्पर्र्धा भरविल्या जात असत. मध्यंतरीच्या काळात भारतीय युवती अेकीपाठोपाठ अेक त्यांत यशस्वी  ठरत गेल्या, आणि भारतातील सौंदर्य झाकलेले असायचे ते जगाच्या बाजारात फारच अुघड होअू लागले. त्या स्पर्धेत शारीर सौंदर्याच्या मोजमापानंतर त्यांची म्हणे बौध्दिक परीक्षा घेतली जात असे. त्यांची तत्पर आणि चोख अुत्तरे दिली जायची असे सांगण्यात येआी. ते खरे मानले तरी त्या स्मार्ट पोरींना कुणी अभ्यासू विद्वान म्हटल्याचे अैकले नाही. त्यांना जगत्सुंदरी म्हटल्याने कदाचित जाहिरातींची कामे मिळाली असतील; पण त्यांना कोण्या परिसंवादात किंवा गेला बाजार कविसंमेलनांतही कुणी बोलावले नाही. कारण त्यांचा स्मार्टनेस हा सर्वंकष सुजाणत्वाचा नव्हता, तर तो केवळ दिखाअू होता. विदेशी मालाने भारतीय बाजारपेठ बऱ्यापैकी काबीज केल्यानंतर, आपल्या देशातील तरुणी गेल्या काही वर्षांत त्या क्षेत्रात चमकलेल्या नाहीत, हेही नमूद करण्याजोगे आहे. त्यावरून अेक गोष्ट समजून घ्यायला हरकत नाही की, आपल्या देशातील सौंदर्य कमी-अधिक झालेले नाही, तर या देशातल्या ग्राहकांना स्मार्ट होण्याचे व्यसन लागण्याशी त्याचा संबंध असावा.
हे स्मार्टपण अर्थातच वरवरचे आहे. त्याचा स्रोत ग्राहकांच्या क्रयशक्तीशी आहे. जगाच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था अधिक गतीने वाढत आहे, हे तर खरेच आहे. सामान्यांच्या भाषेत बोलायचे तर आपल्याकडच्या लोकांच्या खिशात जास्त पैसा खुळखुळू लागला आहे. पश्चिम महाराष्ट्नपुरते बोलायचे तर तिथे मुंबआी-पुण्याशी निकटचे नाते असलेला वर्ग आहे. त्यांना भरपूर रोजगार आहे. सध्या शेतमजूराला किंवा बिगारी हमाली काम करणाऱ्यालाही चांगली मिळकत आहे. शेतात भांगलणी करायला बाया-माणसे मिळत नाहीत अशी स्थिती आहे. त्यांच्यातही स्मार्टपण आितके बाणलेले आहे की, त्या मजूर महिला आजकाल सनकोट, पायात क्रॅन्व्हास बूट, पाण्याची बाटली, टिफिनचा डबा आणि निर्विवादपणे मोबाआील अशा वावरताना दिसतील. त्यांना गावातून शेतात ने-आणीसाठी गाडीची व्यवस्था करावी लागते. या तुलनेत पगारदार वर्गाची स्थिती काय वर्णावी? किमान दुचाकी गाडी नसलेला कामगार कुणाच्या पाहण्यात आहे काय?
मुद्दा असा की, सामान्य म्हणवणाऱ्या लोकांकडे पैसा वाहात आहे, त्यामुळे त्यांना स्मार्टपण जपण्याची  कुवत आली आहे. अर्थातच हे स्मार्टपण वरवरचेच आहे. सच्चे ग्राहकत्व त्यांपैकी कितीजण जाणतात या प्रश्नाचे अुत्तर फारसे अुत्साहदायक नाही. प्रत्येक माणूस हा  अर्थव्यवहारातील ग्राहक, लोकशाही प्रक्रियेतील मतदार, आणि सामाजिक दृष्टीने तो नागरिक असतो. त्याचे त्या तिन्ही भूमिकांच्या संदर्भात काही हक्क आणि अधिकार आहेत, त्याचबरोबर काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्येही आहेत. व्यक्ती तीच, पण अेकाच वेळी ती ग्राहक -नागरिक -व मतदार असते. ती जितकी  शहाणी असेल तितका देश मोठा होतो. आिथे प्रश्न केवळ चटपटीत चमकोगिरीचा नाही तर जागरूकतेचा आहे, सहभावनेचा आहे. तिथे आपण फार कमी पडतो आहोत. म्हणून आपल्याला हा स्मार्टनेस आलेला असला तरी त्यावर किती विसंबता येआील, याची शंका आहे.
आजच्या तरुणांकडे मोबाआील सहज अुपलब्ध असतो, तो वापरण्याचे कौशल्य आहे, अेवढ्याच अर्थी ती मुले स्मार्ट आहेत. घरातील स्नानगृहात चमकदार टाआील्स आलेल्या आहेत, पण अंघोळीचे शास्त्र माहीत नाही. महागड्या हॉटेल्समध्ये आधुनिक बशा-काटे आले,पण खायचे काय नि कसे हे कळत नाही. वातानुकूल मोटारींत गुबगुबीत खुर्च्या आहेत, पण सिग्नलला थांबायचे कळत नाही. अुत्तम पादत्राणे पायात आली आहेत, पण दारात ती काढून ठेवायची कशी हे कळत नाही. ग्राहक म्हणून महागडी जीवनशैली आपण अनुसरत आहोत, त्यास स्मार्ट समजून चाललो आहोत; पण ग्राहक म्हणून आपल्याला हक्कही कळलेले नाहीत आणि कर्तव्येही  समजत नाहीत अशी स्थिती आहे. `जागो ग्राहक जागो %' अशा सरकारी आरोळया तेवढ्या वाढलेल्या आहेत. पण ग्राहक राजा अद्यापि झोपलेलाच आहे. आपण स्मार्ट झाल्याची स्वप्ने त्याला पडत आहेत. ती प्रत्यक्षात आलेली नाहीत.
ग्राहक संरक्षणाचा कायदा होअून ३०वर्षे झाली, ग्राहक तक्रार निवारणाची स्वतंत्र व्यवस्था झाली; पण अधिकांश लोकांना तो कायदाही माहीत नाही. त्यास    समान्तर असे आितरही सोपे सोपे कायदे आहेत, त्याचा अुपयोग करून आपले अर्थक्षेत्र आपण शुध्द करू शकतो. वस्तू किंवा सेवा विकत घेतो तो ग्राहक असतो, आणि त्याला त्या कायद्यान्वये अनेक हक्क प्राप्त होत असतात. पण त्यासाठी पहिली अट पावती किंवा बिल घेण्याची असते, तेवढेही आपण करत नाही. जाहिरातीचे मायाजाल लक्षात घेत नाही. त्यामुळे आजच्या स्मार्ट काळात अनेक ठिकाणी आपल्या तथाकथित स्मार्ट लोकांची सहज फसवणूक होते. मोबाआील व आिंटरनेट आले, त्याचबरोबर सायबर गुन्हे वाढले. म्हणजे पूर्वी गावातला वाणी फसवत होता, त्याअैवजी आता कुठे तरी विदेशांत बसलेले ठक आपल्याला फसवतात. मग आपल्याला स्मार्ट कसे म्हणायचे? पिण्याच्या शुध्द पाण्याची बाटली आपल्या घरातून घेतली तर गरज भागते, पण ते पाणी आपण बिनदिक्कत वीस रुपये लिटर दराने घेतले की आपल्याला स्मार्ट ग्राहक म्हणतात. शाळेला जाताना चिमुरड्यांनी बूट-टाय लावला की, त्यास स्मार्ट मानले जाते, पण अेवढाली फी भरून त्याला शिकण्याचे फायदे मिळतात काय, असे कोणीच कसे विचारत नाही?
हे नसते स्मार्टपण आपल्या देशाला आणि अर्थव्यवस्थेला महाग पडते आहे. स्मार्ट दिसण्यासाठी आजकाल गल्लीबोळात ब्यूटी पार्लर असते, पण आपल्याला जे वाटते पटते त्याबद्दल आितरांशी संवाद करायचा तर फेजती होते. तिथे स्मार्टपणा टिकत नाही. हे भारतातल्या ग्राहक चळवळीचे वास्तव आहे.
यासाठी ज्यांनी चळवळ बलवान करायला हवी, तो मध्यमवर्ग सध्या त्या भासमान स्मार्टनेसच्या नादी लागलेला आहे. समाज जागरणाचे काम त्या वर्गाने करायला हवे. भारतातला आर्थिक दुर्बल वर्ग संख्येने खूप ज्यास्त आहे, पण तो पूर्वीप्रमाणेच आज शोषित आहे. त्याच्याकडे तितकी क्रयशक्तीच नाही, त्याला कसा जागरूक करायचा हा प्रश्न आहे. त्याला साबण तेल मिळत नसेल तर आधुनिक स्मार्टनेस कुठून आणावा? त्यात कुपोषित आहेत, बेरोजगारी आहेत, विकलांग आहेत. त्यांच्यासाठी मध्यमवर्गी स्मार्ट लोकांनी संघटितपणे चळवळ अुभारायला हवी. त्यांना अुभे करायला हवे; हे करण्याला समुत्कर्ष म्हणतात. ते जर केले नाही तर समाज सशक्त कसा होणार? हल्लीच्या स्मार्टपणाच्या व्याख्येत स्वच्छ अंघोळीच्या साधेपणाअैवजी बगलेत सुवासिक फवारे मारणे येते. तसा स्मार्टपणा देशाला फसवे सामर्थ्य देआील. शरीराचा अेक जरी अवयव खुरटलेला राहिला तर वरपांगी चमकोगिरीने जग फसणार नसते. आजच्या स्मार्ट लाआीफ स्टाआीलच्या काळात अर्थव्यवस्थेला खरे महत्व येणार आहे, त्यासाठी ग्राहक केवळ स्मार्ट होण्यापेक्षा, तो ग्राहकत्व समजणारा असला पाहिजे.

अभिजातावर चमकोगिरी स्वार
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी अक्षयकुमार काळे यांच्याकडे आल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यावर खळबळ वगैरे  काही अुडाली  नाही, तर  तोंडाची चव गेल्यावर जसे कोणत्याही पदार्थामुळे गिळगिळीत वाटते, तसेच साहित्यक्षेत्राला वाटले असेल. अर्थात मराठीच्या कोणत्याही साहित्य संमेलनातून अेकूणात तसाच प्रत्यय येअू लागला आहे, त्यामुळे त्या क्षेत्राचे अ.भा.संमेलन तरी वेगळे काय घडविणार; हेही खरे! सार्वत्रिक अभिजात रसिकता आणि सृजन यांचीच अैशीतैशी चालू असल्यामुळे त्या अध्यक्षपदाविषयी आणि संमेलनासह साहित्य व्यवहारांविषयी कशा कशाला हळहळावे अशीही समजूत काढून घेण्याला गत्यंतर नाही.

साध्या साध्या सोहळयात आजकाल बटबटीत चमकोगिरीला फार म्हणजे फारच महत्वाचे स्थान दिले जात आहे. गाण्याच्या कार्यक्रमांत झोकदार दिव्यांचा झगमगाट फेकणारी रोषणाआी असते, त्याची गरज कुणाला किती असावी याला काही नियम नाही, पण त्या झोतांवरून गाण्याचा दर्जा ठरविण्याचे दिवस अजूनी तरी आलेले नाहीत अशी अेक समजूत सामान्य रसिकांची आहे. लग्नाच्या वेदीवर नवऱ्या मुलामुलीला आणण्यासाठी  पालखी-मेणे आणतात, ते वाहून नेण्यासाठी बिचारे पगारी भोआी असतात, आिथंवर हौस समजू शकते. पण आता तर पैसे फेकून मिळणाऱ्या नर्तकींचा ताफा या पालख्यंापुढे हावभाव करत नाचू लागल्यावर विवाह सोहळयाला मांगल्य चिकटविण्यास मन धजत नाही. या साऱ्या वर्तनांस अभिजात वळण देण्यासाठी साहित्य आणि वाङ्मयातून काही अनुकूल विचार प्रकट आणि प्रसारित व्हायला हवेत, त्याअैवजी आमची साहित्य संमेलनेच फटाकेबाजी  आणि वेशभूषित मूषकांच्या अदाकारीने सजू लागली आहेत.

हे खेळ पैशाशिवाय होत नाहीत. त्यासाठी कोणीतरी धनवान बहादूर स्वागताध्यक्ष केल्यावर त्याच्या कौतुकांचे पवाडे गावे लागणार हेही नक्कीच. त्यासाठी सरकारही २५लाखांचा दौलतजादा करते आहे. यांत साहित्याचा विचार किती आणि कोठे होतो, हे कोण विचारणार? आणि तसे विचारणाऱ्याला तरी कोण विचारणार?

त्यात ज्यांना काही गैर दिसते, त्यांचा आवाज क्षीण पडतो. तरीही तो अुच्चारत राहिले पाहिजे. लग्नासारखा सोहळा कौटुंबिक असतो, पण तोही आितर समाज चतुराआीने न्याहाळत असतो. विवाहातून दोन मनांचे, दोन कुटुंबांचे, दोन परिवारांचे समरस होणे अपेक्षित असते; त्याअैवजी हल्ली घटस्फोटांचे प्रमाण वाढत चालल्याचे म्हणतात. तसेच कोणत्याही अेकत्रीकरणांचे होत आहे काय? कौटुंबिक संमेलने होतात, ज्ञातींची संमेलने होतात, वसाहतींची संमेलने होतात... त्या सर्व ठिकाणी  सम मेलन घडल्याचा प्रत्यय येत नाही. तिथे रुसवे गवे तोंडी लावण्यापुरते ठीक असतील पण साऱ्या वातावरणात कलुषितपणा वाढत असेल तर त्यांचा विचार करायलाच हवा.

साहित्य संमेलन हे मराठी समाजाच्या अस्मितेचे प्रकटीकरण आहे. त्यात कसदारपणाही पाहिजे. कोणीतरी नाचगाण्यांचा अुत्सव करून त्यात स्वागताध्यक्षांच्या आणि सरकारच्या पैशाची अुधळपट्टी करावी असे नाही. कौटुंबिक संमेलनांतही तसे घडत आहे. कुटुंबांतल्या व्यथा वेदना आणि समस्या यांचा विचार होणे त्यात आवश्यक आहे. त्या कमी करण्याचे मार्ग शोधून त्यांचा अंमल होण्याचे ठरविले पाहिजे. जे कसदार आहे, परंतु दुर्लक्षित आहे त्याची आवर्जून दखल घेतली जायला हवी. त्यांच्या वेदना गरजा समजून घ्यायला हव्यात. पुढच्यांना त्यांचे महत्व समजून द्यायला हवे. त्या आधारे काही नवे घडण्याचे प्रयत्न करण्याचा संकल्प हवा. तसा काही विचारविमर्श नकोच असणाऱ्या चंगळवाद्यांचा तो अुत्सव होणार असेल तर त्यांतून कौटुंबिक अेकत्व कसचे साधणार? तसेच ज्ञातींचे आहे, तसेच साहित्य-विज्ञान-कला यांच्या संबंधांतील संमेलनांचे असते. त्यात  काहीशी  अैटदार अदाकारी गैर नाही; पण केवळ तेवढीच बाब त्यांतून साधते, हे साफ चूक आहे.

त्यासाठी असे संमेलनोत्सव कोण आयोजित करतो, आणि त्याचे प्रमुखपद कुणाकडे येते याला महत्व असते. ज्याची त्या क्षेत्रावर किंवा विषयावर पकड असते, अशी माणसे नेतृत्व करण्यासाठी पुढे यावी लागतात. पण ती पुढे आणणे हे त्या क्षेत्रांच्या हितचिंतक समुदायाचे काम आहे. भलत्या हाती नेतृत्व जाण्याने त्या क्षेत्राचे क्षात्र नाहीसे होते आणि मग असला बुळबुळीतपणा व्यापून राहतो. साहित्याच्या क्षेत्रात आजही खूप काही घडते आहे, चांगलेही घडते आहे. पण ते घडवीत असणारे कोणी असल्या संमेलनांत फिरकत नाहीत. कारण तिथे पुस्तकांचे `मार्केट' असते, तसे पुरणपोळयाचे असते. पाळणे-पिपाण्याही आणतील. पुष्कळांच्या अंगात तर येत असतेच. आपली साहित्यिक अपत्ये तिथल्या अुच्चासनांवरून ओवाळून फेकली जातात, असेही ऐकण्यात आहे.

अेकूण या प्रकारच्या साहित्य अुत्सवांना मिळालेल्या नेतृत्वावरून आपापल्या स्थानच्या अुत्सवांचे मूल्यांकन करावे, आणि पटत-वटत असेल तेवढा बदल करावा अेवढी अपेक्षा करणे पुरे! नाचणारे नाचत असतात, अुधळणारे अुधळत असतात. `जाणाऱ्याचं जातं, आणि कोठावळयाचं पोट दुखतं' अशातला हा प्रकार नक्कीच नाही, अेवढे सांगितले पाहिजे. पण त्यातून गैर गोष्टींना प्रतिष्ठा मिळते, आणि अंतिमत: साऱ्या समाजाचे सर्वांगिण नुकसान होते; याची हळहळ उरते.

प्रा. कुमुदिनी दांडेकर - एक प्रयोगशील संशोधक
 ``आमचा हिंदू धर्म इतका समावेशक आहे की, काही काळानंतर कुटुंब नियोजन हा सतरावा संस्कार म्हणून गणला गेला तर मला आश्चर्य वाटणार नाही..'' असे साठ-एक वर्षापूर्वी परदेशी पाहुण्यांना ठणकावून सांगणाऱ्या प्रा. कुमुदिनी दांडेकर..! १९५३ साली कोलकत्याला परिषद भरली होती. दांडेकरबाइंर्नी कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रातील कामावर आधारित एक शोधनिबंध त्या परिषदेमध्ये सादर केला. त्यावेळी ठेलज्ञषशश्रश्रशी र्ऋेीपवरींळेप चे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. `तुमच्या हिंदू धर्मात कुटुंब नियोजनाला मान्यता असेल का' असा प्रश्न त्यांनी दांडेकरबाइंर्ना विचारला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दांडेकरबाईंनी दिले. कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम त्यावेळी(म्हणजे, १९५१साली) सरकारी पातळीवर नुकताच प्रवर्तित करण्यात आलेला होता, त्याबद्दल इतक्या खात्रीशीर बोलायचे तर द्रष्ट्याचीच नजर हवी. आज कुटुंब नियोजन हा औपचारिकरीत्या हिंदू कुटुंबातील सतरावा संस्कार बनलेला नसला तरी लोकांची स्वीकृती त्याच तोलामोलाची आहे.
लग्नानंतरच्या कुमुदिनी दांडेकर म्हणजे खरे मास्तरांचे चौथे कन्यारत्न. कृष्णाबाई मोटे आणि मालतीबाई बेडेकर या त्यांच्या मोठ्या बहिणी. दांडेकरबाइंर्चा जन्म १४ मार्च १९२० रोजीचा. वडील शिक्षकी पेशातील. बाइंर्चे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. मॅट्नीकच्या परीक्षेत पुण्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन गणित विषयाची पदवी मिळवून त्या पुढील शिक्षणासाठी कोलकात्याच्या खपवळरप डींरींळीींळलरश्र खपीींर्ळींीींश मध्ये दाखल झाल्या.  च. डींरीं. ही पदवी घेऊन आणि आयुष्याचा जोडीदारही सोबतीला घेऊन बाई पुण्याला परतल्या. विख्यात अर्थतज्ञ प्रा. वि. म. दांडेकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत दोघेही रुजू झाले. आपापल्या संशोधन क्षेत्रात मग दोघांनीही स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले.
रॉकफेलर फौंडेशन या संस्थेने गोखले अर्थशास्त्र संस्थेस १९४९ साली पाच वर्षांसाठी संशोधन अनुदान दिले. गोखले अर्थशास्त्र संस्थेतील लोकसंख्या संशोधन विभाग त्या अनुदानाद्वारेच साकारला आणि स्वतंत्रपणे कार्यरत बनला. आपल्या देशातील अशा काही अगदी सुरुवातीच्या केंद्रांपैकी हे एक केंद्र होते. पुढे मग फोर्ड फौंडेशनचेही अनुदान मिळाले. याच काळात दांडेकरबाइंर्चे अन्य संशोधनही चालूच होते. प्रा. वि.म. दांडेकर यांच्यासह त्यांनी १९५१ साली पुणे जिल्ह्याचे लोकसांख्यिकीय सर्वेक्षण केले.
कुटुंब नियोजनाची स्वीकृती कशी वाढविता येईल याचा विचार दांडेकरबाई त्या काळात सतत करत असत. तेव्हा, वैद्यकीय उपचार करत असतानाच कुटुंब नियोजनाबाबतची जाणीव-जागृती करता येईल, असा विचार बाइंर्च्या मनात आला. मंचर येथे आकारास आलेल्या १५ खाटांच्या रुग्णालयाच्या माध्यमातून दांडेकरबाईर्ंच्या त्या विचाराला मूर्त स्वरूप लाभले. गोखले अर्थशास्त्र संस्थेने चोखाळलेली ही आणखी एक वेगळी वाट. मोठ्या मुष्किलीने दोन डॉक्टर मिळाले आणि १९५९ ते १९६५ या काळात संस्थेने ते रुग्णालय चालविले. स्थानिक परिसरातील मुस्लिमधर्मीयांचा कुटुंब नियोजनास विरोध होता, त्यांची समजूत घालण्यासाठी अगदी पार इजिप्तच्या मुल्ला-मौलवींकडून फतवाही मागवून घेतला गेला. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणत्याही पातळीवर प्रयत्न करण्याच्या दांडेकरबाइंर्च्या तयारीचा अंदाज त्यांच्या त्या साऱ्या धडपडीद्वारे सगळयानांच त्या काळात पुरेपूर आला.
या व अशा अभ्यासप्रकल्पांच्या जोडीनेच दांडेकरबाइंर्नी अनेक विषयांवर संशोधनपर निबंध लिहिले. संशोधनाधारित असे १२ स्वतंत्र अहवाल व सुमारे ७५ ते ८० शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी अनेकदा परदेशवाऱ्या केल्या. १९५७ साली अमेरिकेला गेल्या. त्यानंतर, अस्ट्न्ेिलॉया व इंग्लंड या देशात लोकसंख्या परिषदेमध्येही त्यांनी शोधनिबंध सादर केले. बेल्जियम, लेक्झिंग्टन, कुलालंपूर, मेक्सिको, फिनलंड या देशांत परिषदांमधूनही त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले.
या क्षेत्रातील कामामुळे त्यांचे नाव सर्वदूर झाले होते. साहजिकच, अनेक संस्थांकडून संचालक अथवा तत्सम उच्चस्तरीय अधिकारपदांसाठीचा देकार त्यांच्याकडे येत असे. खअचठ(नवी दिल्ली), खखझड(मुंबई) या संस्थांचे संचालकपद त्यांना देऊ करण्यात आले होते. ठशसळेपरश्र ऊशोसीरहिळल अर्वींळीेी षेी र्डेीींह एरीीं आीळर हे पदही त्यांना मिळण्यासारखे होते. परंतु, त्यांनी ती पदे व त्या संधी नाकारल्या. बाइंर्ची शिस्त कडक होती. वेळेच्या आणि इंग्रजीच्याबाबतीत त्या विलक्षण काटेकोर होत्या. काही काही वेळा तर त्या काटेकोरपणाचा जाच वाटायचा. त्यांचा विश्वास संपादन करणे ही तर फारच कठीण बाब होती.

काळ आला होता.....
या जगात चांगुलपणा आहे. दि. २२ सप्टेंबर २०१६. माझे बाबा श्री. मोहन वासुदेव लेले पुण्यातून सांगलीला येण्यासाठी निघाले. बस आष्ट्याच्या पुढे आली आणि बसच्या कंडक्टरच्या लक्षात आले की, बाबांची काही हालचाल होत नाहीये. ते पूर्ण बेशुद्ध झाले होते. शेजारी बसलेल्या माणसाच्याही ही गोष्ट लक्षात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ड्नयव्हरने बस सांगली एस.टी. डेपोत नेली. कंट्नेलरना ही गोष्ट सांगितली. तातडीने त्यांनी बस सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेली. कंडक्टरने बाबांच्या मोबाईलवरून शेवटी कॉल झालेला नंबर डायल केला. तो माझी भावजय सौ.माधुरीचा होता. फोनवरूनच त्यांनी कल्पना दिली.
माझा भाऊ प्रसादने सांगलीतील काही मित्रांना फोन केले. त्याचे मित्र १० ते १५ मिनिटातच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोचले. तेथून तातडीने त्यांनी बाबांना मिरजेला मिशन  हॉस्पिटलमध्ये हलविले. तोपर्यंत मी व माझे पती कराडहून निघालो, पुण्यातून भाऊ, भावजय, आईपण निघाले. मिरजेला पोहोचेपर्यंत बाबांना मिशन हॉस्पिटलमध्ये न्युरो डिपार्टमेंटला आयसीयुमध्ये अॅडमिट केले होते. डॉक्टरांनी ट्नीटमेंटला सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी बाबांनी डोळे उघडले, त्यांच्या हातापायाची हालचाल बऱ्यापैकी होत होती. नंतर सीटीस्क्रॅन, एमआरआय इ. टेस्ट झाल्या. बाबांच्या मेंदूचा उजवा भाग थोडा इफेक्टेड होता. माईल्ड पॅरालिसेस होता. आतापर्यंत त्यानंीं कोणत्याही प्रकारची गोळी, औषधे घेतली नव्हती. तिसऱ्या दिवशी बाबा बोलू लागले. आयसीयूमधून बाहेर आणले आणि आश्चर्य म्हणजे पाचव्या दिवशी त्यांना डिस्चार्ज पण मिळाला, ते सुखरूप पुण्यात पोहोचले.
बस चे ड्नयव्हर श्री. डी.सी.  बुवा, कंडक्टर श्री. मारुती पाटील, वाहतूक नियंत्रक श्री. जी.डी. सूर्यवंशी या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच. मित्र परिवार रवी कुलकर्णी, प्रशांत पाटील, पृथ्वीराज पाटील, संजय महाजन, पाटील काका या सर्वांमुळे आम्ही आजचा दिवस पहात आहोत. मिशन हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉ.ससे, डॉ. डेव्हीड, तेथील सर्व स्टाफ यांचाही उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही.
या जगात चांगुलपणा आहे, हे पटले.....

- सौ. वैशाली आगरकर(लेले), कराड
  मो. नं. ९२७०५६३२०१

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन