अशी कामगिरीच द्या अतिरेकी कारवाया ही भारताला पोखरणारी कीड बनली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान-श्रीलंका-म्यार्र्र्त्त्ीकीं%ॅडीण्-ईर्र्त्र्गीणीं%ॅडीण्-िंॅर्द्धु्ंकी-मॅर्द्गी (ब्रह्मदेश) ही शेजारी राष्ट्न्े अतिरेक्यांना फूस लावणे, त्यांना प्रशिक्षण देणे, आपल्या देशातल्या महत्त्वाच्या बातम्या काढण्यासाठी हेरगिरी करणे हे उद्योग करतच असतात. एका अर्थी तो राजकारणाचा भागही असतो. परन्तु नक्शलवादी-माओवादी - खलिस्तानवादी - द्राविडीस्तानवादी-बोडो-उल्फा या सर्व संघटनांनी गेल्या काही वर्षांत भारतात उच्छाद मांडला आहे. सरकार आणि जनतेला तो असह्य होत आहे. अतिरेकी पकडले जाण्याने हा प्रश्न लवकर संपू शकत नाही. मुंबईवर बेछूट हल्ला करणाऱ्यांपैकी एक अजमल कसाब सापडला, पण त्याला त्वरित मारून टाकण्याऐवजी त्याच्याकडून अनेक प्रकारांनी माहिती वदवून घेणे हे जास्त उपयोगी असते. म्हणून त्याच्याच संरक्षणाची व्यवस्था करून, मोठा खर्च करून त्यास जिवंत सांभाळावे लागते. राजकारण म्हणून हे सर्व ठीक आहे, पण त्यालाही मर्यादा आहेत. त्या राजकीय मर्यादा ओलांडल्या गेलेल्या आहेत. भारताच्या ईशान्य सीमेवर आसामसह जी सात राज्ये आहेत त्य