Skip to main content

Posts

Showing posts from December, 2019

23 December 2019

अन्न नासाडी भारतात शेतीच्या बाबतीत मोठेच बदल घडून आले आहेत. लोकसंख्या वाढत चालली आहे, तरीही त्या साऱ्यांना पुरेल इतके अन्नधान्य आपल्याकडे पिकते. उत्पादन चांगले वाढले. परंतु जगातील काही महत्वाच्या अर्थसंस्थांच्या सर्वेक्षणांवरून असे दिसते की, भारतात भुकेल्या माणसांची संख्या फारच जास्त आहे. भुकेलेल्या लोकांचे प्रमाण देशात किती आहे, या बाबतीत जागतिक पातळीवर आढावा घेतला जातो. त्याला `जागतिक भूक निर्देशांक'(ग्लोबल हंगर इंडेक्स) म्हणतात. ११९ इतक्या विकसनशील देशांच्या एकूण क्रमवारीत भारताचा क्रमांक शंभरावा आहे. या यादीत बांगला देश आणि नेपाळ या छोट्या देशांचा क्रमांक आपल्यापेक्षा वरती आहे. `जागतिक अन्न  धोरण-विषयक संशोधन संस्था (इंटरनॅशनल फूड पॉलिसी रीसर्च इन्स्टीट्यूट)' या संस्थेचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला, त्यात नमूद केलेल्या काही गोष्टी आपल्याला दहादा विचार करायला लावतील अशा आहेत. विकसनशील देशांत नागरिकांना किती आणि कसे अन्न मिळते, याचा आढावा सर्वेक्षणात घेतला जातो. त्यानुसार दोन वेळेला पुरेसे जेवण न मिळालेली, भुकेली माणसे आणि कुपोषित बालके यांचे प्रमाण भारतात जास्त आहे. या स