`सिरीभूवलय' - अद्भुत आणि चमत्कारिक ग्रंथ भारताच्या ज्ञानभंडारात इतक्या गोष्टी लपलेल्या आहेत की, मन अक्षरश: थक्क होतं..! त्या काळात हे असलं भारी ज्ञानभांडार आपल्या जवळ होतं, मग आता का नाही? कुठं गेलं हे ज्ञान..? हे प्रश्न आपल्याला सतावत राहतात..! याच श्रेणीतला अद्भुत ग्रंथ आहे -`सिरीभूवलय' किंवा श्री भूवलय. जैन मुनी आचार्य कुमुदेंदू यांनी रचलेला. राष्ट्न्कूटांचं शासन होतं, मुस्लिम आक्रमक यायला बरीच वर्षं होती आणि सम्राट अमोघवर्षनृपतुंग (प्रथम) हे जेव्हा राज्य करत होते, त्या काळातला हा ग्रंथ. अर्थातच सन ८२० ते ८४०च्या काळात केव्हातरी लिहिला गेलेला..! मात्र मागील हजार वर्षे हा गं्रथ गायब होता. कुठेकुठे याचा उल्लेख यायचा. पण ग्रंथ मात्र लुप्तावस्थेतच होता. हा ग्रंथ मिळाला कसा, याचीही एक मजेदार गोष्ट आहे. राष्ट्न्कूटांच्या काळात कोण्या मल्लीकब्बेजी या बाईने या ग्रंथाची एक प्रत नकलून घेतली आणि आपले गुरु माघनंदिनीजी यांना शास्त्रज्ञात केली. या ग्रंथाची प्रत, हस्ते परहस्ते सुप्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक धरणेंद्र पंडितांच्या घरी पोहोचली. हे धरणेन्द्र पंडित, बंगळूर-तुमकूर रेल्वे मार