Skip to main content

19 Feb.2018

कमल हासन हास्यास्पद का ठरला?
तामिळनाडू हे दक्षिण भारतातील एक द्रमुकचे महत्वाचे राज्य. पण मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तेथील राजकीय वर्तुळात एक अभूतपूर्व पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या शंभरीकडे वाटचाल करत असलेले ज्येष्ठ नेते करुणानिधी हे आपल्या घरातील कलहामुळे हतबल झाले आहेत. त्यांचे पुत्र आणि पक्षाचे अध्यक्ष एम.के.स्टॅलिन हे अधूनमधून हिंदू मंदिरांना भक्तिभावाने भेटी देत आहेत. डीएमके हा हिंदू भावनेचा आदर करणारा पक्ष आहे, असा संकेत देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. दरम्यान, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चेन्नई भेटीवर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुणानिधी यांची स्टॅलिन यांच्या उपस्थितीत  सदिच्छा भेट घेतली.
सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षातील माजी मुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम आणि विद्यमान मुख्यमंत्री ई.पलानीस्वामी यांच्यातील दुरावा वाढत चालला आहे. पलानीस्वामी यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेली जवळीक लपून राहिलेली नाही. एकूणच भारतीय जनता पक्ष २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करीत आहे. या वेळी तामिळनाडूत काँग्रेस कुठेही स्पर्धेत दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर तामिळ चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलावंत रजनीकांत आणि कमल हासन यांच्या नावांची चर्चा होत आहे. तामीळ राजकारणातून चित्रपटसृष्टी वजा केली तर काहीच राहणार नाही. तामिळी जनतेने आजवर चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना नेता म्हणून डोक्यावर घेतल्याचा अनुभव आहे. म्हणूनच भारतीय जनता पक्षाने रजनीकांतला पक्षात आणण्याचा प्रयत्न चालवला होता. दरम्यान, रजनीकांतमध्ये नेता होण्यासाठीचे गुण नाहीत, असे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले. तामिळ जनता सिनेनट-नट्यांना स्वीकारते, याचा अर्थ प्रत्येक सुपरस्टारमध्ये नेतृत्वगुण असतील असे नाही. रजनीकांतला याची जाणीव असावी. आपले आरोग्य, वय आणि मर्यादा ओळखून त्याने राजकारणात सक्रिय होणे काही काळ टाळले असावे.
या पार्श्वभूमीवर ६३व्या वर्षी तामिळ अभिनेता कमल हासन चर्चेत आहे. तामिळनाडूत भाजपसाठी अनुकुल वातावरण असल्याचे पाहून कमल हासन सुरुवातीला म्हणाला की, `जनतेच्या भल्यासाठी वेळ पडल्यास मी भाजपमध्ये प्रवेश करेन. त्यासाठी सिनेमात काम करणेही सोडून देईन. भाजपला माझी विचारधारा माहीत आहे. राज्याच्या हिताचा विचार केल्यास आणि त्यांना माझ्या विचारधारेचा अडथळा वोटत नसेल तर मी भाजपमध्ये प्रवेश करू शकतो. जनतेच्या भल्यासाठी मी राजकारणात कोणतीही अस्पृश्यता मानत नाही.' दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कमल हासनची भेट घेऊन पक्षात येण्याचे निमंत्रण दिल्यानंतरचे हे वक्तव्य आहे. त्याच्या `विवेकवादी' भूमिकेबद्दल तो म्हणाला, `माझ्या मते विवेकवादी असणे म्हणजे उध्वस्त करणे नव्हे. तुम्ही रातोरात कोणाच्याही श्रद्धेला नष्ट करू शकत नाही, ते आपोआप होईल. माझी विचारधारा सर्वश्रुत आहे. काही मार्क्सवादी आणि समाजवाद्यांचा मी चाहता आहे. डावी विचारधारा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. मी केवळ थोडीशी तडजोड करतोय.' म्हणजे, कमल हासन जाणून आहे की काँग्रेस आणि डीएमकेमध्ये भवितव्य नाही. अण्णा द्रमुकमध्ये मुख्यमंत्रीपदाची शक्यताच नाही. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये  प्रवेश करण्याची त्याची तयारी! परंतु, भाजप त्याला स्वीकारण्यास उत्सुक दिसला नाही, त्याचा परिणाम म्हणजे कमल हासनने मांडलेली वादग्रस्त भूमिका होय.
तामिळ साप्ताहिक `आनंद विकटन'ला दिलेल्या मुलाखतीत कमल हासन म्हणतो, हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. पूर्वी कडवे हिंदू चर्चा करत असत, आता ते हिंसा करतात. हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद पसरलेला आहे. `सत्यमेव जयते'वरचा विश्वास उडाला असून बळी तो कान पिळी ही भावना त्यांच्यात बळावते आहे. उजव्या हिंदुत्ववादी संघटना आधी चर्चेवर भर द्यायच्या त्या आता हिंसेवर भर देत आहेत.' यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. मग त्याने यू टर्न घेतला. त्याने स्वच्छ सांगून टाकले, `हिंदूंना दुखवायचा माझा कोणताही हेतू नव्हता. फक्त एखाद्या धर्माच्या नावावर हिंसा करायला माझा विरोध आहे. मी कधीही `हिंदू दहशतवाद' या शब्दाचा उल्लेखच केला नाही.'
या कोलांटउड्यांनी हासनला हास्यास्पद बनवले. कमल हासन हा एक प्रतिभावंत अभिनेता असला तरी नेता म्हणून तो अपरिपप् आहे. तो पुढील काळात राजकारणात सक्रिय होईल का, स्वत:चा पक्ष काढेल का, किंवा केरळातील डाव्यांशी हातमिळवणी करून तामिळनाडूत नशीब आजमावेल का? स्वत:ला कट्टर मार्क्सवादी समजणारा आणि हिंदूंच्या श्रद्धा नष्ट होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या कमल हासनने हिंदू दहशतवादाचा वाद जाणीवपूर्वकच निर्माण केला असेल? इस्लामी दहशतवादावर मौन बाळगणे आणि काल्पनिक भीती दाखवत हिंदूंचा तेजोभंग करणे ही बुद्धीजीवींची रणनीती असते. २०१३मध्ये कमल हासनचा विश्वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषित बंदीच घातली. तेव्हा कमल हासनने `हा इस्लामी दहशतवाद आहे' असे म्हटले नाही. उलट मुस्लिम संघटनांसोबत बैठक करून विश्वरूपम चित्रपटातील ५ दृश्ये कापून टाकली आणि मुस्लिम संघटनांची परवानगी मिळवली. मुस्लिम गटांनी चित्रपट बंद पाडल्याने ४०० दशलक्ष रुपयांचे नुकसान झाले म्हणणारा कमल हासन `हिंदू गट दहशतवादी आहेत' असे म्हणतो. म्हणजे रस्त्यावर मार खाल्ल्यावर घरी येऊन त्याचा राग बायका-मुलांवर काढणाऱ्या माणसाप्रमाणे झाले.
साहित्य, कला आणि चित्रपटसृष्टीत अशा कणाहीन विचारांची एक जमात आहे. अन्य कट्टरवादाविषयी ब्र बोलणार नाहीत, पण काल्पनिक हिंदू दहशतवादाबद्दल रान उठवणार! गिरीश कर्नाड हे तसे मोठे दिग्गज साहित्यिक आणि नाटककार. कर्नाड टिपू सुलतानची बाजू मांडताना म्हणाले, `टिपू सुलतानने फक्त केरळ, तामिळनाडूत कत्तली, बलात्कार आणि धर्मांतर केले. पण त्याने कर्नाटकात आदर्श राज्यकारभार केला, त्यामुळे त्याला धर्मांध म्हणता येणार नाही.'
टिपू सुलतान याने केरळात लाखो हिंदू आणि िख्र्चाश्नांना बळजबरीने बाटवले. तरीही टिपू सुलतानचे उदात्तीकरण करण्यासाठी ही मंडळी आकाशपाताळ एक करतात. पण, डॉ.एपीजे अब्दुल कलाम, परमवीरचक्र प्राप्त अब्दुल हमीद आदी महान देशभक्तांना मुस्लिमांचे आदर्श म्हणून सादर करत नाहीत. देशात सर्वाधिक मंदिरे पाडणारा क्रूरकर्मा अल्लाउद्दीन खिलजी. त्याचे उदात्तीकरण करण्यास ही मंडळी पुढे मागे पाहात नाहीत. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असे असते का?
ही मंडळी असे का वागतात? हिंदू धर्माबद्दल मनात इतका आकस का? या प्रश्नाचे उत्तर आहे हिंदूमध्ये खोलवर रुजलेली गुलामी मानसिकता. केरळमध्ये एका प्राध्यापकाचे हात तोडले. कारण त्याने इस्लामी कट्टरतावाद वाढत असल्याचे लिहिले. या घटनेवर कमल हासनपासून एकाही कलाकाराने ब्रही काढले नाही. िख्र्चाश्न आणि इस्लामी विस्तारवादाविरुद्ध कोणी काही बोलले की त्यांना अनेक स्तरावर वाळीत टाकले जाते. तुम्ही बोलता ते सत्य असले तरी त्याबद्दल बोलायचे नाही, असे वातावरण अनेक क्षेत्रात आहे. थोर विचारवंत प्रा.शेषराव मोरे यांनी याला `पुरोगामी दहशतवाद' हा शब्द वापरला आहे.
हिंदू धर्म इतर धर्मांचे अस्तित्व मानतो. `माझा धर्म सत्य त्याप्रमाणे इतरांचेही धर्म सत्य आहेत', हा विचार केवळ हिंदू धर्मातच आहे. त्यामुळे धर्मांतरासारखे प्रकार हिंदू धर्मीय कधीच करत नाहीत. याउलट इस्लाम, िख्र्तासी आदी धर्म विस्तारवादी आहेत. त्यांच्या मते केवळ त्यांचाच धर्म खरा असतो. त्यासाठीच ते धर्मांतरासारखे प्रकार अवलंबतात. त्यासाठी हिंसा करायलाही ते मागेपुढे पाहात नाहीत. जिहादी आणि िख्र्तासी विस्तारवादाची मानसिकता असलेले अनेक बुद्धिजीवी समाजाच्या विविध क्षेत्रांत सेक्युलरतेचा जप करत वावरतात. धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखवतात. हिंदूंना संभ्रमित करत असतात. यातूनच पुरोगामी दहशतवाद फोफावला. याला प्रसिद्धी माध्यमांतील मुख्य प्रवाहाने नेहमीच खतपाणी घातले. परंतु, पुरोगामी थोतांड हे असत्यावर आधारित असल्यामुळे त्याचा पाया ठिसूळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मिडियाचा उदय झाल्यामुळे सत्य झाकून ठेवणे इतके सोपे राहिले नाही. परिणामी, पुरोगामी भोंगळपणा उघड होऊ लागला.
हिंदू दहशतवादाची काल्पनिक भीती दाखवूनही देशात सत्तांतर झाले. तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांनी आपले अस्तित्वच धोक्यात येत असल्याचे पाहून असहिष्णुता वाढल्याचा बनाव करून पाहिला. तरीही अनेक राज्यांत हिंदू विचारावर श्रद्धा असणारी सरकारे येऊ लागली. आता २०१९ जवळ येत आहे. सर्र्व सेक्युलर जमात आकाशपाताळ एक करणार हे तर स्पष्ट आहे. नरेंद्र मोदी यांना रोखता नाही आले तरी फार बहुमताने येणार नाही याची रणनीती आखण्यात येत आहे. यामध्ये कमल हासन सारख्यांची अवस्था हास्यास्पद होईल. आपल्या देशात असे टीकाकार किंवा चाहते कुंपणावर बसून आपली किंमत वसूल करण्याच्या प्रयत्नात, किंमत घालवून बसतात.
-(सिद्धराम पाटील यांच्या `विवेक विचार'मधील लेखावरून संक्षेप)

 संपादकीय
दिली स्थिति देवाने तीतच मानी सुख कधि विटू नको
असल्या गाठी धनसंचय कर सत्कार्यी व्यय हटू नको
आता तुज ही गोष्ट सांगतो सत्कर्मा ओसरू नको ।।
-अनंत फंदी
भारतापुढील आजच्या समस्यांची नकारात्मकच यादी करायची झाली की त्यात भ्रष्टाचार आणि त्या जोडीला बेरोजगारीचा मोठा बाअू करून मांडण्याची अेक पध्दत पडून गेली आहे. तरुणांच्या हाताला काम नाही असे मानून साऱ्या जगातही दंगे  माज(वि)तात. भारतात तर  गुलामीचे राज्य शेकडो वर्षे होते, त्यावेळी आिथल्या लोकांचे कौशल्य हिरावून त्यांना देशोधडी लावण्याचे प्रयत्न, योजून केले गेले. परदेशी जेते लोकांनी भारताच्या सक्रीयतेला आळशी बनविले. स्वातंत्र्यानंतर काही अुद्योग अुभारले गेले, शेतीसाठी योजना आल्या, तंत्रज्ञान प्रशिक्षण वाढले, मोठमोठे प्रकल्प साकारले आणि गेल्या शतकात रुजलेला आळशी हताशपणा बऱ्याच अंशाने कमी झाला. पण स्वातंत्र्याच्या प्रारंभी बेरोजगारीची जी समस्या सतत मांडली जात होेती, त्यापेक्षा आता ती जास्त कर्कशपणे ओरडली जाते. आपल्या देशाचे तर राहो, पण प्रगत मानल्या जाणाऱ्या देशांतही बेरोजगारीबद्दल ओरडा चालू आहे, आणि बाहेरच्या देशांतील रोजगारक्षम तरुणांना स्वत:च्या देशात येण्याला बंदी घालण्याची मागणी होत आहे. हा तर अगदी बिहारी-भय्ये यांना मुंबआीत येण्यास विरोध करण्याचाच प्रकार आहे.

आपल्या देशाच्या बाबतीत स्पष्ट दिसते की, बेरोजगारीपेक्षा बाष्कळ अपेक्षा अुंचावण्याची खरी समस्या आहे. कुठल्या तरी डीम्ड प्रमाणपत्राला बाहेरचे जग आजकाल जुमानत नाही, पण ते हाती घेतल्यामुळे त्या तरुणांच्या स्वत:बद्दलच्या कल्पना आकाशात झेपावू लागतात. अुत्तुंग करीयर म्हणजे नेमके काय हे समजून देण्याअैवजी, बाजारातील शिकवण्यांचे वर्ग केवळ कोट टाय ल्यालेल्या आकर्षक जाहिरातींच्या आधारे लोकांना भुरळ घालत असतात. त्याचा परिणाम अुमलत्या आणि मावळत्याही पिढीवर होतो. आजकाल आपल्याकडे रोजगाराच्या आितक्या संधी दार ठोठावत आहेत की, माणसांना निवृत्तही होता येणार नाही. पण तरीही तरुणांना काम नाही ही ओरड चालू आहे. कामाला माणूस नाही, आणि माणसाला मनासारखे काम नाही अशी चमत्कारिक स्थिती आली आहे. याचे कारण माणसंाच्या मनांत, नसते मोठेपण भरवून दिेले गेले आहे. ज्यंाची पात्रता झाडलोट करण्याची असते, त्यांनाही आपण कंपनीचे अेक्झिक्युटिव्ह असल्याचे भास होत राहिल्यामुळे, माणसे मोकाट फिरत असली तरी झाडलोटीलाही माणूस मिळत नाही, ही कृत्रिम समस्या तयार झाली आहे.

शेती हा तर आपला राष्ट्नीय व्यवसाय आहे आणि असतील तितकी माणसे  तिथे काम मिळवू शकतात. परंतु आपल्या तरुणांना ते क्षेत्र नकोसे झाले आहे. शेतकरी म्हणजे अडाणी, शेती म्हणजे कायम नुकसान, शेती करणे केवळ नाआिलाज... असल्या दळभद्री कल्पनांचे तण आपल्या शेतीत माजले आहे. शेतीसंबंधांतील आंदोलनेही रस्ता सोडून भरकटल्याचे दिसते. आिस्रायलच्या भूमीवर माती नाही, पाणी नाही तरीही तो देश शेतमालाची निर्यात करतो, आणि शेतीच्याच जोरावर समर्थ म्हणून मिरवतो. त्याचे गोडवे अेकीकडे गात राहावे, आणि दुसरीकडे शेतीअैवजी आितर अुद्योगांकडे वळावे असा सल्ला शेतीमंत्र्यानीच द्यावा; हा विरोधाभास केवळ आिथेच दिसेल. डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेला माणूस डॉक्टरकी करतो, वकिली शिकलेला वकील होतो, ड्नयव्हिंग शिकला तर ड्नयव्हर होतो; पण शेतीपदवीधर झालेला तरुण घरची शेती कसतो असे दिसणार नाही. घरची शेती चांगली असली तरी आपल्या पोराला कोणताही पालक शेती कर हे सांगत नाही. श्री अ दाभोलकर अथवा प्र शं ठाकूर यांसारखे कृतिशील शास्त्रज्ञ सिध्द करून दाखवीत की पावअर्ध्या अेकराच्या शेतीवरती अेक कुटुंब चांगले जगू शकते. आिथे तर शेकडो अेकर शेती ओसाड पडून राहते, पाणी वाहून जाते, आणि झाडे तुटून जातात. शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ आंदोलकांच्या राजकारणासाठी वापरले जातात.

ज्या घरी दुकानदारी आहे, छोटा अुद्योग आहे त्यांची पोरे त्या व्यवसायात राबत नाहीत. पालकांची अशीच भावना असते की, आम्ही दुकानात पुड्या बांधत बसलो किंवा लोकांच्या विजारी शिवत बसलो पण आमच्या पोरांना ते करावे लागू नये, त्याने `मोठे' व्हावे. -म्हणजे नेमके काय आणि कसे व्हावे ते त्यांसही कळलेले नसते. वास्तविक शिंप्याच्या पोराने शिलाआीचा अुद्योग करणे किंवा कुंभाराच्या पोराने आपला पिढीजात अुद्योग करणे यात गैर काही नाही. जुन्या अुद्योगांना नवे स्वरूप देणे आवश्यक आहे, ते देण्याचे कौशल्य असेल तर व्यवसाय कितीही मोठा होअू शकतो. आधुनिक प्रकारच्या कपबशा आणि भांडी (क्रोकरी) तयार करण्याचा कुंभारी कारखाना अुभा राहू शकतो. छपाआी-जाहिरात-मनोरंजन हे व्यवसाय आजकाल बहराला आलेले आहेत. परंतु आपल्या शिक्षणात तंत्र आणि मंत्र यांना अनाठायी महत्व देण्यात येते; मानव्यशास्त्रे मागे पडत चालली. आितिहास भूगोल भाषा यांना त्या क्षेत्रांत खूप महत्व असते. तशी कामे करणाऱ्यांचे दुर्भिक्ष्यच आहे. चांगले लेखन वाचन करणारी माणसे मिळत नाहीत, त्याचप्रमाणे भांडी घासणारी, शेत भांगलणारी माणसेही मिळत नाहीत. ज्यांना बुद्धिमत्ता आहे, संधी आहे त्यांना आपापल्या आवडीचे क्षेत्र मिळावे, त्यातले शिक्षण प्रशिक्षण मिळावे यात वादच नाही; तथापि ज्यांच्याकडे दैववशात ते नाही त्यांनी कोणतेही काम हलके न मानता ते स्वीकारले पाहिजे हे कोण सांगणार?

भजी विकणारा माणूस हा स्वयंरोजगार करतो, हे तर आमचे माजी अर्थमंत्रीही मानायला तयार नाहीत. चिदंबरम् म्हणतात की भजी विकणे हा जर रोजगार म्हणायचा तर भीक मागणे हाही रोजगार म्हणायचा काय? -या अजब तर्कदुष्टतेमुळेच रोजगाराची समस्या बिकट भासते आहे. भजी विकणे हा निर्विवादपणे स्वयंरोजगार आहे. तो कोण्या खर्डेघाश्या चाकरी कारकुनापेक्षा श्रेष्ठ आहे. जर कोण्या भजीविक्याने आपले हिशेब लिहिण्यासाठी कारकून कामाला ठेवला तर चिदंबरम् त्या कारकुनाला रोजगार लाभला म्हणतील; पण भजी विकणाऱ्याला किंमत देणार नाहीत. हॉटेल हे तर भजीविक्यांचेच मोठे रूप असते, तिथे मॅनेजर असण्याला रोजगाराचे महत्व देणार; की हॉटेलच्या मालकाला? गुलामगिरीचे डोहाळे जपत राहण्यामुळे आपल्या रोजगारीला मार्ग सापडत नसावा. महाराष्ट्नत किंवा विशेषत: मुंबआीत परप्रांतीय येतात ते भीक मागायला नाही तर भजी विकायलाही येतात, त्यांच्याविरोधात आंदोलने मग का करावीशी वाटतात? आिराण्याचे हॉटेल हे उच्चभू्र साहित्यिक गप्पांचे केंद्र मानण्याचा अेक शहरी काळ होता. त्या काळात कोणी मराठी माणसाने हॉटेल काढणे सन्मानाचे  न  मानण्याचा करंटेपणा आमच्या पूर्वजांनी केलेला आहे.

सारे सन्मानाचे रोजगार हे पैशाला महत्व देत असतात. किर्लोस्करांच्या कंपनीत आज नोकरी मिळणे मानाचे समजले जाईल पण त्याचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे स्वत:ला घिसाडी म्हणवून घेत असत. म्हणजे त्यांच्याकडे चाकरी करणे हे तर घिसाड्याकडेच करण्यासारखे आहे. भंगार मालाचे व्यापारी अलोट पैसा कमावताना आपण पाहतो पण आपल्या पोराला तो धंदा कर असे कोण मोठ्या मनाने सांगेल? धंदा म्हणजे `धन दा' आहे असे सांगणारा व्यवसायिक जोवर तरुण पिढीला भेटत नाही, तोवर बेरोजगारीची भ्रामक समस्या संपणारच नाही. भटजी, नर्स, स्वयंपाकी, गवंडी, नारळ काढणारे, निवेदक, मुद्रित शेाधक(प्रुफ रीडर), सफाआीवाले, अशा अनेक व्यवसायी लोकांची टंचाआी कुणालाही जाणवत असेल. प्रत्येकाला साहेब व्हायचे किंवा टीव्हीवर चमकायचे असेल तर मात्र ते शक्य नाही. स्पर्धेचे युग आहे हे अर्धसत्य आहे. आपण अकारण गर्दीत शिरतो आहोत हे तरुणांना घरच्यांनी सांगितले पाहिजे. त्यांना सन्मान दिला पाहिजे, मदत केली पाहिजे. घरी राहून चांगला व्यवसाय करीत राहिले तर घरच्यांची मदत होते, चांगले पैसे मिळतात, कुटुंब अुभे राहते, मानवी संबंध टिकतात. याला स्वयंरोजगार म्हणायचा की नाही हा प्रत्येकाच्या दृष्टीचा विषय आहे.

बादशहाची मनसबदारी स्वीकारण्याअैवजी शिवाजी राजाने स्वराज्याचा नसता खटाटोप केला असे म्हटले तर त्यापुढे काय सांगणार? तसाच विचार केला तर शिवाजीच्या अेवढ्याशा कष्टाळू राज्यापेक्षा मिर्झाराजाची जहागीर अधिक मोठी होतीच. मग राजा कोण? बादशहापुढे मुजरे करायचे की स्वराज्यातील प्रेमाचा घास खायचा? सर्कशीतील सिंहाने रिंगमास्टरच्या सांगण्याने स्टुलावर बसले तर आयते सुखाचे पोटभर मांस मिळते; पण वनातल्या सिंहाला स्वत:ची शिकार करून आणावी लागते -कधी अुपासही पडतो. स्वयमेव मृगेंद्रता ज्यांना महत्वाची वाटते त्यांना बेरोजगारीचा प्रश्न नक्कीच नाही. अैतखाअू आळशांच्या आकांक्षांना पुरेल असले बिनकामाचे रोजगार कधीच अुपलब्ध होअू शकत नसतात.

चांगल्या रसिकतेचा तो काळ
पद्मावत, जोधा अकबर या चित्रपटांच्या विरोधात उसळणाऱ्या दंगली पाहताना मन जुन्या आठवणींचा फेरफटका करून येते. ५०-५५ वर्षांपूर्वीचे दिवस! निखळ आनंदासोबत वैचारिक मेजवानी देणारे चित्रपट आम्ही पाहिले.
गावात खूपशा सुविधा होत्या! फिरती टूरिंग टॉकी हा मनोरंजनाचा चांगला पर्याय होता. दरवर्षी दिवाळी झाली की, `तंबूतला सिनेमा' ही पर्वणीच वाटायची. टूरिंग म्हणजे मोठ्या जीपमध्ये प्रोजेक्टर असायचे, भल्यामोठ्या पांढऱ्या पडद्यावर सिनेमा दिसायचा. मोठा तंबू, जमिनीवर बसूनच सिनेमाचा आनंद. ४ आणे, ८ आण्यात तिकिट काढून चित्रपट पाहिल्याचे समाधान तेव्हा मिळे.
मराठी सिनेमाचे ते सुवर्णयुगच होते. ग.दि.मांच्या पटकथा, अर्थपूर्ण गीते, बाबूजींचे संगीत, लता, आशा, हृदयनाथ यांच्या गळयातून आलेले सप्तसूर म्हणजे अंतरीचा अनमोल ठेवा आहे. कन्यादान, सुवासिनी, अवघाचि संसार, शिकलेली बायको, वरदक्षिणा असे एकाहून एक सरस, सुरस चित्रपट आम्ही पाहिले. मनावर कोरले गेलेले दोन चित्रपट म्हणजे `मानिनी' व `प्रपंच'. काळजाला स्पर्शणारे कथाविषय व सुरेल संगीत यामुळे ते अविस्मरणीय ठरले. `मानिनी'त बहिणाबाई चौधरींची गीते, `प्रपंच' म्हणजे ग.दि.मांची गीते! वास्तवाला भिडणारी गीते व उत्कृष्ट अभिनयाची जुगलबंदीच जणू! ग.दि.मांनी आशयघन काव्यांची देणगी प्रेक्षकांना दिली. `तू वेडा कुंभार' व `बैल तुझे हरिणावाणी, गाडीवानदादा' ही गीते आजही श्रवणीय वाटतात.
तालासुरांचा ठेकाच धरायला लागावा इतके सुंदर तमाशापट तेव्हा निघत. रंगपंचमी, वैजयंता, केला इशारा जाता जाता असे चित्रपट तमासगीरांच्या कथा व व्यथा सांगून गेले. `पिंजरा'ने तमासगीरांच्या जीवनातील दु:खद बाजू कलापूर्ण रीतीने सादर करून शतक महोत्सवी खेळ केले. बव्हंशी चित्रपट काळे-पांढरे(ब्लॅक अॅण्ड व्हाईट) असत. तांत्रिक बाजू पुढारलेली नव्हती तरीही कर्णमधुर संगीत, आशयघन गीते व पटकथा यांच्या मिश्रणाने मराठी सिनेमाने वेड लावले होते.
खरं तर `चित्रपट' हा विषय एखाद्या प्रबंधाचा. जुन्या आठवणींनी मनात गर्दी केली की `तंबूतला सिनेमा'वर उसळून येतो. `तंबूतील सिनेमा' काही वेगळाच..! सिनेमा आवडत होता, किंवा आवडत नव्हता; त्याचा `पद्मावत' करण्याचे कुणाला सुचतही नव्हते. सिनेमा पुढे गेला आणि आम्ही रसिक मात्र मागे निघालो!
-जयश्री जगदाळे, सांगली         फोन-९०९६३०२०१३

मिरजेतील मठाची सुधारणा हवी
मी मूळचा मिरजेचा असल्याने जेव्हा मिरजेत जातो त्यावेळी वेणाबाईच्या मठात जाऊन रामपंचायतनाचे, समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारुतीरायाचे दर्शन घेतो.
हा मठ समर्थ रामदास स्वामींनी ४०० वर्षांपूर्वी स्थापन केला आहे. त्यांच्या शिष्या वेणाबाई यांची त्यांनी मठाधिपती म्हणून नेमणूक केली. मठास काही शेतजमीनसुद्धा दिली आहे. या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून व भक्तांकडून येणाऱ्या निधीतून मठाचा दैनंदिन खर्च भागवला जातो. आता मठ जुना झाल्यामुळे पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. पण जवळजवळ १०-१२ वर्षे झाली, अजूनही काम पूर्ण झाले नाही. मठात जाण्यासाठी दरवाजा, त्यापुढील मार्ग व्यवस्थित नाही. त्यामुळे वृद्ध माणसांना कुणाचातरी आधार घेऊनच आत जावे लागते. या मठात काही मंडळी बसली होती, त्यांना विचारले असता, पैशाचा ओघ कमी आहे त्यामुळे काम पुढे जात नाही असे कळाले. त्या मंडळीत मठाधिपतीसुद्धा होते. बांधकामास पैसा कमी पडत आहे पण स्थानिक आमदार, खासदार यांच्याकडून काहीही मदत झाली नाही असे कळले.
लहानपणी मी या मठात राष्ट्नीय कीर्तनकार दत्तोपंत पटवर्धन यांची कीर्तने ऐकली आहेत. त्याप्रमाणे निजामपूरबुवा व इतर कीर्तने प्रवचने ऐकली आहेत. दत्तोपंत पटवर्धन यांचा मुक्काम दीड महिना असे. मिरजेतील संस्थानिकांनी काही जमीन वैद्य स.भा.जोशी यांच्या घराण्यास दिली आहे. त्या उत्पन्नातून, कोणी कीर्तनकार मिरजेत येईल याची राहण्याची व्यवस्था या जोशींकडे होत असे. एकदा पटवर्धनबुवांनी कीर्तनात सांगितले की `मी पैसे बाळगत नाही. आज मी स्मश्रू केली तर त्याचे ४ आणे स.भा.जोशींनी दिले'. हे मी ऐकले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या चरित्रात `मी दत्तोपंत पटवर्धन यांची राष्ट्नीय कीर्तने ऐकून देशभक्तीकडे वळालो' असे नमूद केले आहे. अशी थोर मंडळी या मठात येऊन त्यांनी आपली सेवा दिली आहे.
मठाच्या दुरुस्तीचे काम रेंगाळलेले पाहून मला वाईट वाटले. मिरजेतील रामदास भक्तमंडळींनी, लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे व स्थानिक मठास मदत करावी. त्याचप्रमाणे नगरपालिकेने भरीव मदत देऊन काम पूर्ण करावे. सांस्कृतिक खात्यानेसुद्धा ऐतिहासिक मठास साहाय्य देऊन मठाची सर्वांगीण सुधारणा करावी.
-डॉ. राम नेने, गोरेगाव(प.) मुंबई फोन: ०२२-२८७३२९९०

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!
      `वार्धक्याची शाल', `विरोधही घटनात्मक हवा' किंवा `स्नेहदर्शी आलिंगन' हे अग्रलेख नेमक्या परिस्थितीवर बोट ठेवणारे. `राजकारणात नैतिक मतांचा आदर करून चांगल्या कारभाराचा आणि विधायक विरोधाचा नवा अध्याय भारतीय लोकशाहीत लिहिला जावा' असा आशावाद आपण व्यक्त केला आहे. सध्याचा राज्यकारभार चांगला चाललेला नाही आणि विरोधात विधायकता असू शकते इतपत जाणणारा विरोधकही नाही.
सत्तेच्या उबेत ज्यांनी पार्श्वभाग शेकून घेतले असे महाभाग शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते फेडू नका, विजेची बिले भरू नका असं सांगून देशाला बुडवणार आहेत, त्यांनाच डोक्यावर घेऊन नाचण्याचे रंग खेळले जात आहेत. झुंडशाही एवढेच चलनी नाणे आहे. आपण सारेच याला जबाबदार आहोत हेही तितकेच खरे! पुन्हा नव्याने सृष्टी निर्माण झाल्याशिवाय ही घाण संपणार नाही इतपत विचार जाऊ शकतो.

पुण्याच्या तिजोरीत पापांचे बोजे?
कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे!

रट्निपाष्ता वधिला गेला, एका अविचारे
सजा मात्र निष्पापांना, जाळून घरे-दारे
अजूनही भळेभळे जखम, घाव होती ताजे
कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे!

उद्धरिले राष्ट्न् ज्यांनी, करूनिया प्रयास
जातभाई दिवटे म्हणती, स्वत:ला वारस
प्रज्ञावंता गाडून पायी, नादान बनती राजे
कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे!

फुले-शाहू-आंबेडकर हे, नेते बहुत थोर
आज फक्त नाव त्यांचे, कृतीत सर्व चोर
जुनी मढी उकरून त्यावरी, जो तो पोळी भाजे
कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे!

कुणी माथेफिरू यवन, मारतो गाईला
कुणी सनातनी वेडा, पेटवे भाईला
दोन वेड्यांच्या वणव्यात, माणुसकी भाजे
कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे!

महात्म्याच्या डोईवरती, ना कधी जी पाहिली
ती गांधी-टोपी मात्र, लबाडांना पावली
खादी-वर्दीच्या गर्दीत, लोकशाहीच लाजे
कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे!

-गोविंद करमरकर, सांगली      फोन-८८०५९५९८२४

  प्राचीन शस्त्रशास्त्र
`महाभारत काळातील शस्त्रे' अेवढे म्हटले की सर्वप्रथम आपल्यास अर्जुनाचे गाण्डीव धनुष्य आठवते. आजच्या काळातील भाषेत गेंडा (ऱ्हिनोसेरस) हा प्राणी परिचित आहे. मूळ शब्द गाण्डी आहे. त्या प्राण्याची कातडी टणक (अगदी गेंड्याचीच) असते! त्या कातड्याच्या पिशवीत हे धनुष्य ठेवले जाआी, त्यावरून त्यास गाण्डीव म्हणत. ते ब्रह्म्याने तयार केले होते. त्याची प्रत्यंचा(दोरी) आिंद्राने तयार करून त्यावर चढविली होती, ती कधीच तुटणारी नव्हती. अर्जुनाला ते धनुष्य निवातकवचाशी लढण्यासाठी दिलेेले होते. ब्रह्माने हजार वर्षे, नंतर प्रजापतीने आठशे वर्षे, शक्राने ८३ वर्षे आणि वरुणाने ते शंभर वर्षे वापरले होते. अर्जुनाच्या अज्ञातवासापर्यंत ६५ वर्षे ते त्याच्याकडे होते. वरुण त्याचे रक्षण(देखभाल?) करीत असे, त्यामुळे ते वरुणाचेच समजले जाआी. खांडव वनाच्या दहनावेळी ते अग्नीने वरुणाकडे अर्जुनासाठी मागितले. शंकराने अर्जुनाला सांगितले होते की, तू जे धनुष्य हाती धारण करतो आहेस ते मी आिंद्राच्या अभिषेकावेळी दैत्यांच्या विरोधासाठी माझ्या मनुष्य अवतारात वापरलेले आहे. अर्जुन `गाण्डीवधन्वन्' म्हणून ओळखला जाआी.
अर्जुनाचे धनुष्य हे दिव्य शस्त्र होते.ते अद्भुत, अक्षय, अुत्तम, श्रेष्ठ(परमायुध), प्रसिद्ध, शाश्वत प्रशंसिलेले होते. देव दानव गंधर्व मनुष्य हे सारे त्या शस्त्राची स्तुती  करीत. आितर कोणत्याही शस्त्राहून मोठ्या आकाराचे (सर्वायुधमहामात्रम्), तालवृक्षासारखे अुंच, वेगवान, शक्तिमान्, अुग्र पराक्रमी, बळकट, भयप्रद(दारुण), मोठा आवाज करणारे, वज्रासारखे जड, सुवर्णजडित, सूर्यासारखे तेजस्वी असे होते. शस्त्रांना आकर्षक रंग व आकर्षक धातू यांनी सुशोेभित करीत असत असे या वर्णनावरून दिसते. गाण्डीवामुळे अर्जुनाचा रथही तेजस्वी दिसत असे. प्रत्यंचा लावल्यावर ते वीज अग्नी वज्र यांप्रमाणे भासे. याची बरोबरी करणारे धनुष्य कौरवांकडे नव्हते ही खंत धृतराष्ट्नला होती. त्याच्या आवाजाने दिशा आकाश भरून जाआी. धरणी कंपायमान होआी.
गाण्डीव धनुष्याची दोरी अर्जुनाशिवाय भीम, कृष्ण हे लावू शकत. अर्जुन सव्यसाची म्हणून ओळखला जाआी.धनुष्य वापरण्याआधी अर्जुन ते साफ करून घेत असे. हाती वर्तुळाकार फिरविले तर अग्निचक्राकार दिसे. विशेष प्रसंगी वापरताना अर्जुन गाण्डीव धनुष्याची प्रत्यंचा व बाण यांना अुद्देशून काही मंत्र म्हणत असे. अेके प्रसंगी मनाच्या चलबिचल अवस्थेत त्याच्या हातून गळून पडले, पण ते त्याने लगेच अुचलून घेतले आणि युद्धात यशस्वीपणे वापरले. पांडव वनात जाण्यास निघाले तेव्हा गाण्डीव आणि त्याचा भाता तो सोडू शकला नाही. अर्जुनाला पुढे त्याचा अुपयोग नसल्याने ते वरुणाला परत द्यावे असे अग्नीने सांगितले; पण आपल्या भावांच्या सांगण्यावरून त्याने भात्यासह धनुष्य पाण्यात बुडविले.
त्या काळातील युद्धांत धनुष्यबाणाचा अुपयोग जास्त होत असे. गाण्डीव खेरीज महेंद्राचे विजय, आणि विष्णूचे शाङ्र्ग ही धनुष्ये प्रसिद्ध आहेत. आितर काही शस्त्रांचे अुल्लेख आहेत - नन्दक : कृष्णाचे खड्ग. परश : तीक्ष्ण पात्याचे राम जामदग्न्याचे शस्त्र. पिनाक : शिवाचे धनुष्य. शिबिका: कुबेराचे शस्त्र. सुदर्शन : विष्णूच्या हातीचे चक्र. कौमोदकी : विष्णूचे गदा नावाचे शस्त्र.

(पुण्याच्या वेदभवन पत्रातील आिंदू देशपांडे यांच्या लेखावरून साभार. त्यानी भांडारकर संस्थेच्या आवृत्तीचा आधार घेतल्याचे नमूद केले आहे.)

या शस्त्रवर्णनातील काही संदर्भ व नावे आपल्या कानी पडलेली असतात. पण त्यांचे वैज्ञानिक वा अैतिहासिक आधार मिळणे आनंदाचे असते. त्या काळातील नोंदी पुराणातील कथा मानल्या जातीलही, पण त्यांतील नेमकेपण जाणून घेण्याची अुत्सुकताही वाटू लागेल. आजच्या काळातील काही शस्त्रास्त्रे काही देश बाळगून असतात, काही शोधून काढतात, काहींचा नुसताच धाक असतो.  आपल्या देशाने संशोधन करून तयार केलेल्या काही अस्त्रांना अग्नी, ब्राह्मोस अशी नावे देण्यात किती औचित्य आहे, हेही लक्षात घेण्याजोगे आहे. त्यांच्या अुपयोगांशी प्राचीन अुल्लेखांचे बरेच साम्य दिसेल.
शस्त्राने समोरच्या(दिसणाऱ्या) लक्ष्यावर आघात करता येई, अस्त्र हे अतिदूरचे अदृश्य लक्ष्य वेधत असे. अस्त्रासाठी तपश्चर्या व मंत्रसामर्थ्य आवश्यक; शस्त्र कोणीही (पात्र) धारण करू शके. अस्त्र रोधण्यासाठी दुसरे अस्त्र उपयोगी असे. शास्त्र इंद्रियाधीन असे, अस्त्र अतीन्द्रिय मंत्राधीन असे.

अनुभवांतून शिकवत जाणारा काळ
माझी मुलगी आर्या, स्वत:च्या पायावर उभी राहू शकली. आर्याचा जन्म २००२चा. जन्मत: तिच्या दोन्ही पायांच्या लांबीमध्ये थोडा फरक होता. सर्व तपासण्या केल्या. जन्मानंतर चौथ्या दिवशी एक्स-रे काढला होता. डॉक्टरांचे म्हणणे होते की, काळजीचे कारण नाही. वय वाढेल तसा तो फरक कमी होईल. तिची वाढ व्यवस्थित होत गेली. ती भरतनाट्यम शिकली. बॅडमिंटन खेळू लागली, सायकलिंग करू लागली. ती आठवीत असताना तिच्या चालण्यामध्ये थोडा वेगळेपणा जाणवू लागला. बाकी काही त्रास नव्हता. तपासणी करणे गरजेचे होते.
मे २०१६ मध्ये आम्ही डॉ.सतीश शिंदे यांना दाखविले. त्यांनी सांगितले की शल्यक्रिया करावी लागेल. जून २०१६ ला पुणे येथे संचेती हॉस्पिटलमध्ये गेलो. तपासणी झाल्यांनतर लक्षात आले की तिचा डावा पाय हा उजव्या पायापेक्षा चार से.मी. लहान होता, शिवाय उजव्या पायाच्या मांडीचे हाड तिरके वाढत गेले आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही पायांच्या शल्यक्रिया कराव्या लागणार होत्या.
आर्याची शाळा, अभ्यास व्यवस्थित चालू होते. शालान्त परीक्षा ४ एप्रिल २०१७ला शल्यक्रिया ठरवली. सगळे कसे पार पडेल, याची काळजी होती. ९ वाजता तिला आत नेले. चलबिचल होत होती. उलट सुलट विचारांची गर्दी होती. दुपारी १ वाजता शल्यक्रिया पूर्ण झाली. आम्ही तिला भेटलो. उजवा पायाचे मांडीचे हाड वाकडे झाले होते, ते तोडून तिथे एक चकती(प्लेट) बसवली होती, त्यामुळे तो पाय सरळ झाला. त्यांनतर डावा पाय -ज्याची लांबी वाढविण्याची ङळाल ठशलेर्पीींीीलींळेप डूीींशा  म्हणजे ङठड.
डाव्या मांडीचे हाड तोडले. त्याला ५ सळया(रॉड)सहित एक षळुरींेी जोडला होता. रोज १ मिलीमीटर याप्रमाणे अंतर वाढवत होतो. ४ सेंटीमीटर पूर्ण करण्यासाठी आम्हाला जवळजवळ ५० दिवस लागले. हॉस्पिटलमध्ये आम्ही ८ दिवस होतो. घरी आल्यानंतर खरी परीक्षा होती. आमची आणि आर्याचीही! पायाच्या मांडीत सळया आणि षळुरींेी तर उजव्या पायाच्या मांडीत प्लेट. प्रत्येक हालचालीवर मर्यादा येत होती. एकाच स्थितीत म्हणजे उताणे झोपणे क्रमप्राप्त होते.
यापुढे प्रत्येक १० ते १२ दिवसांनी एक्स-रे काढावा लागणार होता. म्हणजे आमच्यासाठी एक दिव्यच होते. अँबुलन्स आणि स्ट्न्ेचरशिवाय पर्याय नव्हता. आम्ही राहतो पहिल्या मजल्यावर, तारेवरची कसरत होती. आर्याला होणारा त्रास पाहवत नव्हता, पण पर्याय नव्हता. आठ दिवसाच्या अंतराने ड्न्ेिंसग करावे लागत. डॉ.सतीश शिंदे स्वत: घरी येऊन ड्न्ेिंसग करत होते.
१५ मे ची रात्र आम्ही विसरू शकत नाही. तिला दिवसभर खूप दुखत होते. रात्री ती खूप जोरात ओरडत होती, रडत होती. त्या रात्री सहनशक्तीच्या पलीकडे होते. एक क्षण ती म्हणाली, `आई माझा पाय तोडून टाका, मला माझा पाय नको.' आम्ही गलबलून गेलो. रात्री २ वाजता डॉ.पटवर्धन यांना फोन केला. त्यांनी एक इंजेक्शन सांगितले. प्रदीप मराठे एका हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. त्यांनी रात्री २.३० वाजता आर्याला इंजेक्शन दिले, पहाटे आम्ही परत पुण्याला जायचा निर्णय घेतला.
डॉ.पटवर्धन बोलले, आतले रॉड तुटले असण्याची शक्यता आहे. हे ऐकून धस्स झाले. पुन: ऑपरेशन या कल्पनेनेच मला अस्वस्थ वाटू लागले, जिवात जीव नव्हता. आतमध्ये जे नवीन हाड तयार होत होते त्यामुळे तेथील स्नायू ताणले जात होते. त्याचीच ही वेदना होती. २ दिवसांनी वेदना कमी झाल्या. डॉ.आभा यांनी तिला पहिल्यांदा वॉकरच्या साहाय्याने उभे केले. परत घरी कराडला आलो.
२० मे पासून फिजीओथेरपी सुरू केली. डॉ.सायली गिजरे आमच्या घरी येऊ लागल्या वेगवेगळे व्यायामप्रकार, हालचाली आर्याकडून करून घेऊ लागल्या. लांबी वाढविण्याचे काम पूर्ण झाले. दोन्ही पायांमध्ये ४ सें.मी.चा फरक होता, तो भरून आला. नवीन हाड तयार होत होते, ते नाजूक होते. ३ ऑगस्टला आम्ही परत संचेतीमध्ये दाखल झालो. षळुरींेी, ीेव इ. सगळे काढून संपूर्ण डाव्या पायाला प्लास्टर घालण्यात आले. आतमध्ये नवीन हाडाला धक्का लागू नये. प्लास्टर घातलेला पाय अजिबात टेकवायचा नव्हता. बघताबघता ६ आठवडे होऊन गेले.
ऑपरेशन होऊन सहा महिने झाले अजून थोडा संयम ठेवणे गरजेचे होते. ६ महिने आणि २० दिवसानंतर आर्या दोन्ही पाय जमिनीवर ठेवून चालत होती. आम्हा सर्वांसाठी तो क्षण अविस्मरणीय होता. डॉ.सायली यांची फिजीओथेरपी सुरू झाली. वेगवेगळे व्यायाम डॉक्टर तिच्याकडून करवून घेत होत्या.
आमची सर्वांची तपश्चर्या फळास आली. या सर्व प्रवासात अनेक अनुभव आले. प्रकर्षाने जाणवलं की आपण कराडसारख्या छोट्या गावात राहतो म्हणून एकमेकांना जवळून ओळखत असतो. मागच्या वर्षी आर्याच्या दातांना क्लिप बसवली होती. त्यासाठी क्लिनीकमध्ये जावे लागते, पण या ऑपरेशनच्या काळात तिथे नेणे शक्यच नव्हते. इस्लामपूरचे डॉ.नलवडे आणि कराड मधील डॉ.कोरे यांनी आमच्या घरी येऊन आर्याच्या दातांची ट्नीटमेंट केली. जूनमध्ये आर्याचा दहावीचा निकाल लागला. ८३% मार्क्स मिळाले. कराडच्या महिला कॉलेज प्रवेश घेतला. प्राचार्य आणि सर्व स्टाफने खूप मोलाचे सहकार्य केले. आमचे नातेवाईक, हितचिंतक, आमचे फॅमिली डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी, आर्याच्या मित्र-मैत्रिणी त्यांचे पालक, क्लासचे शिक्षक, लायन्स क्लबचे सभासद सर्वांचेच खूप साहाय्य झाले, धीर मिळाला. सभोवती `आपली' माणसे असली तर संकटे किती सुसह्य होतात!!
पालक म्हणून एक गोष्ट आव्हानात्मक वाटली. तिच्यासमोर येताना डोळयात पाणी न आणता सकारात्मक बोलणे. या काळामध्ये वैद्यकशास्त्र आणि आधुनिक प्रगत तंत्रज्ञान तसेच फिजीओथेरपीची कमाल जवळून अनुभवली.

या एकूण उपचारांसाठी आम्हाला सुमारे ४ लाख खर्च आला, पण राहण्याची सोय, खोलीभाडे, प्रवास वगैरे घटकांबाबत पैसे कमी-जास्त लागतील. याच प्रकारे ज्यांना काही शारीरिक समस्या असते, ते दुर्लक्ष करतात, किंवा एका पायात उंच चप्पल वगैरे वापरून काम चालवतात. त्याचा कालान्तराने मणक्याला वा इतरत्र त्रास होऊ शकेल, म्हणून धीराने वेळीच उपचार करावेत. प्रत्येकाला स्वत:च्या आनंदासाठी छंद हवा. आर्याला या संकटकाळात चित्रकलेने विरंगुळा दिला त्याचे फार महत्व जाणवले.
आर्या व्यवस्थित चालत आहे. कॉलेजलाही जात आहे. आता तिच्या भविष्याबद्दल अजिबात काळजी नाही, या कालावधीमध्ये माझे सासरे राजाराम व सासुबाई वसुंधरा आगरकर यांच्या आधाराशिवाय हे दिव्य पार करू शकलो नसतो. त्यांचे आशीर्वादामुळे आम्ही अनेक संकटे पार करू शकतो, असा विश्वास आहे.
-वैशाली आगरकर, कराड
फोन-९२७०५६३२०१

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन