Skip to main content

Posts

Showing posts from November, 2016

14 Nov. 2016

मराठ्यांचा राज्यविस्तार मोगलांच्या कराल दाढेतून सुटका होणे हे छ. थोरले शाहू महाराज यांच्या दृष्टीने क्रांतीचे द्योतक होते. त्यांनी उत्साही, कर्तबगार व्यक्तींना प्रोत्साहित करून, स्वराज्य वृद्धीसाठी त्यांचा उपयोग करून घेतला. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्वराज्याचे साम्राज्य घडविण्याची किमया घडली. शाहू महाराज परिपूर्ण किंवा निर्दोष होते असे म्हणता येणार नाही. तरीही त्यांनी मराठा राज्यातील कर्तबगार सरदारांच्या व पेशव्यांच्या मदतीने भारत वर्षात अटकपासून कटकपावेतो दरारा निर्माण केला. अटक सध्या पाकिस्तानात आहे. कटक ओरीसामध्ये आहे. मराठा इतिहास अबोल आहे. आपलाच पराक्रम आपण अभिमानाने सांगत नाही हे दुर्दैव वाटते. भारतवर्षात भरून राहिलेला हा मराठी पराक्रम काळाच्या ओघांत विस्मृतीत गेला. तो इंग्रजांनी दाबून टाकला. पानिपतच्या संग्रामाला २५५ वर्षे पूर्ण झाली, पण त्या निमित्ताने मराठी पराक्रम भारतातच नव्हे तर इतरही खंडात पोहोचला. मराठी अंमल हिंदुस्थानात कोठे कोठे होता? गुजराथ, म.प्रदेश, हरियाणा, राजस्थान, ओरिसा, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, येथील अनेक दुर्गांवर कधी ना कधी मराठ्य

24 Oct. 2016

SAMPADAKIY निसर्गाने भारताला  अुत्तम हवा, विपुल पाणी व कसदार भूमी दिलेली आहे. जगाच्या पाठीवरच्या अनेक देशांमध्ये माणसाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशी नैसर्गिक संपन्नता कमी असल्यामुळे परस्पर लढाया आणि मारामाऱ्या यांनी जगाचा आितिहास घडला आहे. त्याअुलट भारतीय अुपखंडात मात्र प्रचंड ज्ञानाचा महासागर तयार झाला होता, असे आता अुघड होअू लागले आहे. ज्या काळात युरोपीय देशंात लोक रानटी राहणीमानाचे होते, त्यावेळी भारताचे लोक हिमालयाच्या चोटीवर अुभे राहून `कृण्वन्तो विश्वमार्यम्' (सारे जग सुप्रतिष्ठित करू) अशी अुद्घोषणा करत होते. अशा संपन्न वातावरणात राहात असताना स्वाभाविकच माणसाचा अुपजत अुत्सवी भाव सतत प्रकट होत असतो. भारत हा अुत्सवप्रिय देश आहे, असे म्हटले जाते. आपल्याकडे अेखाद्याचा वाढदिवस साजरा होतो. हल्ली तर त्याचे महाप्रस्थ माजले आहे; शेंबड्या पोरांचाही वाढदिवस चौकात शुभेच्छांचे फलक झळकल्याशिवाय साजरे होत नाहीत. पुढाऱ्यांच्या वाढदिवसाला बैलगाड्यांच्या शर्यती होण्यात कुणाला औचित्यभंग वाटत नाही. मोठ्या व्यक्तीची पुण्यतिथीही आपल्याकडे दु:खद श्रध्दांजलीअैवजी  ती अुत्सव म्हणून `साजरी

17 Oct. 2016

धर्म वरचढ नव्हेच. अेके काळी महाराष्ट्नचे वर्णन करताना  `धर्म राजकारण समवेत चालती' असे केले गेले होते. अलीकडच्या काळात, सर्वधर्मांसाठी समभाव प्रशासनात बाणवायचा असेल तर हिदूवाल्यांचा तिटकारा करायचा, अशी अेक पुरोगामी फॅशन आली आहे. अेखाद्या हिंदूप्रेमी  राजकीय सत्ताधाऱ्याने त्यांस अनुकूल असा काही निर्णय चुकून घेतलाच तर त्यांचे राजकीय आणि सामाजिक विरोधक असा काही गदारोळ अुठवून देतात की या देशात सांप्रत केवळ ंहिंदूराष्ट्न्च काय ते अवतरले असून आितर धर्मीयांचा आता खातमाच होणार असा कुणाचा समज व्हावा ! अर्थातच त्यांना वाचविण्यासाठी या विरोधकांना जिवाची बाजी लावावी लागणार असेही त्यांना वाटू लागते. पंढरीची पूजा शासनाच्या वतीने करण्याचा प्रघात आहे, त्यात कुणा काँग्रेसवाल्याला आजवर प्रशासनाचा धर्म दिसला नाही. मुस्लीम धर्मीयांच्या आिफ्तार पाटर््याना हजेरी लावण्यात प्रशासन आडवे येत नाही. आितकेच काय सध्या कित्येक शासकीय कार्यालयांच्या आवारांत देवळे नि देवस्थाने दिसू लागली आहेत. दत्त, हनुमान ही त्यांत लाडकी दैवते आहेत. यांतील काही देव नवसाला पावणारे असल्याचेही सांगितले जाते आणि त्यांच्या दर्शनाला

10 oct 2016

राजकारणी मोर्चेबांधणी गेल्या दोन तीन महिन्यांत महाराष्ट्न्भरात मराठा समाजाचे  महामोर्चे सुरू झाले ते साऱ्या जिल्ह्यांतून फिरून झाल्यानंतर बहुधा  मुंबआीतील मोहिमेने त्यांची सांगता होआील. आजपर्यंत कुठल्याही संघटनेचा मोर्चा म्हटले की साऱ्या नागरी जीवनाला धसका बसत असे; पण तो वेगळया अर्थाने! वाटेत कुणी आला तर त्याला तुडवतच जाण्याची आजवरची रीत होती. हे मोर्चे मात्र त्यास आजवर तरी सन्माननीय अपवाद ठरले आहेत. संख्येने फार मोठे असूनही ते शांततेने पार पडले आहेत. त्याचा काही अनिष्ट परिणाम झाला हेही नाकारण्यात अर्थ नाही.  कोणत्याही कारणाने आितकी माणसे रस्यावर अुतरायची म्हटल्यावर दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होणारच, तसा तो झालाही. त्या मोर्चावेळी सारे साऱ्यांचे व्यवहार सुरळीतच चालले असते तर आणखी कौतुक करता आले असते. शाळा चालू राहूनही कोणत्याही बालकास त्रास न होता घरी परतता आले असते तर मोर्चांची शान वाढली असती. पण काही ठिकाणी `दुकाने बंद राहतील, जी अुघडी राहतील त्यांच्या दुकानांत पुन्हा कुणी जाणार नाहीत' या आशयाच्या सूचना देण्यात आल्या असतील तर, अेवढ्या चांगल्या मोहिमेला परिपूर्ण श्रेय देता ये