मराठ्यांचा राज्यविस्तार मोगलांच्या कराल दाढेतून सुटका होणे हे छ. थोरले शाहू महाराज यांच्या दृष्टीने क्रांतीचे द्योतक होते. त्यांनी उत्साही, कर्तबगार व्यक्तींना प्रोत्साहित करून, स्वराज्य वृद्धीसाठी त्यांचा उपयोग करून घेतला. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्वराज्याचे साम्राज्य घडविण्याची किमया घडली. शाहू महाराज परिपूर्ण किंवा निर्दोष होते असे म्हणता येणार नाही. तरीही त्यांनी मराठा राज्यातील कर्तबगार सरदारांच्या व पेशव्यांच्या मदतीने भारत वर्षात अटकपासून कटकपावेतो दरारा निर्माण केला. अटक सध्या पाकिस्तानात आहे. कटक ओरीसामध्ये आहे. मराठा इतिहास अबोल आहे. आपलाच पराक्रम आपण अभिमानाने सांगत नाही हे दुर्दैव वाटते. भारतवर्षात भरून राहिलेला हा मराठी पराक्रम काळाच्या ओघांत विस्मृतीत गेला. तो इंग्रजांनी दाबून टाकला. पानिपतच्या संग्रामाला २५५ वर्षे पूर्ण झाली, पण त्या निमित्ताने मराठी पराक्रम भारतातच नव्हे तर इतरही खंडात पोहोचला. मराठी अंमल हिंदुस्थानात कोठे कोठे होता? गुजराथ, म.प्रदेश, हरियाणा, राजस्थान, ओरिसा, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, येथील अनेक दुर्गांवर कधी ना कधी मराठ्य