एजंट कशासाठी हवेत महाराष्ट्न् राज्य परिवहन आयुक्तानी राज्यभरातील आरटीओ कार्यालये दलाल-मुक्त करणार असल्याची घोषणा करून, त्यास दणकून प्रसिद्धी दिली. वाहन-परिवहन (आर टी ओ) विभाग भ्रष्टाचारी असून तेथील एजंट हेच त्या भ्रष्टाचाराचे कारण व माध्यम आहेत, असा समज करून देण्यासाठी परिवहन खाते प्रयत्नशील असावे. पण `अंदरकी बात' राज्यातल्या जनतेला ठाऊक आहे. आर टी ओ मधले एजंट बंद करण्यामुळे सरकारी बाबूंची खाबूगिरी कशी काय बंद होणार आहे? उलट जनतेच्या सोयीसाठी तिथले एजंट उपयोगी असतात. तिथले काम दहा-पाच मिनिटांत होत असते तर बात वेगळी. एरवी कामाच्या माणसांनी स्वत:चा दिवस मोडून अशा कार्यालयातील साधे-किरकोळ काम करण्यात काय शहाणपणा? अशा एकाच कामासाठी समजू शंभर रुपये एजंट घेत असेल तर अशा दहावीस जणांची कामे एकत्रित करून त्याने त्याच्या दिवसाची कमाई करण्यात चूक काय? एजंट केवळ आरटीओकडेच असतात काय? स्वत:चा खटला चालविण्यासाठी फी देऊन वकील नेमला तर तो एजंट नव्हे का? हल्ली तर काही ठिकाणी वकील लोक शब्दश: `एजंट' म्हणूनच काम करतात असे ऐकण्यात येते, खरे-खोटे ती आंधळी न्यायदेवता जाणे! महसूल, पोलिस अशा ठिकाण