दोष धर्माला कशासाठी?
श्री.गोविंदराव पानसरे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध होणार, व्हायलाच हवा. या प्रकारे कुणीही यावे आणि गोळया झाडाव्यात ही परिस्थिती भलतीच गंभीर आहे. श्री.पानसरे अभ्यासू वक्ता आणि सर्वस्पर्शी विचारवंत होते. त्यांनी कधी तोडफोडीची आंदोलने किंवा भडक भाषणबाजी केली नाही; उलट स्वत:ची ठाम मते असूनही इतरांचे ऐकून घेण्याची प्रगल्भ सभ्यता त्यांच्याकडे होती. तरीही कोणी भाडोत्री गुंड किंवा माथेफिरूच्या गोळीला त्यांना तोंड द्यावे लागावे हा अराजकी दैवदुर्विलास आहे.
परंतु त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करतांना कित्येक अविचारवंतांनी ताळ सोडल्याचे ऐकून-वाचून, अराजकाचा अधिक स्पष्ट प्रत्यय येतो. श्री.पानसरे हे साम्यवादी होते, म्हणून त्यांच्यावरील हल्ल्याचे पाप हिंदुत्त्वावर ढकलण्यात काही शहाणपणा नाही. स्वत: पानसरे यांना अहिंदू ठरविण्याचेच काही कारण नाही. साम्यवादी म्हणजे अहिंदू, हे फार उथळ गणित झाले. भारतातील कित्येक-बहुतांशी सर्वच-साम्यवादी हे तर जन्माने हिंदूच होते! हिंदुत्त्व ही तर जीवनपद्धती आहे असे त्याच धर्मातील तत्ववेत्ते सांगतात. तर मग उदारमतवादी, सहिष्णू पुरोगामित्त्वाला हिंदू म्हणण्यास काहीच हरकत नाही. जे सनातन, नित्यनूतन असते त्याचे सहर्ष उत्फुल्ल स्वागत करणारी समावेशक भारतीय जीवनपद्धती म्हणजेच हिंदुत्व आहे. पानसरे किंवा अगदी थेट कै.श्रीपाद अमृत डांगे किंवा फॉर्वर्ड ब्लॉकचे नेताजी सुभाष यांना त्या अभिमानास्पद परंपरेतून बाजूला काढण्यात कसले पुरोगामित्व; आणि कसली वैचारिकता!!
भारतवर्षात प्राचीन काळापासून अनेक राज्ये अस्तित्वात होती. त्याकाळी त्यांस देश म्हणत. केंद्रीय एकमेव सत्ता नसली तरी त्या त्या राज्यांचे संबंध परस्पर संमत अशा `राज्यधर्मा'वर आधारित होेते. तेच संविधान किंवा राजकीय परंपरा आजच्या काळात चालणार नाहीत. ज्या काळात लोकसंख्या अल्प होती, युद्धे-आपत्ती अटळ होत्या, त्यावेळी अष्टपुत्रा मातेला मोठे स्थान होते. आजच्या काळात चार अपत्यांचा पुरस्कार करणाऱ्या महाराजांनी, त्या पुरातन काळाचे साक्षी कशाला म्हणवावे? या वेडगळपणास कुणी हिंदुत्त्ववादी म्हणत म्हणवत असतील तर ते खऱ्या जीवननिष्ठ पुरोगामी हिंदू प्रणालीचा अधिक्षेप करीत आहेत. जसे कोणाही अतिरेक्याला मुस्लिम म्हटल्याने अन्याय होतो; त्याचप्रमाणे पानसरेंच्या संशयित हल्लेखोरास हिंदुत्त्ववादी म्हणणे हे निस्संशय द्वेषपूरक आहे. राजकारण जर धर्मातीत हवे असेल तर राजकीय स्पर्धेतून येणाऱ्या आरोपांना त्या तथाकथित समाजवाद्यांनी किंवा पुरोगाम्यांनी हिंदुत्त्व जोडण्याचे कारणच नाही.
श्री.मोदी सत्तेवर आले, त्यांना अमदाबाद दंगलीवरून दहा-बारा वर्षे मुस्लिमशत्रू ठरविण्याचे उद्योग झाले. ते मोदी आता मुस्लिम वा िख्र्चाश्नांस सामावून घेण्याची भाषा सर्वोच्च पदावरून करत आहेत. त्यात राजकारणही असेल, पण तेही गैर कसे? राजकारण असले तरी समाजवादी विचारातील हिंदुत्त्व तरी नाही? मग त्या विधानांचे तरी स्वागत करावे ना! पण ते करायला खरे खुले पुरोगामित्व लागते, ते कुठून आणायचे?
खऱ्या धर्मातील तत्वे आणि मूल्ये चिरंतन, परंतु आचार व कर्मकाण्डे स्थलकालस्थिती सापेक्ष असतात. ती बदलतच असतात. जुन जाऊन नवीन येणे, यात धर्मही असतो आणि पुरोगामित्वही असते. सावरकर धोतर-टोपी घालत म्हणून प्रतिगामी; आणि आजचा कोणी बूटपाटलोण घालतो म्हणून पुरोगामी इतके सहज ते ठरत नसते. उलट गतिमान समाजात तो फरक वरवरचा दिसतो, तसा तो मान्य करीत जावे; आणि मूळच्या धर्ममूल्यांशी आपल्या वर्तनाचा मेळ घालावा हेच धर्माचरण असते. महाभारत म्हणते की -
भवत्यधर्मो धर्मोहि धर्मो%धर्मो भवत्युत
कारणद्देशकालस्य देश: कालस्तु तदृश: ।
ज्या आचाराला पूर्वी धर्म्य मानले, तो पुढच्या कालात अगर भिन्न प्रदेशात अधर्म मानला जातो; व जो आचार अधर्म्य, तो धर्म्य मानला जातो. तेव्हा गतिमान समाजात फरक अपरिहार्य आहे.
हा फरक लक्षात घेऊन धर्माच्या बाबतीत पुरोगामित्त्व ठरवावे. राजकीय विचारांची राजकारणे धर्माला जोडण्याचे कारण नाही. पानसरे यांच्या हल्लेकऱ्यांचा शोध लागत नाही म्हणून काँग्रेसच्या राधाकृष्ण विखेपाटलांनी देवेंद्र सरकारला दूषणे दिली, पण सव्वा वर्षांपूर्वीचे दाभोलकरांचे मारेकरी त्यांच्याही सरकारला सापडले नाहीत, हे त्यांच्या लक्षात येत नसले तरी लोकांच्या येते! दाभोलकर गेल्यास एकदोन दिवस उलटताच त्यांच्या पृथ्वीराजकारण्यांनी काही संघटनांवर किरण धरण्याचा `न्याय' केला होता, त्यास कोण पुरोगामित्व म्हणणार?
हिंदू धर्माचे हित ज्यांना अपेक्षित असेल त्यांनीही त्या श्रेष्ठ धर्माच्या नावाखाली नस्ता वावदूकपणा करता कामा नये. त्यांची उचापतखोर विधाने व कृतींनी हिंदुधर्महित साधत नाही, पण अनेक हिंदूधार्मिक दुखावतात. दुही माजते, ती आपल्या देशाला महागात पडते. त्यांचे धर्मविचार चूक की बरोबर हे नंतर पाहा, पण आज त्यांतून जे सामाजिक तणाव वाढतात, ते परवडत नाहीत. धर्माभिमानी जर मनुस्मृती मानत असतील तर त्यांच्यासाठी मनूचे सांगणेे आहे की - धर्माला विरुद्ध असे अर्थोत्पादन आणि वासना सोडून दिल्या पाहिजेत. ज्या आचारामुळे समाजाचे सुख व सुस्थिती साधली जात नाहीत; व ज्या आचारासंबंधी लोकांची फारच हाकाटी व तिटकारा आहे तो आचार, - धर्म्य मानला गेला असला तरी - सोडून दिला पाहिजे.
परित्यजेदर्थकामौ यौ स्यातां धर्मवर्जितौ
धर्म्यंचाप्यसुखोदर्कं लोक विक्रुष्टमेवच ।
मनुस्मृति अ.४/१७६
सारा समाज दुहीग्रस्त होणे भयसूचक आहे. गोविंदराव पानसरे हे विचारवंत म्हणून समाजधुरीण होते. त्यांच्यावर शारीरिक घात हल्ला होण्याने भयाचे प्रदर्शन घडले. ते कृत्य अधार्मिक आहे. त्या कृत्यास किंवा ते करणाऱ्यांस जे कोणी हिंदुत्त्व जोडू पाहात असतील ते प्रतिगामी विद्वेषी ठरतात. त्यांना हिंदुत्त्व किंवा सद्धर्म कळणे दुरापास्त वाटते, ते समाजवादी नव्हेत, साम्यवादी नव्हेत, पुरोगामी नव्हेत, विचारवंत तर नव्हेतच. त्यांना काय म्हणावे-? प्रश्नच आहे खरा!!
१२ मार्च (१९१४) हा यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस. त्यांच्या १०१व्या जयंतीच्या निमित्ताने, त्यांच्या खुल्या संवादपटुत्त्वाचा परिचय देणारी आठवण.
देशमुख आणि कं. (पुणे ३०) प्रकाशित, `माणसं माणसांसारखीच वागतात' या पुस्तकातून संक्षेप ...
यशवंतराव चव्हाण
काही कामासाठी दिल्लीला गेलो होतो. चहा घेताना सहज म्हणून टेलिफोन डिरेक्टरी चाळायची, तर नेमके पान आले `सदस्य लोकसभा' आणि समोर नाव, पत्ता व अर्थातच फोन नंबर : यशवंतराव चव्हाण. अनेक वर्षांची सुप्त इच्छा जागी झाली. बघू या प्रयत्न करून, म्हणत नंबर फिरवला.
माझे मामा म्हणजे महाराष्ट्नतला गाजलेला प्रकाशक ग.पां.परचुरे. केव्हातरी नवीन प्रकाशने यशवंतरावांना भेट द्यायला तो जात असे. एकदा त्याने मलाही सोबत नेले होते. फार तर दहा-पंधरा मिनिटे आम्ही तिथे असू. (ती आठवण दिली.)
``अरे, गजाननराव तुझे मामा? सख्खे? मग तर तू घरचाच. उतरलास कुठे? नीट सोय नसली तर बॅग उचल आणि इथे ये. मी एकटाच आहे. आज वेणूबाई कऱ्हाडला गेली आहे.''
***
मला एक प्रश्न होता. सहकारक्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कुणा व्यक्तीचा सत्कार झाला होता. दुर्दैवाने त्यांचे नाव आज स्मरणात नाही. त्या सत्कार सोहळयात यशवंतराव बहुधा अध्यक्ष होते. एक वक्ते होते प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व विचारवंत वि.म.दांडेकर. मात्र तो समारंभ गाजला होता निराळयाच कारणाने. आपल्या भाषणात वि.मं.नी सहकारी साखर क्षेत्रावर सडकून टीका केली. खूप बोचरे असे ते भाषण असावे. त्याच सभेत यशवंतरावांनी कडक भाषेत वि.मं.ना फटकारले. तो प्रसंग त्यावेळी वृत्तपत्रांतून खूप गाजला होता. त्यातल्या तात्विक भागापेक्षा व्यासपीठावरच्या `तू-तू, मैं-मैं'चा ऊहापोह जरा जास्तच झाला, संपादकीयातदेखील.
१९७७ ची आणीबाणी संपवणारी निवडणूक. जाहीर सभा, आव्हाने-प्रति आव्हाने, टोलेबाजी हे सर्व रसायन त्या गदारोळात असतेच. मात्र १९७७ ला पु.ल.देशपांडे जनता पक्षाच्या प्रचाराला हिरीरीने उतरले होते. बहुधा कोल्हापूरच्या सभेत पुलंनी यशवंतरावांना काँग्रेस सोडून जनता पक्षात येण्याचे जाहीर आवाहन केले. सातारच्या सभेत बोलताना यशवंतरावांनी `मला विदूषकाच्या सल्ल्याची गरज नाही' असा उलटा फटकारा मारला.
मला कुतूहल होते ते निराळेच. हे दोन्ही प्रसंग पूर्वी घडून गेलेले, मधे काळही लोटलेला. ``या व्यक्तींचे आपसात संबंध अशा घटनांनंतर कसे राहिले? पूर्वीसारखेच, कमी पातळीवर, का तुटले?''
यशवंतराव हसले, ``अरे, ही टोलवाटोलवी त्या क्षेत्रात चालतेच. त्याचा संबंधांवर परिणाम तसा होत नाही. आता वि.म.दांडेकर त्यांच्या क्षेत्रातला मोठा तज्ज्ञ, अभ्यासू, कळकळीने काम करणारा, काही मूल्ये-निष्ठा जपणारा. जे पटले नाही ते परखडपणे सांगणारा. मात्र त्या दिवशी प्रसंग होता एका कार्यकर्त्याच्या गुणगौरवाचा. वि.म.जे बोलले, ते बोलायचा त्यांना अधिकार होता. मत पटणे, न पटणे निराळे; मात्र तो प्रसंग, ते व्यासपीठ ही त्यासाठीची जागा नव्हती. त्यामुळे औचित्यभंग झाला, असे मला वाटले. दांडेकरांनंतर आणखी कुणी वक्ता असता तर कदाचित फरक पडला असता, पण लगेच माझेच नाव जाहीर झाले. त्या तिरमिरीत मी जास्त कडवटपणे बोललो. ते भाषण गंभीरपणे घेऊ नको. माझे व विमदांचे संबंध उत्तम राहिले आहेत. आजही भेटीगाठी, हास्यविनोद, विचारांची देवाणघेवाण.... सर्व पूर्वीप्रमाणे, काहीच फरक नाही.''
यशवंतराव थांबले, मात्र मंदपणे हसत राहिले. आणखी काही बोलतील याची मी वाट पाहात होतो; मात्र ते गप्पच. मी म्हटले, `साहेब, उत्तर पूर्ण झाले नाही. पु.ल.?'
``तिथे मात्र पूर्वीसारखे नाही राहिले. म्हणजे संबंध पूर्ण तुटले, असे नाही; पण कुठे भेट झालीच तर नमस्कार, कसं काय - यापलीकडे पु.ल.जात नाहीत.''
``साहेब, असं का झालं असावं?''
``कुणास ठाऊक? पण माझा अंदाज सांगतो. राजकारणाच्या खडाखडींचा पुलंना अनुभव नाही, नव्हता. त्यांना ७७च्या निवडणूक प्रचारात भाग घ्यावासा वाटला; तो त्यांचा हक्कच होता. विनोदाचे शस्त्र त्यांच्या हाती होते. त्याचा त्यांनी मुक्त हस्ते वापर केला. हे सर्व करण्याचा त्यांना मूलभूत अधिकार होता. काँग्रेस जर निवडणूक हरली, जनता पक्षाला सत्तेवर आणता आले; तरच आणीबाणी संपेल, नाही तर हुकूमशाहीला लोकशाही पद्धतीने `सँक्शन' मिळेल हे प्रचाराचे सूत्र होते. ते मांडताना मला तिकडे चुकीच्या पक्षात आहात, इकडे या - असे जाहीर आवाहन माझे नाव घेऊन करण्याचे काही कारण नव्हते. ठीक आहे, केले. मारला एक टोला; मग एक टोला पचवायची तयारीही हवी. ती मानसिकता त्यांची नाही. त्यांनी ते मनात वागवले असे मला वाटते. असो.''
``पण साहेब, ते उत्तम नट, नाटककार, विनोदसम्राट, व्यासंगी तर आहेतच. विडंबन हातखंडा, मराठीच्या बोलीभाषांवर पकड, मूल्यांवर श्रद्धा ही यादी मोठी. मग झाले - गेले, जो रात गई वो बात गई - असे का झाले नाही?''
``मला वाटते, त्यांना स्वत:वर झालेली टीका ऐकायची-वाचायची सवय नाही. कारण त्यांच्या लिखाणावर फार खोलात जाऊन समीक्षा झालीच नाही.''
- विश्वास दांडेकर,
`मालवती' कांगा कॉलनी, सातारा
फोन (०२१६२) २३५२५४
ज्येष्ठ नागरिकांसाठी लेखन स्पर्धा
`माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग', `माझ्या जीवनातील टर्निंग पॉइंर्ट', `अभी तो मैं जवान हूँ (पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा!) यापैकी कोणत्याही विषयावरील लेख स्पर्धेसाठी पाठवायचा आहे. त्यासोबत व्यक्तिगत माहिती, फोटो (ऐच्छिक) व प्रवेश शुल्क रु.५०/- पाठवावे. लेखाची शब्दमर्यादा १०००. एकाहून जास्त प्रवेशिकाही स्वतंत्र ड्नफ्टसह पाठवता येतील. भाषा, आशय व शैली या निकषांवर निर्णय होईल व तो अंतिम असेल. तीन क्रमांकांना अनुक्रमे रु.२०००, १५०० व १००० आणि रु.५०० चे उत्तेजनार्थ दोन पुरस्कार व सन्मानपत्र समारंभपूर्वक देण्यात येतील. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग कृतज्ञता पत्र दिले जाईल. काही चांगले लेख पुस्तकरूपात प्रसिद्ध करण्याचाही विचार आहे. (त्याविषयी नंतर कळविण्यात येईल.)
ड्नफ्ट व लेखासह प्रवेशिका ९ एप्रिलपर्यंत पोचणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पत्रव्यवहार शक्य होणार नाही. उत्साही स्त्री पुरुषांनी सहभाग घ्यावा.
संपर्क : श्री. अरुण गोडबोले, कौशिक प्रकाशन, ६९, शनिवार पेठ, सातारा ४१५००२
फोन : ९८५०९ ४३०४१ (सकाळी ११ ते सायं.६)
`कन्यादान': चर्चा व्हावी
परंपरेप्रमाणे आपल्याकडे विवाह-सोहळयामध्ये `कन्यादान' या नावाचा विधी होत असतो. `कन्यादान' या शब्दाबद्दल माझा आक्षेप आहे.
दान सामान्यपणे निर्जीव वस्तूचे किंवा पशूंचे होत असते, माणसाचे होत नसते. कन्या निर्जीव वस्तू नाही, पशू नाही. कन्यादान या शब्दात पुुरुषी वर्चस्व, लिंगभेद, अहंकार हे भाव दिसतात.
स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये एकच आत्मत्त्व आहे. तस्मात् दोहोमध्ये समत्व असायला-पाळायला हवे. `कन्यादान' हा शब्द सत्य तत्त्वाला छेद देणारा आहे. कन्यादान हा उच्च कोटीचा विधी असेल तर त्यावेळी पुत्रदान हाही विधी व्हावा. `कन्यादान' या शब्दापेक्षा `स्नेहबंध' या नावाचा उभयपक्षी लागू होणारा विधी रूढ करावा.
व्यक्तीच्या बाबतीत आत्मबलिदान, देहदान हे शब्द अवश्य रूढ होऊ द्यावेत. त्या संज्ञांमध्ये `देह जड आहे' असा पूर्णत: आध्यात्मिक भाव आहे; त्यागाचा उदात्त भाव आहे. चर्चा व्हावी.
- म. वि. कोल्हटकर, सातारा फोन : (०२१६२)२३२५०४
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको
मोबाईलवर स्वत:चा फोटो काढून स्मार्टफोनवर ठेवण्याची अजब कला सध्या सोशल मीडियावर बोकाळली आहे. इस्ट्नग्राम या साईटने गेल्या वर्षी शेवटच्या सहा महिन्यातच ८.८०लाख सेल्फी ठेवल्या होत्या. त्यांचा अभ्यास आणि विश्लेषण 'डळाश्रिळषळशव ३६०' या संस्थेने केला. त्यातून हे अजब फॅड उघड झाले. एखाद्या समारंभात अनेक मंडळी व्यासपीठावर असतात. आपल्यासमवेत एखाद्या सेलिबे्रेटीचा फोटो असावा असा हपापा असतो. त्या इच्छेपोटी हा प्रकार चालला आहे. `आजच्या जीवनशैलीत आपल्या शेजारी कोण राहते हेही ठाऊक नसते' असे कौतुकाचे बोल ऐकायला मिळतात. परंतु आपली छबी समाजमाध्यमांवर झळकावी आणि त्याचे दर्शन साऱ्या जगाला व्हावे ही हौस फार वाढली आहे. संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपच्या काही तरुण महिला खासदारांनी लोकसभेच्या सभागृहातच फोटोसेशन करून मोबाईलवर सेल्फी काढल्याचे वृत्त नुकतेच वाचनात आले. आता कोणाला काय बोलणार?
कधी कधी या हौसेचे स्वरूप विकृत दिसते. एका अभिनेत्रीने आपला चेहरा इतका लाल रंगवला की तो रर्क्तेंंबाळ वाटला. तिने स्वत:च्या त्या फोटोला `फेशियल' असे नाव दिले. गाडी चालविण्याची पोझ प्रसिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे अश्लिल हिंसक चित्रेही सुरू झाली आहेत. काहींनी तर स्वत:च्या आत्महत्त्या चित्रित करून पाठविल्या आहेत. मथुरा रेल्वे स्टेशनजवळ रुळावरती पाठीमागून धावणाऱ्या रेल्वेसमोर स्वत:चा फोटो काढण्याच्या नादात तिघांचा मृत्यू झाला अशी बातमी आली आहे.
डोक्यावर हात ठेवला की भस्म होते हे भस्मासुराला समजल्यावर, नाचता नाचता त्याने स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवून नाश केला ही विष्णुपुराणात मोहिनी नृत्याची कथा आहे. ही नवी नवी फॅडे जोपासणाऱ्यांना ही कथा लागू पडते. आपली पुराणे पुराणकथा वाटतात, पण अशा प्रकारच्या प्रवृत्तींची ती रूपके असावीत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक त्याच दिशेला नेतो.
- विवेक ढापरे, कऱ्हाड (फोन : ७५८८२२११४४ / ९४०५५३८२८५)
`आपले जग'चा त्रितपपूर्ती समारंभ
तीन तप:पूर्तीच्या निमित्ताने प्रकाशित केलेला अंक सर्वत्र मिळाला असेलच. त्याबद्दलचा अभिप्राय जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अनेक वाचक व हितचिंतकांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले, त्याचबरोबर बहुतकांनी त्रितपपूर्तीचा समारंभ कुठे-कधी-कसा झाला याचा वृत्तांत विचारला आहे -
या महत्त्वपूर्ण आणि जिव्हाळयाच्या निमित्ताने अत्यंत घरगुती असा कार्यक्रम आयोजित केला होता. `आपले जग'शी निकट संबंधी, किंवा पूर्वी कधी या अंकासाठी काम केलेल्या पत्रकार-मित्रांची स्नेहभेट योजिली होती. त्यात जिल्हा माहिती अधिकारी एस.आर.माने, दै.`पुढारी'च्या सांगली आवृत्तीचे संपादक चिंतामणी सहस्रबुद्धे, `तरुण भारत'चे सांगली आवृत्तीचे संपादक मंगेश मंत्री, `सकाळ'च्या सांगली आवृत्तीचे संपादक अशोक घोरपडे, `केसरी'च्या सांगली आवृत्तीचे संपादक मनोहर पेशवे आणि माधवी पेशवे, तसेच उदय वेलणकर, विवेक ढापरे, विनिता तेलंग, मोहन आळतेकर इत्यादि पारिवारिक-स्नेहीजन सहभागी होते. `पुढारी'चे विजय गुरव, चित्रकार सुरेश पंडित हे ऐनवेळी येऊ शकले नाहीत. सकाळी ९वा. `आपले जग'च्या प्रकाशनस्थळी (`वाल्मिकी'च्या अंगणात) गप्पा आणि न्याहरीने प्रारंभ झाला.
तिथून विटे येथे जयंतराव बर्वे यांच्या शेतावर भेट दिली. सेंद्रिय शेतीचे प्रयोग, अग्निहोत्राचा पिकांवर परिणाम, बायोगॅस, गोपालन, ठिबकसिंचन, बायोमास इत्यादी प्रयोगांची पाहणी व चर्चा घडली. नेचरकेअर फेर्टलायझर या सेंद्रिय खत कारखान्यास भेट, निर्यातक्षम उत्पादनांची माहिती व वार्षिक १० हजार टन उत्पादन करणारा प्रकल्प आणि शेतकऱ्यांना रासायनिककडून सेंद्रिय कडे वळण्याने होणारे फायदे पटवून देणारे प्रशिक्षण प्रयोग अशीही पाहणी झाली. जयदेव बर्वे आणि डॉ.सांडू (सुप्रसिद्ध सांडू ब्रदर्स मुलंुंडचे) यांनी शेतजमीन व फळबागांसाठी देशी उपचार व पोषण देणाऱ्या अनेक पद्धतींची माहिती दिली. `नेचर केअर'चा आणखी एक कारखाना लातूर येथे सुरू झाला असून आफ्रिका व युरोपीय देशांतून चांगली मागणी येत असल्याचे सांगण्यात आले.
`आपले जग'चे प्रारंभकाळातील लेखक (विटे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी) कै.बलवंत प्रभावळकर यांचे नातू अमृत कुलकर्णी व पूर्वी `सकाळ'च्या सांगली कार्यालयात काम करणारे श्री.बिदनूर हे आता त्या सेंद्रिय उत्पादन प्रकल्पात असतात. त्यांनी या जुन्या सहकारी `मित्रमंडळा'चे अगत्य करून माहिती दिली. श्री.जयदेव यांनी आपल्याकडील सेंद्रीय उसाचा रस सर्वांना दिला.
पुढचा टप्पा बलवडीच्या क्रांतिस्मृतिवनात होता. काही ना काही नात्याने भाई संपतराव पवार निर्मित, या अनोख्या प्रेरणास्थळाशी ही सर्व पत्रकार मंडळी परिचित होती, पण अलीकडच्या काळात या प्रकल्पाने घेतलेले सुरम्य रूप सर्वांना अनोखे होते. त्यामुळे इथली भेट, पाहणी, भावी योजना, (आणि समस्याही) पत्रकार नजरेत येणे विशेष जिव्हाळयाचे होते. या ठिकाणी संपतराव पवार यांनी साऱ्यांचे स्वागत केले, व हुतात्म्यांच्या नावाने केलेले वृक्षसंगोपन प्रत्यक्ष दाखविले. जिल्हा माहिती अधिकारी श्री.माने यांना राज्यशासनाचा उत्कृष्ठ वार्तांकनाचा मोठा पुरस्कार नुकताच मिळाला, त्याबद्दल त्यांचा सत्कार जयंतराव बर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. `आपले जग'च्या विशेषांकाचे प्रकाशन भाई संपतराव पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर `आपले जग' परिवारातील विनायक साठे, संदीप देशमाने, मनीषा, आनंद, पद्मा, सईदा यांनी आयोजित केलेल्या बासुंदीचा आस्वाद या स्थळी वनभोजनात सर्वांनी घेतला.
या अनोख्या, वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासदौऱ्यातून साऱ्या परिवाराचा हृद्य मेळा जमविणारी ही सर्वांची स्नेहभेट `आपले जग'च्या त्रितपांच्या पुण्याईला साजेशी ठरली.
श्रद्धांजली
तासगावच्या मार्केट यार्डातील कार्यालयात चाहूूल घेतली, आणि तासगावपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावरच्या `अंजनी' या गावाकडे जीप दामटली. पावसाच्या आधीचा आठवडा. माळराने उदास होती. पिकांचे मोड क्षीण झाले होते. आमदारांच्या अंजनीतील घराला कुलूप पाहून गाडी पुन्हा माघारी वळवली. तरीही त्यातून त्यांच्या गावच्या दु:खाची आणि परिस्थितीची पुष्कळशी कल्पना आली होती.
तासगावच्या बाजार समितीचे कार्यालय हा आमदारांचा तिठ्ठा. चुकला फकीर दुसऱ्या हेलपाट्याला याच मशिदीत भेटला. आतल्याच्या आतल्या खोलीत आम्ही जाऊन बसलो.
आमदार आर.आर.पाटील हे विधानसभेतले एक बोलके, अभ्यासू सभासद. साडेतीन वर्षांच्या आमदारकीत किती आणि कोणती भाषणे केली याचा तपशीलवार आढावा मतदारांपुढे ठेवण्याची कल्पना त्यांनी सांगितली. या आमदाराला सारेजण `आबा' म्हणतात. आबा म्हणण्यासारखे त्यांचे व्यक्तिमत्त्व नाही. पोक्त वय, छपरी मिशा, भारदस्त शरीर यातलं काहीही नाही.
``प्रसिद्धी आणि प्रचार याचंही एक तंत्र असतं. त्यासाठी हाताशी मोठी बँक, कारखाना असं असावं लागतं''- हे त्यांनी थेटच सांगून टाकलं. ``ते नसल्यामुळं केलेलं काम आणि त्या मागची भूमिका लोकांपर्यंत पोचविण्यात आपण कमी पडतो.'' असे ते म्हणाले. त्या संबंधीच्या राजकीय वर्तुळातल्या गंमती त्यांनी सांगितल्या.
त्या आतल्या खोलीपर्यंतही येऊन लोक त्यांना वेढत होते.
- आज गावात येणाऱ्या मंत्र्याचं स्वागत करताना कुणी कुणीकडून जायचं.
- आमच्या गावाला ग्रामसेवक नाही, कधी मिळणार?
- मी अपंग स्वातंत्र्यसैनिक. सवलतीच्या मागं नाही, पण माझ्या कामाचं काय?
- अधिवेशनाला मुंबईला कधी जाताय? रेल्वे सांगलीत पकडायची की मिरजेत?
या साऱ्या कामांशी चौफेर भिडत आमदार आर आर शांतपणाने बोलत होते. आमची बैठक थोड्या वेळाने संपून ते मागच्या लवाजम्यासह पुढच्या कार्यक्रमासाठी हलले. जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात त्यांची चार-दोनदा गाठ घेतली, तेव्हा कित्येक गप्पात ते खुलायचे.
तासगावच्या माळावर त्यांच्याच आधिपत्त्याखाली रामानंद सूत गिरणी आहे. तिथे एकदा त्यांची वाट पाहात होतो. एव्हाना आर आर आबा मंत्री झालेले होते. त्यामुळे `घरून निघालेत', `गावात थांबलेत', `आत्ताच वायरलेस आलाय'.... अशा हुलकावण्या ऐकत तासभर गेला. एकदाचे आले! धावपळीत सगळेजण आतल्या बैठकीत पळाले. मी बाहेरच रेंगाळलो. तसे आणखी सात-आठजण. एका करकरीत गाडीशी नारळ वाढविण्याची तयारी होती. त्यांच्या निकटच्या एका `कार्यकर्त्या'ने आपण घेतलेली गाडी त्याच्या आबाला दाखवायला आणली होती. आबांना नारळ फोडायची `रिप्ेष्ट' करत तो पुढं येताच, `अरे, ही आणली का गाडी...?' म्हणत आबा आधी तिकडे वळले. गाडीचं दार उघडून त्यांनी `डायवरशीट' पकडली. नीट पाहिलं, चौकशी केली. मग खाली उतरून नारळ वाढवला. त्या गाडीवाल्याचा आनंद चेहरा भरून सांडत होता.
चालत चालतच माझ्या हातचे कागद त्यांनी पाहिले. एका बाजूने बोलत-ऐकत प्रकरण ताब्यात घेतले. `पाहतो' म्हणत ते आतल्या गर्दीत घुसले. मी अल्लाद बाहेर सटकलो. बढती मिळत गेली तरी ही जवळीक त्यांनी सांभाळली हे मला विशेष वाटते. आबा माणसातला माणूस होता,.... गेला!!
- वसंत आपटे, कि.वाडी
श्री.गोविंदराव पानसरे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध होणार, व्हायलाच हवा. या प्रकारे कुणीही यावे आणि गोळया झाडाव्यात ही परिस्थिती भलतीच गंभीर आहे. श्री.पानसरे अभ्यासू वक्ता आणि सर्वस्पर्शी विचारवंत होते. त्यांनी कधी तोडफोडीची आंदोलने किंवा भडक भाषणबाजी केली नाही; उलट स्वत:ची ठाम मते असूनही इतरांचे ऐकून घेण्याची प्रगल्भ सभ्यता त्यांच्याकडे होती. तरीही कोणी भाडोत्री गुंड किंवा माथेफिरूच्या गोळीला त्यांना तोंड द्यावे लागावे हा अराजकी दैवदुर्विलास आहे.
परंतु त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करतांना कित्येक अविचारवंतांनी ताळ सोडल्याचे ऐकून-वाचून, अराजकाचा अधिक स्पष्ट प्रत्यय येतो. श्री.पानसरे हे साम्यवादी होते, म्हणून त्यांच्यावरील हल्ल्याचे पाप हिंदुत्त्वावर ढकलण्यात काही शहाणपणा नाही. स्वत: पानसरे यांना अहिंदू ठरविण्याचेच काही कारण नाही. साम्यवादी म्हणजे अहिंदू, हे फार उथळ गणित झाले. भारतातील कित्येक-बहुतांशी सर्वच-साम्यवादी हे तर जन्माने हिंदूच होते! हिंदुत्त्व ही तर जीवनपद्धती आहे असे त्याच धर्मातील तत्ववेत्ते सांगतात. तर मग उदारमतवादी, सहिष्णू पुरोगामित्त्वाला हिंदू म्हणण्यास काहीच हरकत नाही. जे सनातन, नित्यनूतन असते त्याचे सहर्ष उत्फुल्ल स्वागत करणारी समावेशक भारतीय जीवनपद्धती म्हणजेच हिंदुत्व आहे. पानसरे किंवा अगदी थेट कै.श्रीपाद अमृत डांगे किंवा फॉर्वर्ड ब्लॉकचे नेताजी सुभाष यांना त्या अभिमानास्पद परंपरेतून बाजूला काढण्यात कसले पुरोगामित्व; आणि कसली वैचारिकता!!
भारतवर्षात प्राचीन काळापासून अनेक राज्ये अस्तित्वात होती. त्याकाळी त्यांस देश म्हणत. केंद्रीय एकमेव सत्ता नसली तरी त्या त्या राज्यांचे संबंध परस्पर संमत अशा `राज्यधर्मा'वर आधारित होेते. तेच संविधान किंवा राजकीय परंपरा आजच्या काळात चालणार नाहीत. ज्या काळात लोकसंख्या अल्प होती, युद्धे-आपत्ती अटळ होत्या, त्यावेळी अष्टपुत्रा मातेला मोठे स्थान होते. आजच्या काळात चार अपत्यांचा पुरस्कार करणाऱ्या महाराजांनी, त्या पुरातन काळाचे साक्षी कशाला म्हणवावे? या वेडगळपणास कुणी हिंदुत्त्ववादी म्हणत म्हणवत असतील तर ते खऱ्या जीवननिष्ठ पुरोगामी हिंदू प्रणालीचा अधिक्षेप करीत आहेत. जसे कोणाही अतिरेक्याला मुस्लिम म्हटल्याने अन्याय होतो; त्याचप्रमाणे पानसरेंच्या संशयित हल्लेखोरास हिंदुत्त्ववादी म्हणणे हे निस्संशय द्वेषपूरक आहे. राजकारण जर धर्मातीत हवे असेल तर राजकीय स्पर्धेतून येणाऱ्या आरोपांना त्या तथाकथित समाजवाद्यांनी किंवा पुरोगाम्यांनी हिंदुत्त्व जोडण्याचे कारणच नाही.
श्री.मोदी सत्तेवर आले, त्यांना अमदाबाद दंगलीवरून दहा-बारा वर्षे मुस्लिमशत्रू ठरविण्याचे उद्योग झाले. ते मोदी आता मुस्लिम वा िख्र्चाश्नांस सामावून घेण्याची भाषा सर्वोच्च पदावरून करत आहेत. त्यात राजकारणही असेल, पण तेही गैर कसे? राजकारण असले तरी समाजवादी विचारातील हिंदुत्त्व तरी नाही? मग त्या विधानांचे तरी स्वागत करावे ना! पण ते करायला खरे खुले पुरोगामित्व लागते, ते कुठून आणायचे?
खऱ्या धर्मातील तत्वे आणि मूल्ये चिरंतन, परंतु आचार व कर्मकाण्डे स्थलकालस्थिती सापेक्ष असतात. ती बदलतच असतात. जुन जाऊन नवीन येणे, यात धर्मही असतो आणि पुरोगामित्वही असते. सावरकर धोतर-टोपी घालत म्हणून प्रतिगामी; आणि आजचा कोणी बूटपाटलोण घालतो म्हणून पुरोगामी इतके सहज ते ठरत नसते. उलट गतिमान समाजात तो फरक वरवरचा दिसतो, तसा तो मान्य करीत जावे; आणि मूळच्या धर्ममूल्यांशी आपल्या वर्तनाचा मेळ घालावा हेच धर्माचरण असते. महाभारत म्हणते की -
भवत्यधर्मो धर्मोहि धर्मो%धर्मो भवत्युत
कारणद्देशकालस्य देश: कालस्तु तदृश: ।
ज्या आचाराला पूर्वी धर्म्य मानले, तो पुढच्या कालात अगर भिन्न प्रदेशात अधर्म मानला जातो; व जो आचार अधर्म्य, तो धर्म्य मानला जातो. तेव्हा गतिमान समाजात फरक अपरिहार्य आहे.
हा फरक लक्षात घेऊन धर्माच्या बाबतीत पुरोगामित्त्व ठरवावे. राजकीय विचारांची राजकारणे धर्माला जोडण्याचे कारण नाही. पानसरे यांच्या हल्लेकऱ्यांचा शोध लागत नाही म्हणून काँग्रेसच्या राधाकृष्ण विखेपाटलांनी देवेंद्र सरकारला दूषणे दिली, पण सव्वा वर्षांपूर्वीचे दाभोलकरांचे मारेकरी त्यांच्याही सरकारला सापडले नाहीत, हे त्यांच्या लक्षात येत नसले तरी लोकांच्या येते! दाभोलकर गेल्यास एकदोन दिवस उलटताच त्यांच्या पृथ्वीराजकारण्यांनी काही संघटनांवर किरण धरण्याचा `न्याय' केला होता, त्यास कोण पुरोगामित्व म्हणणार?
हिंदू धर्माचे हित ज्यांना अपेक्षित असेल त्यांनीही त्या श्रेष्ठ धर्माच्या नावाखाली नस्ता वावदूकपणा करता कामा नये. त्यांची उचापतखोर विधाने व कृतींनी हिंदुधर्महित साधत नाही, पण अनेक हिंदूधार्मिक दुखावतात. दुही माजते, ती आपल्या देशाला महागात पडते. त्यांचे धर्मविचार चूक की बरोबर हे नंतर पाहा, पण आज त्यांतून जे सामाजिक तणाव वाढतात, ते परवडत नाहीत. धर्माभिमानी जर मनुस्मृती मानत असतील तर त्यांच्यासाठी मनूचे सांगणेे आहे की - धर्माला विरुद्ध असे अर्थोत्पादन आणि वासना सोडून दिल्या पाहिजेत. ज्या आचारामुळे समाजाचे सुख व सुस्थिती साधली जात नाहीत; व ज्या आचारासंबंधी लोकांची फारच हाकाटी व तिटकारा आहे तो आचार, - धर्म्य मानला गेला असला तरी - सोडून दिला पाहिजे.
परित्यजेदर्थकामौ यौ स्यातां धर्मवर्जितौ
धर्म्यंचाप्यसुखोदर्कं लोक विक्रुष्टमेवच ।
मनुस्मृति अ.४/१७६
सारा समाज दुहीग्रस्त होणे भयसूचक आहे. गोविंदराव पानसरे हे विचारवंत म्हणून समाजधुरीण होते. त्यांच्यावर शारीरिक घात हल्ला होण्याने भयाचे प्रदर्शन घडले. ते कृत्य अधार्मिक आहे. त्या कृत्यास किंवा ते करणाऱ्यांस जे कोणी हिंदुत्त्व जोडू पाहात असतील ते प्रतिगामी विद्वेषी ठरतात. त्यांना हिंदुत्त्व किंवा सद्धर्म कळणे दुरापास्त वाटते, ते समाजवादी नव्हेत, साम्यवादी नव्हेत, पुरोगामी नव्हेत, विचारवंत तर नव्हेतच. त्यांना काय म्हणावे-? प्रश्नच आहे खरा!!
१२ मार्च (१९१४) हा यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस. त्यांच्या १०१व्या जयंतीच्या निमित्ताने, त्यांच्या खुल्या संवादपटुत्त्वाचा परिचय देणारी आठवण.
देशमुख आणि कं. (पुणे ३०) प्रकाशित, `माणसं माणसांसारखीच वागतात' या पुस्तकातून संक्षेप ...
यशवंतराव चव्हाण
काही कामासाठी दिल्लीला गेलो होतो. चहा घेताना सहज म्हणून टेलिफोन डिरेक्टरी चाळायची, तर नेमके पान आले `सदस्य लोकसभा' आणि समोर नाव, पत्ता व अर्थातच फोन नंबर : यशवंतराव चव्हाण. अनेक वर्षांची सुप्त इच्छा जागी झाली. बघू या प्रयत्न करून, म्हणत नंबर फिरवला.
माझे मामा म्हणजे महाराष्ट्नतला गाजलेला प्रकाशक ग.पां.परचुरे. केव्हातरी नवीन प्रकाशने यशवंतरावांना भेट द्यायला तो जात असे. एकदा त्याने मलाही सोबत नेले होते. फार तर दहा-पंधरा मिनिटे आम्ही तिथे असू. (ती आठवण दिली.)
``अरे, गजाननराव तुझे मामा? सख्खे? मग तर तू घरचाच. उतरलास कुठे? नीट सोय नसली तर बॅग उचल आणि इथे ये. मी एकटाच आहे. आज वेणूबाई कऱ्हाडला गेली आहे.''
***
मला एक प्रश्न होता. सहकारक्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कुणा व्यक्तीचा सत्कार झाला होता. दुर्दैवाने त्यांचे नाव आज स्मरणात नाही. त्या सत्कार सोहळयात यशवंतराव बहुधा अध्यक्ष होते. एक वक्ते होते प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व विचारवंत वि.म.दांडेकर. मात्र तो समारंभ गाजला होता निराळयाच कारणाने. आपल्या भाषणात वि.मं.नी सहकारी साखर क्षेत्रावर सडकून टीका केली. खूप बोचरे असे ते भाषण असावे. त्याच सभेत यशवंतरावांनी कडक भाषेत वि.मं.ना फटकारले. तो प्रसंग त्यावेळी वृत्तपत्रांतून खूप गाजला होता. त्यातल्या तात्विक भागापेक्षा व्यासपीठावरच्या `तू-तू, मैं-मैं'चा ऊहापोह जरा जास्तच झाला, संपादकीयातदेखील.
१९७७ ची आणीबाणी संपवणारी निवडणूक. जाहीर सभा, आव्हाने-प्रति आव्हाने, टोलेबाजी हे सर्व रसायन त्या गदारोळात असतेच. मात्र १९७७ ला पु.ल.देशपांडे जनता पक्षाच्या प्रचाराला हिरीरीने उतरले होते. बहुधा कोल्हापूरच्या सभेत पुलंनी यशवंतरावांना काँग्रेस सोडून जनता पक्षात येण्याचे जाहीर आवाहन केले. सातारच्या सभेत बोलताना यशवंतरावांनी `मला विदूषकाच्या सल्ल्याची गरज नाही' असा उलटा फटकारा मारला.
मला कुतूहल होते ते निराळेच. हे दोन्ही प्रसंग पूर्वी घडून गेलेले, मधे काळही लोटलेला. ``या व्यक्तींचे आपसात संबंध अशा घटनांनंतर कसे राहिले? पूर्वीसारखेच, कमी पातळीवर, का तुटले?''
यशवंतराव हसले, ``अरे, ही टोलवाटोलवी त्या क्षेत्रात चालतेच. त्याचा संबंधांवर परिणाम तसा होत नाही. आता वि.म.दांडेकर त्यांच्या क्षेत्रातला मोठा तज्ज्ञ, अभ्यासू, कळकळीने काम करणारा, काही मूल्ये-निष्ठा जपणारा. जे पटले नाही ते परखडपणे सांगणारा. मात्र त्या दिवशी प्रसंग होता एका कार्यकर्त्याच्या गुणगौरवाचा. वि.म.जे बोलले, ते बोलायचा त्यांना अधिकार होता. मत पटणे, न पटणे निराळे; मात्र तो प्रसंग, ते व्यासपीठ ही त्यासाठीची जागा नव्हती. त्यामुळे औचित्यभंग झाला, असे मला वाटले. दांडेकरांनंतर आणखी कुणी वक्ता असता तर कदाचित फरक पडला असता, पण लगेच माझेच नाव जाहीर झाले. त्या तिरमिरीत मी जास्त कडवटपणे बोललो. ते भाषण गंभीरपणे घेऊ नको. माझे व विमदांचे संबंध उत्तम राहिले आहेत. आजही भेटीगाठी, हास्यविनोद, विचारांची देवाणघेवाण.... सर्व पूर्वीप्रमाणे, काहीच फरक नाही.''
यशवंतराव थांबले, मात्र मंदपणे हसत राहिले. आणखी काही बोलतील याची मी वाट पाहात होतो; मात्र ते गप्पच. मी म्हटले, `साहेब, उत्तर पूर्ण झाले नाही. पु.ल.?'
``तिथे मात्र पूर्वीसारखे नाही राहिले. म्हणजे संबंध पूर्ण तुटले, असे नाही; पण कुठे भेट झालीच तर नमस्कार, कसं काय - यापलीकडे पु.ल.जात नाहीत.''
``साहेब, असं का झालं असावं?''
``कुणास ठाऊक? पण माझा अंदाज सांगतो. राजकारणाच्या खडाखडींचा पुलंना अनुभव नाही, नव्हता. त्यांना ७७च्या निवडणूक प्रचारात भाग घ्यावासा वाटला; तो त्यांचा हक्कच होता. विनोदाचे शस्त्र त्यांच्या हाती होते. त्याचा त्यांनी मुक्त हस्ते वापर केला. हे सर्व करण्याचा त्यांना मूलभूत अधिकार होता. काँग्रेस जर निवडणूक हरली, जनता पक्षाला सत्तेवर आणता आले; तरच आणीबाणी संपेल, नाही तर हुकूमशाहीला लोकशाही पद्धतीने `सँक्शन' मिळेल हे प्रचाराचे सूत्र होते. ते मांडताना मला तिकडे चुकीच्या पक्षात आहात, इकडे या - असे जाहीर आवाहन माझे नाव घेऊन करण्याचे काही कारण नव्हते. ठीक आहे, केले. मारला एक टोला; मग एक टोला पचवायची तयारीही हवी. ती मानसिकता त्यांची नाही. त्यांनी ते मनात वागवले असे मला वाटते. असो.''
``पण साहेब, ते उत्तम नट, नाटककार, विनोदसम्राट, व्यासंगी तर आहेतच. विडंबन हातखंडा, मराठीच्या बोलीभाषांवर पकड, मूल्यांवर श्रद्धा ही यादी मोठी. मग झाले - गेले, जो रात गई वो बात गई - असे का झाले नाही?''
``मला वाटते, त्यांना स्वत:वर झालेली टीका ऐकायची-वाचायची सवय नाही. कारण त्यांच्या लिखाणावर फार खोलात जाऊन समीक्षा झालीच नाही.''
- विश्वास दांडेकर,
`मालवती' कांगा कॉलनी, सातारा
फोन (०२१६२) २३५२५४
ज्येष्ठ नागरिकांसाठी लेखन स्पर्धा
`माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग', `माझ्या जीवनातील टर्निंग पॉइंर्ट', `अभी तो मैं जवान हूँ (पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा!) यापैकी कोणत्याही विषयावरील लेख स्पर्धेसाठी पाठवायचा आहे. त्यासोबत व्यक्तिगत माहिती, फोटो (ऐच्छिक) व प्रवेश शुल्क रु.५०/- पाठवावे. लेखाची शब्दमर्यादा १०००. एकाहून जास्त प्रवेशिकाही स्वतंत्र ड्नफ्टसह पाठवता येतील. भाषा, आशय व शैली या निकषांवर निर्णय होईल व तो अंतिम असेल. तीन क्रमांकांना अनुक्रमे रु.२०००, १५०० व १००० आणि रु.५०० चे उत्तेजनार्थ दोन पुरस्कार व सन्मानपत्र समारंभपूर्वक देण्यात येतील. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग कृतज्ञता पत्र दिले जाईल. काही चांगले लेख पुस्तकरूपात प्रसिद्ध करण्याचाही विचार आहे. (त्याविषयी नंतर कळविण्यात येईल.)
ड्नफ्ट व लेखासह प्रवेशिका ९ एप्रिलपर्यंत पोचणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पत्रव्यवहार शक्य होणार नाही. उत्साही स्त्री पुरुषांनी सहभाग घ्यावा.
संपर्क : श्री. अरुण गोडबोले, कौशिक प्रकाशन, ६९, शनिवार पेठ, सातारा ४१५००२
फोन : ९८५०९ ४३०४१ (सकाळी ११ ते सायं.६)
`कन्यादान': चर्चा व्हावी
परंपरेप्रमाणे आपल्याकडे विवाह-सोहळयामध्ये `कन्यादान' या नावाचा विधी होत असतो. `कन्यादान' या शब्दाबद्दल माझा आक्षेप आहे.
दान सामान्यपणे निर्जीव वस्तूचे किंवा पशूंचे होत असते, माणसाचे होत नसते. कन्या निर्जीव वस्तू नाही, पशू नाही. कन्यादान या शब्दात पुुरुषी वर्चस्व, लिंगभेद, अहंकार हे भाव दिसतात.
स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये एकच आत्मत्त्व आहे. तस्मात् दोहोमध्ये समत्व असायला-पाळायला हवे. `कन्यादान' हा शब्द सत्य तत्त्वाला छेद देणारा आहे. कन्यादान हा उच्च कोटीचा विधी असेल तर त्यावेळी पुत्रदान हाही विधी व्हावा. `कन्यादान' या शब्दापेक्षा `स्नेहबंध' या नावाचा उभयपक्षी लागू होणारा विधी रूढ करावा.
व्यक्तीच्या बाबतीत आत्मबलिदान, देहदान हे शब्द अवश्य रूढ होऊ द्यावेत. त्या संज्ञांमध्ये `देह जड आहे' असा पूर्णत: आध्यात्मिक भाव आहे; त्यागाचा उदात्त भाव आहे. चर्चा व्हावी.
- म. वि. कोल्हटकर, सातारा फोन : (०२१६२)२३२५०४
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको
मोबाईलवर स्वत:चा फोटो काढून स्मार्टफोनवर ठेवण्याची अजब कला सध्या सोशल मीडियावर बोकाळली आहे. इस्ट्नग्राम या साईटने गेल्या वर्षी शेवटच्या सहा महिन्यातच ८.८०लाख सेल्फी ठेवल्या होत्या. त्यांचा अभ्यास आणि विश्लेषण 'डळाश्रिळषळशव ३६०' या संस्थेने केला. त्यातून हे अजब फॅड उघड झाले. एखाद्या समारंभात अनेक मंडळी व्यासपीठावर असतात. आपल्यासमवेत एखाद्या सेलिबे्रेटीचा फोटो असावा असा हपापा असतो. त्या इच्छेपोटी हा प्रकार चालला आहे. `आजच्या जीवनशैलीत आपल्या शेजारी कोण राहते हेही ठाऊक नसते' असे कौतुकाचे बोल ऐकायला मिळतात. परंतु आपली छबी समाजमाध्यमांवर झळकावी आणि त्याचे दर्शन साऱ्या जगाला व्हावे ही हौस फार वाढली आहे. संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपच्या काही तरुण महिला खासदारांनी लोकसभेच्या सभागृहातच फोटोसेशन करून मोबाईलवर सेल्फी काढल्याचे वृत्त नुकतेच वाचनात आले. आता कोणाला काय बोलणार?
कधी कधी या हौसेचे स्वरूप विकृत दिसते. एका अभिनेत्रीने आपला चेहरा इतका लाल रंगवला की तो रर्क्तेंंबाळ वाटला. तिने स्वत:च्या त्या फोटोला `फेशियल' असे नाव दिले. गाडी चालविण्याची पोझ प्रसिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे अश्लिल हिंसक चित्रेही सुरू झाली आहेत. काहींनी तर स्वत:च्या आत्महत्त्या चित्रित करून पाठविल्या आहेत. मथुरा रेल्वे स्टेशनजवळ रुळावरती पाठीमागून धावणाऱ्या रेल्वेसमोर स्वत:चा फोटो काढण्याच्या नादात तिघांचा मृत्यू झाला अशी बातमी आली आहे.
डोक्यावर हात ठेवला की भस्म होते हे भस्मासुराला समजल्यावर, नाचता नाचता त्याने स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवून नाश केला ही विष्णुपुराणात मोहिनी नृत्याची कथा आहे. ही नवी नवी फॅडे जोपासणाऱ्यांना ही कथा लागू पडते. आपली पुराणे पुराणकथा वाटतात, पण अशा प्रकारच्या प्रवृत्तींची ती रूपके असावीत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक त्याच दिशेला नेतो.
- विवेक ढापरे, कऱ्हाड (फोन : ७५८८२२११४४ / ९४०५५३८२८५)
`आपले जग'चा त्रितपपूर्ती समारंभ
तीन तप:पूर्तीच्या निमित्ताने प्रकाशित केलेला अंक सर्वत्र मिळाला असेलच. त्याबद्दलचा अभिप्राय जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अनेक वाचक व हितचिंतकांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले, त्याचबरोबर बहुतकांनी त्रितपपूर्तीचा समारंभ कुठे-कधी-कसा झाला याचा वृत्तांत विचारला आहे -
या महत्त्वपूर्ण आणि जिव्हाळयाच्या निमित्ताने अत्यंत घरगुती असा कार्यक्रम आयोजित केला होता. `आपले जग'शी निकट संबंधी, किंवा पूर्वी कधी या अंकासाठी काम केलेल्या पत्रकार-मित्रांची स्नेहभेट योजिली होती. त्यात जिल्हा माहिती अधिकारी एस.आर.माने, दै.`पुढारी'च्या सांगली आवृत्तीचे संपादक चिंतामणी सहस्रबुद्धे, `तरुण भारत'चे सांगली आवृत्तीचे संपादक मंगेश मंत्री, `सकाळ'च्या सांगली आवृत्तीचे संपादक अशोक घोरपडे, `केसरी'च्या सांगली आवृत्तीचे संपादक मनोहर पेशवे आणि माधवी पेशवे, तसेच उदय वेलणकर, विवेक ढापरे, विनिता तेलंग, मोहन आळतेकर इत्यादि पारिवारिक-स्नेहीजन सहभागी होते. `पुढारी'चे विजय गुरव, चित्रकार सुरेश पंडित हे ऐनवेळी येऊ शकले नाहीत. सकाळी ९वा. `आपले जग'च्या प्रकाशनस्थळी (`वाल्मिकी'च्या अंगणात) गप्पा आणि न्याहरीने प्रारंभ झाला.
तिथून विटे येथे जयंतराव बर्वे यांच्या शेतावर भेट दिली. सेंद्रिय शेतीचे प्रयोग, अग्निहोत्राचा पिकांवर परिणाम, बायोगॅस, गोपालन, ठिबकसिंचन, बायोमास इत्यादी प्रयोगांची पाहणी व चर्चा घडली. नेचरकेअर फेर्टलायझर या सेंद्रिय खत कारखान्यास भेट, निर्यातक्षम उत्पादनांची माहिती व वार्षिक १० हजार टन उत्पादन करणारा प्रकल्प आणि शेतकऱ्यांना रासायनिककडून सेंद्रिय कडे वळण्याने होणारे फायदे पटवून देणारे प्रशिक्षण प्रयोग अशीही पाहणी झाली. जयदेव बर्वे आणि डॉ.सांडू (सुप्रसिद्ध सांडू ब्रदर्स मुलंुंडचे) यांनी शेतजमीन व फळबागांसाठी देशी उपचार व पोषण देणाऱ्या अनेक पद्धतींची माहिती दिली. `नेचर केअर'चा आणखी एक कारखाना लातूर येथे सुरू झाला असून आफ्रिका व युरोपीय देशांतून चांगली मागणी येत असल्याचे सांगण्यात आले.
`आपले जग'चे प्रारंभकाळातील लेखक (विटे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी) कै.बलवंत प्रभावळकर यांचे नातू अमृत कुलकर्णी व पूर्वी `सकाळ'च्या सांगली कार्यालयात काम करणारे श्री.बिदनूर हे आता त्या सेंद्रिय उत्पादन प्रकल्पात असतात. त्यांनी या जुन्या सहकारी `मित्रमंडळा'चे अगत्य करून माहिती दिली. श्री.जयदेव यांनी आपल्याकडील सेंद्रीय उसाचा रस सर्वांना दिला.
पुढचा टप्पा बलवडीच्या क्रांतिस्मृतिवनात होता. काही ना काही नात्याने भाई संपतराव पवार निर्मित, या अनोख्या प्रेरणास्थळाशी ही सर्व पत्रकार मंडळी परिचित होती, पण अलीकडच्या काळात या प्रकल्पाने घेतलेले सुरम्य रूप सर्वांना अनोखे होते. त्यामुळे इथली भेट, पाहणी, भावी योजना, (आणि समस्याही) पत्रकार नजरेत येणे विशेष जिव्हाळयाचे होते. या ठिकाणी संपतराव पवार यांनी साऱ्यांचे स्वागत केले, व हुतात्म्यांच्या नावाने केलेले वृक्षसंगोपन प्रत्यक्ष दाखविले. जिल्हा माहिती अधिकारी श्री.माने यांना राज्यशासनाचा उत्कृष्ठ वार्तांकनाचा मोठा पुरस्कार नुकताच मिळाला, त्याबद्दल त्यांचा सत्कार जयंतराव बर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. `आपले जग'च्या विशेषांकाचे प्रकाशन भाई संपतराव पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर `आपले जग' परिवारातील विनायक साठे, संदीप देशमाने, मनीषा, आनंद, पद्मा, सईदा यांनी आयोजित केलेल्या बासुंदीचा आस्वाद या स्थळी वनभोजनात सर्वांनी घेतला.
या अनोख्या, वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासदौऱ्यातून साऱ्या परिवाराचा हृद्य मेळा जमविणारी ही सर्वांची स्नेहभेट `आपले जग'च्या त्रितपांच्या पुण्याईला साजेशी ठरली.
श्रद्धांजली
तासगावच्या मार्केट यार्डातील कार्यालयात चाहूूल घेतली, आणि तासगावपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावरच्या `अंजनी' या गावाकडे जीप दामटली. पावसाच्या आधीचा आठवडा. माळराने उदास होती. पिकांचे मोड क्षीण झाले होते. आमदारांच्या अंजनीतील घराला कुलूप पाहून गाडी पुन्हा माघारी वळवली. तरीही त्यातून त्यांच्या गावच्या दु:खाची आणि परिस्थितीची पुष्कळशी कल्पना आली होती.
तासगावच्या बाजार समितीचे कार्यालय हा आमदारांचा तिठ्ठा. चुकला फकीर दुसऱ्या हेलपाट्याला याच मशिदीत भेटला. आतल्याच्या आतल्या खोलीत आम्ही जाऊन बसलो.
आमदार आर.आर.पाटील हे विधानसभेतले एक बोलके, अभ्यासू सभासद. साडेतीन वर्षांच्या आमदारकीत किती आणि कोणती भाषणे केली याचा तपशीलवार आढावा मतदारांपुढे ठेवण्याची कल्पना त्यांनी सांगितली. या आमदाराला सारेजण `आबा' म्हणतात. आबा म्हणण्यासारखे त्यांचे व्यक्तिमत्त्व नाही. पोक्त वय, छपरी मिशा, भारदस्त शरीर यातलं काहीही नाही.
``प्रसिद्धी आणि प्रचार याचंही एक तंत्र असतं. त्यासाठी हाताशी मोठी बँक, कारखाना असं असावं लागतं''- हे त्यांनी थेटच सांगून टाकलं. ``ते नसल्यामुळं केलेलं काम आणि त्या मागची भूमिका लोकांपर्यंत पोचविण्यात आपण कमी पडतो.'' असे ते म्हणाले. त्या संबंधीच्या राजकीय वर्तुळातल्या गंमती त्यांनी सांगितल्या.
त्या आतल्या खोलीपर्यंतही येऊन लोक त्यांना वेढत होते.
- आज गावात येणाऱ्या मंत्र्याचं स्वागत करताना कुणी कुणीकडून जायचं.
- आमच्या गावाला ग्रामसेवक नाही, कधी मिळणार?
- मी अपंग स्वातंत्र्यसैनिक. सवलतीच्या मागं नाही, पण माझ्या कामाचं काय?
- अधिवेशनाला मुंबईला कधी जाताय? रेल्वे सांगलीत पकडायची की मिरजेत?
या साऱ्या कामांशी चौफेर भिडत आमदार आर आर शांतपणाने बोलत होते. आमची बैठक थोड्या वेळाने संपून ते मागच्या लवाजम्यासह पुढच्या कार्यक्रमासाठी हलले. जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात त्यांची चार-दोनदा गाठ घेतली, तेव्हा कित्येक गप्पात ते खुलायचे.
तासगावच्या माळावर त्यांच्याच आधिपत्त्याखाली रामानंद सूत गिरणी आहे. तिथे एकदा त्यांची वाट पाहात होतो. एव्हाना आर आर आबा मंत्री झालेले होते. त्यामुळे `घरून निघालेत', `गावात थांबलेत', `आत्ताच वायरलेस आलाय'.... अशा हुलकावण्या ऐकत तासभर गेला. एकदाचे आले! धावपळीत सगळेजण आतल्या बैठकीत पळाले. मी बाहेरच रेंगाळलो. तसे आणखी सात-आठजण. एका करकरीत गाडीशी नारळ वाढविण्याची तयारी होती. त्यांच्या निकटच्या एका `कार्यकर्त्या'ने आपण घेतलेली गाडी त्याच्या आबाला दाखवायला आणली होती. आबांना नारळ फोडायची `रिप्ेष्ट' करत तो पुढं येताच, `अरे, ही आणली का गाडी...?' म्हणत आबा आधी तिकडे वळले. गाडीचं दार उघडून त्यांनी `डायवरशीट' पकडली. नीट पाहिलं, चौकशी केली. मग खाली उतरून नारळ वाढवला. त्या गाडीवाल्याचा आनंद चेहरा भरून सांडत होता.
चालत चालतच माझ्या हातचे कागद त्यांनी पाहिले. एका बाजूने बोलत-ऐकत प्रकरण ताब्यात घेतले. `पाहतो' म्हणत ते आतल्या गर्दीत घुसले. मी अल्लाद बाहेर सटकलो. बढती मिळत गेली तरी ही जवळीक त्यांनी सांभाळली हे मला विशेष वाटते. आबा माणसातला माणूस होता,.... गेला!!
- वसंत आपटे, कि.वाडी
It is alleged that the Pansare's murder is the result of personal animosity between local land mafia. No organisation is ( Hindu ) is involved. Similar situation is applicable to Dr. Dabholkar murder case.
ReplyDelete