नवतेचा सांधा प्राचीनाशी जुळूदे ! अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांचा, पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये सत्कार करण्यात आला. भारतीय प्राचीन संस्कृतीत, विविधता असली तरीही तिच्यातील समन्वय आणि सर्वसमावेशकता, संशोधनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न ज्येष्ठ संशोधक, अभ्यासकांनी नेहमीच केलेला आहे. हाच धागा पकडून, प्राचीन मौलिक साहित्याचा नवतेशी सांधा जुळण्यासाठी, अभ्यासकांची सर्वसमावेशक भूमिकाच आधुनिक काळात महत्वाची ठरणार असल्याचे मत अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. या भूमिकेची गरज लक्षात घेऊन त्यांच्या प्रतिपादनाचा हा संपादित अंश - महासमन्वय हे सर्वच विद्वत्जनांचे सूत्र असते. प्राचीन संचित लाभलेल्या आपल्या भूमीत अनेक विचारधारा, प्रवाह निर्माण झाले. विद्रोह झाला, चळवळी झाल्या, आक्रोश झाले. या सगळयांना समजून, सामावून घेत संस्कृतीचा प्रवाह पुढे जात राहतो. ही संस्कृती कल्याणकारी करणे, मानवकेंद्री करणे, आणि मानवतेला पोषक अशी मूल्ये अधोरेखित करीत जाणे; त्यांतून संस्कृतीचा विकास घडवणे हे काम आपल्या विचारवंतांनी, ज्ञानवंतांनी आणि संशोधक अभ्यास