Skip to main content

3-4-2017

घटप्रभेचा अमृतघट 
-महादेवशास्त्री जोशी
बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा(नदीकाठी) गावात कर्नाटक आरोग्यधाम (हेल्थ इन्स्टिट्यूट) हे विस्तृत रुग्णालय आणि विविधांगी संस्थासंस्कृतीचे केंद्र आहे. त्याचे संस्थापक माधव कृष्ण वैद्य हे शल्यविशारद. त्यांची जन्मशताब्दी दि.०२ एप्रिल २०१७ पासून सुरू होत आहे. त्या व्यक्तिमत्वाबद्दल गौरव लेख, वैद्य डॉक्टरांच्या ५०व्या वाढदिवसाला प्रकाशित झाला होता; तो येथे शताब्दीनिमित्तानेे पुनर्मुद्रित.
निवासी शिकाऊ डॉक्टरांचा संप नुकताच घडून आला. त्यादरम्यान रुग्णसेवा-वैद्यक व्यवसाय-कायदा-शासकीय मर्यादा-रुग्णांचा रोष-आणि त्या सर्वांतून खदखदणारी सामाजिक अस्वस्थता इत्यादींसंबंधी चर्चा व प्रतिक्रिया व्यक्त होत राहिल्या. त्या पृष्ठभूमीवरती या अमृतपुत्राचे सेवाभावी दीनबंधुत्व वेगळे उठून दिसेल; आणि या धन्वंतरीचे स्मरण करून उचित बोध घेतल्यास त्या क्षेत्राला वेगळी दिशा मिळू शकेल.
कर्नाटक आरोग्यधामाचे शिल्पकार माधव कृष्ण वैद्य यांनी आपले आयुष्य रुग्णसेवेस समर्पण केले. माधवराव वैद्य यांनी ५  दशके अविरत रुग्णसेवा केली. रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असे ते मानीत. आपल्या कामावर अपार भक्ती व निष्ठा असणारे ते कर्मयोगी. संस्कृत भाष्यकार व भारतीय संस्कृती कोषाचे लेखक महादेवशास्त्री त्यांच्याविषयी लिहितात-
घटप्रभा हे मिरज-बेळगाव लोहमार्गावरचं एक लहानसं स्टेशन, त्याला लागून छोटंसंच गाव. तिथे मोठी बाजारपेठ नाही, कोर्टकचेऱ्या नाहीत किंवा एखादं प्रेक्षणीय स्थळ नाही. पण तेच गाव आजमितीस बेळगाव जिल्ह्यातल्या शतसहस्त्र रुग्णांना तीर्थरूप ठरलं आहे. शरीराचे आणि त्याबरोबरच मनाचेही दोष झाडून टाकणारं आरोग्यतीर्थ! `कर्नाटक आरोग्यधाम' हे त्या तीर्थाचं नाव. दगडाला देवपण, जळाला तीर्थत्व आणि स्थळाला क्षेत्रत्व प्राप्त होतं, ते तिथं वास्तव्य करणाऱ्या श्रेष्ठांच्या आणि सत्पुरुषांच्या सान्निध्यात! `यदध्यासित मर्हद्भि: तद्धि तीर्थं प्रचक्ष्यते ।' या कालिदास-वचनात हाच आशय स्पष्ट झालेला आहे. कर्नाटक आरोग्यधामातली श्रेष्ठ सच्चरित, महनीय आणि विद्यानिष्णात अशी मूर्ती म्हणजे माधव कृष्ण वैद्य(एम.एस)ही होय. ही मूर्ती त्या क्षेत्रात शरीरानं आणि मनानं वावरत आहे. तिथल्या अणुरेणूत माधवरावांचे नि:श्वास मिसळत आहेत. तिथल्या प्रत्येक वस्तूवर आणि वास्तूवर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटला आहे. त्या परिसरात अनेक उपांगसंस्था आणि औद्योगिक क्रिया त्यांच्या प्रेरणेने, मार्गदर्शनानं आणि निरीक्षणाच्या नेत्रस्पर्शानं अनुप्राणित झाल्या आहेत. या प्रदीर्घ कालात तिथे आलेल्या अनेक रुग्णांच्या आणि त्यांच्या आप्तेष्टांच्या जीवनात त्यांनी आनंदाचे मळे फुलवले आहेत. रडत, विव्हळत तिथे आलेल्यांना त्यांनी हसत खेळत परत पाठविलं आहे.
आजूबाजूची आणि दूरदूरचीही रुग्ण माणसं तिथे येतात, ती वैद्यांचा अमृतहस्त आपल्या शरीरावरून फिरावा म्हणून. आपल्या देहाला चाकू लागणारच असेल, तर तो माधवरावांच्या हातून लागावा म्हणून! रोगनिदान त्यांच्याकडूनच व्हावं आणि त्यांच्याकडूनच उपचार व्हावा, म्हणून! अथांग श्रद्धा त्यांच्याविषयी आजूबाजूच्या लोकांत दृढमूल होऊन बसली आहे. मीही त्यातलाच! पुण्यकर्मासाठी गंगा आणि आरोग्यासाठी घटप्रभा, हे सूत्र माझ्या मनात ठासून राहिलं आहे. माधवराव यांच्याविषयी माझे आणि इतर अनेकांचे अनुभव माझ्या स्मृतिमंजुषेत आहेत.
तपासण्याच्या खोलीत जाऊन तिथल्या कॉटवर बसावं आणि थोडक्याच वेळात माधवरावांची गंभीर पण प्रसन्न मूर्ती आत यावी. लांब पांढरी विजार, तोकड्या बाह्यांचा शुभ्र लांब चोगा, गळयात स्टेथॉस्कोपची माळ, एखाद्या प्रेषितासारखी करुणाघन दृष्टी, भाग्यवंताच्या वाट्याला येणारं रुंद कपाळ, डोक्यावरचे विरळ केस, वरचा ओठ खालच्यापेक्षा किंचित जाड, चेहरा रुंद पण थपटका नव्हे आणि उंची सुमारे पावणे सहा फूट- अशा त्या मूर्तीचे दर्शन होताच आपल्यापुढे जणू करुणानिधीच उभा आहे, असं वाटू लागतं. त्यापाठोपाठ हळूवार आणि संजीवक असा पहिला प्रश्न `काय होतंय?' हाच प्रश्न माणूस बघून मराठीत, कानडीत, इंग्रजीत, हिंदीत किंवा कोकणीत विचारला जातो आणि मग त्यांच्यासमोरचा तो माणूस नकळत बोलका होतो, आपल्या व्यथा-वेदना एखाद्या देवाला निवेदाव्या, तशा सांगू लागतो. माधवराव त्याला अडवीत नाहीत. त्याचं सगळं ऐकून घेतात. त्याला मन मोकळं करायला लावतात. मधूनमधून सूचक प्रश्न विचारतात. तो वेडंवाकडं कसंही बोलला तरी त्याच्यावर रागावत नाहीत, खेकसत नाहीत, कपाळाला आठ्या घालीत नाहीत. काही मिनिटांतच ते त्याला पूर्णपणे विश्वासात घेतात. तपासून त्याचं निदान करतात. घरीच औषध घेण्याजोगं असल्यास औषध लिहून देऊन त्याची रवानगी करतात आणि त्यावर शस्त्रक्रिया करायची असल्यास त्याला आरोग्य धामात प्रविष्ट करून घेतात.
माधवराव हे वैद्यकशास्त्रात सव्यसाची आहेत. कसल्याही कठीण शस्त्रक्रियेत त्यांचा हात जसा कुशलतेने चालतो, तशीच त्यांची बुद्धीही रोगनिदान करण्यात आणि त्यावर नेमका उपचार शोधण्यात चालते. बुद्धीची सूक्ष्मता आणि कृतीची कुशलता हे त्यांचं व्यवसायातलं वैशिष्ट्य. त्यांच्या वाणीत विलक्षण जादू आहे; ती भरमसाट नसते अथवा अतिशयोक्त नसते; मोजकीच पण समाजावणीची असते. शस्त्रक्रियेला टाळणारे, खळखळ करणारे त्या कल्पनेनंच रडणारे रोगी, माधवराव पाच मिनिटं त्यांच्याशी बोलले की विश्वासानं त्या दिव्याला सामोरे होतात, हे मी अनेकवेळा प्रत्यक्ष पाहिलं आहे. लहान मुलं अशा वेळी किती आडदांडपणा करीत असतात. तंगड्या झाडणाऱ्या आणि रडणाऱ्या मुलांना जेव्हा मोठी माणसं बळजबरीनं ऑपरेशनच्या टेबलावर चढवू लागतात, तेव्हा हा वाणीचा जादूगार त्यांना सांगतो, `तुम्ही बाजूला व्हा'. आणि मग हातमोजे चढवताना ते त्या मुलाशी बोलू लागतात, वेगवेगळया प्रकारे बोलावं लागतं. ती विद्या त्यांनी साध्य केली आहे. पेपरमिंटची गोळी देऊन एखाद्या मुलाकडून काम करून घ्यावं, त्याप्रमाणे मग ते दृश्य दिसतं. ते हट्टी मूल स्वत:च्या पायांनी ऑपरेशन टेबलावर चढतं आणि स्वस्थ आडवं होतं.
माधवराव ही एक अलौकिक व्यक्ती आहे. ते सागराच्या खोलीचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या मनाचा थांग आणि विचारांची झेप सहसा कुणाच्या लक्षात यायची नाही. सहवासानं हळूहळू उलगडत जाणारं ते एक कोडं आहे. महिनोन् महिने मी घटप्रभेच्या वातावरणात वावरलो आहे; पण माधवराव कोणावर रागावलेले मी पाहिलेले नाही. त्यांचा चढा आवाज मी कधीही ऐकलेला नाही. भांडणाऱ्या, आदळआपट करणाऱ्या माणसाला ते एक रोगीच समजतात. रागासारखंच प्रेमही अदृश्य. अंतरात त्याचे पाझर आहेत; पण त्यांचा पघळपणा कधीही आढळायचा नाही. या कलियुगात अत्यंत दुर्लभ अशी एक गोष्ट मी त्यांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, माधवराव कधीही खोटं बोलत नाहीत.
सकाळी झुंजूमंुजू झाल्यापासून तो प्रहर रात्रीपर्यंत त्या रुग्णालयाच्या आवारात माधवरावांचं अविच्छिन्न काम चालतं; पण त्याचा गाजावाजा कधीच नसतो. डोहाला कधी खळखळाट असतो का? तसंच त्यांच्या कामाचं! शरीराचे चोचले नाहीत. श्रमांची पर्वा नाही. पैशांची हाव नाही आणि सुख, चैन, `सोशल लाइफ' यापैकी कसलीच आकांक्षा नाही. वैद्यकीय व्यवसाय हा त्यांचा धंदा नसून धर्म आहे. परदेशच्या प्रवासात कुणीतरी त्यांचा धर्म विचारला. अपेक्षित होतं, हिंदू, मुस्लिम, िख्र्तासी अशा प्रकारचं उत्तर; पण माधवराव म्हणाले, ``माझा धर्म सर्जरी!'' पृच्छक विस्फारित नेत्रांनी त्यांच्याकडे पाहू लागला. त्यावर ते म्हणाले, ``होय. तोच एक धर्म मी शास्त्रशुद्ध आचरतो आणि आचरू शकतो. माधवराव म्हणजे जनरल सर्जन. `स्पेशलायझेशन' ही कल्पनाच त्यांना खुळचटपणाची वाटते. कान-नाक-घशाच्या डॉक्टरांनी रोग्याच्या पोटाला, हाता-पायांना हात लावायचा नाही, ही काय शेखी मिरविण्याची गोष्ट आहे? माधवरावांच्या मते नाही. सतत अभ्यास, अनुभव, आणि त्या त्या विषयातील निपुणांच्या हाताखाली केलेलं काम या गोष्टींनी माधवराव आता हृदयाच्या शस्त्रक्रियेपर्यंत यशस्वीपणे येऊन पोचले आहेत. बेळगावच्या एका ख्यातनाम डॉक्टरांच्या तोंडचे शब्द मी तुम्हाला सांगतो, ``सर्जन कसा असावा? तर माधवरावांच्यासारखा. अचल, अविकंपित आणि प्रज्ञावंत.''
माधवरावांची बुद्धी केवळ डॉक्टरीपुरती सीमित होऊन राहिली नाही. तिथल्या वास्तू त्यांच्या स्थापत्यविद्येतल्या बुद्धिमत्तेचे कौतुक सांगतात. तिथला विजेचा जनरेटर माधवराव जवळ आले की, आपला अडेलतट्टूपणा सोडून देतो. तिथलं कोणतंही स्थूल-सूक्ष्म यंत्र आजारी झालं की आपल्या अंगावरून माधवरावांचा हात फिरावा, अशी अपेक्षा करतं. इतर रुग्णालयांमधून सर्रास उघड वा प्रच्छन्नपणे चालणाऱ्या कित्येक वाईट अन् निंद्य गोष्टी घटप्रभेच्या वातावरणात शिरायला घाबरतात, त्या माधवरावांच्या सच्चरित आणि कणखर व्यक्तिमत्वामुळे! असा हा कर्मयोगी, धुरंधर, धन्वंतरी. व्यवसाय स्वीकारल्यापासून  आजतागायत त्यांचा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक जागृत घटिका रुग्णसेवेच्या पुण्यकृत्यासाठी खर्ची पडली आहे. माधवराव खऱ्या अर्थाने `श्रीमंत' आहेत. तो पुरुष चालताना, बोलताना, हसताना, काम करताना पाहिला, म्हणजे मनाची खात्री होते, की या पुरुषाला जीवनाचा खरा अर्थ गवसला आहे. हे जीवन पृथ्वीला भारभूत नसून आधारभूत आहे. घटप्रभेचा हा अमृतघोट कधीही आटू नये, कोरडा पडू नये.

घटप्रभा येथील आराग्ेयधामातील सद्यस्थिती-
फेब्रवारी २०१७ मधील रुग्णसंख्या
बाह्य रुग्ण-४२८३, आंतर रुग्ण-३१८१,
अतिदक्षता-१४६, शस्त्रक्रिया-१७४,
स्त्रीरोग चिकित्सा-१५८३, प्रसूती विभाग-१२२
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया-१४,
अल्ट्न सोनोग्राफी-७४१, कोकार्डियोग्राफी-४८
अस्थिरोग चिकित्सा-१४९, नेत्ररुग्ण-३४
इ.एन्.टी.ऑपरेरशन-३, दंत विभाग-६९
बालरुग्ण-११४, क्षय फुप्फुस विकार-२४
टी.बी.आंतर रुग्ण-९,पोलिओ टि्न्पल-६७
बी.सी.जी.-५८, कृत्रिम पाय व क्रॅलिपर्स-१०
योगा-२५, निसर्गोपचार-९५, सी.टी.स्क्रॅन-२३

या संस्थेच्या परिसरात अंध मुलांसाठी निवासी शाळा, परिचारक प्रशिक्षण, प्रार्थना मंदिर, संस्कृतीभवन, संस्कृत पाठशाळा, बालभवन इत्यादी विविध उपक्रम संलग्न आहेत. कर्नाटक आरोग्यधामचे पूर्वाध्यक्ष शं.वा.किर्लोस्कर, मु.शं.किर्लोस्कर होते, सध्या उगारचे प्रफुल्ल शिरगावकर अध्यक्षपदी आहेत.

नको असणारी गरज
चालू शैक्षणिक वर्षाचा अ्रखेरचा टप्पा सध्या सुरू आहे. परीक्षा  नकेा नको म्हणत वेगळया काहीतरी नावाने चालू आहेत, त्या असाव्याच लागतील. `हल्ली कुणाला नापास करायचेच नसते' असा अेक सोयिस्कर अर्थ पालक व शिक्षकांनी काढला आहे, तो निखालस चूक आहे. मुलांना केवळ टक्क्यांच्या मागे धावणारे परीक्षार्थी बनवू नये, त्यांना त्यांचे जीवन फुलविता यावे असे, चांगले आयुष्य जगण्याला अुपयोगी ठरणारे शिक्षण द्यावे हा त्यामागचा खरा हेतू होता. कुणाला नापास करायचेच नाही असे नव्हे, तर कुणी नापास होणारच नाही असे पाहायचे आहे. कोणीही बालक नवे काहीतरी शिकू पाहात असते, त्याला त्याचा कल पाहून संधी अुपलब्ध करून द्याव्यात, हे शाळांचे पालकांचे आणि समाजाचे कर्तव्य असते. वास्तविक या कार्यात सरकारची काही जबाबदारी असते, ती केवळ या कार्याच्या मागे साहाय्यकारी किंवा पूरक म्हणून अुभे राहण्याची. सरकारनेच सारे करावे, ही आपल्याकडे घातक समजूत झाली आहे. सरकारही ती करून देण्यास जबाबदार आहे.

ज्या काळात केवळ राज्याच्या शासनयंत्रणेला आवश्यक कारकुनी व गुलामी वृत्तीचे लोक हवे होते, त्या काळात आिंग्रजांनी तसे शिक्षण देणाऱ्या शाळा काढल्या. ते लक्षात आल्यानंतर या भूमीला गरजेचे आणि भावी पिढीच्या मनांत देशभावना चेतविणारे मूलभूत शिक्षण देणाऱ्या राष्ट्नीय शाळा आिथल्याच तरुणांनी काढल्या. गावोगावी स्थापन झालेल्या त्या साऱ्या शाळा आज शतकाच्या अुंबरठ्यावर आहेत. पुण्याची डेक्कन अेज्युकेशन, सांगली शिक्षण संस्था, सोलापूरची हरीभाआी देवकरण, कऱ्हाडचे टिळक हायस्कूल, राजापूर, दापोली, सावंतवाडी, कोल्हापूर, याशिवाय बडोदे, आिंदूर अशा बृहन्महाराष्ट्नतील नामवंत शाळा आता शंभरीत आहेत. त्यांनी तयार केलेली मुले किमान संस्कारांची असतात हे जितके खरे आहे; तितकेच साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेने, सांगलीच्या  `यंगमेन्स'ने जनसामान्यांना  या प्रवाहात आणण्याचे काम केले, तेही थोर सत्य आहे. या साऱ्या संस्थांना सरकारचा पाठिंबा नव्हता, असला तर अस्थानी विरोधच होता. तरीही त्यांनी सरकारशी संघर्ष करत त्यांचे कार्य चोख केले.

आज काळ असा आला आहे की, सरकारने सारे शिक्षणक्षेत्र वेठीला धरले आहे. ज्या मान्यवर संस्थांचा अेकेकाळी  आदराने अुल्लेख केला जात होता, तिथेही धंदेवाआीक वखवख भिनविण्याचे कार्य सरकारच्या नियमांनी केले आहे. आणि ज्या संस्थांवर सरकारचा फारसा अंकुश नाही अशा विनाअनुदान शाळांनी तर सारे वातावरण खडूळ केले आहे. खेडोपाडी अैश वाटणाऱ्या आिमारती आणि पिवळया गाड्यांना भुलणारी मानसिकता अुद्याच्या पिढीचे केवढे नुकसान करते आहे, याची त्यातल्या कुणालाच कल्पना येत नाही. दारू पिणारा माणूस आपण होअूनच त्या दुकानात जातो, पण दुकानदाराचा धंदा वाढू देता कामाचा  नाही; तसेच आज या शिक्षण बाजाराचे आहे. गावठी `डून स्कूल'ची लाट मुलांना मोठी अधिकारपदे देण्यास अुपयोगी पडेल ही भाबडी समजूत नाहीशी केली पाहिजे.

देश मोठा होण्यासाठी अर्थव्यवस्था मोठी आणि मजबूत असावी लागते, त्याचबरोबर संशोधनाला महत्व द्यावे लागते. या दोन्हींची जाणीव सरकारला झाली आहे, अशी चाहूल आत्ता लागत आहे. शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सूचित केले आहे की, अुत्पादन-सेवा-शेती-व्यवस्थापन अशा सगळया क्षेत्रांत देशातच नव्हे तर जगातही कुशल माणसांची गरज मोठी आहे, आणि ती वाढत जाणार आहे. पण आपल्याकडे बेरोजगारीच्या नावाने गळे काढणारे राजकारण प्रभावी ठरत असल्याने खऱ्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते. सरकारच्या यंत्रणेत प्रशासन(आयअेअेस), विदेशसेवा(आयअेफअेस), पोलीस(आयपीअेस), या अुच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या जाणत्या व्यवस्था आहेत, तशी भारतीय शिक्षणसेवा (आयआीअेस) अशी अधिकाररचना करण्याची सरकारची योजना अैकिवात आहे. तथापि `तो अेक चांगला प्रयत्न' अेवढेच त्याचे मोल ठरेल. शिक्षणातून चांगले नेते, चांगले कारखानदार, चांगले कलाकार निर्माण होणे हीच त्याची कसोटी आहे. आज शिक्षणसंस्था  धंदेवाआीक, आणि शिक्षक कामाठी बनले त्यामुळे त्या क्षेत्रात मार्केटिंगचाच प्रभाव वाढला आहे. ते धोक्याचे आहे.

गुरुकुल नावाच्या संस्थाही आजकाल त्या मार्केटमध्ये आहेत, त्यांचा पूर्वकालीन `गुरुकुला'शी सुतराम संबंध नाही. आजची गुरुकुले म्हणजे मुलांसाठी अुच्च राहणीमानाची  वसतिगृहे आहेत. तिथे मुलांना गुरेे राखणे, लाकडे गोळा करणे, नदीचे पाणी आणणे किंवा गुरुजींची वस्त्रे धुणे आणि मुख्य म्हणजे `अध्ययन' या संकल्पनेचे ज्ञानार्जन करणे अशा प्रकारचे शिक्षण कुणी मनांतही आणू शकणार नाही; त्याअैवजी  पोहण्याचा तलाव, टायबूट, रेकॉर्डडान्स यांची तिथे सोय असते. त्याला ग्रामीण भागातील पालक शब्दश: भुलतात. त्यांची हजारोच्या मापात लूट होते. त्या प्रकारच्या संस्थांतून काय शिक्षण मिळणार यांकडे सरकारचे लक्ष नाही. त्या प्रकारच्या अैश शाळा चालविणाऱ्यांना `शिक्षणमाफिया' म्हटले जाते, यातच सारे आले. अर्थात त्यालाही पिचत अपवाद आहेत.

शिक्षण या विषयावर चिरंतन संशोधन तर होत राहिलेच पाहिजे, शिवाय ते कालानुरूप राहण्यासाठी त्यात सतत बदलही करावे लागतील. परंतु ते बदल वरवरचे असतात. शाळेत जाताना खाकी चड्डी घालायची की पांढरी, किंबहुना गणवेश हवा की नको या पध्दतीतही बदल होअू शकतो, पण शिक्षण कशासाठी - या प्रश्नाच्या अुत्तरात बदल संभवतच नाही. माणूस म्हणून हा प्राणी, पशूच्या मन:स्थितीतून वरती येण्यासाठी शिक्षण द्यावे लागते. आजकाल तेही बहुतांशी मुलांना मनापासून घ्यायला नको असते. तसेच जर वयाने वाढलेल्या माणसांनाही ते द्यायला नकोच असेल, आणि ते देण्याच्या नावाखाली दुसरेच काही हेतू असतील तर मग या प्रकारचे गोंधळ माजतात. ते माजू नयेत तेवढे भान ठेवण्याची गरज सरकारकडून असते. तेवढे सोडून सरकार सर्वत्र लक्ष घालते. त्यामुळेच शिक्षण सोडून बाकीचे सारे घडते. मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांनी आपले प्रशिक्षण महत्वाचे मानण्याची खरी गरज आहे. ती गरज असूनही  त्याची सक्ती करावी  लागते, हे अजब आहे.

शिक्षणवेडे कुटुंब
महाराष्ट्न् लोकसेवा आयोगाच्या(अेमपीअेससी) वतीने घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत अमृता साबळे ही वाई (साताऱ्या)ची मुलगी मुलींत पहिली आली आहे. ती टेलिकम्युनिकेशन व आिलेक्ट्नॅनिक विषयात आिंजिनियर आहे, शिवाय अेमबीअे व अेम टेक् झाली आहे. अमृताची आआी मंगल या सध्या बावन्नाव्या वर्षी पीअेचडी चा अभ्यास करीत आहेत, तर भाअू सत्यजित हा स्पर्धा परीक्षेचीच तयारी करीत आहे. अमृताचे वडील विलास साबळे हे गट विकास अधिकारी(बीडीओ) म्हणून काम करीत होते, ते नुकतेच निवृत्त झाले. `समाजासाठी चांगले काहीतरी करण्यासाठी अधिकार राबविण्याची अुमेद असल्याचे' अमृताने सांगितले आहे. तिचे मन:पूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.

साधी सोपी बँक
बँकेतून पैसे ठेवण्याचे प्रमाण अलीकडे खूप वाढले आहे. यापुढे तर सारे व्यवहार बँकेमार्फतच व्हावेत असा सरकारचा आग्रह आहे, आणि तो योग्यही आहे. पण बँकांतील कर्मचाऱ्यांची व व्यवस्थापनाची रीत अशी असते की लोकांना बँकेत जाअूच नये असे वाटावे. त्यातल्या त्यात पोस्टाकडे सामान्य माणसांचा ओढा असतो. आता पोस्टाचीच बँक सुरू होत असल्यामुळे साधारण मनुष्यांला जरा धीर वाटेल. अर्थात पोस्टाच्या लोकांनाही आळसांतून बाहेर काढून हसायला तरी शिकवावे लागेल.
साधारण बँकेंतून किमान रक्कम शिल्लक ठेवावी लागते. शून्य रकमेची खातीसुध्दा अुघडण्याची मोहीम झाली  तो अपवाद होता. पण किमान रक्कम किती, याचे अुत्तर प्रत्येक बँक वेगळे देते. काही ठिकाणी तर ५हजार रुपये किमान शिल्लक पडून ठेवावी लागते, ती बड्यांचीच बँक असते. पण आता पोस्टाच्या बँकेत तसे होणार नाही. खात्यात केवळ ५०रुपये असले तरी पुरतील. चेकबुकची सेवा घेतली तर त्यांसाठी ५०० ठेवावे लागतील. खाते सुरू करायला केवळ २०रुपये पुरेत.
टपाल विभागाकडून देशांतल्या १.३लाख पोस्ट कार्यालयांत बँकसोय असेल. बचत खात्यांवरील रकमेस ४टक्के व्याज राहील. कोअर बँकिंग(सीबीअेस)ने सुमारे २३हजार पोस्टे जोडण्यात आली आहेत. ९६८ अेटीअेम सुरू झाली आहेत. या पेास्टबँकेकडे सामान्य लोक नक्कीच ओढले जातील. बड्या बँकांना जरा त्याचा विचारच करावा लागणार आहे. अर्थात विजय मल्ल्यासारख्यांना `त्या' बँका आवश्यक असणार आहेत.

किती पोलीस ठेवणार?
निवासी व शिकाअू डॉक्टरांचा संप मिटला. त्यांच्यावर चुकीच्या अुपचारांच्या आक्षेपांवरून होणारे हल्ले हे संपाचे कारण होते; आणि सरकारने त्यांना पुरेसे संरक्षण देण्यासाठी रक्षक पुरविण्याचे आश्वासन दिले हे संप मिटण्याचे कारण झाले. ही दोन्ही निमित्ये तशी फसवी आहेत. माणसांच्या आपल्या हक्कांबद्दलच्या जाणीवा व अपेक्षा भलत्याच वाढल्या आहेत, त्याचप्रमाणे डॉक्टरांची बाजारू वृत्तीही बळावली आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले हे तर कुणालाच मान्य होणार नाहीत, पण आज सगळयाच समाज घटकांना सुरक्षितता वाटत नाही हेही खरे आहे. कलाकारांवर, पत्रकारांवर, खेळाडूंवर, शिक्षक वा शिक्षणसंस्थांवर, देवळावर हल्ले होत आहेत. प्रश्न पुढे आला की सरकार त्या त्या घटकाला संरक्षण देण्याचे दडपून सांगते, काहीतरी कायदा करते. आजवर आितके हल्ले झाले त्यापैकी कितीजणांना कठोर शिक्षा झाली? कुणालाही नाही. सरकार असे रक्षक तरी किती आणि कुठेकुठे नेमणार आहे?
नुकतीच घटना घडली ती तर खासदाराने विमान कर्मचाऱ्याला ठोकल्याची. आता तिथे संरक्षण म्ंहणजे काय द्यायचे? ज्यांनी संरक्षणाचा कायदा करायचा, सुरक्षिततेचे अभय जनतेला द्यायचे त्या खासदारापासूनच कर्मचाऱ्यांना वाचविण्याची वेळ आली. आणि तरी तो खासदार अुद्दाम बोलतो आणि त्यांचा नेता त्याला पाठीशी घालतो, यातून लोकांना काय संरक्षण मिळणार?
जो कोणी मारामारीसारखा गुन्हा करतो, तोही निर्भय असतो. त्याला तत्काळ आणि पुरेशी शिक्षा देणारी यंत्रणा असणे चांगल्या कारभाराचे लक्षण आहे. तरच  गुन्हे कमी होतील. कोणी काहीही केले तरी त्याला काहीही भय नाही, हे  प्रशासन कसले?  आज डॉक्टरांना गप्प केले अुद्या दुसरा अुभा राहील. समस्या तीच. डॉक्टरी भाषेत बोलायचे तर रोगांवर अुपचार करण्यापेक्षा प्रतिबंधक अुपाय महत्वाचे आहेत.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन