Skip to main content

21 May 2018

इतिहासाचा धडा
आपला काही दोष नसताना शाळकरी मुलांना समाजाने दिलेली भयंकर शिक्षा वाचल्यानंतर,
आजच्या विखारी आंदोलनांचा वेगळा काही विचार करावासा वाटेल.
मोहिब कादरी या तरुणाचे लिखाण वाचले, आणि स्तब्ध झालो. आजवर दलितांची, ग्रामीण तरुणांची आत्मनिवेदनं वाचली होती. ...पण आिथं त्याहून वेगळं. हे मुस्लिम-ग्रामीण आत्मनिवेदन. या अनुभवंाची जात काहीशी वेगळी, अनोळखी..... त्याच्या लहानपणी हिंदू-मुस्लिम हे समाज किती छान अेकमेकांशी निगडीत होते. आीदचे नमाज पटांगणावर पढून झाले की सगळे गावात यायचे. सगळे गावकरी अुभेच असायचे. मिठ्या मारणे, हातात हात घेअून हलविणे... मग पोलीस पाटलाच्या वाड्यावर चहा... विड्याच्या पानांचे मळे, तिथं जाअून पान खायचेे, त्या दिवशी पैसे नाहीत. कुठं गेलं ते?'
-ज्या पुस्तकाच्या  प्रस्तावनेत अनिल अवचट यांनी हे लिहिलं आहे, ते `आठवणी जुन्या  - शब्द नवे' पुस्तक नुकतंच `साधने'नं प्रकाशित केलं आहे. ग्रामीण भागात लहानपण गेलेल्या कादरी यांनी आपले अनुुभव साध्या सरळ भाषेत, या छोटेखानी पुस्तकात नमूद केले आहेत. तथापि त्या अनुभवांतून हा लेखक बाहेर आला असून कुठलाही राग द्वेष मनात  न ठेवता स्वच्छ मनाने हे लिखाण त्यानी केले आहे.
त्यातील हे अेक प्रकरण  -
तिसरीपर्यंतचे शिक्षण गावातील एकशिक्षकी शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी गावापासून चार किमी अंतरावर असलेल्या दुसऱ्या गावातील मोठ्या शाळेत प्रवेश घेतला. नवे गाव -नवी शाळा. प्रचंड उत्सुकता. मोठी शाळा. तासाप्रमाणे विषय व गुरुजी बदलायचे. भाषाविषय, गणित, इतिहास-भूगोल, नागरिकशास्त्र. मजा यायला लागली. दिवस कसा जायचा, कळायचेच नाही. आम्ही दोघे भाऊ आणि गावातीलइतर तीन-चार जण एकाच वर्गात. स्थानिक आणि आजूबाजूच्या खेड्यांतील इतर साठ-सत्तर विद्यार्थी सोबत. नवी शाळा, नवनवीन मित्र, नवे शिक्षक, नवीन विषय... आनंदात प्रचंड भर पडली. कधी एकदा शाळेत जावे, असे दररोज व्हायचे. केव्हा सायंकाळ झाली, कळायचेच नाही आणि शाळा सुटायची. दिनक्रम अगदी आनंदात जात होता.
विषयानुसार शाळेचे वेळापत्रक ठरलेले. वडिलांच्या एका मित्रानी सर्व विषयांच्या पुस्तकांचा एक संच, जुना, अर्ध्या किंमतीत घेऊन दिला. किती आनंद झाला होता! सर्व पुस्तकांना नवे मजबूत पुठ्ठे लावून घेतले. एकेका दमात एकेक पुस्तक वाचून काढले. शाळेत शिकवण्याच्या आधीच धडे वाचलेले असल्यामुळे वर्गात अधिक मजा यायची. आधीच वाचून आपल्यामुळे गुरुजीही शाबासकी द्यायचे. सर्व गुरुजन विषय अधिक रंगवून सांगायचे. इतिहासाचे शिक्षक तर अधिकच नाट्यमय शैलीत प्रसंग रंगवायचे. पुस्तक बाजूला ठेवून पूर्ण प्रसंग आधी कथानुरूप सांगायचे. प्रसंगाचे वर्णन, आवाजाचा चढ-उतार, अभिनिवेश, सादरीकरण अप्रतिमच. हे झाल्यावर मग पुस्तकवाचन आणि सविस्तर शिकवणे. त्यामुळे हवाहवासा वाटणारा हा तास.
नेहमीप्रमाणे एक दिवस गुरुजी वर्गात आले; प्रसन्न व्यक्तिमत्व, जोश व उत्साहाने भरभरून सर्वांनी उठून नमस्कार केला. बसायची आज्ञा झाली, आम्ही सर्वजण खाली बसलो. गुरुजींनी पुस्तक बाजूला ठेवून नेहमीप्रमाणे आपल्या विशिष्ट शैलीत कथानुरूप प्रसंग सांगायला सुरुवात केली. आधीच वाचून घेतल्यामुळे कळायला उशीर लागला नाही. धडा `होता जिवा- म्हणून वाचला शिवा'. श्री छत्रपती शिवाजीमहाराज व अफजलखान यांची प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेली भेट. दि.१० नोव्हेंबर १६५९. भेटीसाठी खास तयार केलेले तंबू. अफजलखान याच्यासोबत त्याचे विश्वासू सरदार, साधारणत: बारा हजार घोडदल, दहा हजार पायदल, पंधराशे बंदुकधारी सैन्य, पंच्याएेंशी हत्ती, बाराशे उंट व एेंशी-नव्वद तोफा. प्रतापगडाच्या पायथ्याशी ठाण मांडून बसलेले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कान्होजी जेधे व इतर विश्वासू सरदार. नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली असलेले घोडदल किल्ल्यासमोर तैनात. मोरोपंत पिंगळे यांच्या मार्गदर्शनात संभाजी कावजी, येसाजी नाईक व जिवा महालाच्या नेतृत्वाखाली निवडक तीन हजार पायदल सैन्य जंगलात आपापल्या जागेवर तैनात... गुरुजी प्रसंग जिवंत उभा करत होते. सर्व विद्यार्थी तल्लीन झालेले. पुढे काय होणार... उत्सुकता ताणलेली. प्रसंगाचे वर्णन गुरुजी जीव ओतून करत होते. ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे वकील व एक अंगरक्षक आणि त्या बाजूने अफजलखान, त्याचे वकील व एक अंगरक्षक भेटणार होते.
भेटीसाठी तंबू छान सजलेला, अफजलखान धिप्पाड शरीरयष्टीचा, विशिष्ट मोठी दाढी, बिनमिश्यांचा, डोक्यावर टिपिकल पगडी; गुरुजी आपल्या वर्णनाने अफजलखान जसाच्या तसा उभा करीत होते. इतका वेळ तल्लीन, एकाग्र होऊन ऐकणाऱ्या वर्गातील  मुलांमध्ये मात्र हळूहळू चुळबूळ सुरू झाली. कुणी तरी आमच्याकडे पाहून इतरांना हळूच खुणावत होते. हळूहळू हे लोण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. आमच्या वर्गात आम्ही दोघे भाऊ व इतर एक मुसलमान विद्यार्थी, बाकी सर्व मुस्लिमेतर. सर्व विद्यार्थी आमच्याकडे पाहून खाली मान घालून हसत होते. आम्हाला कळेचना, काय होतंय. मुलांच्या हालचालींमुळे गुरुजींचे लक्ष विचलित झाले. गुरुजींनी सर्वांना दरडावलं. वर्ग शांत, चिडीचुप्प; गुरुजी पुढे चालू. छत्रपती शिवाजीमहाराज तंबूत प्रवेश करतात. अफजलखान आधीच वाट पाहात बसलेला. छत्रपती शिवाजीमहाराजांना पाहून अलिंगन देण्यासाठी उभा राहतो. शिवाजी महाराज आलिंगनासाठी जवळ येताच अफजलखान त्यांना आपल्या डाव्या बाहूत पकडतो आणि त्यांच्यावर कट्यारीचा वार करतो. चिलखतामुळे छत्रपती शिवाजीमहाराजांना काहीच इजा होत नाही. खानाने दगा दिल्याचे कळताच महाराज आपल्या हातात लपवून ठेवलेली वाघनखे खानाच्या पोटात खुपसतात. खानाची आतडी बाहेर, खानाची मोठी किंकाळी निघते. एवढा वेळ शांत बसलेल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या हास्याचा फुगा फुटावा असा स्फोट. सर्व विद्यार्थी आम्हा तिघांकडे पाहून जोरजोरात हसायला लागतात. आम्ही संभ्रमावस्थेत. गुरुजींना कळले, मुलं का हसताहेत, इतका वेळ गंभीर होऊन पुस्तक हातात न घेता शिकविणाऱ्या गुरुजींनी हळूच मागे वळून पुस्तक हातात घेतले. पुस्तक हातात समोर पकडण्याऐवजी तोंडासमोर पकडून कितीतरी वेळ काहीच बोलत नाहीत; पण पुस्तक मात्र वर-खाली होतंय. हळूच पाहिलं तर गुरुजीही पुस्तकाआड हसताहेत. आम्ही तिघे खाली मान घालून बसलेलो. सर्व वर्ग शांत होईपर्यंत आम्ही विचार करत राहिलो. पूर्ण वर्गात आम्ही तिघे मुसलमान विद्यार्थी अफजलखान होतो. बाकी सर्व जण - गुरुजींसह छत्रपती शिवाजी महाराज होते.
इतक्यात टोल पडला. तास संपला. गुरुजी वर्गातून गेले. वर्गातील काही विद्यार्थी आमच्या जवळ येऊन डिवचाडिवची करू लागले. काहींनी कंपास-पेटीतील कर्कटक काढले व आमच्या मागे लागले. आमच्या पोटाजवळ नेऊन डिवचायला लागले. आम्ही निमूट-शांत. दिवसभर शाळेत मन लागले नाही. एरवी हवीहवीशी वाटणारी शाळा आज कधी एकदाची सुटेल, असे झाले होते. नंतर तासामागून तास झाले. कोणत्या विषयाचा तास होता, हेही कळले नाही. काय शिकलो, हा तर प्रश्नच नाही. खिन्न मनाने दिवस काढला. शाळा सुटली. घरी येताना कोणाशीच बोललो नाही. आमची अस्वस्थता आईला दिसली. आईने खोदून-खोदून विचारलं. काही नाही-काही नाही म्हणत कधी बांध फुटला, कळलंच नाही. मोठमोठ्याने रडून घेतलं. मन मोकळं झालं. वर्गात मुलांसोबत वाद झाले, एवढंच सांगितलं. आईने समजूत काढली. डोक्यावरून हात फिरवला. आजची भांडणे उद्या मुलांच्या लक्षात राहात नाहीत; अभ्यास करून शांत निवांत झोपा- असं म्हणाली. दिवस मावळला, रात्र झाली. झोपायला गेलो. झोपच येईना. अस्वस्थता कायम.
दुसऱ्या दिवशीपासून शाळा नियमित सुरू. नेमक्या इतिहासाच्या तासाला दांडी मारली. कालचा धडा अर्धा बाकी होता. शाळेपासून दूर जाऊन बसलो. तास संपताच पट्कन वर्गात यायला निघालो. दारवरच गुरुजी छडी घेऊन उभे. छडी मोडेपर्यंत प्रसाद मिळाला. आमची चूक होती; निमूट मार सहन केला. पुन्हा असे करणार नाही, असे कबूल करून सुटका करून घेतली.
दिनक्रम व्यवस्थित चालू होता. अभ्यासक्रम पुढे सरकत होता. उद्या काय शिकवणार याची कल्पना येत होती. आधी वाचूनच शाळेला जायचो. उद्याच्या विषयावर बारीक लक्ष ठेवून होतो. एके दिवशी पाहिलं. उद्या इतिहासाचा दुसरा धडा. श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान यांची पुण्यातील लढाई. सकाळी लवकर शाळेला निघालो. वाटेत नदी लागायची. नदीच्या पुढे पाऊल उचलेना. दिवसभर नदीकाठी बसून राहिलो. संध्याकाळी शाळा सुटायच्या नियमित वेळेला घरी. जणू काही घडलेच नाही. दोन दिवस गेले. काहीच नाही. वाटलं, कल्पना मस्त कामाला आली. तीन-चार दिवसांनी शाळेतून आल्यावर वडिलांनी अचानक बोलावून घेतलं. शाळेला नियमित जाताहात का,ं विचारलं. मनात शंकेची पाल चुकचुकली. भीत-भीतच `हो' म्हटलं. शाळेतून निरोप आला होता; -एक दिवस आम्ही दांडी मारली आहे. वडिलांनी बैल सोडून चारा टाकलाच होता. बसल्या बसल्या चाबूक वळून ठेवला होता. आम्ही डोळे बंद करून घेतले. चाबकाचा फटका पडल्यासरशी तोंडातून आवाज बाहेर निघाला. वडिलांनी म्हटलं, आवाज बंद! आवाज दाबून चाबूक तुटेपर्यंत प्रसाद घेतला. चाबूक लवकर तुटावा म्हणून मनातल्या मनात ईश्वराला प्रार्थना करीत होतो. नेहमीप्रमाणे आईने मध्यस्थी केली आणि दिवस मावळला.
-मोहिब कादरी
अहमदपूर, जि.लातूर
फोन :९४२२४ ६८७६०

ुसुमंगल असेल तर ते राजकारण कसले!
नव्या करारात येशू िख्र्तासची गिरीवचने नोंदलेली आहेत. त्यांत आणि गीतेच्या  विचारांत गांधीजींना, त्यांच्या लंडनमधील प्रारंभकाळात खूप साम्य दिसले.  -`तू दुष्ट  प्रवृत्तीचा प्रतिकार करत बसू नकोस, कोणी तुझ्या अुजव्या गालावर प्रहार केला तर तू  तुझा डावा गाल पुढे कर, तुझा कोट कुणी काढून घेतला तर तू त्याला तुझा अंगरखाही काढून दे...' हे तत्वज्ञान गांधीजींना आपले वाटले.  `शांत गृहस्थाला किंवा तुला कुणी छळले, शिवीगाळ केली तर तो आपल्याला दिलेला आशीर्वाद आहे असं समज. शत्रूनं आपल्याला शाप दिला तरी तू त्याला आशीर्वादच दे...' हे िख्र्ताससारख्या करुणाघन मनुष्याने म्हणणे ठीक आहे, गांधीजींना ते आकर्षक वाटणे हेही ठीक आहे. परंतु लुआीस फिशर याने गांधीजींच्या चरित्रात म्हटल्याप्रमाणे, पुढच्या काळात गांधीजींनाही हे जाणवल्याचे दिसते की, स्वार्थत्यागाचा विचार केला तर हिंदूंची विचारधारा  िख्र्चाश्नांपेक्षा पुढे आहे. हिंदूंनी आपला कर्तव्यधर्म आणि मार्मिक सखोलता या दृष्टींनी ज्ञानाच्या बाबतीत श्रेष्ठता प्राप्त केली आहे. याचाच प्रभाव म्हणून असेल, गांधीजींनी त्यांच्या अेका मुलाखतीत त्यांच्या  वैचारिक अनुसरणाबाबत असे म्हटल्याचे सांगतात की, डाव्या गालावर थप्पड मारली तर अुजवा गाल पुढे करायचा; पण त्याही गालावर थप्पड बसली तर? - तर मग तिसरी थप्पड बसण्यासाठी त्याचा गाल वापरायचा! गांधीजींचेच अुदाहरण द्यायचे तर  दक्षिण आफ्रिेकेतल्या संघर्षात  त्यांनी युद्धाला अुतरल्यानंतर  अंतिम जय मिळण्यासाठीच लढा दिला; भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी शेवटपर्यंत लढाच दिला. -तथापि गांधीजींची युद्धनीती वेगळी होती, पद्धत वेगळी होती.

राजकारणच करायचे म्हटले की ते त्या तडफेनेच करावे लागते. आजच्या संविधानाने जे नियम कानू घालून दिलेले आहेत, त्यांतून तर कुणाला सुटका करून घेता येणारच नाही. परंतु त्या चौकटीत आपली बाजू बसती करून सत्ता हस्तगत करणे याशिवाय दुसरा कोणता हेतू राजकारणाचा असूच शकत नाही. `दुसरा पक्ष केवळ सत्तेसाठी हपापलेला आहे...' असे म्हणणारा पक्ष स्वत: तेच करत असतो; कारण सत्तेसाठीच तर राजकीय पक्षाचा जन्म असतो. कृष्ण, शिवाजी, टिळक या थोर पुरुषांचे दाखले आजच्या राजकारणासाठी द्यावेत की नाहीत हा प्रश्न  न  काढता, त्यांची युद्धनीती लक्षात घेतली तर त्यांनी सत्तेसाठी काय काय केले, हे दिसून येआील. राजकीय मुत्सद्देगिरी ही काही िख्र्तासच्या करुणेने चालत नसते.  आपल्याकडचे जे स्वामी, योगीराज, परमसद्गुरू वगैरे मानले जातात, त्यांनासुद्धा त्यातून बाजूला राहता आले नाही. त्यांच्यावर कुणी टीका केली, त्यांचे महत्व नाकारले तर त्या पाखंड्याच्या अंगावर फोड येतात; आणि त्या ब्रह्मांडनायकाला शरण गेले की ते रोग लगेच बरे होतात. असल्या कथा अैकणाऱ्या  मानवांना कर्नाटकात जे चालले आहे त्याचे आश्चर्य आणि दु:ख वाटण्याचे कारणच नाही.

कर्नाटकच्या जनतेने जो कौल दिला आहे, तोच मुळी हेंगाडा आहे. त्यावरच्या प्रतिक्रिया त्याहूनही हेंगाड्या उमटल्या. ठाकरे बंधूंनी या निकालास ईव्हीएम मशिनचा प्रताप मानले; आजच्या तंत्रज्ञानी युगात नेते म्हणविणारे माणसे इतके भरकट बोलू शकतात याचे आश्चर्य आहे. मशिनचा प्रताप असता तर त्रिशंकू अवस्था कशाला केली असती? हा अनवस्था प्रसंग जनतेने आणला आहे, पण तो पहिल्यानेच आलेला प्रसंग नव्हे. आितर राज्यांतही तसे घडलेले आहे, केंद्रातही घडून गेले आहे. त्या प्रत्येक वेळी राष्ट्न्पती किंवा राज्यपाल यांच्या भूमिकेबद्दल वादंग माजले आहे. फरक असा की, त्या काळात निर्णय झाला की नाआिलाजाने का असेना, तो मानला जात होता. त्रिशंकू ही अवस्थाच अशी असते की, त्यातून सर्वांना पटणारा योग्य पर्याय निघू शकत नाही. त्रिशंकू ह्या तपस्वी ऋषीची कथा तशीच आहे. तो ऋषी आपल्या प्रयत्नांनी स्वर्गारोहण कर लागला, त्यास स्वर्गातून ढकलून देण्यात आले आणि पृथ्वी तलावावर उतरता आले नाही ; त्यामुळेच तर तो उलट्या अवस्थेत अधांतरी अवस्थेत लोंबकळत राहिला. या अवस्थेला कोणताही पर्याय असतच नाही. रुग्णालयात पूर्वकाळी मृत्यू होत होतेच, पण आजपर्यंत त्या कारणावरून रुग्णालयाची तोडफोड वा डॉक्टरला मारहाण होत नव्हती. आजचा काळ असा की निर्णय देणारा पंच असो, पास नापास करणारा मास्तर असो, रोकड संपली असे सांगणारा बँकवाला असो  त्याच्यासाठी हाणामाऱ्या शिवीगाळ हे भोग अटळ बनले आहेत. राजकारणही त्याला अपवाद नाही. कारण तिथे तर आपलेच प्रतिनिधी आहेत.

कर्नाटकात कोणताही निर्णय राज्यपालानी घेतला असता, तरी तो मान्य होणारा नव्हताच.  कुणालाच संधी न देता भले राष्ट्न्पती राजवट लावली असती, पुन्हा निवडणुका लावल्या असत्या तरी कोण अैकणार होते? निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायमूर्ती, सभागृहाचे पीठाधिकारी अशा कुणालाही  न  जुमानणारी नवी रीत आली आहे, त्यांना कसे आवरायचे हा प्रश्नच आहे. यात कोणत्याही पक्षाची भूमिका नैतिक तत्वांवर तपासण्याचे कष्ट घ्यायला नकोत. कारण आिथे कुणी िख्र्तासचे अनुयायी नाहीत. ते कुठेही नाहीत, िख्र्चाश्न देशांतही नाहीत. परंतु मुळातच राजकारण हा सत्तेचा खेळ असतो (पॉलिटिक्स आिज अ गेम ऑफ पॉवर); किंवा राजकारण म्हणजे तडजोडीची (पॉलिटिक्स आिज अॅन आर्ट ऑफ काँप्रमाआीज्) कला असे असेल तर  तिथे साऱ्या भल्याबुऱ्याला आपण मानच डोलवावी लागते. कारण  त्या कलाविष्कारात किंवा क्रीडेत आपण प्रत्यक्ष सहभागी नसतो.

कर्नाटकातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून भा ज पक्षाला संधी दिली, म्हणून त्याच न्यायाने बिहार, गोवा, मणिपूर या राज्यांतील सर्वंात मोठ्या पक्षाने आता सरकार बनविण्याचा दावा केला आहे. राज्यपालाना जर खास अधिकार (डिस्क्रिशनरी पॉवर) संविधानात असेल तर त्याना तितपत भेदभाव करण्याचे स्वातंत्र्य राहणारच, आणि तो ते वापरणारच. त्याने तसे करावे की नको हा पूर्ण वेगळा प्रश्न आहे. पण तोे विचारणारे किंवा त्यास अुत्तर देणारे कुणी िख्र्तास् नव्हेत, गांधी नव्हेत! ते अमित शहा आणि राहुल गांधी आहेत. त्यांचे भांडण हे त्याच विवक्षित भूमिकेतून पाहायला हवे, कारण ते आजचे गलिच्छ राजकारण (डर्टी पॉलिटिक्स) खेळत आहेत.

ते तसे वागतात त्याचे कारण ते आपले प्रतिनिधी आहेत. आपल्या देशात भ्रष्टाचार मातला आहे, असे म्हणतो त्यावेळी प्रवासातील जागा मिळवण्यासाठी आपण दिलेले पैसे आठवले पाहिजेत. सिग्नल तोडून आपली गाडी दामटताना जर हटकले तर कोणते सत्य आपल्या मुखातून बाहेर पडते ते आठवले पाहिजे. आपल्या घरात फ्रीज असतो, त्यातील हवा थंड राहते त्याचवेळी त्याच्यासभोवती गरम झळा वाहात असतात याचा अनुभव प्रत्येकाने घेतला असेल. आपल्याला सोयीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी आितरत्र गैरसोय माजविण्यात आपण पटाआीत असतो. त्याच प्रवृत्तीचे विकसित स्वरूप म्हणजे राजकारण. आपल्या घरातले कौटुंबिक कज्जे खटले त्याच रीतीने लढले जातात, तिथेही तितकेच डर्टी पॉलिटिक्स होते. साधे मीठ आमटीत जास्त झाले तर ते `घरात' मान्य होत नाही. `ही आमटी खारट नाहीच, तुम्हाला हल्ली माझा स्वैपाक नकोसा झालाय' -हे त्याचे समर्थन असते. त्याही बाबतीत तिसऱ्या कुणा लवादाची साक्ष मान्य केलीच जात नाही, किंवा त्याने विरुद्ध निकाल दिला तर त्याच्या विरोधात महाभियोग सुरू होतो.

आपल्या देशावर गांधीजींचा प्रभाव किती आहे हे रोजच्या जीवनांतून कळतेच आहे. िख्र्चाश्न देशांत तर तो प्रभाव कधीच नव्हता. आपण कर्मयोग मानणारी माणसं. तिथं रात्रंदिन युद्धाचा प्रसंग असतो. तरीही युद्धाला जो धर्म असतो, तो युद्धाचाच असतो. कारण युद्ध जिंकायचेच असते. सत्यमेव जयते हे तेांडाने म्हणत राहिले तरी  जयते आिति सत्यम् (ज्याचा जय होतो तेच सत्य असते) हे सत्य म्हणून स्वीकारावे लागते. कर्नाटकात किंवा साऱ्या सार्वजनिक जीवनात युद्धाचा धर्म नाही तर अराजकी हाणामाऱ्यांचा धर्मकाळ अवतरला आहे, त्यातून बाहेर पडणे अशक्य नाही.  राजकारण आणि समाजकारण यांसाठी आपली भूमिका कोणती,  यावर ते अवलंबून आहे.

वसुंधरेचे पूजन करता येआील का?
वसुंधरा दिवस म्हणून साजरा होतो, त्यात शहरी अुत्सवीकरण जास्त वाटते. हरतऱ्हेची फळे फुले औषधी देणाऱ्या वनस्पती आपापल्या घरात गच्चीत बागेत फुलविण्याला प्राधान्य असायला हवे.
माझ्या लहानपणी आमच्या वडिलांनी  विविध रंगरूपाच्या फळांची फुलांची बाग लावलेली होती. जवळच्या अेका लग्नाची माझी आठवण अशी की, ते लग्न २८ मे ६४रोजी होते. आधल्या दिवशी मा. पंतप्रधान पं.नेहरू यांच्या निधनाची बातमी रेडिओवर आली, आणि सारे बाजार बंद झाले. लग्नासाठी नवरा नवरीला हारसुद्धा मिळेना. माझ्या वडिलांनी आपल्या बागेतील गुलाब आणि निशिगंधाच्या फुलांचे अुत्तम हार तयार करून आणले. २७ मे रोजी मला नेहरूंबरोबरच या लग्नाची आठवण होते.
माझ्या लग्नाच्या वेळी  वडिलांनी  मला स्थळाबाबत अपेक्षा विचारल्या होत्या. मी खेडेगाव, गुरं-गोठा, आाणि मुख्यत: बागबगीचा असायला हवा असे म्हटले. तसे पाहून वडिलांनी मला सासर दिले. माझ्या आजच्या झुकत्या वयातही या बागेतील फळाफुलांकडे पाहून खूप समाधान होते, माझी प्रकृती अुत्तम राहते. कुठून कुठून शोधून मी झाडे आणून लावली आहेत. गावात कुठे पूूजा वगैरे असेल तर आम्ही आनंदाने फुले देतो. या वसुंधरेचे आम्ही खूप ऋणी आहोत. आजच्या पिढीने मनात आणले तर याच प्रकारे बागबगीचे फुलविता येतील; आणि मग वसुंधरा दिन खरा साजरा होआील.
-मालती दातार,  बेळगुंदी (बेळगाव) 

अेकांताची शिक्षा अटळ झाली आहे
गेल्या अंकात सावरकर साहित्य संमेलनाबाबत अपेक्षा, अनुभव, त्रुटी आणि विसंगती संयमित भाषेत, कुणाच्याही भावना  न  दुखावता पण स्पष्ट मांडल्या आहेत. `माणूस नावाचे बेट' हा छोटासा लेख फार आवडला. अेकांतवासाची शिक्षा भोगत दूर राहावे लागणे, भेटणाऱ्यांची घटती संख्या, गैरसोयी, फेसबुक व्हॉट्सअॅप चे अनुभव... सारे वास्तव मांडले आहे. तो साक्षात्कार मलाही काही वेळी झाला आाहे. काका गाडगीळांची आठवण वाचली. ते पंजाबचे राज्यपाल असताना त्यांनी सरकारी गाड्या थांबवून भजी मागवून घेतली हा किस्साही प्रसिद्ध आहे.
-मोहन आळतेकर, सावंतपूर वसाहत, (किर्लोस्करवाडी)

अधिक मास
आपले सण, उत्सव, व्रते आणि उपासना वगैरे चांद्रमासाप्रमाणे म्हणजे चंद्राच्या गतीवरून ठरविली आहेत. काळ गणनेत मेळ घालण्यासाठी पंचांगकर्त्यांनी दर तीन वर्षांनी चांद्रमासाचा एक महिना अधिक म्हणून ठरविला.
चैत्र महिन्यापासून आश्विन महिन्यापर्यंत एकदा, तर कधी कधी फाल्गुन महिनाही अधिक मास म्हणून येतो. अधिक मासाला `मलमास' असे नामकरण झाले. या महिन्यात मंगल कार्याऐवजी पुण्यकार्य करतात. भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना सांगितलेल्या कथेत परमश्रेष्ठ श्रीकृष्णाकडे विष्णूंनी मलमासाची व्यथा सांगितल्यावर श्रीकृष्णांनी स्वत:चे पुरुषोत्तम मास असे नाव देण्याचे पौराणिक उल्लेख आढळतात.
दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो, म्हणजे त्या वर्षात १२ ऐवजी १३ महिने येतात. त्यास `धोंड्याचा महिना', `मलमास' किंवा `मलिचल्लू' असेही संबोधतात. दर महिन्यात सूर्य एकेका राशीतून संक्रमण करतो. परंतु ज्या महिन्यात सूर्य कोणत्याही राशीतून संक्रमण करीत नाही, तो महिना `अधिक मास' धरतात. दर अठरा वर्षांनी तोच महिना पुन्हा अधिक महिना म्हणून येतो. चांद्रवर्ष व सौरवर्ष यांचा मेळ घालण्यासाठी सरासरी बत्तीस चांद्रमासानंतर चांद्रवर्षात एक अधिक महिना धरावा लागतो. कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ हे कधी क्षयमास होतात. पंचांगात ते महिने नसतात, अशा वर्षात अधिक मास दोन वेळा येतो. क्षयमासापूर्वीचा अधिक मास पुण्यकर्त्यांना वर्ज्य. त्यानंतर येणारा अधिकमास हाच `पुरुषोमत्तमास' म्हणून शास्त्रकर्ते मानतात. अधिक मासात सूर्य संक्रात नसते. अशावेळी चंद्र-सूर्याच्या गतीत फरक पडतो. म्हणून वातावरणात ग्रहण काळाप्रमाणे विशेष असा बदल संभवतो.
या कालावधीत पुरुषोत्तम श्रीकृष्णाचे पूजन सांगितले आहे. प्राचीन काळी निमिष नावाच्या अरण्यात ऋषीमुनी यज्ञ कार्यासाठी एकत्र येत. व्यास महर्षीचे शिष्ट `सूत' मोठे पुराणिक होते. त्यांना शौनक नावाच्या ऋषींनी या व्रत उद्यापनाविषयी विचारलेल्या विविध शंका व प्रश्नांमध्ये सूतांनी अधिक -माहात्म्य सांगितले. पद्मपुराण, देवी भागवत यांमध्ये अधिक मासाचे उल्लेख आहेत.
दर तीन वर्षांनी म्हणजे सुमारे साडेबत्तीस महिन्यांनी -३२ महिने १६ दिवस ४ घटिकांचा, एक महिना जास्त धरतो. `दुष्काळात तेरावा महिना' अशी म्हण आहे. मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन यांना जोडून अधिक महिना सहसा येत नाही. सर्वसाधारणपणे १२ वर्षांनी चैत्र, ज्येष्ठ व श्रावण अधिक मास येतो. १८ वर्षांनी `अधिक आषाढ' तर दर २४ वर्षांनी एकदा `अधिक भाद्रपद' येतो. आश्विन १४१ वर्षांनी अधिक मास येतो, तर ७०० वर्षांनी कार्तिक अधिक मास येतो. भाद्रपदापर्यंतच्या मासांना अधिक मास म्हणतात. आश्विन व कार्तिक अधिक आले तरी त्यास तसे म्हणत नाहीत. ज्यावर्षी आश्विन अधिक होतो, त्यावर्षी पौष क्षयमास होतो. अशावेळी दोन प्रहरापर्यंत मार्गशीर्ष, व दोन प्रहरांना पौषमास गृहित धरून धार्मिक कृत्ये करतात.
३५५ दिवसांचे `चांद्रवर्ष' आणि ३६५ दिवसांचे `सौरवर्ष' यांचा मेळ घालण्यासाठी या अधिक मासाची निर्मिती झाली, हे निश्चित. अधिक मासाला `पाकृत' आणि `संसर्प' अशाही नावाने ओळखतात.
या मासाची विष्णू ही देवता मानली असून त्याच्या कृपेसाठी कृत्य करण्यास सांगितले आहे. पूजा, पापक्षालनासाठी मलमासव्रत, प्रत्येक दिवशी अनारसे इ. पपन्ने तेहतीस या संख्येने कांस्यपात्रात भरून पात्रासह त्यांचे दान, पादत्राणे व छत्री यांचे दान, सुवर्णदक्षिणा इ. सांगतात. महाराष्ट्नत अधिक मासातले अनारशांचे वाण बहुधा जावयाला देतात. कन्या व जामात यांना लक्ष्मीनारायण स्वरूपी मानले आहे. वर्षभर श्रम केल्यामुळे सर्व ऋतु आपली गती करून या कालावधीत सूर्याचा पाहुणचार घेतात, असे ऋग्वेदात म्हटले आहे.
अधिक मास माहात्म्य नावाची प्राचीन पोथी एकूण ३३ अध्यायांची आहे. अधिकमासात गोग्रास, अपूपदान, दीपदान वगैरे सांगितले आहे. छिद्र असणारे पदार्थ म्हणजे अनारसे, बत्तासे वगैरे वस्तू ३०+३(तेहतीस) अशा प्रमाणात दान करण्याची प्रथा आढळते. ही दाने कास्य धातूच्या भांड्यातून करावीत. दांपत्यभोजन आवळी स्नान आदी व्रते आहेत.
अधिक मास धरण्याची पद्धती सर्व भारतात प्रचलित असावी, प्राचीन काळापासून शुद्ध प्रतिपदेला देवासमोर पाट, कलशपूजन, पुरुषोत्तम राधिकेसह श्रीकृष्ण मूर्तींची पूजा संकल्पयुक्त करून व्रत आरंभ करावा. अधिक कृष्ण अमावस्येला व्रत उद्यापन करावे.
या मासात अग्लाधान, देव प्रतिष्ठा, राज्याभिषेक, विवाह, उपनयन, गृहारंभ, गृहप्रवेश व देशांतर यात्रा यांना वर्ज्य काळ ठरविले आहे. अधिक मासात मृत झालेल्यांचे श्राद्ध व महालय शुद्ध मासात ज्या-त्या तिथीला करतात.
-नंदकुमार मराठे, कोल्हापूर      फोन-९९७५४२९४९४

ब्राह्मण्य असेल तर तो ब्राह्मण
ब्राह्मण समाज संख्येने फार कमी असला तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहात असतो. कधी कौतुकाच्या, कधी दबावाच्या, कधी  श्रद्धेच्या, तर कधी मत्सर किंवा संतापाच्याही निमित्ताने तो गुदमरतो. जन्माने जात ठरत असल्यामुळे तथाकथित ब्राह्मण्याच्या नावावर समाज झुकत राहतो. पण खरे ब्राह्मणत्व कोणते हे तर कोणी समजून घेत नाही. गुणकर्माने जात ठरणेच योग्य असते; त्यामुळे ज्यांनी मोठे कर्तृत्व आपल्या विद्वत्तेच्या जोरावर केले तेच ब्राह्मण म्हणविले जावेत, हे ओघानेच येते. -किंबहुना प्राचीन काळापासून तेच मानले गेेले आहे, -मग व्यवहारात काहीही चालू असो!
श्रावणबाळाची गोष्ट मी लहानपणापासून अैकत आलो आहे. आंंधळया मातापित्यांना कावडीतून यात्रेला घेअून जाणारा श्रावणबाळ हा ब्राह्मणकुमार असल्याचेच आतापर्यंत अैकत होतो. `त्या ब्राह्मणपुत्रा बघुनी । शोकाकुल झाला नृमणी ।' अशीच कविता शाळेत शिकलो होतो. पण नुकतीच वेगळी कथा समजली. यवतमाळचे श्री. बोंद्रे यांनी वाल्मिकी रामायणाचा श्लोकानुसारी अनुवाद केला आहे-(तत्वबोध रामायण). त्यांनी  अनुवादासाठी गोरखपूर प्रेसचे मूळ रामायण घेतले; त्यात श्रावण हा वैश्य पिता आणि शूद्र माता यांचे अपत्य असल्याचे म्हटले आहे. -मग तो ब्राह्मणकुमार कधी झाला? -की त्याच्या गुणांमुळे त्याच्यावर ब्राह्मण्य ठेवले?
साऱ्या समाजाची अेक ठाम समजूत आहे की, सारे सद्गुण ब्राह्मणांच्या ठायी अेकवटले आहेत. किंवा त्याचा व्यत्यास मांडायचा तर ज्याच्याकडे अुत्तम गुण असतील त्यास ब्राह्मण म्हणून ओळखावे. ब्राह्मण हा शब्द म्हणजे साऱ्या सद्गुणांचे प्रतीक.
हा विचार खरा मानायचा तर मग  प्रत्येक वर्णात - जातीत ब्राह्मणांचे अस्तित्व आहेच! ज्याला तत्कालीन ब्राह्मणांनी नाकारले, तो संन्यासाचा पोर ज्ञानेश्वर हा याही अर्थाने ब्राह्मण होता; तसेच चोखा हाही ब्राह्मणच होता. गाढवामुखी गंगेचे पाणी घालणारा अेकनाथ ब्राह्मण होता. `वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भार माथा ।' हे ठणकावणारा तुकाराम ब्राह्मणच की! `शेख महंमद अविंध । त्याचे हृदयी गोविंद' हे सांगणारा महंमद ब्राह्मण. तळागाळाच्या समाजात जागरण करणारे गाडगेबाबा, पीडितांसाठी आयुष्य झोकणारे आमटे बाबा हे सारे ब्राह्मणच तर होते.... त्यांची जन्मजात कशाला विचारा!!
अशा सर्व थरांतील ब्राह्मणांची संख्याही अल्पच असते. पण त्यांचा नैतिक प्रभाव कितीतरी पटीने असतो, कितीतरी काळ टिकून राहतो. असे सत्पुरुष अल्पसंख्य असतात. आणि दुर्दैव असे की त्यांची वाटणी जन्माधारे करून आजच्या जातींतून बखेडे माजतात.
याच अनुषंगाने असे मांडता येआील की, जे जन्मानेच ब्राह्मण आहोत म्हणून आपल्या अस्मितेचे मोठेपण सांगतात त्यांच्यावर आपोआपच मोठी सामाजिक जबाबदारी टाकलेली आहे. त्यांनी समाजाच्या त्या विश्वासाला तडा जाआील असे आपल्या हातून काही घडू देता कामा नये. `ब्राह्मण जाला जरी भ्रष्ट, तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ-' हे मुळीच खरे नाही. आळस टाकून, जिज्ञासूपणे ज्ञानसाधना करणे आणि ती समाजाप्रति अर्पण करणे, समाजाच्या विकासासाठी हातभार लावणे, दुरितांचे तिमिर जाण्यासाठी प्रयत्नरत राहणे, दुर्गुण-दुर्व्यसनांपासून दूर राहणे हेच खरे ब्राह्मण्य होय. तेच जोपासायला हवे, तर त्याचा प्रभाव राहील. हेच ब्राह्मण्य असेल तर, ते साऱ्या समाजाच्या थरांत कसे पाझरेल हेही पाहायला हवे. त्या अर्थाने `ब्राह्मण करूनि सोडावे सकळजन' असेही म्हणावे !
श्री.धुं जोशी -अरविंद सोसा. पुणे-५१
फोन-९८९०८२५८२६


दिलखुलास मंत्री
ओरिसातील पुलांची काही कामे अेस बी जोशी अँड कंपनीकडे होती, आणि त्यांतील अेका कामावर मी १९६२मध्ये रुजू झालो, त्यावेळी काकासाहेब गाडगीळ तिथे माझ्या घरी आल्याची कथा मी गेल्या अेका अंकात दिली होती. तशीच अेक कथा मंत्र्यांची आहे.
१९६६च्या सुमारास काँग्रेसचे अधिवेशन ओरिसात होते, त्यासाठी अुत्तर प्रदेशातील काही मंत्रीही आलेले होेते. आमच्या कंपनीची काही कामे अुत्तर प्रदेशातही चालू होती, त्यामुळे जोशीसाहेबांचा संपर्क त्या मंत्र्यांशी होता. अेस बी जोशी यांनी अुत्तरप्रदेशच्या दोन मंत्र्यांना ओरिसातील पुलांच्या कामांबद्दल सांगितले, व त्या ठिकाणी भेट देण्याची विनंती केली. मंत्र्यांनी मान्य केले व ब्राह्मणी नदीवरील पुलाच्याच कामाला भेट देण्याचे ठरले, तिथे मी होतो. तसे मला सांगण्यात आले.
मी त्यांच्या भेटीची व्यवस्था केली आणि त्यांच्या भोजनाची सोयही पुन्हा आमच्याच घरी केली. श्रीखंडपुरीचा बेत केला. जेवणाच्या पानावर आल्यावर अेका मंत्र्याने दुसऱ्याला विचारले, `क्या आपको याद है, १९३४के अधिवेशन में आपने पच्चास पुरी खायी थी?' त्यावर दुसऱ्या मंत्र्याने अुत्तर दिले की, `अरे भआी, ये तो कुछ नही । आपने तो साठ पुरी खायी थी, वह भी मुझे याद है ।' मी आणि पत्नीने अेकमेकाकडं पाहिलं. आज आमची काही धडगत नाही, फेजती होणार. पुऱ्यांची ही संख्या आमच्या सरावाची नव्हती. आयत्या वेळी त्या आडबाजूला करणार काय? पण त्यांच्या पुढच्या वाक्याने आम्हाला धीर आला. -`वह तो पुरानी बात हो गआी । अभी कौन आितनी पुरी खायेगा ।' तेे अैकून आमचा जीव भांड्यात पडला. जेवण व्यवस्थित पार पडले.
पण गप्पा मारताना त्यातल्या अेकाने पुन्हा जुनी आठवण काढली. -`आपने आितनी पुरी खायी; अैार तो और भोजन के बाद आधा किलो मिठाआी भी खायी थी; वो कैसे?' त्या बहाद्दरानं म्हटलं, `वो तो राजा की सवारी है । राजा आनेसे पहले रास्ते में बहुत भीड होती है; लेकिन राजा आते समय सब भीड हटती है, और राजा के लिये पूरा रास्ता खाली हो जाता है । अुसी तरह मिठाआी देखतेही अपने पेट में जगह बन जाती है ।' जेवणानंतर हल्ली स्वीट डिश म्हणून काही मिठाआी देतात, त्यावेळी आम्हाला त्या राजाकी सवारीची आजही आठवण होते.
  -मुकुंद करमरकर, मुंबआी ५१   फोन : ८४५१ ८२४ ६०७

आठवांचे साठव
नसती ब्याद अंगावर
प्रेसचा उद्योग आणि नियतकालिकाची हौस असे जोडकाम चालू असल्यामुळे काही कामे संयुक्त स्वरूपातील असत. सहकारी संस्थांच्या सगळया सभासदांना हिशेबाची पत्रके आणि वार्षिक अहवाल पाठवायचे काम आम्ही दोन हजार सालच्या आसपास प्रथम अंगावर घेतले. सांगली अर्बन बँकेसाठी ते काम त्यावेळपर्यंत आितरत्र होते, ते काही कारणाने आम्ही करावे यासाठी विचारणा झाली. आणि थोडा दबावही आला. त्या पहिल्याच वर्षी त्यांची संख्या सुमारे ४२हजार होती. आमच्या अंकात जाहिरात-दराने त्यांचा अहवाल छापायचा आणि त्यांच्या सभासदांना ते अंक पोस्टाने पाठवायचे असा तो व्याप करण्याचे आव्हान होते. वास्तविक तो डोक्यापेक्षा सरावाचा भागच होता. आता आितक्या अनुभवानंतर त्या प्रकारचे काम आमच्याकडे आजही चालते, पण आता त्याचा फारसा ताण जाणवत नाही.
त्या वर्षी ते काम अेका ठराविकच दरात, स्पर्धेत अुतरून करायचे होते, ते स्वीकारून तर बसलो. पण त्यानंतरचे तीन आठवडे शब्दश: फेसाटी अुडाली. आितकेही करून त्यात फार काही पडतर राहिली नाही. पण कोणाच्याही मदतीशिवाय आणि सल्ल्याशिवाय आमच्या कर्मचारी सहकाऱ्यांनी ते काम वेळेत पूर्ण केले आणि शर्यत जिंकली. अशा कामात काय काय चुका झाल्या आणि त्या कशा सुधारता येतील याचा अनुभव मिळणे ही छोटी गोष्ट नव्हे. पण तो फायदा पुन्हा त्या प्रकारचे काम आले तरच दिसणार ना! तसे ते आले, आणि गेली पंधरावीस वर्षे ते चालू राहिले आहे. त्यात पोस्ट खात्याचे हिसके बसायचे ते बसले, अैनवेळी काहीतरी समस्या यायची ती आली, ताणपट्टी व्हायची ती होत राहिली; पण आता त्या कामात आमचे प्रभुत्व म्हणता येआील आितके मिळाले आहे हेही खरे.
अेके वर्षी बँकेच्या संबंधातील मजकुरात अेक सूचना अैनवेळी हाती आली, ती त्या ताळेबंदाच्या पानात वाढवून घेतली. मजकूर तपासून घेतला, आणि त्याच्या पॉझिटिव्हज् वगैरे घेअून पाने छापायला गेली. मोठ्या वेब मशीनवर बारा पृष्ठे टॅब्लॉआीड आकारातील छापून गट्ठे ताब्यात आले. सकाळी माणसे तयार ठेवली होती. त्या वर्षीच्या ५५हजार अंकांवर पत्ते चिकटवायचे, त्याच्या घड्या घालून पोस्टात पाठवायचे होते. मांडामांड करून पहिले काम धडाक्यात सुरू झाले. आणि सहज अंकावर नजर टाकली, तर शेवटच्या टप्प्याला आलेली ती महत्वाची सूचना अर्धीच छापली गेली होती, बाकीची पाच-सहा वाक्ये गायब! काय घोटाळा झाला हे शेाधत बसायलाही वेळ नव्हता. संगणकाचे तंत्र कुठेतरी सटकले होते आणि त्यात काहीतरी गफलत झाली होती. आता कुणाला बोल लावण्याअैवजी दुरुस्ती करायची कशी याचा विचार महत्वाचा. सगळे पर्याय चाचपणी करून त्या तेवढ्या मजकुराच्या चिट्ठ्या छापून घेअून त्या ठराविक जागी चिकटवून घेणे अेवढा अेकच अुपाय शिल्लक होता, तो करण्याचे ठरले. अेव्हाना तासदोन तास वाया गेलेच होते.त्यात आणखी काही वेळ घालवून गडबड घाआीत त्या चिठ्या छापून घेतल्या; आधीच तारांबळ होणे अपेक्षित होती; त्यात या ५५हजार अंकांना आधी चिठ्या चिकटवून घेण्याचे काम वाढले. पण करतो काय? वेळ पैसा श्रम कशाचाही विचार करत बसण्याला काही अर्थच नव्हता. अंगावर येणारा हल्ला परतवून लावायचा अशा जिद्दीने आमची सारी फौज मैदानात अुतरली, आणि सारे काम पूर्ण करून त्यांनी श्वास घेतला. वेळेच्या कट्टाकटी आधी शर्यत कडेला लागली.
अेका वर्षी तर पोस्टाची न्यारी तऱ्हा अनुभवली. वास्तविक आमची जबाबदारी अंक पोस्टात पोचविण्याशी संपते. त्यानंतर ते संबंधितांस वेळेत पोचतात का, हे कसे पाहणार? त्याच्याशी आमच्या कामाचा संबंध नसतो. पण आम्ही प्रथमपासून त्यातही (म्हटले तर अनावश्यक, पण आमच्या कर्तव्य-भावनेतून) लक्ष घालत असू. अेके वर्षी ६० हजार अंक पोस्टात दिले आणि साधारण चारसहा दिवसांनी  सहज म्हणून प्रधान डाकघरी गेलो, तर ते सारे गट्ठे तिथेच रचून ठेवलेले. चौकशी आणि आरडाओरड सुरू केली. मग कळले की त्यांचे फ्रँकिंग मशीन मोडले होते. वास्तविक त्यांनी आमच्याकडून वेगळे पैसे फ्रँकिंग करण्यासाठी मजुरी म्हणून वसूल केले होते, तरीही ते काम दूर ढकलून दिले होते. संस्थेची वार्षिक सभा जवळ आलेली होती, त्याआधी सभासदांना गावोगावी ते अंक पोचणार कसे? ही अक्षम्य चालढकल सरकारी मला सहन होआीना. वास्तविक माझी त्याबाबत काही जबाबदारी नव्हती. माझे काम वेळेत संपले होते आणि त्याचे बिल मला तर मिळणारच होते. पण `बुडती हे जन, पाहवेना डोळा' -हे म्हणायचे! म्हणून तिथून वरिष्ठ पातळीवर फोनाफोनी केली. पोस्ट मास्टर जनरल कार्यालयातील अेक अधिकारी बाआी रिटा म्हणून होत्या, त्या पुण्यात एका मिटींग मध्ये होत्या. त्यांना बोलल्यावर त्यांनी त्यांच्याच यंत्रणेवर जाळ काढला, आणि तिथून सूत्रे हलवली. मग प्रधान डाकघरातील साऱ्या खुर्च्या डळमळल्या. पुढचे तीन चार दिवस त्यांचे सारे सैन्य याच कामात गुंतले. हे सारे आमच्या त्या ग्राहक संस्थेला माहीत असण्याचे कारण नव्हतेे, आम्हाला त्याचे काही वेगळे पैसेही मिळणार नव्हते. आपल्याशी संबंधित नसलेल्या, पण तरीही परिचित कामासाठी आिरेला पडलो हेही खरे आहे. तसे का केले? -ठाअूक नाही!
-वसंत आपटे, किर्लोस्करवाडी

आपल्याला याची सवय नाही...
काही दिवसांपूर्वी नागपूरच्या आर टी ओ कार्यालयाच्या आवारात अेका दुचाकी गाडीवरून अेक महिला आली. गाडी स्टँडला लावून ती महिला कार्यालयात आली. तिच्या वाहनचालन परवान्याचे (लायसेन्स) नूतनीकरण करायचे होते. महिलेने छापील अर्ज मागून घेतला, तो स्वहस्ते भरला. बाकीची कागदपत्र घेअून ती रांगेत अुभी राहिली. हळूहळू रांग पुढे सरकत होती. महिलेची कागदपत्र घेतली, फोटो काढून घेतला, पैसे भरले. सारी प्रक्रिया आटोपून ती महिला बाहेर पडली आणि आपल्या दुचाकी गाडीकडे निघाली. तोवर त्या कारकुनाचे लक्ष त्या कागदपत्रांवर गेले, ...आणि तो अुडालाच! नाव - अमृता देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्नच्या मुख्यमंत्र्याची पत्नी रांगेत आितका वेळ अुभी होती?
मग पळापळ सुरू झाली. आर टी ओ साहेब कार्यालयात नव्हते. तिथं होते ते अधिकारी त्या गाडीपर्यंत पळत आले. नमस्कार चमत्कार झाले. त्यांनी विनंती केली की, कार्यालयात यावे, लगेच नूतनीकरण करून देतो. सौ.मुख्यमंत्री यानी नम्र शब्दांत नकार दिला. `मी अर्ज केलाय, पूर्तता केली आहे. आता तुमच्या नियमाप्रमाणं स्पीड पोस्टनं परवाना पाठविलात तरी चालेल...' असं म्हणत त्यानी गाडी सुरू केली आणि त्या निघून गेल्या. या अधिकाऱ्याने कपाळावरचा घाम पुसला.
अशी कोणी कल्पना आजच्या जगात करत नाही. या कथेचे आश्चर्य वाटते तोपर्यंत आपण अजून लोकशाहीच्या मार्गात कच्चेच आहोत. परंतु जेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला ओळखूनही, तिला बिनधास्तपणे निर्भयपणे सामान्य नागरिकाची परंतु पूर्ण जबाबदार सेवेचीच वागणूक दिली तर तेव्हाच आपले लोकशाही प्रशासन परिपप् झाले असे म्हणता येआील.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन