Skip to main content

19 March 2018

रामकथा गान
विद्यावाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर हे प्रकांड पंडित, आणि व्यासंगी संशोधक म्हणून सर्वदूर परिचित आहेत. त्यांची ग्रंथसंपदाही मोठी आहे. अलीकडे त्यांनी श्रीरामायणाचे ओवीबध्द सुगम रूपान्तर केले असून त्यावर निरूपणस्वरूपी रसाळ भाष्यही केलेले आहे. या बृहद्ग्रंथाचे खंड प्रकाशित होत आहेत. `बालकाण्ड' याआधी प्रकाशित झाले असून आता `अयोध्याकाण्ड'ची प्रतीक्षा आहे.
या अभिनव रचनेचा तपशील द्यायचा तर, हे रामायण वाल्मीकींच्या मूळ संहितेप्रमाणे असून आजच्या वाचकांस समजेल आितके ते सुगम आहे. संहितेचा मूळ संस्कृत श्लोक, त्याचे आजच्या मराठीत गद्य भाषांतर आणि त्यानंतर अभ्यंकरांचे ओवीरूप निरूपण अशी ग्रंथाची रचना आहे. गुरु.अभ्यंकर यांच्या स्वभाववृत्तीनुसार ठसठशीतपणा, शुध्दता, सौष्ठव, आणि स्वमतप्रतिपादनातील जोश ही वैशिष्ट्ये ग्रंथात दिसून येतात. या समग्र ग्रंथाचे पारायण करण्यासाठी त्याची विभागणी त्यांनी सुचविली आहे. शिवाय रामायणासंबंधाने काही आक्षेप नोंदवून त्यांचे तर्कशुध्द खण्डन आणि रामचरिताच्या वैशिष्ट्यांचे मण्डन ग्रंथारंभी केले आहे, तेही अभ्यसनीय आहे.
श्रीरामनवमीच्या या पर्वकालात या ग्रंथापैकी `बालकांड' मधून काही भाग येथे दिला आहे -

रामायणातील राजनीती, धर्मनीती, अर्थनीती, युद्धनीती, नगरनिर्माणविद्या, विमानविद्या, दिव्य शस्त्रास्त्रसाधनविद्या, अध्यात्मविद्या, भौतिकविद्या या सर्वांचा अभ्यास करावा तितका थोडाच! परंतु याबरोबर रामायण हे काव्य म्हणूनही अलौकिक आहे. प्रभु रामचंद्र भारताचे महाप्राण आहेत आणि महर्षी वाल्मीकि भारताचे आदिकवी आहेत. सर्व मानवी जीवनात राम ओतप्रोत भरला आहे. श्रीरामांच्या चरित्राला जगात तोड नाही. श्रीराम मर्यादापुरुषोत्तम आहेत. आदर्श पुत्र, आदर्श पति, आदर्श बंधु, आदर्श मित्र, आदर्श योद्धा, आदर्श राजा, आदर्श सरसेनापति या दृष्टीने श्रीरामचरित्र अतुलनीय आहे.
...
वेदातील श्रीरामकथा- ऋग्वेदाच्या दशम मण्डलात तिसऱ्या सूक्तातील तिसरी ऋचा एकश्लोकी रामायण म्हणून मानली जाते. ती ऋचा अशी-
`भद्रो भद्रया सचमान आगात् स्वसारं जारो अभ्येति पश्चात्।
सुप्रकेतैर्द्युभिरग्निर्वितिष्ठन् रूशद्भिर्वर्णैरभि राममस्थात् ।।'
अर्थात `अंधकारजेता, उषाप्रियकर, शुभ्रतेज संपन्न आणि रमणीय अग्नि उषेसमवेत अवतीर्ण होत आहे.
काही पंडितांनी या ऋचेचा रूपकात्मक अर्थ रामायणपर केला आहे. उदा. भद्र:- वंदनीय श्रीराम, भद्रया - वंदनीय सीताद्वारा, सचमान - सेवासंगतीत असताना, आगात् - वनात आले. स्वसारम् - सीतेचे अपहरण करण्यासाठी, जार: - रावण, पश्चात् - रामलक्ष्मण कुटीत नसताना, अभ्येति - आला आणि त्याने सीतेला रामांहाती सोपविले. अग्नि: - रावणाचा वध झाल्यावर अग्नि सुप्रकेतै: द्युभि: - श्रीरामपत्नि सीतासमवेत, रामम् अभि - श्रीरामांसमोर रुशद्भिर्वर्णै: - उद्दीप्त तेजासह, अस्थात् - प्रकट झाला.
असेच रूपकात्मक उल्लेख ऋग्वेदात, अथर्ववेदात, शतपथ ब्राह्मणात, श्रीरामोत्तरतापिनी उपनिषद, श्रीरामपूर्वतपिन्युपनिषद सीता उपनिषद इत्यादी अनेक स्थळी मिळतात. अथर्ववेदात (१०.२.३१) अयोध्येचा उल्लेख येतो. या दृष्टीने विचार करता श्रीरामकथेची प्राचीनताही सिद्ध होते.
आचार्य आणि संत वाङ्मयात श्रीराम - महर्षी वाल्मीकि श्रीरामांचा गौरव गाताना म्हणतात- `प्राप्तराज्यस्य रामस्य राक्षसानां वधे कृते। आजग्मुर्मुनय: सर्वे राघवं प्रतिनन्दितुम् ।।'   (वा.रा.७.१.१)
`राक्षसांचा संहार केल्यावर जेव्हा भगवान श्रीरामाला स्वराज्याची प्राप्ती झाली तेव्हा त्यांचे अभिनंदन करण्यासाठी समस्त ऋषी-महर्षी अयोध्यानगरीत आले.'
महर्षी वाल्मीकींनी या ऋषींची यादी दिली आहे- `कौशिक, यवक्रीत, गार्ग्य, गालव आणि मेधातिथीचा पुत्र कण्व हे पूर्वदिशेचा आश्रय करून राहणारे ऋषि तेथे आले. त्वस्त्यात्रेय, भगवान नमुचि, प्रमुचि, अगस्त्य, अत्रि, भगवान सुमुख आणि विमुख हे जे दक्षिणदिशेचा आश्रय करून राहणारे मुनि तेही अगस्त्यासहवर्तमान तेथे आले. नृषंगु, कवषी, धौम्य आणि महर्षी कौषेय हे जे पश्चिम दिशेचा आश्रय करून राहाणारे मुनि तेही शिष्यांसहवर्तमान तेथे आले. वसिष्ठ, कश्यप, अत्रि, गौतमासहवर्तमान विश्वामित्र, जमदग्नि आणि भारद्वाज हे जे उत्तर दिशेस नित्य वास्तव्य करणारे सप्तर्षी तेही तेथे आले होते.' (वा.रा.७.१.२ ते ६) या सर्व ऋषींनी प्रसंगोपात्त श्रीरामांचा गौरव गायिला आहे.
`योगवासिष्ठ' ग्रंथात `रामस्तु भगवान स्वयम् ।' आणि ब्रह्म संहितेत `राघवो भगवान स्वयम्।' असे उल्लेख आहेत. स्वत: महर्षि वाल्मीकीही श्रीरामांना `आदिकर्ता स्वयं प्रभु:।' (वा.रा. ६.११७-१८) असे म्हणतात.
`याज्ञवल्क्य स्मृती'ने श्रीरामांना परब्रह्म म्हटले आहे-
`अवतारा बहव: सन्ति कलांशाश्वांशविभूतय:।
राम एव परब्रह्म सच्चिदानन्दमव्ययम् ।।'
रामायणाची थोरवी गाताना सायणाचार्य म्हणतात,
`यावत्स्थास्यन्ति गिरय: सरितश्च महीतले ।  तावद्रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति ।।'
अर्थात् `या भूतलावर जोपर्यंत पर्वत आणि नद्या आहेत, तोपर्यंत ही रामायणकथा लोकांत प्रचलीत असेल.'
महर्षि अत्रि म्हणतात, `नमामि भक्तवत्सलं, कृपालु, शील, कोमलं-- जगद्गुरुं च शाश्वतं, तुरीयमेव केवलं ।' अर्थात भक्तवत्सल, कृपालू, श्रेष्ठ शील, कोमल तनू असलेल्या शाश्वत जगद्गुरू आणि तुरीय असलेल्या श्रीरामांना मी वंदन करतो.'
महर्षि व्यासांचे कर्तृत्व अमर्याद आहे. `अध्यात्म रामायण' ही त्यांचीच रचना मानली जाते.
उपवर सीता
पृथ्वीमधून प्रगट झालेल्या सीतेचा सांभाळ करून ती आता मोठी झाल्यावर तिला मागण्या येऊ लागल्या. तिला प्राप्त करण्यासाठी कोणते निकष आहेत हे काहीजणांनी विचारले होते. तेव्हा त्यांना जनकाने शिवधनुष्य दाखविले होते. जनकराजा विश्वामित्राला त्यासंबंधी सांगतो आहे.
बालकाण्ड सर्ग - ६६
न शेकुर्ग्रहणे तस्य धनुषस्तोलने%पि वा । तेषां वीर्यवतां वीर्यमल्पं ज्ञात्वा महामुने ।।१९ ।।
प्रत्याख्याता नृपतयस्तन्निबोध तपोधन । तत: परमकोपेन राजानो मुनिपुङ्गव ।।२० ।।
अरुन्धन् मिथिलां सर्वे वीर्यसंदेहमागता: । आत्मानमवधूतं मे विज्ञाय नृपपुङ्गवा: ।।२१ ।।
रोषेण महताविष्टा: पीडयन् मिथिलां पुरीम् । तत: संवत्सरे पूर्णे क्षयं यातानि सर्वश: ।।२२ ।।

परंतु त्यांच्यापैकी कोणालाच हे धनुष्य तोलता आले नाही. हे महामुने! त्या पराक्रमी नरेशांकडे फारच थोडे बल आहे हे जाणून मी त्यांच्यापैकी कोणालाच माझी कन्या द्यायला नकार दिला. याच्या नंतर जी घटना घडली, ती आपणही ऐकावी. हे मुनी! माझ्या नकारानंतर हे सर्व राजे क्रोधित झाले. आपल्या पराक्रमावरच संशय घेतल्याने त्यांनी मिथिलेला चारी बाजूंनी घेरले. माझ्याकडून त्यांचा अपमान झाला असे मानून त्या श्रेष्ठ राजांनी रागावून जाऊन मिथिला नगरीला चोहो बाजूंनी त्रास द्यायला प्रारंभ केला. मुनीश्रेष्ठा! पूर्ण एक वर्षभर त्यांनी मिथिलेला वेढा घातला होता. या काळात युद्धसाहित्यही कमी पडू लागले. यामुळे मी अतिशय दु:खी झालो.
पुरविण्या की जिज्ञासेस । ठेविले श्रीशिवधनुष । परि ना कोणासीही यश । धारण्यासी ।।२०५।। म्हणती विक्रमी नरेश । महाबली नित्य स्वत:स । परि बल त्यांचे अल्पांश । ज्ञात मजला ।।६।। कन्या जरी ही उपवर । दिला मी नरेशा नकार । चढला तया क्रोध फार । शब्दाने मम ।।७।। घडली नंतर घटना । अपमान वाटे नृपांना । साहवेना त्या अपमाना । जरी अशक्त ।।८।। नाचवुनी आपुला घोडा । घालती मिथिलेसी वेढा । संतापाचा क्षत्रियसडा । ओलाण्डिती ।।९।। अत: करिती तिरस्कार। आक्रमणा करिती घोर । पीडेस माण्डियले थोर । मिथिलापुरीस ।।२१०।। गेले की एक संवत्सर । वेढलेले राही नगर । क्षीण शक्ती साधनसार । युद्धामुळे ।।११।। जाणता धनुषाचा पण । कातरले अंत:करण । राजे मानिती अपमान । अहङ्कारी ।।१२।। डावलुनिया या पणास । वेढुनी दिव्य मिथिलेस । म्हणुनी माण्डिती युद्धास । निर्दयपणे ।।१३।।
सुकन्या असे अयोनिजा । वीर्यशुल्का ती कमलजा । का ही प्रत्यक्ष विश्वा ऊर्जा । वंदनीय ।।१४।। पौर्णिमेसमान श्रीसीता । लावण्य गुण संपन्नता । होतसे हर्ष राजचित्ता । जनकाचे ।।१५।। सर्व क्षत्रियांसी सादर । जनक राजर्षि तत्पर । तये माण्डिले स्वयंवर । दुहितेचे त्या ।।१६।। स्वयंवरा कठीण पण । होता वीरा अति दारुण । शिवधनुष्यासी धारण । करिल जो गा ।।१७।। तयाचेच की वीर-गळा । जानकी अर्पील सुमाला । सद्गुणां षोडश स्वकुळा । भाग्यवंता ।।१८।। क्षत्रिय बहु आले-गेले । प्रयत्ना करूनी थकले । परि धनुष्य ना पेलले । राजियांसी ।।१९ ।। अपमान झोंबता मनी । केले की कपट राजांनी । दुष्टांनी एकत्र येऊनी । वेढिली मिथिला ।।२२०।। श्रीजनकाने अत्यादरे । स्वर्गस्थ देवांचे सुवरे । क्षत्रिया भीषण सङ्गरे । परास्त केले ।।२१।। त्या मिथिला राजसभेत। अवतरे कौसल्यासुत । लीलया धनुष धारित । जिङि्कला पण ।।२२।। पाहुनी सावळा श्रीराम । थक्की मिथिलेचे धाम । पूर्णब्रह्म श्रीपूर्णश्याम। वरिला सीते ।।२३।। विषय झाला अलङ्कार । सीता-श्रीराम स्वयंवर । प्रतिभावंत विद्वद्वर । प्रतिभाविलास ।।२४।। श्रीराम-सीता समन्वय । परस्परांसी हो अन्योन्य । स्वयंवर नव्हे, समाह्वय। सादर केला ।।२५।। धनुष्यासी स्वये धारून । रामे जिङि्कला राजपण। अजरामर केला क्षण । इतिहासी ।।२६ ।। समाह्वय तो झाला कसा। गोजिरा सर्व इतिहासा । वर्णू सादर स्थळी तसा । गौरवाने ।।२७।।
न साहवे धनूस भारी । रावण पडे भूमीवरी । शिवधनुष्य उरावरी । दंतकथा असे ।।२८।। उत्तरकाण्डी सर्गांतर । वर्णिला असे सविस्तर । पराक्रमाचा शौर्यकर । नासला कामे ।।२९।। जनकाचे मिथिलेवरी । जाहली ना रावणस्वारी । वाल्मीकींची बोले वैखरी । रामायणी ।।२३०।। क्षत्रियांचे धनुष-ढाल मिथिलेवरी करी चाल । नव्हता की लङ्केश काळ । पापात्मा त्यात ।।३१।। त्याने शिवधनु ना पाहिले । ना धारिले, ना उचलिले । उरावरी त्याचे पडले। दंतकथा ही ।।३२।।
...
गुरु.अभ्यंकर यांचे अन्य ग्रंथातील भाष्य
श्रीराम संपूर्ण भारताचे चक्रवर्ती सम्राट होते. सम्राटाला राष्ट्नीय जीवन प्रधान असते. व्यक्तिगत जीवनाला, व्यक्तिगत सौख्याला राष्ट्न्सौख्यासाठी राजाला, सम्राटाला तिलांजली द्यावी लागते. एखाद्या डॉक्टरचे व्यवहारातील उदाहरण घेऊ. पत्नीला घेऊन तो एखाद्या नाटकाला वा सिनेमाला निघालेला असताना समोर अस्वस्थ रुग्ण आला तर नाटक-सिनेमा रद्द करून रुग्णाला स्वास्थ्यपूर्ण करणे डॉक्टरचे आद्य कर्तव्य ठरते! संपूर्ण राष्ट्नच्या स्वास्थ्याचा विचार करणाऱ्या सम्राटाचे आद्य कर्तव्य फार व्यापक आणि श्रेष्ठतम असते. सीतात्यागानंतर श्रीरामांनी सर्व सौख्यांचा त्याग केला. आश्रमातील सीतेप्रमाणेच ते विरक्त जीवन जगले. पुढे झालेल्या यज्ञातही, शेजारी सीतेची सुवर्णप्रतिमा ठेवून तो याग संपन्न केला. श्रीरामांनी आपला त्याग का केला, याची पूर्ण जाणीव सीतेला होती. ती लक्ष्मणाला म्हणते, ``माझ्या वतीने काही एक भेद मनामध्ये न आणिता सर्व सासूबाइंर्ना हात जोडून मस्तकाने त्यांच्या चरणांना अभिवादन कर व राजालाही कुशल कळीव. हे लक्ष्मणा, सर्वांच्याच पुढे तू मस्तक लववून माझा निरोप सांग आणि धर्मकृत्याविषयी अतिशयच दक्ष असलेल्या राजाला कळीव की, ``हे राघवा, खरोखर सीता कशी शुद्ध आहे हे तू जाणीतच आहेस व तुझ्याविषयी तिचे ठिकाणी पराकाष्ठेचे प्रेम असून ती सर्वदा तुझ्या हिताविषयी तत्पर असते. परंतु हे वीरा, लोकांत होणाऱ्या अपकीर्तीला भिऊन तू माझा त्याग केला आहेस.''
सीतात्याग सीतेला समजला, पण साहित्यिकांना, अनुवादकांना कळला नाही, हे दुर्दैव!

वाल्मीकी रामायण हा खरा इतिहास आहे, खरे श्रीरामचरित्र आहे. त्यानंतर झालेले रामायणाचे अवतार त्या त्या कवी-लेखकांनी स्वेच्छापूर्वक लिहिले आहेत.
श्रीरामचरित्राची पावले मानवी संस्कृतीवर चिरंतन उमटलेली आहेत आणि युगानुयुगे जगाला मार्गदर्शनही करणार आहेत. वाल्मीकि रामायणाचे भविष्य सायणाचार्यांनी वर्तविले आहेच -
यावत्स्थास्यन्ति गिरय: सरितश्च महीतले ।
तावद् रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति ।।
जोपर्यंत या भूतलावर पर्वत नद्या आहेत, तोवर श्रीरामायणकथा लोकांमध्ये अजरामरच राहील.

संपर्क -शंकर वासुदेव अभ्यंकर, आदित्य प्रतिष्ठान
४/१५ वेदांतनगरी सोसा; कर्वेनगर, पुणे-५२
फोन-(०२०) २५४४५१७१

संपला तो थांबला!
या वृत्तपत्रास ३९वर्षे झाली आणि त्याचे ४०वे वर्ष सुरू झाले. वास्तविक त्याचे प्रथम प्रकाशन १२ फेब्रुवारीचे असल्यामुळे गेल्याच महिन्यात हा अंक निघायला हवा होता, पण काही अपरिहार्य तांत्रिक कारणांनी ते जमले नाही. या अंकाच्या निमित्ताने त्याच्याशी संबंधित साऱ्यांना नम्र प्रणाम करणे हे कर्तव्यच आहे. यापुढेही तो लोभ राहावा अशी प्रार्थना आहे.

या अंकाच्या बाबतीत अेक गोष्ट फार बरी आहे की कोणत्याही अतिकठोर नियमांच्या आणि अनाठायी बंधनांच्या दोरखंडानी ते बांधून आणि बाधून घेत नाही. अंक वेळेत निघावा, तो पुरेसा चांगला निघावा याची आपल्या परीने दक्षता घ्यायची ती घ्यायचीच; पण दक्षता घेअूनही कधी अत्यंत अपरिहार्यच कारणाने ती हुकली तर हतोत्साही निराश होअून थांबायचे नाही, पुन्हा चालू पडायचे. काही सज्जनांचा आक्षेप, रोष झेलावे लागले तर तो त्यंाचा अधिकार समजून घ्यायचा. दक्षता अधिक सांभाळू पाहायची. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत या अंकाला अनेकानेक अडचणी आल्या तरी ते थांबले नाही, आणि  केवळ थांबले नाही म्हणूनच ४० वर्षे चालू राहिले. बाकी पोस्टाच्या तक्रारी, आमच्याही मर्यादा, वाचकांची सोय सवड या तर नित्याच्या सबबी असतात, त्यांत तथ्यही असतेच. पण त्यावर चडफडत राहून त्रागा करण्यापेक्षा जे प्राप्त होते त्यातील चांगले निवडता येते हे धोरण ठेवले, आणि ते वाचकांनीही मनापासून स्वीकारले. अेरवी अंकाला अमूक तमूक वर्गणी, मग त्यातील आितके अंक मिळाले नाहीत, वर्गणी कधी संपली, त्यापुढील किती बाकी राहिली, ..आितकीच कशी राहिली, ज्यांची बाकी राहिली त्यांचा अंक बंद करायचा का, हा सारा तापत्रय कमी करून ते सारे व्यवहार वाचकांच्या निर्णयावर सोपविले गेले. ज्याला जे वाटेल ते त्याने कधीही द्यावे, ...किंवा न द्यावे! -त्याबद्दल या अंकाची काही तक्रार नाही, त्याविषयी काही मतच नाही. आपला वाचक जाणता आहे, तो योग्य ते करतोच यावर पूर्ण भरंवसा ठेवल्यामुळे दीर्घकाळ म्हणता येआील आितके चालता आले. `आम्ही इतके करूनही कुणी प्रतिसाद देत नाही, मग हे कुणासाठी करायचे?' असा आत्मगौरवी तोरा या अंकास कधी जमला नाही. वाचकांनीही तो प्रपंच सांभाळला. समाजाचा योगक्षेम समाज चालवितो असे म्हणतात, त्याचाच हा प्रत्यय होता. त्यातूनही काही घट राहिली तर ती सोसेल तोवर ते चालवावे असा हा कारभार! अजूनी तो चालविण्याची अुमेद आहे हे आज ठणकावून सांगायला हवे.

 ज्या नियतकालिकाच्या मागे कोणताही मोठा अुद्योग, धर्मपीठ, संस्था-संघटना किंवा पक्ष असे काही नाही; अशी नियतकालिके आजच्या मराठीत तरी अपवादानेच असतील. `अपवादानेच असतील' हे खरे तर जरा सभ्यता म्हणून लिहिले, तसे कोणी नसेलच. त्यातूनही चाळीस वर्षांचे आयुष्य लाभणारे नियतकालिक माहीत नाहीच. आता पुढचा प्रश्न दर्जाचा. हा अंक रेल्वेच्या स्टॉलवर किंवा स्ँटडवर देता येण्याआितके त्याचे मार्केटिंग जाल विस्तारता आले नाही. कधीमधी प्रयत्न करून पाहिले पण ते फसले. कारण तिथे विकण्यासाठी जो चटपटीतपणा लागतो, तो देता आला नाही. तसेच लब्धप्रतिष्ठित मेळेमेळावे, पुरस्कार, स्पर्धा यांच्या रांगेत उभारणेही जमले नाही. अेक तत्व लक्षात आले ते सत्य होते. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट देणे आपल्याला शक्य नाही. आपल्या मापाच्या साध्या चपला पायात सरकविणे चांगल्या चालीसाठी पुरे ठरते. पुष्कळशी नामख्यात नियतकालिके पुरोगामीत्व मिरविण्यासाठी ज्योतिषावर सडकून टीका करतात, आणि आपल्याच अंकात नियमित राशीभविष्य छापतात. जाहिरातबाजीवर तोंड टाकतात आणि आपलेच मुखपृष्ठ जाहिरातीने बरबटतात. असला काही दांभिक मोठेपणा  चालू  न  देणारा वाचक, हा या अंकाचा नियंता राहिला आहे, आणि या अंकाने तो आनंदाने स्वीकारला आहे....भले त्यामुळे विस्तारावर मर्यादा का पडेनात!
आजच्या जमान्यात जे बदल होत चालले आहेेत, त्याची दबक काहीजण व्यक्त करतात, आपलं कसं -हा त्यात काळजीचा सूरही असतो. ती काळजी करून चालणार नाही; -काळजीचं तसं कारणच नसतं. जातस्यहिध्रुवोर्मृत्यु (जन्माला आलेल्याचा मृत्यू अटळ) हे खरे आहे. गेल्या शतकातील  ज्या नियतकालिकांची नावे सन्मानाने घेतली जातात, ती तशी समर्थही होती. आज तीही काळाच्या पडद्याआड गेली. केसरी मराठ्याचे सोडा, पण सत्यकथेसारखी वाङ्मयीन ताकतही क्षीण झाली, अलीकडच्या काळात `अंतर्नाद' अंतर्धान पावले. अंतर्नादचे संपादक भानू काळे यांच्याशी संवाद करताना कित्येकदा ते `आपण समदु:खी' म्हणायचे! पण या अंकाच्या मते ते समसुखी असणे आहे. करता येआील ते आटोकाट केल्यावर थांबण्याचेही सुख मानायला काय हरकत आहे?  थांबणे कुणाचे ठरलेले नसते. या अंकाचेही थांबणे आजतरी ठरलेले नाही; जेव्हा ते थांबेल तेव्हा कदाचित वाचक हळहळेल, या अंकाला समाधान मात्र असेल.

चाळीस वर्षांच्या आरंभाच्या चांंगल्या प्रसंगी ही जाण्याची भाषा कशाला असे कोणी म्हणेल, पण त्यातला भावार्थ असा की या अंकाच्या दीर्घ चालीचे फार कौतुक नसावे, त्याच्या असण्याचा टेंभा नसावा, तसेच अुद्या वेळ आली तर थांबण्याचे क्लेश नसावेत! जोवर आपल्या परीने करता येआील ते चांगले करू, त्याचा हिशेब कुणाला द्यायचा नाही, कुणी विचारणार नाही. आपल्याकडे चित्रगुप्त ही चांगल्या-वाआीटाचा हिशेब ठेवणारी देवता असते म्हणतात. ती खरी असेल नसेल; पण समाजमनात आपल्या कामाचे जे गुप्त चित्र अुमटत असते तीच आपली कामगिरी, -यावर या अंकाची अधिक श्रध्दा आहे! त्याच श्रद्धेने पुढे चालत राहूया.

त्यांच्याच पद्धतीचा अवलंब 
अलीकडे संसद आणि राज्य विधानसभेत काम चालत नाही, तर केवळ दंगा करून सभा बंद पाडली जाते. मतदार जनतेचा हा अपमान आहे. कधीतरी राग व्यक्त होणे समजू शकते, पण यांचा राग असा सततच चालू राहणार असेल तर सभागृहे कायमची बंदच करावीत. सरकार त्याचे काम करत राहील. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी संसदीय चर्चेशिवाय अन्य पर्यायच नसतो, तोच नाकारायचा असेल तर विरोधी पक्षांचे काम काय? त्यांना पगार आणि भत्ते कशासाठी? घटनेने सांगितलेल्या तत्वांचा तो अपमान आहे. जनतेचा अपमान करून घेण्यासाठी त्यांना प्रतिनिधित्व दिलेले नाही. सभागृहात दंगा घालणाऱ्या सदस्यांना रोखण्यासाठी कोणीच काही करू शकत नसेल, तर जनतेने काय करायला हवे? त्यांच्या सभा जेथे जेथे होतात, त्याही त्याच असांसदीय प्रकारे बंद पाडायच्या का? जनता तेही करू शकेल, पण ती वेळ कदापि येअू देअू नये.
        -भैरव काळसेकर, खाडेघर रोड, कमानपाडा, गावकुस
रूढी आणि परंपरा
विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला सरकारी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री, विरोधी  पक्षाच्या नेत्याना मित्रत्वाने चहापानाला बेालावतात. ही अेक अुत्तम परंपरा होती, तिला आज विक्षिप्त रूप आले आहे. विधानसभेत चालणारे कामकाज ही दोन्ही पक्षांची समसमान जबाबदारी असते, त्याविषयी दोन्ही बाजू अत्यंत गंभीर असायलाच हव्यात कारण ते शेवटी जनतेला जबाबदार असतात. पण अलीकडच्या काळात प्रत्येक वेळी मित्रत्वाच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचीच रूढी पडली आहे. `आम्हाला तुमचा चहा नको' असे म्हणणारे विरोधी पक्ष काय विचार करतात ते कळत नाही. जनतेच्या ज्या समस्या आहेत त्यावर काय आणि कसे कामकाज चालावे याची वास्तविक अनौपचारिक स्नेहातून चर्चा होण्याची गरज आहे. तो अुद्देश टाळला जातो, आणि सभागृहाच्या पहिल्या मिनिटापासून धुडगूस सुरू होतो, काम बंद पाडले जाते.
सरकार आणि विरोधी पक्ष हे सात पिढ्यांचे वैरी असावेत असे वागतात. जनतेला सभागृहात पोचणे शक्य नसते, म्हणून आम्ही यांना प्रतिनिधी  या नात्याने पाठवितो. तेथील खर्च आणि चहापानसुध्दा जनतेच्या पैशातूनच होणार असते. तरीही जनतेच्या त्या चहावर यांचा राग का? काही झाले तरी अन्नावर राग काढू नयेे अशी आपली शिकवण असते. कधीतरी कैव्हातरी तसा राग व्यक्त झाला तर त्याचा आबही राहील. पण आता या नेत्यांना आितकी मुर्वत नसेल तर ते बोलावणे कायमचे बंदच करावे; आणि जनतेच्या पैशाचा आणि सौजन्याचा अवमान टाळावा हे बरे.
खरे तर अधिवेशनाच्या आधी विरोधकांनीच चहापान करावे, आणि समारोपाचे भोजन मुख्यमंत्र्यांनी द्यावे; आितके मोकळे वातावरण राखले जावे. विरोधकांनी आमच्या समस्या संसदीय चर्चेने मार्गी लावण्यासाठी त्यांना कौशल्य वापरावे लागेल. आमच्या अन्नाला दोघांनी जागावे.
  -नारायण ग.केळकर, सांगली
   फोन-८८८८७३४८७८

महाराष्ट्नतील शतक महोत्सवी नागरी सहकारी बँका
शामराव विठ्ठल को-ऑप.बँक        ठाणे १९०६
डिफेन्स अकाउंट्स को-ऑप. बँक पुणे १९०६
कॉसमॉस को-ऑप. बँक                 पुणे १९०६
दि अकोला डीसीसी बँक               अकोला १९०९
भिंगार अर्बन को-ऑप. बँक    नगर १९०९
नगर अर्बन को-ऑप. बँक अहमदनगर १९१०
महाराष्ट्न् स्टेट को-ऑप. बँक मुंबई १९११
दि पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक पंढरपूर १९१२
दि कोल्हापूर अर्बन को-ऑप. बँक कोल्हापूर १९१३
पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हंट्स बँक पुणे १९१४
दि मॉडेल को-ऑप. बँक मुंबई १९१६
दि कराड अर्बन को-ऑप. बँक कराड १९१७
राजर्षि शाहू गव्हर्मेट सर्व्हंट्स को-ऑप. बँक कोल्हापूर १९०६
राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँक कागल १९१७
डेक्कन मर्चंट्स को-ऑप. बँक मुंबई १९१७
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे १९१७
एन.के.जी.एस.बी. बँक मुंबई १९१७
सारस्वत को-ऑप. बँक मुंबई १९१८
बॅसीन क्रॅथलिक को-ऑप. बँक वसई १९१८

विद्यावाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर हे प्रकांड पंडित, आणि व्यासंगी संशोधक म्हणून सर्वदूर परिचित आहेत. त्यांची ग्रंथसंपदाही मोठी आहे. अलीकडे त्यांनी श्रीरामायणाचे ओवीबध्द सुगम रूपान्तर केले असून त्यावर निरूपणस्वरूपी रसाळ भाष्यही केलेले आहे. या बृहद्ग्रंथाचे खंड प्रकाशित होत आहेत. `बालकाण्ड' याआधी प्रकाशित झाले असून आता `अयोध्याकाण्ड'ची प्रतीक्षा आहे.
या अभिनव रचनेचा तपशील द्यायचा तर, हे रामायण वाल्मीकींच्या मूळ संहितेप्रमाणे असून आजच्या वाचकांस समजेल आितके ते सुगम आहे. संहितेचा मूळ संस्कृत श्लोक, त्याचे आजच्या मराठीत गद्य भाषांतर आणि त्यानंतर अभ्यंकरांचे ओवीरूप निरूपण अशी ग्रंथाची रचना आहे. गुरु.अभ्यंकर यांच्या स्वभाववृत्तीनुसार ठसठशीतपणा, शुध्दता, सौष्ठव, आणि स्वमतप्रतिपादनातील जोश ही वैशिष्ट्ये ग्रंथात दिसून येतात. या समग्र ग्रंथाचे पारायण करण्यासाठी त्याची विभागणी त्यांनी सुचविली आहे. शिवाय रामायणासंबंधाने काही आक्षेप नोंदवून त्यांचे तर्कशुध्द खण्डन आणि रामचरिताच्या वैशिष्ट्यांचे मण्डन ग्रंथारंभी केले आहे, तेही अभ्यसनीय आहे.
श्रीरामनवमीच्या या पर्वकालात या ग्रंथापैकी `बालकांड' मधून काही भाग येथे दिला आहे -

रामायणातील राजनीती, धर्मनीती, अर्थनीती, युद्धनीती, नगरनिर्माणविद्या, विमानविद्या, दिव्य शस्त्रास्त्रसाधनविद्या, अध्यात्मविद्या, भौतिकविद्या या सर्वांचा अभ्यास करावा तितका थोडाच! परंतु याबरोबर रामायण हे काव्य म्हणूनही अलौकिक आहे. प्रभु रामचंद्र भारताचे महाप्राण आहेत आणि महर्षी वाल्मीकि भारताचे आदिकवी आहेत. सर्व मानवी जीवनात राम ओतप्रोत भरला आहे. श्रीरामांच्या चरित्राला जगात तोड नाही. श्रीराम मर्यादापुरुषोत्तम आहेत. आदर्श पुत्र, आदर्श पति, आदर्श बंधु, आदर्श मित्र, आदर्श योद्धा, आदर्श राजा, आदर्श सरसेनापति या दृष्टीने श्रीरामचरित्र अतुलनीय आहे.
...
वेदातील श्रीरामकथा- ऋग्वेदाच्या दशम मण्डलात तिसऱ्या सूक्तातील तिसरी ऋचा एकश्लोकी रामायण म्हणून मानली जाते. ती ऋचा अशी-
`भद्रो भद्रया सचमान आगात् स्वसारं जारो अभ्येति पश्चात्।
सुप्रकेतैर्द्युभिरग्निर्वितिष्ठन् रूशद्भिर्वर्णैरभि राममस्थात् ।।'
अर्थात `अंधकारजेता, उषाप्रियकर, शुभ्रतेज संपन्न आणि रमणीय अग्नि उषेसमवेत अवतीर्ण होत आहे.
काही पंडितांनी या ऋचेचा रूपकात्मक अर्थ रामायणपर केला आहे. उदा. भद्र:- वंदनीय श्रीराम, भद्रया - वंदनीय सीताद्वारा, सचमान - सेवासंगतीत असताना, आगात् - वनात आले. स्वसारम् - सीतेचे अपहरण करण्यासाठी, जार: - रावण, पश्चात् - रामलक्ष्मण कुटीत नसताना, अभ्येति - आला आणि त्याने सीतेला रामांहाती सोपविले. अग्नि: - रावणाचा वध झाल्यावर अग्नि सुप्रकेतै: द्युभि: - श्रीरामपत्नि सीतासमवेत, रामम् अभि - श्रीरामांसमोर रुशद्भिर्वर्णै: - उद्दीप्त तेजासह, अस्थात् - प्रकट झाला.
असेच रूपकात्मक उल्लेख ऋग्वेदात, अथर्ववेदात, शतपथ ब्राह्मणात, श्रीरामोत्तरतापिनी उपनिषद, श्रीरामपूर्वतपिन्युपनिषद सीता उपनिषद इत्यादी अनेक स्थळी मिळतात. अथर्ववेदात (१०.२.३१) अयोध्येचा उल्लेख येतो. या दृष्टीने विचार करता श्रीरामकथेची प्राचीनताही सिद्ध होते.
आचार्य आणि संत वाङ्मयात श्रीराम - महर्षी वाल्मीकि श्रीरामांचा गौरव गाताना म्हणतात- `प्राप्तराज्यस्य रामस्य राक्षसानां वधे कृते। आजग्मुर्मुनय: सर्वे राघवं प्रतिनन्दितुम् ।।'   (वा.रा.७.१.१)
`राक्षसांचा संहार केल्यावर जेव्हा भगवान श्रीरामाला स्वराज्याची प्राप्ती झाली तेव्हा त्यांचे अभिनंदन करण्यासाठी समस्त ऋषी-महर्षी अयोध्यानगरीत आले.'
महर्षी वाल्मीकींनी या ऋषींची यादी दिली आहे- `कौशिक, यवक्रीत, गार्ग्य, गालव आणि मेधातिथीचा पुत्र कण्व हे पूर्वदिशेचा आश्रय करून राहणारे ऋषि तेथे आले. त्वस्त्यात्रेय, भगवान नमुचि, प्रमुचि, अगस्त्य, अत्रि, भगवान सुमुख आणि विमुख हे जे दक्षिणदिशेचा आश्रय करून राहणारे मुनि तेही अगस्त्यासहवर्तमान तेथे आले. नृषंगु, कवषी, धौम्य आणि महर्षी कौषेय हे जे पश्चिम दिशेचा आश्रय करून राहाणारे मुनि तेही शिष्यांसहवर्तमान तेथे आले. वसिष्ठ, कश्यप, अत्रि, गौतमासहवर्तमान विश्वामित्र, जमदग्नि आणि भारद्वाज हे जे उत्तर दिशेस नित्य वास्तव्य करणारे सप्तर्षी तेही तेथे आले होते.' (वा.रा.७.१.२ ते ६) या सर्व ऋषींनी प्रसंगोपात्त श्रीरामांचा गौरव गायिला आहे.
`योगवासिष्ठ' ग्रंथात `रामस्तु भगवान स्वयम् ।' आणि ब्रह्म संहितेत `राघवो भगवान स्वयम्।' असे उल्लेख आहेत. स्वत: महर्षि वाल्मीकीही श्रीरामांना `आदिकर्ता स्वयं प्रभु:।' (वा.रा. ६.११७-१८) असे म्हणतात.
`याज्ञवल्क्य स्मृती'ने श्रीरामांना परब्रह्म म्हटले आहे-
`अवतारा बहव: सन्ति कलांशाश्वांशविभूतय:।
राम एव परब्रह्म सच्चिदानन्दमव्ययम् ।।'
रामायणाची थोरवी गाताना सायणाचार्य म्हणतात,
`यावत्स्थास्यन्ति गिरय: सरितश्च महीतले ।  तावद्रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति ।।'
अर्थात् `या भूतलावर जोपर्यंत पर्वत आणि नद्या आहेत, तोपर्यंत ही रामायणकथा लोकांत प्रचलीत असेल.'
महर्षि अत्रि म्हणतात, `नमामि भक्तवत्सलं, कृपालु, शील, कोमलं-- जगद्गुरुं च शाश्वतं, तुरीयमेव केवलं ।' अर्थात भक्तवत्सल, कृपालू, श्रेष्ठ शील, कोमल तनू असलेल्या शाश्वत जगद्गुरू आणि तुरीय असलेल्या श्रीरामांना मी वंदन करतो.'
महर्षि व्यासांचे कर्तृत्व अमर्याद आहे. `अध्यात्म रामायण' ही त्यांचीच रचना मानली जाते.
उपवर सीता
पृथ्वीमधून प्रगट झालेल्या सीतेचा सांभाळ करून ती आता मोठी झाल्यावर तिला मागण्या येऊ लागल्या. तिला प्राप्त करण्यासाठी कोणते निकष आहेत हे काहीजणांनी विचारले होते. तेव्हा त्यांना जनकाने शिवधनुष्य दाखविले होते. जनकराजा विश्वामित्राला त्यासंबंधी सांगतो आहे.
बालकाण्ड सर्ग - ६६
न शेकुर्ग्रहणे तस्य धनुषस्तोलने%पि वा । तेषां वीर्यवतां वीर्यमल्पं ज्ञात्वा महामुने ।।१९ ।।
प्रत्याख्याता नृपतयस्तन्निबोध तपोधन । तत: परमकोपेन राजानो मुनिपुङ्गव ।।२० ।।
अरुन्धन् मिथिलां सर्वे वीर्यसंदेहमागता: । आत्मानमवधूतं मे विज्ञाय नृपपुङ्गवा: ।।२१ ।।
रोषेण महताविष्टा: पीडयन् मिथिलां पुरीम् । तत: संवत्सरे पूर्णे क्षयं यातानि सर्वश: ।।२२ ।।

परंतु त्यांच्यापैकी कोणालाच हे धनुष्य तोलता आले नाही. हे महामुने! त्या पराक्रमी नरेशांकडे फारच थोडे बल आहे हे जाणून मी त्यांच्यापैकी कोणालाच माझी कन्या द्यायला नकार दिला. याच्या नंतर जी घटना घडली, ती आपणही ऐकावी. हे मुनी! माझ्या नकारानंतर हे सर्व राजे क्रोधित झाले. आपल्या पराक्रमावरच संशय घेतल्याने त्यांनी मिथिलेला चारी बाजूंनी घेरले. माझ्याकडून त्यांचा अपमान झाला असे मानून त्या श्रेष्ठ राजांनी रागावून जाऊन मिथिला नगरीला चोहो बाजूंनी त्रास द्यायला प्रारंभ केला. मुनीश्रेष्ठा! पूर्ण एक वर्षभर त्यांनी मिथिलेला वेढा घातला होता. या काळात युद्धसाहित्यही कमी पडू लागले. यामुळे मी अतिशय दु:खी झालो.
पुरविण्या की जिज्ञासेस । ठेविले श्रीशिवधनुष । परि ना कोणासीही यश । धारण्यासी ।।२०५।। म्हणती विक्रमी नरेश । महाबली नित्य स्वत:स । परि बल त्यांचे अल्पांश । ज्ञात मजला ।।६।। कन्या जरी ही उपवर । दिला मी नरेशा नकार । चढला तया क्रोध फार । शब्दाने मम ।।७।। घडली नंतर घटना । अपमान वाटे नृपांना । साहवेना त्या अपमाना । जरी अशक्त ।।८।। नाचवुनी आपुला घोडा । घालती मिथिलेसी वेढा । संतापाचा क्षत्रियसडा । ओलाण्डिती ।।९।। अत: करिती तिरस्कार। आक्रमणा करिती घोर । पीडेस माण्डियले थोर । मिथिलापुरीस ।।२१०।। गेले की एक संवत्सर । वेढलेले राही नगर । क्षीण शक्ती साधनसार । युद्धामुळे ।।११।। जाणता धनुषाचा पण । कातरले अंत:करण । राजे मानिती अपमान । अहङ्कारी ।।१२।। डावलुनिया या पणास । वेढुनी दिव्य मिथिलेस । म्हणुनी माण्डिती युद्धास । निर्दयपणे ।।१३।।
सुकन्या असे अयोनिजा । वीर्यशुल्का ती कमलजा । का ही प्रत्यक्ष विश्वा ऊर्जा । वंदनीय ।।१४।। पौर्णिमेसमान श्रीसीता । लावण्य गुण संपन्नता । होतसे हर्ष राजचित्ता । जनकाचे ।।१५।। सर्व क्षत्रियांसी सादर । जनक राजर्षि तत्पर । तये माण्डिले स्वयंवर । दुहितेचे त्या ।।१६।। स्वयंवरा कठीण पण । होता वीरा अति दारुण । शिवधनुष्यासी धारण । करिल जो गा ।।१७।। तयाचेच की वीर-गळा । जानकी अर्पील सुमाला । सद्गुणां षोडश स्वकुळा । भाग्यवंता ।।१८।। क्षत्रिय बहु आले-गेले । प्रयत्ना करूनी थकले । परि धनुष्य ना पेलले । राजियांसी ।।१९ ।। अपमान झोंबता मनी । केले की कपट राजांनी । दुष्टांनी एकत्र येऊनी । वेढिली मिथिला ।।२२०।। श्रीजनकाने अत्यादरे । स्वर्गस्थ देवांचे सुवरे । क्षत्रिया भीषण सङ्गरे । परास्त केले ।।२१।। त्या मिथिला राजसभेत। अवतरे कौसल्यासुत । लीलया धनुष धारित । जिङि्कला पण ।।२२।। पाहुनी सावळा श्रीराम । थक्की मिथिलेचे धाम । पूर्णब्रह्म श्रीपूर्णश्याम। वरिला सीते ।।२३।। विषय झाला अलङ्कार । सीता-श्रीराम स्वयंवर । प्रतिभावंत विद्वद्वर । प्रतिभाविलास ।।२४।। श्रीराम-सीता समन्वय । परस्परांसी हो अन्योन्य । स्वयंवर नव्हे, समाह्वय। सादर केला ।।२५।। धनुष्यासी स्वये धारून । रामे जिङि्कला राजपण। अजरामर केला क्षण । इतिहासी ।।२६ ।। समाह्वय तो झाला कसा। गोजिरा सर्व इतिहासा । वर्णू सादर स्थळी तसा । गौरवाने ।।२७।।
न साहवे धनूस भारी । रावण पडे भूमीवरी । शिवधनुष्य उरावरी । दंतकथा असे ।।२८।। उत्तरकाण्डी सर्गांतर । वर्णिला असे सविस्तर । पराक्रमाचा शौर्यकर । नासला कामे ।।२९।। जनकाचे मिथिलेवरी । जाहली ना रावणस्वारी । वाल्मीकींची बोले वैखरी । रामायणी ।।२३०।। क्षत्रियांचे धनुष-ढाल मिथिलेवरी करी चाल । नव्हता की लङ्केश काळ । पापात्मा त्यात ।।३१।। त्याने शिवधनु ना पाहिले । ना धारिले, ना उचलिले । उरावरी त्याचे पडले। दंतकथा ही ।।३२।।
...
गुरु.अभ्यंकर यांचे अन्य ग्रंथातील भाष्य
श्रीराम संपूर्ण भारताचे चक्रवर्ती सम्राट होते. सम्राटाला राष्ट्नीय जीवन प्रधान असते. व्यक्तिगत जीवनाला, व्यक्तिगत सौख्याला राष्ट्न्सौख्यासाठी राजाला, सम्राटाला तिलांजली द्यावी लागते. एखाद्या डॉक्टरचे व्यवहारातील उदाहरण घेऊ. पत्नीला घेऊन तो एखाद्या नाटकाला वा सिनेमाला निघालेला असताना समोर अस्वस्थ रुग्ण आला तर नाटक-सिनेमा रद्द करून रुग्णाला स्वास्थ्यपूर्ण करणे डॉक्टरचे आद्य कर्तव्य ठरते! संपूर्ण राष्ट्नच्या स्वास्थ्याचा विचार करणाऱ्या सम्राटाचे आद्य कर्तव्य फार व्यापक आणि श्रेष्ठतम असते. सीतात्यागानंतर श्रीरामांनी सर्व सौख्यांचा त्याग केला. आश्रमातील सीतेप्रमाणेच ते विरक्त जीवन जगले. पुढे झालेल्या यज्ञातही, शेजारी सीतेची सुवर्णप्रतिमा ठेवून तो याग संपन्न केला. श्रीरामांनी आपला त्याग का केला, याची पूर्ण जाणीव सीतेला होती. ती लक्ष्मणाला म्हणते, ``माझ्या वतीने काही एक भेद मनामध्ये न आणिता सर्व सासूबाइंर्ना हात जोडून मस्तकाने त्यांच्या चरणांना अभिवादन कर व राजालाही कुशल कळीव. हे लक्ष्मणा, सर्वांच्याच पुढे तू मस्तक लववून माझा निरोप सांग आणि धर्मकृत्याविषयी अतिशयच दक्ष असलेल्या राजाला कळीव की, ``हे राघवा, खरोखर सीता कशी शुद्ध आहे हे तू जाणीतच आहेस व तुझ्याविषयी तिचे ठिकाणी पराकाष्ठेचे प्रेम असून ती सर्वदा तुझ्या हिताविषयी तत्पर असते. परंतु हे वीरा, लोकांत होणाऱ्या अपकीर्तीला भिऊन तू माझा त्याग केला आहेस.''
सीतात्याग सीतेला समजला, पण साहित्यिकांना, अनुवादकांना कळला नाही, हे दुर्दैव!

वाल्मीकी रामायण हा खरा इतिहास आहे, खरे श्रीरामचरित्र आहे. त्यानंतर झालेले रामायणाचे अवतार त्या त्या कवी-लेखकांनी स्वेच्छापूर्वक लिहिले आहेत.
श्रीरामचरित्राची पावले मानवी संस्कृतीवर चिरंतन उमटलेली आहेत आणि युगानुयुगे जगाला मार्गदर्शनही करणार आहेत. वाल्मीकि रामायणाचे भविष्य सायणाचार्यांनी वर्तविले आहेच -
यावत्स्थास्यन्ति गिरय: सरितश्च महीतले ।
तावद् रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति ।।
जोपर्यंत या भूतलावर पर्वत नद्या आहेत, तोवर श्रीरामायणकथा लोकांमध्ये अजरामरच राहील.

संपर्क -शंकर वासुदेव अभ्यंकर, आदित्य प्रतिष्ठान
४/१५ वेदांतनगरी सोसा; कर्वेनगर, पुणे-५२
फोन-(०२०) २५४४५१७१

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन