पंचगव्य
ऑर्गेनिक फार्मिंग असोसिएशन ऑफ इंडिया (ओफाय) - ही आपल्या देशातील सर्व सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संस्था आहे. ओफायच्या सभासदांमध्ये महिला शेतकरीसुद्धा आहेत व त्यांचा सक्रीय सहभाग असतो. सहकारी संस्था म्हणून नोंदणीकरण झाले आहे. संस्थेचे मुख्य धोरण सेंद्रीय शेतीचा प्रचार, प्रसार व पुरस्कार करणे व यासाठी उपलब्ध सर्व साधनांचा वापर करणे आहे. ओफायने लेबिलंग स्कीम व स्वयंशासित प्रमाणीकरण पद्धती (पीजीएस) उपलब्ध करून देऊन सेंद्रीय शेतकऱ्यांच्या शेतमालाला प्रमाणीकरण प्राप्त करून दिले आहे. हे प्रमाणीकरण देशांतर्गत व्यापारासाठी आहे. भारतातील प्रत्येक राज्यातील सेंद्रीय शेतकऱ्यांच्या संघटना ओफायशी जोडल्या गेल्या आहेत. महाराष्ट्न् ऑर्गेनिक फार्मिंग फेडरेशन (मॉफ) ही संस्थासुद्धा ओफायशी जोडली गेली आहे. नैसर्गिक तत्वावरील सेंद्रीय शेतीसाठीच ही संस्था आहे व तिचा जीएमओ सीडस् व रासायनिक शेती या गोष्टींना ठाम विरोध आहे.
हरितक्रांतीच्या नावाखाली आपल्या देशात संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांची एक लाट आलेली आहे. `अधिक धान्य पिकवा' या घोषणेमुळे शेतकरी वर्ग या लाटेत सामील झाला. सुरुवातीच्या काळात शेती उत्पादन वाढल्यासारखे वाटले, पण गेल्या पंचवीस वर्षांत शेतजमिनीचा कस कमी होत चालला, पाण्याचा तुटवडा आहे व खर्चाच्या प्रमाणात उत्पादन व उत्पन्न न वाढल्यामुळे शेतकरी कर्जाच्या बोजाखाली आहे.
हरितक्रांतीच्या नाण्याची ही पहिली बाजू तर दुसरी बाजू अन्न खाणाऱ्या ग्राहकांची. आज प्रचलित शेतीपद्धतीमधील कोणतेही शेती उत्पादन हे रासायनिक खता-औषधांशिवाय निर्माण होत नाही. त्यामुळे सर्व अन्न प्रदूषित आहे, विषयुक्त आहे. शेती, जमीन, पाणी व पर्यावरण हे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. याचा भयानक परिणाम मानवी आरोग्यावर प्रकर्षाने जाणवत आहे.
पंचगव्य :
वेद काळापासून गाय ही शेती व्यवसायाशी अत्यंत निगडीत आहे. गाईला सर्व धर्मांत व शास्त्रात पवित्र मानले गेले आहे. `गावो विश्वस्य मातरम्' असे म्हटले आहे. गाईच्या स्वामित्वासाठी युद्धे होत व गोधन ज्याच्याकडे जास्त तो सामर्थ्यवान, वैभवसंपन्न व शूरवीर समजला जात असे. गोमय, गोमूत्र व दूध, गाईचे तूप, गाईचे दही या पंचामृताची आहुती यज्ञांमध्ये देत असत. याला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. गाईच्या या पाच पदार्थांच्या मिश्रणास पंचगव्य म्हणतात. प्रायश्चित्तासाठी हे पंचगव्य प्राशन करावयाचे असते. यामागे शास्त्र आहे, संकेत आहेत. तांबड्या गाईचे (गो)मूत्र, पांढऱ्या गाईचे गोमय, कांचन वर्ण गाईचे दूध, काळया रंगाच्या गाईचे दही आणि नीलवर्ण गाईचे तूप असावे. या शोधक द्रव्य मिश्रणासाठी त्यातील प्रत्येक पदार्थासाठी मंत्र आहेत. पंचगव्य तीन वेळा प्राशन करावे. `जे पाप माझ्या देहाच्या त्वचेत आणि अस्थीत राहिले असेल, ते पंचगव्याच्या प्राशनाने, अग्नीने सरपण जळावे तसे नष्ट होवो.'
शेणाने सारवलेल्या जमिनीत कीड व बुरशीनाशक गुणधर्म कसे येतात हे पाहण्यासाठी एक प्रयोग केला गेला. गोमय व गोमूत्र एकत्र करून ते १० हजार आरपीएम ने घुसळले. तापमान वाढू नये म्हणून तेथे थंड करण्यासाठी शीतपद्धती वापरली. त्या मिश्रणातील रस बाहेर काढला. तो रस पेट्नीडिशमध्ये अगार हे माध्यम वापरून त्यावर घेतला. सर्व प्रकारच्या बुरशी त्यावर सोडल्या. कोणत्याही बुरशीची वाढ झाली नाही. अगदी इकोलाय व साल्मुनेला बुरशीपण रोखल्या गेल्या. हा कीड व बुरशीनाशक गुणधर्म आहे.
वशिंड व आकाशाकडे टोके असणारी शिंगे धारण करणारी भारतीय गाय कोणत्याही तापमानात राहू शकते. तिच्या गळयातील पोळीमध्ये तापमान सहन करण्याची शक्ती आहे. गाईच्या खाण्यात विषारी पाला आला तरी तिच्या दुधावर दुष्परिणाम होत नाही. गाईच्या वशिंडात `सूर्यकेतू' नावाची नाडी आहे. सूर्य प्रकाशात ती कार्यान्वित होते. सूर्यापासून आलेले सुवर्णभार यातूनच तिच्या दुधात, शेणात व गोमूत्रात मिसळतात. त्यामुळे सर्व रोगनाशक, सर्व विषनाशक गुणधर्म प्राप्त होतात. गाय नेहमी कोवळया/हलक्या उन्हात राहणे पसंत करते.
भारतीय वंशाच्या गाईमधून बाहेर पडणारी ऊर्जा ही इतर सर्व प्राण्यांहून जास्त असते. देवाच्या फोटोत त्याच्या चेहऱ्यामागे एक तेजोवलय (आभा मंडल) दाखविलेले असते. प्रत्येक प्राणिमात्राला असेच तेजोवलय असते. ते त्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे द्योतक असते. डॉ.मूर्ती या न्यूक्लिअर शास्त्रज्ञाने या ऊर्जेचे मोजमाप केले आहे. मनुष्य प्राण्यांचे आभा मंडल २.५ ते २.८ मीटर असते. तर गाईची आभा ऊर्जा ४.५ ते ६ मीटर असते. गाईच्या तुपाची आभा ऊर्जा १४ मीटर, शेणाची ६ मीटर, गोमूत्राची ८.९ मीटर, दुधाची १२ ते १३ मीटर, दह्याची ६.५ ते ६.७ मीटर असते. ही सर्व मोजमापे युनिव्हर्सल थर्मोस्क्रॅनरच्या साहाय्याने घेतली आहेत. गाय आपल्या उच्छ्वासातून प्राणवायू सोडते. गाईच्या शरीरातून गुग्गुळ नामक पदार्थ गंधरूपाने बाहेर पडतो त्यामुळे प्रदूषण नष्ट होते.
कोडूमुडी येथील शंकराच्या देवळात डॉ.नटराजन गेले होते. त्यांना पंचगव्याचा तीर्थप्रसाद देण्यात आला. कुतुहलाने डॉ.नटराजन अंतर्मुख झाले. गाईच्या आंबवलेल्या मलमूत्रापासून माणसातील रोगांवर कसे औषध तयार करता येईल याचा विचार सुरू झाला. सलग तीन वर्षे पंचगव्य या सेंद्रीय पदार्थावर ते प्रयोग करत राहिले. पंचगव्यामुळे वनस्पतींची प्रतिकारशक्ती वाढते व वाढ चांगली राहते ही त्यांची निरीक्षणे आहेत. डॉ.नटराजन यांनी त्यांच्या भागातील संशोधक शेतकऱ्यांच्या सहकार्याने त्याचे थोड्या वेगळया पद्धतीने प्रमाणीकरण केले आहे.
वशिंड व शिंगे या भारतीय गाईच्या ओळखण्याच्या खुणा आहेत. वशिंड हे अंतरिक्ष लहरींना अती संवेदनशील असते. भारतीय वंशाच्या गाई आणि बैल त्यांचे वशिंड हाताने दाबले तर त्या गुडघे टेकतात. खच्चीकरण केल्यानंतर बैलाच्या वशिंडाचा आकार लहान होतो. त्यांचे वशिंड व प्रजनन क्षमता यामध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे.
गोमूत्राची निर्यात लक्षणीय -
गोमूत्र व गाईच्या शेणाच्या गोवऱ्या मोठ्या प्रमाणात युरोपात व काही प्रमाणात अमेरिकेत जातात यावर सामान्यांचा विश्वास बसणार नाही. ही आकडेवारी केंद्र शासनाच्या निर्यात यादीत अलिकडेच प्रसिद्ध झाली आहे. सुमारे १२५ कोटींचे दरम्यान हा एक्सपोर्ट होत आहे. पोटाचे, त्वचेचे व श्वसनाचे विकार यावर गाईचे मूत्र ग्रहण करण्यासाठी तसेच त्याचा उपयोग पंचगव्य करण्यासाठी परदेशात केला जातो. पंचगव्य प्राशन करण्याची आपली जुनी परंपरा आहे. अनेक धार्मिक विधीत आपण ते घेतो. गाईच्या शेण्या (गोवऱ्या) हवेत जाळल्याने सभोवतालचे विषाणू, कीटक, डास, दूषित वायू इ. नष्ट होतात. शिवाय उरलेली राख त्वचारोगावर लेप लावण्यासाठी वापरली जाते. असे बहुगुणी गोमूत्र व शेण हे मोठ्या प्रमाणात निर्यात होते. पुढारलेल्या देशांना याचा औषधी गुण समजला, दुदैवाने आमच्याकडे मात्र याचे महत्त्व वाटत नाही.
आपल्या देशात मूलभूत संशोधन कमी होत असल्याची खंत इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली आहे. भारताने पाश्चात्यांचे अनुकरण करताना तेथील संशोधन वृत्ती स्वीकारली नाही. अशा संशोधनाला प्रोत्साहन दिले नाही. संशोधनात मग्न राहू इच्छिणाऱ्याला आपल्या समाजात प्रतिष्ठा मिळत नाही. इतरांच्या तुलनेने फारसे धनही मिळत नाही. यामुळे संशोधन वृत्तीची जोपासना होत नाही. `रेडिमेड' संशोधनावर आधारित बरेच काही साध्य करून घेण्याची स्पर्धा उद्योग-व्यवसाय, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात दिसते हे दुर्दैव आहे. माहिती तंत्रज्ञानाने परदेशातील कल्पनांवर पैसे मिळविले आणि त्या संस्थांमुळे भारताचा विकासदर उंचावला. मूलभूत संशोधन परदेशात जाऊन करणारे भारतीय आहेत. त्याचा लाभ त्या देशांना मिळतो.
- जयंत बर्वे,
शाश्वत शेती संशोधन संस्था,
विटा - ४१५३११ (जि.सांगली)
ई-मेल : क्षक्षलर्रीींश%ूरहेे.लेा
फोन : ९४२२६१५८७८
महाराष्ट्न् ऑरगॅनिक फार्मिंग फेडरेशन,
बालाजी निवास, कॉसमॉस बँक लेन,
दीप बंगला चौक, मॉडेल कॉलनी, पुणे १६
Comments
Post a Comment