Skip to main content

Lekh on 23-31July2012



माणसं; इथली आणि तिथली
आपल्याकडे झेंडा दिन किंवा सैनिक दिन असतो, तसा क्रॅनडात रिमेंबरन्स डे साजरा करतात. पहिल्या-दुसऱ्या महायुद्धात वीरगती मिळालेल्या सैनिकांच्या स्मृती जागवून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी. पण दुर्दैवानं इथंही बहुतेक सगळे `ज्येष्ठ नागरिक'च त्यात सहभागी होत असावेत. त्या दिवशी स्टेशनवर जेव्हा एक बाई (त्याही `ज्येष्ठ'च) ते झेंडे विकत होत्या तेव्हा बहुतेक सगळे ज्येष्ठ नागरिकच ते आवर्जून घेत होते. मी विचारलेल्या कुणाच तरुणाला ते काय आणि कशासाठी याची कल्पना नव्हती. रात्री टीव्हीवर जेव्हा `देशभरात विविध ठिकाणी रिमेंबरन्स डे उत्साहात साजरा झाल्याचे `आजच्या ठळक बातम्या'त सांगितले तेव्हा मला उलगडा झाला.
दोष फक्त तरुण पिढीलाच देता येणार नाही...निदान आपल्याकडे तरी! एकदा केवळ राष्ट्नीय कर्तव्य म्हणून मी माझ्या पुतण्याबरोबर झेंडावंदनासाठी त्याच्या बालवाडीत गेलो, आणि तिथे त्या लहानग्यांना उन्हात उभं करून मोठ्यांनाही वैताग आणणारी मूर्ख बडबड ऐकून तासाभरानं परत आलो होतो. `पुढच्या झेंडावंदनासाठी गेलंच पाहिजे' अशी सक्ती त्याच्यावर कोणत्या तोंडानं करणार?
इथं एका शाळेतल्या इतिहासाच्या शिक्षकानं एक अभिनव कल्पना राबविलेली टीव्हीवरून दाखविली. शाळेच्या माळावर मुलांकडून एक खंदक खोदून त्यात रात्री मुलांनी झोपायचं. सैनिकांप्रमाणंच काही हालचाल न करता. पाळया बदलताना तसंच गुडघे आणि कोपरांवरून रांगत सरकायचं. सैनिक देशासाठी काय यातना सहन करत असतात याची कल्पना यावी म्हणून. सकाळी त्या मुलांना महायुद्धावरचे माहितीपट दाखवले. मुलांनी कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त पटीनं प्रतिसाद दिल्याचं ते शिक्षक खूश होऊन सांगत होते. भाग घेतलेली मुलं तर भारावून गेली होती. आजवर पाहिलेल्या युद्धपटांपेक्षा आजचा सिनेमा मनाला भिडल्याचं आवर्जून सांगत होती. पुढच्या वर्षी वेगवेगळया शाळांतून हा प्रयोग करण्याचं या मुलांनी तेव्हाच जाहीर केलं. - निदान पुढच्या वर्षीपासून तिथं ते झेंडे विकत घेणाऱ्यांमध्ये शंभर तरुणांची भर नक्कीच पडेल.
असंच एकदा रस्त्यावरून जाताना काही शाळकरी मुलांचा घोळका येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून पैसे गोळा करत होता. मुलं तशी चांगल्या घरातली वाटत होती. थोडं पुढं गेलो तर आणि सहा-सात मुलं दिसली. जवळजवळ पन्नासेक मुलं तरी त्या रस्त्यावर शाळेचा गणवेश घालून पैसे गोळा करत होती. कसलीतरी मॅच असल्याचं त्यांनी मला सांगितलं आणि मी जवळची चिल्लर त्यात टाकून पुढं निघालो. इतका वेळ शांतपणे चार पावलांवर उभ्या असणाऱ्या त्यांच्या शिक्षिका मला थांबवून म्हणाल्या, `माझ्या मुलांना खूश केलंत त्याबद्दल मी आभारी आहे' कोणत्या तरी शालेय स्पर्धेसाठी मुलं जायची होती आणि शाळेच्या बजेटमध्ये ती स्पर्धा नव्हती. आईवडिलांकडून पैसे मागण्यापेक्षा मुलांना चांगल्या कामासाठी काही मागण्याची लाज वाटू नये, त्यांना समाजापुढं जाता यावं म्हणून बाइंर्नी अशी वर्गणी गोळा करायला सांगितली. एवढंच नव्हे तर मुलांबरोबर त्या स्वत: उभ्या होत्या. मुलं कोणाला सतावत नाहीयेत ना.. भिकारीपणा करत नाहीयेत ना ते पाहात होत्या आणि वर्गणी देणाऱ्या प्रत्येकाचे त्या स्वत: आभार मानत होत्या.
तुरळकच का होईना, पण अशी काही उदाहरणं बघून सूर्याची आणि पणतीची गोष्ट आठवते!
- चारुदत्त आपटे, टोरंटो (क्रॅनडा)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...