Skip to main content

About Advocate Balasaheb Apte


आठवांचे  साठव.....
- वसंत आपटे
अॅड.श्री.बाळासाहेब आपटे यांचे नाव फार आधीपासून प्रसिद्ध होते, पण त्याआधी प्रत्यक्ष ओळख झाली ती त्यांचे `ज्येष्ठ' ठाण्याचे डॉ.शां.प.आपटे या तत्त्वज्ञाची! माहीमला श्री.बाळासाहेब यांच्याकहे एकदा जायला हवे असे वाटत राहिले पण एकतर त्यांचा प्रामुख्याने दिल्ली आणि शिवाय इतरत्र प्रवास; आणि माझ्या दृष्टीने दिल्लीच काय, मुंबईसुद्धा दूरच! पण जमवायचं म्हटलं की जमतं!
दिल्लीत श्री.प्रमोद मुजुमदार यांची भेट घेण्यासाठी बिश्वंभरदास मार्ग (मराठीत बी.डी.रोड) शोधून स्वर्णजयन्ती अपार्टमेंटात शिरलो. रहिवाशांची नावे आणि फ्लॅट नंबरची यादी पाहताना एकदम `अॅड.बाल आपटे, सांसद' दिसले. ते तर मुजुमदारांयाच्या वरती २ मजल्यांवर होते. अर्थातच प्रमोदजींकडचे आवरून मी दोन जिने चढलो, आणि दार ठोठावले.
कुणीतरी कर्मचाऱ्याने दार उघडून मला आत घेतले. मी माझे नाव नीट सांगण्याऐवजी बॅगेत बाळगून ठेवलेला भडंगाचा एक पुडा आत पाठवला आणि अंमळ थांबलो. पाच मिनिटात तेच भडंग हातात धरून खासदार पुढे येत म्हणाले, ``कोण सांगलीहून आलंय?''- माझ्या नावपत्त्यापेक्षा त्या भडंगामुळं त्यांना सांगलीची नेमकी ओळख आधीचीच पटली होती. त्यानंतर मी त्यांच्यात विरघळून `आप्त आपटे' होण्यास वेळ लागला नाही.
दोन वर्षांपूर्वी सांगलीत आपटे परिवाराचे संमेलन घेण्याचे ठरले, आणि श्री.बाळासाहेब आपटे यांनी निर्मलाताइंर्सह येत असल्याचे कळविले. स्वाभाविकच संयोजकांना उत्साह आला. पहाटे त्यांना उतरून घेण्यास रेल्वे स्टेशनवर गेलो तेव्हा रीतीप्रमाणे त्यांच्या पक्षाचे मोजकेच प्रतिनिधीही हजर होते. संमेलनात ते उभयता आनंदाने सहभागी झालेच, परंतु जातेवेळी हळूच माझ्या हाती पति-पत्नी दोघांचे प्रतिनिधी शुल्क देऊन गेले. ``माझ्याकडून नाव नोंदणीचे पैसे घ्यायला नकोत, असा इथला सूर दिसला. पण मी इथं आपटे आप्त म्हणून आलोय, पाहुणा नव्हे!'' असे बजावून त्यांनी पैसे दिले. ही नम्रता व शुद्धता अनुकरणीय!
सरसंघचालकांनीच त्यांच्याबद्दल म्हटलं की, आपल्या आचरणातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपलंसं करून विश्वास देणारे त्यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व दुर्मिळ!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...