Skip to main content

Sampadkiya in 23 to 31 July 2012


तुझे आहे तुजपाशी
सहकार ही संकल्पना आपल्याकडे अलीकडच्या - म्हणजे गेल्या शतकभराच्या काळात रुजली असा एक समज आपल्याकडे आहे. आज `सहकार क्षेत्र' असे म्हटले की प्रामुख्याने बँका-सोसायट्या किंवा साखर-सूत गिरण्या एवढ्यांचा विचार प्रामुख्याने मनात येतो. सध्या तिथे जे काही चालले आहे ते पाहून `सहकार धोक्यात आहे' किंवा `सहकार चळवळ संपली' असे सरसकट म्हटले जाते. एखाद्या व्यवसायिक संस्थेच्या व्यवस्थापनात किंवा तिच्या मालकीच्या स्वरूपात, त्यातील हितसंबंध पाहून बदल केले जाऊ शकतात; त्यातील सहकार बदलतो. परंतु त्याव्यतिरिक्त साऱ्या मानवी समाजात सहकार ही एक जीवनपद्धती म्हणूनच राहील हे लक्षात घ्यावे लागते. सहकाराशिवाय मानवी समाज विकसित होऊ शकणार नाही, विनासहकार त्याचा उद्धार होऊच शकत नाही. बँका नि गिरण्या कशाला; आपल्या घरातसुद्धा सहकाराची तत्त्वे लागू करावी लागतात. कुटुंबातील वयस्कर आजोबा-आजी हे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांवर असावे, आणि कर्ता पुरुष (किंवा महिला) कार्यकारी संचालक असावे. वयाची गुंतवणूक न पाहता बालकापासून सर्वांना एकच सममूल्य मत असावे. सर्वांनी निर्णय प्रक्रियेत भाग घ्यावा, त्यानुसार आजोबा-आजीनी धोरण ठरवावे आणि कर्त्या व्यक्तीने (म्हणजे एमडी ने) ते अंमलात आणावे. कुटुंबात आर्थिक पारदर्शकता, हिशेब तपासणी, साप्ताहिक व मासिक बैठका हीच कार्यपद्धत हवी. निधीचा विनियोग शिक्षण-गंगाजळी-इमारतनिधी-यात्राजत्रा, लग्न असे उत्सवनिधी वगैरे शीर्षकांनी व्हावा आणि पुढल्या वर्षीचे अंदाजपत्रकही करावे. इतकेच काय, वार्षिक अहवाल-ताळेबंद-साध्य व संकल्प प्रकट करणारी `जनरल सभा'सुद्धा व्हावी.

कुटुंबाच्या पातळीवर ही सारी कल्पना अतिरंजित किंवा मौजेची वाटेल, परंतु असा प्रयोग करून पाहिला तर बाहेरची सहकार चळवळ संकटात का आली आहे त्याचे नेमके उत्तर सापडेल. वरील पद्धतीने आपल्याच परिवाराचे व्यवहार आणि वृत्तांत तपासून आपण त्यास `अ' वर्ग देऊ शकू काय ते स्वत:शी ठरवावे. पै-पाहुणे, आप्तस्वकीय, मित्र गोतावळा अशा बाहेरच्या जगाला आपण आपल्या कुटुंबाचा `अ' वर्ग दारावरच्या पाटीपासून मिरवून दाखवू. एखाद्या सहकारी संस्थेला सरकारी कायदा व ऑडीटर चांगले म्हणतो, प्रशस्तीपत्र देतो; परंतु ती संस्था तशी चांगली असल्याचे समाज मानत नाही. तिथे गुंतवणूक किंवा सभासद होताना सामान्य माणूस विचारच करतो. त्याचप्रमाणे कोणत्याही कुटुंबाकडे छानपैकी घर-गाडी-नोकरी दिसली तरी तिथे सोयरीक करताना तो `अ' वर्ग बाह्यात्कारी ठरतो व त्यासंबंधी `अंतर्गत तपासणी' करून ठरवावे लागते. याला `सोशल ऑडिट' म्हणता येईल. पण त्याहीपेक्षा त्याच कुटुंबाचे सदस्य त्याबद्दल खरे काय ते जाणत असतात.

त्या कौटुंबिक जाणिवेत जर सहकार कसोटीला उतरला तर अशा लोकांनी चालविलेली कोणतीही संस्था धोक्यात येणार नाही. लोकशाही हे सहकाराचे अविभाज्य अंग आहे. आजची लोकशाही निवडणूक ही जशी चेष्टेच्या पातळीवर उतरली आहे, तीच कथा आपल्या कुटुंबाच्या संदर्भात घडत नाही ना, हे ज्याचे त्याने पाहावे. परिवाराचे सदस्य आपले मत देत नाहीत, हिशेब देत नाहीत, कर्ता माणूस पैसे कुठून आणतो ठाऊक नाही, थकित देणे समजत नाही... अशी रीत अनुसरली तर जो तो आपल्या हितसंबंधापायी परिवाराचाच आधार घेत बाहेर `खाजगीकरण' सुरू करतो. आपल्या कुटुंबसंस्थेलासुद्धा हे फुटीर खाजगीकरणाचे वारे लागले असल्याचे स्पष्ट जाणवू लागले असले तरी `समाज' म्हणून टिकण्यासाठी आपली कुटुंबसंस्था बळकट राहायलाच हवी हे निर्विवाद सत्य आहे. आणि त्यासाठी खऱ्या सहकाराला कुटुंबातसुद्धा पर्याय नाही.

सामुदायिक नळावर, रस्त्यात असो, प्रवासात असो, बाजारात असो.... आपले जीवन परस्पर सहकारावरच अवलंबून असते. ती मानवी जीवनपद्धती आहे. आपल्या दैनंदिन जीवनातच `सहकार धोक्यात' आल्याचे भासते आहे. तो मन:पूर्वक जोपासला तर सहकारी व्यवसाय, सहकारी संस्था आणि एकंदर मानवी जीवन समृद्ध होईल. `समृद्धीचा मार्ग सहकार' हे त्यासाठीच म्हणायचे. सहकार परस्परावलंबी असतो. त्याचा विसर पडला म्हणून आपली कुटुंबव्यवस्था, शेजार, समाज व त्यापुढे जाऊन सहकार चळवळ धोक्यात आहे असे म्हणू लागतो. त्याचे मर्मस्थान आपल्याजवळच आहे हे समजून घ्यावे लागेल.
***

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन