Skip to main content

Aathvanche Sathav


आठवांचे  साठव.....
- वसंत आपटे
रुग्णसेवा
साधारण १९५३-५४ चा काळ असेल. त्यापूर्वीपासून खेड्यांमध्ये नारू या रोगाचे प्रमाण बरेच होते. पाणवठ्याच्या दूषित जागा आणि अस्वच्छ पाणी यांमुळे पुष्कळ खेडुतांना नारू व्हायचा. पायाच्या घोट्याजवळ फोड येऊन पाय सुजायचा. जखमेला `तोंड' पडले की त्यातून दोऱ्यासारखा लांब जंतू - किंवा अळी बाहेर यायची. तिथले नासके रक्त यायचे. त्याच्या असह्य वेदना, शिवाय ताप वगैरेंमुळे माणूस पार घाईला यायचा.
आमच्या शेतामळयातल्या वसतीवर बरीच वर्दळ असे, त्या सर्वांना शुद्ध पाणी वापरण्याच्या शिकवणुकीचे `डोस' माझ्या आई-वडिलांकडून दिले जायचे. परंतु सभोवतीच्या चार-पाच कोस अंतरात बरेच रुग्ण नारूमुळे हैराण होत. आश्रमीय राहणीच्या आमच्या घरी या रोगावरचा उपाय शिकून घेतला गेला. नारूची साथ आली की आमच्या `घरा'पुढचा मांडव म्हणजे रुग्णालयाचा नारू-वॉर्ड झाल्याचे मला आठवते.
टाकणखार नावाचा पदार्थ बाजारात मिळतो. माझी चूक होत नसेल तर पापड तयार करताना त्याचा वापर होतो. एक-दोन आण्यांचा हा टाकणखार तापल्या तव्यावर भाजून त्याची लाही करायची आणि नंतर त्यात शुद्ध जुना गूळ घालून त्याचा छोटा लाडू बनवायचा; अशी काहीतरी त्या औषधाची कृती होती. हे औषध नारूच्या आजारावर अगदी रामबाण होते, मात्र त्याचे कडक पथ्य असायचे. दिवस उगवायला मऊभात-तूप खाऊन घटकाभराने हा औषधी लाडू सेवन करायचा. मग मात्र पाण्याचा - अगदी लाळेचाही थेंब पोटात जाऊ द्यायचा नाही. त्या रात्रीपर्यंत पाय हलका होऊन दुसऱ्या सकाळी तर रुग्ण हसत हसत परत जाई.
औषध तसे सोपे असले तरी ते काळजीपूर्वक बनवायचे, पथ्य सांभाळायचे हे खेडूतांच्या व्यवहारात जिकिरीचेच होते. त्यातून पहाटपारी मऊभात-तूप त्यांना मिळणे दुरापास्त. आमचे घर आणि माझे आई-वडील यांच्या प्रपंचात असल्या कामांना स्थान होते. ते हे औषध करून देत, त्याहीपेक्षा रुग्णाचा तो एक दिवस सांभाळ करीत. बैलगाडी किंवा सायकलवर बसवून नारूचा सुजलेला पाय अंतराळी धरून कोणीही दोन-पाच मैलावरून येत असे. त्याला मुक्काम करायला लावून दुसऱ्या पहाटे अनुशापोटी ते औषध व तूपभात करून द्यायचे काम आईकडे येई. त्या रुग्णाच्या सोबतीला कुणीतरी राहायचे, त्याचे जेवणखाण त्याच्या घरून आले तरी, एखादे कोरड्यास, लोणचे-चटणी, ताक असे द्यायची पद्धत होतीच.
या औषधाचे, पथ्यपाण्याचे, रुग्णसेवेचे किती पैसे मिळायचे हा प्रश्न आजच्या काळाचा. त्यावेळी माझ्या आई-वडीलांना कुणी त्याबद्दल विचारलेही नसावे. कुणाच्या तरी पाठकुळी बसून येणारा रुग्ण स्वत:च्या पायावर चालत जाताना पाहण्याचे समाधान इतकीच त्यांची फी!
रानामळयात काम करताना विंचवाचा दंश होण्याचा प्रकार खूप असायचा. मला स्वत:ला, माझ्या आईला हा झटका बसलेला आहे. आमच्याकडे महादूनाना म्हणून एक घरगडी होता, तो खूप सहनशील असला तरी विंचू चावला की पाय झटकत फू फू फू करत यायचा. माझ्या वडिलांना विंचवाचे विष उतरवण्याची कला अवगत होती.
चुलीत पडलेली साधी गार राख मऊ असते. ती मुठीत घेऊन ते वृश्चिकदंशाच्या पायाला किंवा हाताला बोटांच्या दिशेने भरभर चोळत. त्यामुळे रक्तप्रवाह तिकडे रोधून विषप्रभाव न चढता खालीखाली उतरे. जिथे दंश असेल तिथे फुणफुण राहायची, त्यावर तुळशीतली माती, रक्तचंदन वगैरे लावायचे. हातापायालाही कधी चंदनगंध लावीत असे वाटते. एकूणात विंचू उतरे! हा उपचार वास्तविक कुणालाही सहज करता येण्याजोगा होता पण बाया-बाप्यांचा समज असा की आपटेकाका मंत्र घालतात. राखबिख वापरल्यामुळे तो समज बळकट व्हायचा. वडील त्यांना किती सांगायचे, तसले काही नाही रे बाबांनो!
एक कजाग प्रौढ बाई एकदा आयाय्ओय् करत तीन्हीसांजेला आली. तिचा तरूण मुलगा बरोबर होता, त्याला वडील म्हणाले, `मी सांगतो तसं आईचा पाय तू चोळ.' पण ती बया ऐकेना. `काका तुम्हीच मंतर घाला, पाया पडते...' असे म्हणून ढाँ ढाँ ओरडू लागली. आईला तिची दया येऊन हसत म्हणाली, `घाला हो तुमचा मंत्र...' काका मुकाट्याने तिच्या पायाशी बसले. पद्धतशीर चोळून दिले, विंचू उतरला. बाई शांत होऊन घरी गेली. वडील नंतर आमच्या आईला म्हणाले, `च्यायला, या मंतराच्या घोटाळयात त्या बयेचे पाय चुरत बसण्याची पाळी आली!' सगळे खो खो हसले.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन