Skip to main content

11 July 2016

संपादकीय

मंत्र्यांना कामी लावावे
केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार आणि खातेपालट झाला आणि राज्यातही तो विधी अेकदाचा पार पडला. पंतप्रधान मोदींनी लगेचच नव्या मंत्र्यांना जबाबदारीचे भान दिले, आणि संसदेचे सत्र तोंंडावर असल्याने त्याची परिपूर्ण तयारी करावी असेही सांगितले, शिवाय १५ऑगस्टपर्यंत आपापल्या गावाकडे जाण्याची तत्परता दाखवू नका, हेही सुनावले. राज्य स्तरावरही त्याच सूचनांचा अंमल व्हायला हवा, पण प्रत्यक्ष तसे कोणकोण वागले हे आपण जाणतोच आहोेत. मंत्रीपद घेअून गावच्या गल्लीत मिरवायचे असते, अेवढेच ज्यांना माहीत आहेे, त्यांचीच आपणा जनतेलाही सवय झाली आहे. फार तर त्या मंत्र्यापुढे आापल्या शेपट्या हलवत अुभारावे, आणि त्याचा कृपाकटाक्ष घडला तर धन्य व्हावे, अशी आजवरची रीत बनली आहे. आपल्या पोराला नोकरी किंवा काहीतरी तत्सम लाभाचे काम असेल तर मधल्या चमच्याला,  त्या मंत्र्यांचा जावआी-पुतण्या अशा कोणाला तरी गाठण्याशिवाय  पर्याय नव्हता. अशा रराज्यकारभाराचा कितीही अुबग आला तरी तो सहन करण्यातच आधीच्या पिढीची हयात सरली.

सत्ताबदलाचे परिणाम असोत, तरुण जनता क्रियाशील झाल्यामुळे असो, किंवा माहिती तंत्रज्ञानाचा - संदेश वहनाचा झपाटा असो;... यापुढच्या काळात शासनयंत्रणेला वेगळे वागावेच लागेल. लोकांसाठी काम करावे लागेल. लोकांचे अुत्तरदायित्व सांभाळावे लागेल. केंद्रात प्रधानमंत्री आणि वेगवेगळया राज्यांतील मुख्यमंत्री आता त्यांच्यामागे आहेत. पण त्यांचा बराचसा  मंत्रीगण लोकांची  पत्रास बाळगत नाही हे त्यांनाच धोकादायक आहे. आपल्या गावगल्लीत आजवरच्या अुपकृत झुंडीची किंवा  भाडोत्री  `कार्यकर्त्यां'ची पुतळाजाळू वा टायरजाळू आंदोलने करणे, हा आपले कार्यकौशल्य व नेतृत्व सिध्द करण्याचा मार्ग नसतो; हे आता तरी प्रस्थापित नेत्यांनी समजून घेतले तर बरे.

त्यांनी समजून घ्यायचे की नाही हा त्यांचा प्रश्ण आहे, पण सामान्य शहाण्या जनतेने ही शासन-प्रशासन यंत्रणा समजून घेअून ती योग्य प्रकारे वापरायला शिकलेे पाहिजे. आज सामान्य माणसांचे सामान्य प्रश्ण साऱ्या यंत्रणेने दुष्कर करून ठेवलेे आहेेत. साध्या मुताऱ्याही तिथे जाअूच नये अशा झाल्या आहेत. विजेची बिले, पिण्याचे पाणी, सरकारी दवाखाने, रापमच्या बसेस, रस्त्यातली वाहने, अुत्सवांतील डॉल्बी, खड्डे....अनंत प्रकारांनी सुजाण माणसांचे जिणे मुष्कील करणाऱ्या या गोष्टी सरळसुध्या करता येण्यासारख्या आहेत. त्यासाठी प्रधानमंत्री किंवा त्यांच्या गणातील काही पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळते आहे. त्याची काही अुदाहरणे वृत्तपत्रांतून येत असतात.

मोदींनी कुणा बालिकेला अुपचारांची सोय दिली, रेल्वेमंत्र्यानी कोणा मातेला तिच्या बाळासाठी दूध अुपलब्ध केले, मुख्यमंत्र्यानी कोणा महिलेच्या तक्रारीची दखल घेअून शिवनेरी बसचालकावर कारवाआी केली... अशा काही बातम्या  `बातमी'चा विषय होतात, हे तरी कार्र्य म्हणावे? या प्रकारची कामगिरी करण्यासाठी आितक्या अुच्चपदाला साकडे घालावे लागते, हे आजवरच्या यंत्रणेचे अपयश आहे. पण त्यातही मुद्दा असा की, ते त्या अुच्चपदांना प्रश्ण समजण्याची आता सोय आहे. त्यांनीही तातडीने दखल घेण्याची सोय आहे. आणि त्यावर कार्यवाही त्वरित होण्याचीही सोय आहे. मुख्य म्हणजे त्या अुच्चपदस्थांना अशी साधी सोपी कामे जलद करण्याची  `आतून'  आिच्छा आहे.

या बदललेल्या परिस्थितीचा येाग्य तो अुपयोग करून घेण्यासाठी आपण शहाणी म्हणवणारी जनता काय करणार आहोत हा मात्र प्रश्ण आहे. तंत्रज्ञान आणि आिलेक्ट्नॅनिक माध्यमे बोकाळली आहेत, पण त्यांचा वापर कसा आणि कशासाठी होतो हे काळजी वाटण्याजोगेच आहे. शेंबडी पोेरे त्यावर गेम कार्टून करतात, आणि तरुण पिढी `कसा आहेस, तुझ्या मिठीत.....' अेवढेच जर त्यांतून साधत असतील तर देश, समाज, विकास, या गोष्टी कोणत्या झाडाला पिकून त्या आपल्या तोंडात येणार आहेत? त्या त्या वयाला त्या गोष्टीही अमान्य करायच्या नाहीत; पण केवळ तेवढेच तण फोफावणार असेल तर नव्या विपुलतेचे पीक कसे फुलणार? प्रौढ वयाची माणसेही `आता आमचं काय चालणार? संपल्यातच जमा..' अशा विकलतेत रमतात, मग ज्येष्ठांचे तर पाहायलाच नको. त्यांना नवी तंत्रे अपरिचित असतील, पण हेच प्रश्ण त्यांच्या जुन्या तंत्राने मार्गी लावण्यासाठी काम करण्याला त्यांना कोणी अडवले आहे?

सोप्या साध्या प्रश्णांना वाचा फोडून त्याबद्दल दाद मागण्यासाठी आपल्याकडे शब्दश: अनेक कायदे व नियम असतात. पण समाजातील शहाणी माणसेही त्यांकडे ढुंकून न पाहता साऱ्या जगाचा अन्याय आपल्याच वाटणीला आल्याप्रमाणे कर्वादत असतात. साध्या गावातील अत्यवस्थ रुग्ण शहरातल्या मोठ्या आिस्पितळात न्यायचा तर धावपळ करून कुणाची तरी मोटार मिळवणे हा आजपर्यंतचा नाआिलाजी मार्ग होता, तोच बहुतांशी आचरिला जातो. १०८ नंबरला फोन केला तर शासनाची अद्ययावत् रुग्णवाहिका त्वरित अुपलब्ध होते, हे माहीतच नसते. त्यात काही अडथळा आला तर वरिष्ठांकडे दाद मागण्यासाठी तीच तांत्रिक साधने वापरता येअू शकतात, निदान आपल्या मुला नातवंडांचा तरी त्यासाठी अुपयोग होअू शकतो. तोही होत नसेल तर बाहेर सायबर क्रॅफे असतात, चार पैसे घेअून ते ही कामे करतात.

हे सगळे फारच सोपे आहे, असा दावा कोणीच करणार नाही. पण प्रधानमंत्र्यांपासून, मुख्यमंत्र्यांपासून आणि काही कामसू पदाधिकाऱ्यांपासून अनेकांना आता या व्यवस्था सुधारण्याची आस असल्याचे दिसते आहे, अशा वेळी सुजाण नागरिकांनी त्यांना प्रतिसादही दिला पाहिजे. आपलीही जबाबदारी ओळखली पाहिजे. मंत्रीपदांतील वाढ किंवा बदल हा आपल्या जीवनांत काही बदल घडविणारा नसतो हा आजपर्यंतचा विचार वास्तवच होता, पण प्रधानमंत्री जर स्वत:ला  `प्रधान सेवक' म्हणवून घेत असेल तर त्याच्या त्या तळमळीला केवळ टीकेचे लक्ष्य करण्याची विचारवंती मुत्सद्देगिरी करून काही साधणार नाही. त्यासाठी आपल्यालाही नव्या आशेने काही करावे लागेल. राज्याची आणि प्रशासनाची अुत्तम व्यवस्था प्रत्येक नागरिकाला हवी असते. ती व्यवस्था आयती मिळाली तर प्रश्ण नाही. पण ती तशी मिळत नसेल तर काय? कोण देणार आहे? ती व्यवस्था जर ढासळली तर भल्या घरची मुलेही अतिरेकी होतात, हे दुर्लक्षित करू नये. नक्षलवाद  गडचिरोलीच्या अरण्यात नव्हे तर मंत्रालयात निपजतो, असे म्हटले जाते.

अेखाद्या नेत्याचा गौरव म्हणजे त्याच्या आरत्या करत चमचेगिरी करणे; आणि त्याला विरोध म्हणजे त्याचे पुतळे जाळत अर्वाच्च बरळणे असे राजकारण वा समाजकारण यापुढे बदलले पाहिजे. त्या बदलाची चाहूल अुच्चपदस्थांनी दिली आहे. त्यांच्या अनुयायांनी व सामान्य जनतेनेही आपापले कर्तव्य समजून घेतले तर फार मोठे बदल फार मोठ्या गतीने या देशात फार मोठ्या होअू शकतील. तशी आशा करणे अेवढे तरी तूर्त आपल्या हाती आहे.


ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींसाठी योजना
     आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे ११टक्के - म्हणजे ११कोटि आहे. त्यांतील नागरी भागात राहणारे लोक आपल्या भविष्यासाठी चांगली पुंजी बाळगून असतात, त्या रक्कमेच्या व्याजात त्यांचा चरितार्थ आणि अन्य खर्च चालतात. शिवाय ग्रामीण भागातही अशी पुंजी साठवणाऱ्या ज्येष्ठ लोकांची संख्या चांगली वाढत आहे. हे पैसे गुंतवण्याचा साधा सोपा मार्ग त्यांना वाटतो, तो म्हणजे मुदत ठेव ठेवणे. या मुदत ठेवींवरचे व्याजदर अलीकडे कमी होत चालले असल्यामुळे हा गुंतवणूकदार वर्ग हवालदिल झाला आहे. त्यातल्या त्यात अर्धा पाअूण टक्का जरी कोणती संस्था-बँक जास्त देत असेल तरी हे ठेवीदार लगेच तिकडे वळू पाहतात. बँकांतही या ठेवी आकर्षित करण्यासाठी स्पर्धा असते, त्यांना प्रयत्न करावे लागतात. त्याकरिता पोस्टाच्या वतीने काही योजना करून या नागरिकांना आश्वस्त करायला हवे, त्याचप्रमाणे या प्रचंड ठेवी आपल्याकडे खेचून त्या देशाच्या विकास कामी लावल्या पाहिजेत. देशाच्या तिजोरीत फार मोठ्या प्रमाणात या ठेवींची भर पडू शकते.
     पोस्टाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी अशी काही योजना करता येआील. -
१. कोणीही आपली रक्कम आपले यापुढचे अपेक्षित आयुष्य अंदाजित करून, त्या मुदतीने ठेव ठेवेल. समजा आज ६५वर्षाची व्यक्ती असेल तर ती आपले प्रकृतीमान लक्षात घेअून ८०वर्षाचे आयुष्य गृहीत धरून, १५ वर्षे मुदतीने ठेव ठेवेल.
२. या काळात त्या व्यक्तीला १२टक्के दराने, दर महिन्याच्या हप्त्याने व्याज मिळेल.
३. मुदतीनंतर त्याने सुचविलेल्या वारसाला मुद्दल रक्कम मिळेल.
४. ठरलेल्या मुदतीपूर्वी ठेव मोडली तर तोपर्यंतच्या काळातील जो कमीतकमी व्याजदर असेल तो लागू करून, त्या व्याजाने तिथपर्यंतचा हिशेब करून त्यासह रक्कम मिळेल. व्याजदरातील फरक मुद्दलातून कमी होआील. हा प्रसंग ठेवीदाराच्या विहित मुदतीपूर्वी मृत्यू झाल्यासही अुद्भवू शकतो. त्यावेळी वारसाला रक्कम देताना ती व्याजदराच्या फरकाची  वजावट करूनच द्यावी.
५. ठरलेली मुदत कितीही असू शकेल. किमान पाच वर्षे असावी. कुणी आपले आयुष्य १००वर्षे धरून, त्या मुदतीची ठेव ठेवण्यासही हरकत नाही, पण जोपर्यंत ती व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंतच १२ टक्के व्याज त्यास मिळणार,अन्यथा फरक वजा करून वारसाला मुद्दल परत मिळणारआहे.त्यात पोस्टाचा  काहीच तोटा नाही, झाला तर फायदा. आणि ठेवी वाढण्यासाठी मोठेच आकर्षण ठरेल.
६.  साठ वर्षांपुढील कोणाही व्यक्तीला हा फायदा मिळायला हरकत नाही. त्याची `आयुष्याची  मुदत' त्यानेच ठरवायची आहे.
        या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना मानसिक स्थैर्य लाभेल. त्यांच्याविषयी महत्वाचे कर्तव्य सरकारने   केल्यासारखे होआील. कोणताही आर्थिक बोजा न पडता देशासाठी खूप पैसा अुपलब्ध होआील. तरीही सोयीनुसार योग्य बदल करून तसे नियम करता येतील.


कष्टकरी कर
     माधवनगरच्या रतिलाल गोसालिया यांचा मंगलोेरी कौलांचा व्यापार होता. त्याचा कमिशन एजंट म्हणून मी १९६६ च्या दिवाळीत व्यवसायाला सुरुवात केली होती. वर्षभरात माझ्या स्वत:च्या विक्री व्यवसायासाठी मी त्यास जुळणारा लोखंडी माल खरेदी केला, आणि रुकुटुकू व्यापार सुरू केला. हळूहळू त्याचाही पसारा वाढला. मग १९७२ साली छापखाना सुरू केला, तोही मार्गी लागला. एव्हाना मी लग्नाळू वयाचा झालो होतो. फारसा शोध न करता जमून आले आणि लगीन ठरले. हा १९७५ चा जानेवारी.
     लग्न सांगलीच्या कार्यालयात होते. त्यासाठी आमचे वऱ्हाड आधल्या संध्याकाळी रेल्वेने रवाना झाले. बराचसा गोतावळा सांगलीतच असल्यामुळे इकडून जाणाऱ्या वऱ्हाडात फार गर्दी नव्हती. पण जे आठ-दहा जण जायचे ते आधल्या पॅसेंजरने गेले, आणि आम्हा खाशा स्वाऱ्यांसाठी एक मोटार ठरली होती. ती साधारण पाच वाजता निघायची होती. त्यात मी, माझे आई-वडील, आणि एक मोठी बहीण असे जायचे म्हणून मागे थांबलो होतो. निघायची वेळ होत आली तसे आम्ही आवरते घेतले. हातपाय धुवून तयार झालो. तोवर  आमच्या आवाराच्या दुसऱ्या दिशेला असणाऱ्या गेटकडून हाका आल्या. कोण, म्हणून पाहिले तर एक बैलगाडीवान बोलावत होता.
      त्याच बाजूला, पण आमच्या विस्तीर्ण आवारातच आमचा कौलांचा डेपो होता. त्या गाडीवानाला कौले घ्यायची होती. आत्ता आम्ही परगावी चाललोय, लग्नच आहे, आत्ता उगीच भीड घालू नका.... वगैरे विनवण्या केल्या. पण तो बाबा खनपटीला बसला. सहा-सात मैलांवरून बैलगाडी घेऊन तो आलेला, माझं लग्न आहे हे त्याला कसं माहीत असणार? मग त्याची कणव करून मी गेट उघडलं, आणि `लवकर भरा'  म्हणून सांगितलं. मंगलोरी कौलं भरायची एक अटकळ असते. त्याच्या खाचा जुळवून नीट थप्पी लावावी लागते, तर ती व्यवस्थित बसतात. ते यटाक त्याला जमेना. आमच्याकडचा नेहमीचा गडी वऱ्हाडातून गेलेला. यानं सोबती कुणी आणलं नव्हतं. काय करणार? मुकाट्यानं मी त्या बैलगाडीत चढलो, तो बाब्या खालून कौलं देऊ लागला. तोवर तिकडून वडलांच्या हाका सुरू झाल्या. `तुला लेका नको त्या वेळी हा उद्योग कसला! तिकडं सारे वाट पाहात बसतील ना !' त्यांचं चूक नव्हतं, पण करू काय?
     दोन्हीकडून आरडाओरड  झेलत मी त्या बैलगाडीत दोनशेभर कौलं रचली. गाडीला बैल जुंपून, कासरे बांधून, गाडी गेटबाहेर काढली, तोवर तासभर उशीर झालाच होता. तसाच पळत घराच्या बाजूला आलो. मोटार सुरू केलेली होती. मी घामाघूम झालेला, हात घाणेरडे, पायांवर कौलांची तांबडमाती, कपडे तशापैकीच! पण आता थांंबायला वेळ नव्हता, आणि वडलांचाही गजर चालू होता. मग तसाच मोटारीत बसलो. म्हटलं तिथं कार्यालयात पोचल्यावर स्वच्छ होऊ, कपडे बदलू. तासाभरात सांगलीच्या कार्यालयाच्या दारात गाडी पोचली. अगोदरच उशीर झालेला असल्यामुळे सारेजण खोळंबलेले. मी गाडीतून हॉलच्या दारात येताच आमच्या भावी सासूबाई माझे पाय धुण्याला गरम पाणी आणि दूध घेऊन आल्या. त्यांंनी मला त्यावेळीच प्रथम पाहिले. त्यांना माझे पाय पाहून काय वाटले ते कशाला सांगू? मी हात मागे लपवून धरले होते. मला सर्वांनी मिळून मोठ्या सन्मानाने सीमंातपूजनाच्या गादीकडे नेल्यावर मात्र मी जरा `आत जाऊन येतो' म्हणून विनविले. आणि आत जाऊन गार पाण्याचा नळ सोडला.
      परवा एका लग्नात गेलो होतो, तिथं वधूची साडी नेसून व्हायची आहे म्हणून मुहूर्ताची वेळ टळून चालली होती, आणि भटजींसह सारा मांडव खोळंबून उभा होता. काळ बदलला हे खरे !
वसंत आपटे-किर्लोस्करवाडी
मो. नं.९५६१ ३९० ८९०


थोरातांचे कार्य
     लक्ष्मण थोरात हे किर्लोस्करवाडीच्या परिसरातील अेक अुद्योजक, त्यांच्या सुनियोजित कामासाठी आणि अुचित व्यवहारा(फेअर डील)साठी परिचित आहेत. त्यांचा फाअुंड्नी अुद्योग बहरात होता, आणि अेक मुलगा व मुलगी यांच्यासह संसारही सुखाचा होता. अुमलता मुलगा आिंजिनियरिंगची पदवी घेअून आपल्या अुद्योगात येआील, अशी स्वप्ने पाहणाऱ्या या कुटुंबावर अचानक अस्मान कोसळले. त्यांचा मुलगा अुपेंद्र  -त्याच्या परिवाराचा  गोपा- अपघातात कालवश झाला. थोरात परिवाराने आपले अश्रू दूर केले, आणि अुद्योग पुढे चालू ठेवत, या अुगवत्या पोराची आठवण जागविण्याचे प्रयत्न आपल्या सामाजिक भानातून चालू ठेवले आहेत.
     कै.अुपेंद्र याच्या पहिल्या पुण्यतिथीला  -२०१३साली - त्यांनी रक्तदानाचा अुपक्रम आयोजित केला. अुपेंद्रचा मित्रपरिवारही मोठा असल्यामुळे या पहिल्याच वर्षी १६३जणांनी रक्तदान करून आपल्या त्या मित्राला श्रध्दांजली वाहिली. या कार्याचे महत्व जाणून लक्ष्मणराव थोरातांनी या वार्षिक कार्यक्रमाला त्यांच्या कार्यशैलीने शिस्तशीर मोहिमेचे स्वरूप दिले. पुढच्या प्रत्येक वर्षी रक्तदात्यांची संख्या  -३०३,  ३६३,  अशी वाढत चालू वर्षी ५१३पर्यंत पोचली आहे. शिवाय चालू वर्षी त्यास डोळे तपासणीच्या शिबिराची जोड देण्यात आली. रक्तदान शिबिराच्या यशासाठी त्याची माहिती योग्य रीत्या प्रसारित करण्यात आली होतीच. पण रक्तपेढ्यांकडून अुत्तम सहकार्यही मिळत गेले. त्या मोहिमेचा लाभ बाहेरच्या शहरांतून विखुरलेल्या गावकऱ्यांपैकी ४७३जणांना मिळाला. त्यांना त्यांच्या गरजेला केवळ रक्त मिळाले असे नव्हे तर रक्तातील विशिष्ट घटक(काँपोनंट्स) काही वेळी द्यावे लागतात, तेही अुपलब्ध झाले.
     लक्ष्मण थोरात यांचा पिंड सामाजिक जाणिवेचाच म्हणता येआील. अलीकडच्या काळात काही ठिकाणी दुष्काळी स्थिती होती, तिथे त्यांनी सलग चार वर्षे चारा वाटपासाठी काम केले. त्या भागातील गरजू शाळकरी मुलांसाठी ३ हजार वह्यांचेही वाटप त्यांनी केले. या वर्षी त्यांनी वृक्षलागवडीच्या मोहिमेत सहभाग म्हणूून अेका सार्वजनिक जागेला  `दत्तक'घेअून तिथे रोपांसाठी खड्डे, खत, कुंपण अशी तयारी करण्यात  लाखभर रुपये खर्च केले असून आता रोपांची लागवड आणि त्यांचे संगोपन  करण्यासाठी यापुढे आणखी लाखाभराची तयारी ठेवली आहे.त्यांच्या छोट्याशा सावंतपूर या गावातील दोन मुले त्यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतली असून, स्वत:च्या पुत्रासाठी होणार असलेला खर्च या मुलांना अुपलब्ध करून देत त्यांना पदवीपर्यंत शिकविण्याची जबाबदारी ते बोलून दाखवितात.
आपल्या पुत्राच्या वियोगाचे दु:ख बाजूला करत लक्ष्मण व त्यांच्या पत्नी विजयमाला   या थोरात दंपतीने आपल्या थोरात थोर मनाचे दर्शन घडविले आहे.
संपर्क-लक्ष्मणराव थोरात, 
पलूस रोड, सा.वसाहत, 
किर्लोस्करवाडी(सांगली) 
मो.नं. ९८२२० ५६४९६

                                      -संदीप देशमाने, किर्लोस्करवाडी. फोन: ९९७०७००७५८ 

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन