`मातृवंदना'
कासेगाव (ता.वाळवा) येथील काशिलिंग आडके हा तरुण सध्या प्रो कबड्डी च्या सामन्यांतून गाजतो आहे. त्या स्पर्धांतील `दिल्ली दबंग' या संघाचा तो कप्तान आहे. त्याचे वडील कुस्तीगीर होते, त्यांचे लवकर निधन झाले. परंतु त्यांच्या माघारी काशिलिंगच्या आआीने गाडा सावरला. मुलगा शाळेत फारसा रमत नव्हता, पण खेळात तो पुढे असायचा. त्याचा कल ध्यानात घेअून या माअूलीने त्याला `खेळात मोठा हो' म्हणून सर्वतोपरी पाठिंबा दिला. ही आआी शेतामळयात मोलमजूरीची कामे करून पोराला योग्य संधी देत होती. त्या खेळाचे प्रशिक्षण आणि सराव करण्यास वाव देत होती. आज त्या लेकाने कष्टांचे चीज केले आहे.सांगलीचे चौगुले कुटुंब आपल्या तीन्ही मुलांचे कौशल्य पाहून आज समाधानाने हसते आहे. श्री.चौगुले हे स्पर्धा परीक्षांच्या वर्गांना शिकवतात. ते स्वत: खेळाडू होते. त्यांचा मुलगा अजिंक्य हा पहिलीपासून शाळेच्या बाबतीत फार दमवायचा. कशीतरी त्याची ढकलगाडी तिसरीपर्यंत गेली पण तिथेच अडली. शाळेचे नाव काढले की तो भोकाड काढायचा, दूर जायचा, आजारी पडायचा. आआी वडील हताश झाले. तो मैदानातून मात्र हलायचाच नाही. मध्यरात्रीपर्यंत ग्राअुंडवर हुंदडायचा. त्याला अेकदा स्केटिंगचे बूट आणले, तर ते कौशल्य त्याने पट्कन् आत्मसात केले याचे सर्वांना फार आश्चर्य वाटले. शेवटी त्याच्या आआीने त्याची शाळा संपवून त्याच्या आवडीच्या क्रिकेटवर अक्षरश: `सोडले'. तिथे त्याची चमक दिसू लागली. तो १४ वर्षांखाली, १६वर्षांखाली असे सामने गाजवू लागला. आता तो रणजी सामन्यांत दाखल होण्यासाठी दारे ठोठावतोय. मोठ्या खेळाडूंसोबत सराव करतो, अुत्तम आिंग्रजी बोलतो. त्याच्याप्रमाणेच निनाद आणि सुधा ही त्याची भावंडे शाळेअैवजी आितरत्र चमकत आहेत. निनाद `पूना क्लब' या १६ वर्षांखालच्या टीमचा कप्तान आहे; तर सुधा पेटी तबला अुत्तम वाजवते, आणि कथ्थक व ओडिसी नृत्यात प्रवीण आहे. मुलांच्या या कामगिरीचे श्रेय श्री.चौगुले हे त्यांच्या पत्नी संगीता यांना नि:संकोच देतात, तेव्हा त्यांना आनंदाश्रू आवरत नाहीत.
डाअून सिंड्नेम (गतिमंदत्व) असलेल्या गौरीला मनापासून स्वीकारून तिच्यातील कलांना विशेष वाव देणाऱ्या स्नेहल गाडगीळ या `स्पेशल मदर' आहेत. गौरी गाडगीळ ही `यलो' चित्रपटामुळे सगळीकडे परिचित आहे. तो चित्रपट तिच्याच जीवनावर बेतलेला आहे, तिला त्यासाठी राष्ट्नीय पारितोषिक मिळाले आहे. दहावीपर्यंत ती त्या प्रकारच्या शाळेत शिकली, पण त्याच काळात ती पोहणे आणि भरतनाट्यम् शिकली. पोहण्यात तिने राष्ट्नीय स्तरावर बक्षिसे मिळवली; आणि त्यापुढे चीन तैवान अस्ट्न्ेिलॉया येथील स्पर्धांतही ती चमकली. तिने काही सागरी जलतरण स्पर्धांत भाग घेतला आहे. भरतनाट्यम् मध्ये ती विशारद आहे.तिला राष्ट्न्पतींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. या साऱ्यात तिला घडविण्याचे श्रेय सर्वस्वी तिच्या आआीचे आहे. अेका समयी परमेश्वराने दिलेले ओझे वाटावे अशी ही गौरी आता आआीच्या मते परमेश्वराने दिलेली मोठी भेट आहे !
आपल्या मुलांना या प्रकारे घडविणाऱ्या या तीन प्रतिनिधी मातांचा तो कौतुक सोहळा होता. आजच्या शिक्षणातून गुणवत्तेअैेवजी केवळ गुण पाहिले जातात. पण आपल्या मुलांच्यातील कौशल्यांचा विकास करणाऱ्या या कौसल्या मातांनी मुलांना खरे घडविले आहे. पालकांच्या अपेक्षा नाहक वाढत चालल्या आहेत. त्यांच्या भव्यदिव्य कल्पनांचे आणि गैरसमजुतींचे ओझे मुलांना वागवावे लागत आहे. शिक्षणातून मूल्ये नाहीशी झाल्यासारखे भासते. शर्यतच अशी की, ती जिंकली तरी अेका प्रशस्तीपत्राच्या सुरनळीखेरीज हाती काही राहूच नये. छोट्या शाळेत चमचा-गोटी अशी अेक शर्यत होती. तोंडात चमचा पकडायचा, त्यात खेळातली गोटी ठेवायची, आणि ती गोटी न पाडता पळायचे. पुष्कळांच्या तोंडातील चमच्यातून ती गोटी वाटेतच पडायची. आजच्या शिक्षणाचा तोच प्रकार आहे. मूल्यांची गोटी वाटेतच पडून जाते, आणि अेका पदवीचा मोकळा चमचा तोंडात धरून मुले रेषा ओलांडतात. त्यांना शर्यत जिंकल्याचा भास होतो.त्या साऱ्या पृष्ठभूमीवरती मुलांचे शिक्षण वेगळया नजरेने पाहण्याचा प्रयोग त्या मातांनी यशस्वी केला आहे. मुलांचा कल व आीश्वरदत्त कौशल्य लक्षात घेअून त्यांना, पुस्तकी पठडीतले शिक्षण देण्यासाठी आटापिटा करण्यापेक्षा योग्य त्या दिशेने पुढे जाण्यास प्रोत्साहन द्यायला हवे; असा बहुमोलाचा संदेश या कार्यक्रमातून दिला गेला.
या निमित्ताने श्री विवेक घळसासी यांचे व्याख्यान झाले. त्यांनी या प्रयोगांचे कौतुक तर केलेच, परंतु आआी या विषयावर फार अुद्बोधक विवेचन आपल्या हृदयस्पर्शी वाणीतून केले. `मुले आपली आहेत, आणि तीच आपल्या अपेक्षांचा आविष्कार करणार आहेत ही समजूत काढून टाकायला हवी. अध्यात्म असे सांगते की, सृष्टीकर्त्याच्या आज्ञेने कोणीतरी आत्मा देह धारण करण्यासाठी अेक गर्भाशय शोधत असतो. ते त्याला लाभले की आपल्याला अपत्यलाभ होतो. त्याच्या संगोपनाची जबाबदारी पालकांच्यावर आहे, पण त्यास आपल्या फायद्यासाठी वापर करण्याचा अधिकार पालकांना नसतो. जगातल्या कोणत्याही वयाची स्त्री ही मातृस्वरूपात पाहायला शिकले पाहिजे'
शिक्षण क्षेत्रात काही बदल घडवून आणण्याच्या अुद्देशाने काम करणाऱ्या टी बी लुल्ला फाअुंडेशनच्या या नव्या संकल्पनेला मोठीच दाद मिळाली.
Comments
Post a Comment